रूद्राक्षाच्या माळा घालूनी,
भस्म लाविले सर्वांगाला,
वेषभूषा साधू जनाची,
शोभूनी दिसली शरीराला ।।१।।
खर्ची घातला बहूत वेळ,
रूप सजविण्या साधूचे,
एक चित्त झाला होता,
देहा भोंवती लक्ष तयाचे ।।२।।
शरीरांनी जरी निर्मळ होता,
चंचल होते मन त्याचे,
प्रभू मार्गास महत्त्व देतां,
विसरे तोच चरण प्रभूचे ।।३।।
विधी कर्मात वेळ दवडता,
प्रभू सेवेसी राहील काय ?,
देहाच्या हालचाली बघूनी,
समाधानी तुम्हीं होत जाय ।।४।।
सोडून द्या हे सारे सारे,
जे मनास गुंतवी भलतीकडे,
केवळ तुमचे शांत चित्त,
नेईल तुम्हां ध्येयाकडे ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
ती आत्महत्त्या करताच समाज तिच्याच
चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावून मोकळा होत असतो...
पण तिने आत्महत्त्या करण्यापूर्वी
किती रात्री जागून काढल्या असतील,
किती उश्या तिच्या अश्रुंनी ओल्या झाल्या असतील,
कित्येकदा मनातल्या मनात ती मेलीही असेल
याचा विचार कोणी कधीच करीत नाही...
प्रत्येकाला तिच्या मृत्यूचे कारण जाणण्यात रस असतो...
ती गेल्याचे दु:ख फारच थोड्यांना असतं ...
बाकीच्यांना तो मनस्तापच वाटत असतो...
कोण म्हणतं तिचं प्रेमप्रकरण असेल,
कोण म्हणतं तिचा प्रेमभंग झाला असेल,
कोण म्हणतं ती गरोदर असेल,
कोण म्हणतं तिचे लग्न ठरत नव्हतं,
कोण म्हणतं तिच मन फारच हळवं होतं...
पण खरंच हिच कारणे असतात का तिच्या आत्महत्तेमागे ..?
तिच्या आत्महत्तेची खरी कारणे कधीच येत नाहीत का जगासमोर...
पुरुषांना जन्माला घालणारी स्त्री
त्याच पुरुषांच्या अहंकाराची बळी ठरत असते का ?
ठरत असेल तर हे वेळीच थांबायला हवे !
तिची आत्महत्त्या टाळायला हवी !
नाहीतर... तिच्या अभावी...
भविष्यात कित्येक पुरुषच
आत्महत्त्या करताना दिसतील...
©कवी – निलेश बामणे ( एन.डी.) 18-02-24
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे ।
विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।।
सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी
देह आणि मना, परिणाम करी ।।२।।
लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार
आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३।।
जीवन विषयाचे, बनत असे वलय
रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
समाधान दाही दिशांनी फिरत होतो मनी बाळगुनी तळमळ ती कसे मिळेल समाधान ते विवंचना ही एकच होती धन दौलत ही हातीं असतां धुंडाळल्या त्या बाजार पेठा न मिळे समाधीन कोठें थकली पाऊले चालून वाटा देखिले निसर्गरम्य शिखरे आणिक कांहीं प्रार्थना स्थळे शिलकीमध्यें दिसे निराशा कारण त्याचे कांहीं न कळे
कुठे काय अन कुठे काय
पैशाला येथे फुटले पाय
दीड-दोन दमडी साठी
ईमान येथे विकला जाय
कुठे काय अन कुठे काय
सत्य झाले मिथ्य, मिथ्यस मानले तथ्य
मक्कारी दुनिया करे खोट्याचे नेपथ्य
चौका चौकां मध्ये असत्या चा
पोवाडा आता गायला जाय
कुठे काय अन कुठे काय
जुने गीत, नवीन संगीत
चोरीस आम्ही नाही भित
नाविण्य आला नाही संधी
हुन्नर येथे लयाला जाय
कुठे काय अन कुठे काय
कसला छंद, ही कसली धुंदी
नशेच्या बाजारातील हे सगळे नंदी
दिवसा ढवळ्या या पोळ्यांचा
रंगा नाच रचला जाय
कुठे काय अन कुठे काय
लोकांचे राज्य, पोसले राजे
जाे तो स्वार्थाची पोळी भाजे
तळागाळातील लोकांन साठी
येथे कोणी वाली नाही
कुठे काय अन कुठे काय
तर्काचा बाेध, उत्तरांची शोधा शोध
विज्ञानाच्या नावे सोडला प्रबोध
आधुनिकतेच्या पायाखाली
नैतिकता ही चिरडली जाय
कुठे काय अन कुठे काय
नवा दिवस नवीन प्रीत
रोज हवा नवीन मित
वासनेच्या लाटेवरती
मन मात्र पोहोत जाय
कुठे काय अन कुठे काय
कुठे काय अन कुठे काय
सगळच येथे जुनेच हाय
तुम्हीच तुमचं बघा विनोद बाबू
बाकी दुनिया भाड मे जाये
-- विनोद खराडे
विलासराव देशमुखांना विचारले- का हो तुम्हाला मुख्यमंत्रीपद का सोडावे लागले? तेव्हा ते म्हणाले- माहित नाही यापूर्वीही असेच झाले होते-
मनोहरला विचारले
का रे बाबा का दूर केले?
