(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • वेळेची किमया

    वेळ येता उकलन होते, साऱ्या प्रश्नांची

    जाणून घ्या हो थोडे तुम्ही, रीत निसर्गाची...१,

    जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,

    वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,

    प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे

    कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,

    काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे,

    उकलन होवून गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,

    कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला

    हीच वेळेची किमयासारी, कशी कळे कुणाला....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • मी

     

  • प्रत्येकाला इथं दुःख असतं

    प्रत्येकाला इथं दुःख असतं
    असतं फक्त ते दिसतं नसतं,
    हास्य वरवर सगळीकडे असं
    म्हणून त्यात ते कळतं नसतं..
    गैरसमज करणं इथं तर
    खूप सोप्प सहज असतं,
    किंवा गैरसमज करुन
    घेणं नित्य रोज होतं असतं..
    तू मला बोलला मग मी
    राग तुझ्यावर तो धरेन,
    दोन शब्द तुला जास्त बोलेन
    हेच हल्ली मग सगळीकडे दिसतं..
    दुसऱ्याला गृहीत धरण
    सहज मग होतं असतं,
    जबरदस्तीच गणित त्यात
    नकळत सहज घडतं असतं..
    हक्काने रागवणार ओरडणार
    मोठं माणूस आपुलकीच नसतं,
    झाली चूक तर दाखवणारं आता
    आयुष्यात मोठं माणूस समोर नसतं..
    नातं पण हल्ली उलगडत नसतं
    एकमेकांना काय हवे कळतं नसतं,
    साधा गजरा आणण पण प्रेम आहे
    जुन्या पिढीतील हे प्रेम आता माहीत नसतं..
    दोघांचं चुकलं जरास कुठे हल्ली तर
    ओरडण राग हे नवरा बायकोत होतं,
    भांडण राग ह्यात वेळ सगळा जातो
    प्रेम करायला मग अबोला सोबत उरतो..
    फास्ट दुनियेत सगळचं फास्ट मग
    पैसा जवळ खूप ह्यातच सुख कळतं,
    गरजा कमी करुन थोडं तडजोड करुन
    आनंद मिळतो हे मग साधं गणित न कळतं..
    घरी आणि बाहेर पण नित्य हेच
    सगळीकडे घडतं ते असतं,
    हक्क आणि राग ह्यात पटकन रुसणं
    पण समुजन घेणं दुसऱ्याला होतं नसतं..
    कुणीही आवडून जावं सहज मनात
    अशी लोकं भेटणं आयुष्यात छान घडतं,
    नशिबात असेल तितकं दान मिळतं
    हेच तर जीवनाचं अंतिम सार ठरतं
    कुणी मनात गोड आवडून जावं
    अस हल्ली लोकांचं वागणं होतं नसतं,
    आणि आवडलं मनापासून कुणी तर
    ते सांगणं पण हल्ली कठीण असतं..
    मोह व्हावा अगदी साध्या गोष्टींचा
    पण त्या गोष्टी मिळणं अवघड ठरतं,
    देव करतो रचना ही अशी निराळी
    नशीबाचा दैव फेरा काय ते मग समजतं..
    मरणं सोप्प सहज हल्ली झाले
    जगणं फार कठीण होऊन बसलं,
    करोना कधीही घालेल घाला आता
    भीतीच हे संकट थोडं मनात असतं..
    कोण कधी फटकन जाईल
    कुणाला हे कधी माहीत नसतं,
    आज आहे क्षण आपला आनंदाचा
    तरुण म्हातारं काही मरणदारी नसतं..
    आज करते स्वाती कविता ही
    पण उद्या माझं ही मरणं येऊ शकतं,
    नसेल मग मी ह्या जगात अशी
    कधीही श्वास जाऊ शकतो..
    हेच अंतिम सत्य आयुष्यात
    भरवसा जगण्याचा जरा नसतो,
    नको राग द्वेष कटुता भांडण सारे
    मेल्यावर मग हळहळ करणं उरतं..
    जीवनाचे सूत्र हे सहज साधे
    माणूस अवघड ते करतो,
    समजून न घेणं दुसऱ्याला मग
    गैरसमजाचं दुष्ट चक्र ते फिरतं..
    वाचा कविता ही रसिकहो
    मनात किल्मिश कधी नसावं,
    येईल मरणं माझे कधीही मग
    काळ समोर कधी येऊ शकतो..
    निसर्ग,फुलं,पाऊस,काव्यांत
    मन सहज बेधुंद मुक्त करावं,
    कुणी आवडलं मनापासून मग
    हृदयात गोड बंदिस्त करावं..
    कविता झाली माझी मोठी खूप
    तरी रसिकहो वाचा तुम्ही सारे हो,
    गंध कवितेचा मनात माझ्या नेहमी
    स्वातीच्या प्रेमात राहील तारा हृदयस्थ..
    -- स्वाती ठोंबरे.
  • विनम्रता