म्हणाला माहित नाही
विलास ला विचारले
का रे बाबा का दुर केले?
म्हणाला माहित नाही
सुशीलला विचारले
का रे बाबा कधी दूर होशील?
म्हणाला माहित नाही
जनतेला विचारले
का हो का दूर करतात असे?
जनता म्हणजे माहित नाही
कारण जनतेला कधी
आपल्या मतांची किंमत
कळलेच नाही
-- विनायक अत्रे.
दिनांक: १७/०१/२००३.
प्रदीप निफाडकरांची गझल
अरे माझी माय .. माझी माय ..
म्हणून सगळेच बोंबलतात
बाप तुमचा मेलाय काय...?
आईनं जन्म दिला आईनं वाढवलं
बापाचं योगदान काहीच नाही काय ?
रडत होती पण लढत होती
बरंच सोसावं लागलंय तिला
बापाचा हात पाठीवर होता
म्हणून लढली कधी तरी विचारा तिला.!
आईच्या डोळ्यातलं पाणी आणि
दाटलेले हुंदके सगळ्यांना दिसतात
अरे दिसले नाही कधी कुणाला पण
बापाच्याही डोळ्यात अश्रू असतात..!!
आजची लेक उद्या बहीण प्रेयसी
पत्नी आणि आई होणारच आहे
तु सुध्दा मुलगा आहेस उद्या भाऊ
प्रियकर पती आणि बाप होणारच आहे.
जिवनाच्या जत्रेला जायला जी वाट
काल होती तीच उद्या असणार आहे
निष्ठूरपणे अडगळीत टाकलेल्या बापाच्या जागी
तु ही उद्या बसणार आहे..!!
-- राजेश जगताप
महात्मा गांधींना गोरगरिबांविषयी अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता, आपल्या प्रत्येक कृतीमधून गरिबाविषयीचा कळवळा ते व्यक्त करीत असता. गांधीजींच्या आश्रमात एक तरुण डॉक्टर सेवक होता. तो परदेशातही जाऊन आला होता. मात्र महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन तो त्यांच्या आश्रमात आला होता. आश्रमात येणाऱ्या रुग्णांवर तो गांधीजींच्या सल्ल्याने निसर्ग उपचार करीत असे.
एकदा सकाळीच आश्रमात एक आजारी महिला उपचार घेण्यासाठी आली. आजारपणामुळे तिला खूपच अशक्तपणा आला होता. महात्मा गांधी त्या डॉक्टरला म्हणाले की, या महिलेला कडूनिंबांची पाने खाऊ घाला! तसेच तिला ताक घ्यायला द्या. काही दिवसांनी ती बरी होईल. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे महिलेला कडुनिंबाची पाने व ताक द्यायला सांगितले. दुपारी गांधीजी व डॉक्टरांची पुन्हा भेट झाली. त्या वेळी गांधीजींनी त्या डॉक्टरला त्या महिलेला कडूनिंबाची पाने व ताक दिले का हे विचारले. त्यावर डॉक्टरने हो, तिला घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे तिने घेतली असेल असे सांगितले. त्यावर गांधीजी त्याला म्हणाले, घेतले असेल म्हणजे? तुम्ही तिला ते स्वतः दिले नाहीत काय? त्यावर डॉक्टरने नकारार्थी मान हलविली.
गांधीजी त्याला म्हणाले की, केवळ औषध घ्या एवढेच सांगणे हे डॉक्टराचे काम नसते तर ते घेतले की नाही हे पाहणेही डॉक्टरांची जबाबदारी असते. त्यानंतर गांधीजी स्वत: आश्रमात फिरले व त्या महिलेला त्यांनी शोधून काढले व तिची विचारपूस केली. त्या वेळी ती महिला म्हणाली की, ग्लासभर ताक घ्यायला देखील माझ्याजवळ पैसे नाहीत. त्या महिलेचे दारिद्रय पाहून गांधीजींना खूप वाईट वाटले. त्यांनी त्या महिलेला आश्रमात ठेवून घेण्याबाबत संबंधितांना सांगितले व त्या डॉक्टरलाही तिच्यावर जातीने देखरेख करून रोज सांगितलेले औषध देण्यास सांगितले. काही दिवसांनी ती महिला खडखडीत बरी होऊन आश्रमातून आपल्या घरी गेली.
Copyright © 2025 | Marathisrushti