    लीन दिन ती होवून पुढती,
    झुकली होती त्यावेळी ।
    हात पुढे आणि नजर खालती,
    ज्यांत दिसे करूणा सगळी ।।

    लाचार बनूनी पोटासाठी,
    हिंडे वणवण उन्हांत सारी ।
    वादळ वारा आणिक पाऊस,
    संगत घेवून फिरे बिचारी ।।

    मदतीचा हात दिसे,
    जागृत होता भूतदया ।
    जनसामान्यात असती
    मानवतेतील ही माया ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • नियतीचा फटका

    भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र...

    एक भयानक रात्र अशी,
    सहस्त्रावधींचा घेई बळी ।
    नियतीच्या खेळामधली,
    कुणा न समजे ही खेळी ।।१।।

    मध्यरात्र होऊन गेली,
    वातावरण शांत होते ।
    गादीवरती पडून सारे,
    स्वप्ने रंगवीत होते ।।२।।

    तोच अचानक विषारी वायू,
    पसरला त्या वातावरणी ।
    हालचालींना वाव न देता,
    श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।।३।।

    कित्येक जनांचे बळी घेतले,
    काळ्या काळाने ।
    शांत निद्रेची महा निद्रा,
    करूनी टाकीली क्षणात त्याने ।।४।।

    भरडून गेले सारे परि,
    पापी वा पुण्यवान ते ।
    कळला नाही हिशोब त्याचा,
    मोजमाप काय असते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मायमाऊली मराठी

    माऊली मराठीच माझी मायबोली
    ज्ञानयोगीयांची कनवाळू माऊली
    ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या
    स्वसंवेद्या मराठी माझी मायबोली

    ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वर माऊलीची
    गाथा, जगतगुरू तुकाई माऊली
    भाषाबोध सकल संतसद्गुरूंचा
    माऊली मराठीच माझी मायबोली

    शब्द मराठीच अस्मिता अंतरीची
    गीता, भागवत, दासबोधादी ग्रंथाली
    अक्षर अक्षर, साक्षात्कार स्वयंभू
    माऊली मराठीच माझी मायबोली

    माझ्या मराठीचा मला स्वाभिमान
    जगतवंद्य! ती जगतवंद्य मानिली
    प्राणांहूनही ती श्रेष्ठ आम्हा निरंतर
    माऊली मराठीच माझी मायबोली

    अती आदरे, मराठी अंतरी जपावी
    मराठी मातृभाषा जी आम्हा लाभली
    मराठी भाषा हा अलंकार वैखरीचा
    माऊली मराठीच माझी मायबोली

    -- वि.ग.सातपुते. (विगसा)

    9766544908

    २७ - २ - २०२२.

  • जगलो कसा किती?

    जगी मी जगलो कसा कळले नाही
    पण भोगले ते कधी विसरलो नाही

    आज मनहृदयी घोंगावती गतस्मृती
    स्पर्श वात्सल्यामृताचा भुललो नाही

    मी भाग्यवंत!कृपावंत प्रीतीत डुंबलो
    तो सहवास लाघवी विसरलोच नाही

    भोगले सुखाने, मी भाळीचे दैवदान
    दोष! कधीही कुणाला दिलाच नाही

    लाभले त्याचा सार्थ अभिमान आहे
    दुर्लभतेची, खंत कधीच केली नाही

    सुख, दुःख, वेदनां नित्य संगतीला
    हताश होऊनी मी कधी हरलो नाही

    त्या कृपाळू, दयाघनाची साथ आहे
    भयभीत! मी कधीही झालोच नाही

    जन्ममृत्यू! अटळ कालचक्र सृष्टीचे
    त्यातुनी जगी कुणाचीच सुटका नाही

    जगणेही सुंदर! त्याहूनही मृत्यू सुंदर
    साशंक, मी मनी कधी झालोच नाही

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र.१३९

    २८ - १० - २०२१

  • येतात तुझे आठव….

    येतात तुझे आठव, गगनात काळे ढग,
    उरांत फक्त पाझर,
    शिवाय नुसते रौरव,--||१||

    येतात तुझे आठव,
    सयींची होते बरसात,
    चित्तात उठे तूफांन,
    मनात चालते तांडव,--||२||

    येतात तुझे आठव,
    प्रीतीचे हे संजीवन,
    स्मृतींचे मोठे आवर्तन,
    त्यांचे लागती न थांग,--||३||

    येतात तुझे आठव,
    सरींची त्या उधळण,
    शब्दांचे पोकळ वाद,
    कल्पनांचे नुसते डांव,--||४||

    येतात तुझे आठव,
    अश्रू असूनही शुष्क,
    मन मात्र पांणथळ,
    कसानुसा होई जीव,--||५||

    येतात तुझे आठव,
    भोवती दुःखाची पाचर,
    सहवासाचे अमृतथेंब,
    कधी बनती विष:कण,--||६||

    येतात तुझे आठव,
    प्रेमाचे निव्वळ भास,
    आत्म्यात फक्त उलघाल, काट्यांची बनते शेज,--||७||

    येतात तुझे आठव,
    कधी येईल राघववेळ,
    कुशीत तुझ्या शिरून,
    संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--||८||

    © हिमगौरी कर्वे.

  • कृष्णरूप

    राऊळी, गाभारी
    नयन मी मिटलेले
    अंतरंग उजळलेले
    भक्तीप्रीतीत रंगलेले ।।१।।

    रूपडे निळेसावळे
    कृपासिंधू, कृपाळू
    ओढ नित्य अनावर
    भान माझे हरपलेले ।।२।।

    क्षणक्षण पुण्यपावन
    भक्तीत रंगगंधलेला
    ध्यानमग्न मीराराधा
    कृष्णरूप तेजाळलेले ।।३।।

    रूप लडिवाळ लाघवी
    अंतरी साक्ष दयाघनाची
    निरांजनी दिपवी ज्योत
    श्वास सारे सुखावलेले ।।४।।

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ७९

    १८ - ६ - २०२१.

  • श्रेष्ठत्वात न्युनता विसरते

    विशालतेच्या गुणामध्यें उणीवतेचा लपतो भाग
    चंद्रातील सौंदर्यामुळे आम्ही विसरतो त्याचा डाग

    नदिकांठची चिखलमाती सांचलेली दिसते
    परि निर्मळ प्रवाह वेगांत वाहून ती जाते

    अथांग सागराच्या उदरीं नवरत्नाच्या खाणीं
    विसरुन जातो खारेपणा दुर्लक्ष त्यास करुनी

    सुंदर दिसे रुबाबदार तो पक्षी राज मोर
    आवाज नसे चांगला परिं नाचतो बहरदार

    आकर्षक वाटते मनास फूल गुलाबाच
    लक्ष्य खेचले जातां विचार नसतो कांट्याचे

    कित्येक आहेत विशाल ह्या भूतलावरती
    जीवनांतील न्युनता भव्यतेत लय पावती

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com