(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मुलांचं विश्व

    आमच्यासाठी घर हेच
    आमचं संपूर्ण विश्व होतं
    विश्वाच्या पसाऱ्यात यांना मग
    आमचंच घर कसं दिसत नाही

    आसूसून यांच्यासाठी आम्ही
    किती जमवले आनंदाचे कवडसे
    नाही खिजगणतीतही त्यांच्या
    आम्ही किंवा आमचे उसासे

    उमेद होती तेव्हा कशाकशाची
    तमा नाही बाळगली श्रमाची
    उमजत नाही बाळगावी का
    उमेदही यांच्या तारतम्याची

    केवढा ध्यास आम्हाला, यांचे
    हात लागावेत गगनाला
    पाय तरी ठरतील जमिनीत का
    वाटते आता शंका मनाला

    घ्यावी भरारी त्यांनी म्हणून
    धावलो घेऊन वेड्यागत आपण
    दिशा हुकली की आशाच चुकली
    वाटतं पाहून आता रिकामं अंगण

    कळकळ नि काळजी आमच्या
    असायची काळजात घर करुन
    आता नशिबी आहे रहाणं
    काळजाला पडलेली घरं मोजून

    काळजातले झरे आमच्या
    वाहले प्रसंगी प्रवाही बनून
    कातळात खडखडाट यांच्या
    नसावा पाझर जराही काहून

    सदैव अवतीभोवती यांच्या
    करत आम्ही बाळ, बाळ
    त्यांना फुरसत नसावी पुसाया
    का असाही आता यावा काळ?

    व्यापात कामाच्या आपण
    तरीही घेत होतो यांची चाहूल
    गुंग हे स्वतःतच कायम
    विश्वात आपल्या होऊन मश्गूल

    यांच्या हुसक्याच्याही धसक्याने
    जागलो कितीकदा दचकून आपण
    धसका अजूनही बसतो हृदयाला
    हाक आमची कुठंवर पोचेल
    कानावर यांच्या की पल्याड होऊन

    आमच्या अपेक्षांची तुम्ही
    करा भले उपेक्षा, केवळ
    उपेक्षेचीच तुमच्या करायला
    लावू नका आम्हाला अपेक्षा

    एकंदरीत हे जगच सारा आहे केवळ भास
    तेव्हाही, जेव्हा वाटलं आपण होतो मुलांचे
    आताही, अन्... जेव्हा जाणवतं मुलं नव्हतीच आपली

    -संगोपनास समर्पण
    (आईच्या, आईच्या पिढीच्या आशंकित भावनांना शब्दरुप)

    --यतीन सामंत
    ऋणानुबंध या कविता संग्रहातून
    (९/१२/२००१)

  • वळून पहा

    उडून गेली दूर दूर तू
    झेप घेउनी आकाशी
    बघू लागलो चकीत होऊनी
    पंखामधली भरारी कशी

    नाजूक नाजूक पंखाना
    आधार होता मायेचा
    चिमुकल्या त्या हालचालींना
    पायबंध तो भीतीचा

    क्षणात आले बळ कोठून
    विसरुनी गेलीस घरटे आपुले
    बंधन तोडीत प्रेमाचे
    आकाशासी कवटाळले

    कधीतरी उडणे, आज उडाली
    बघण्या साऱ्या जगताला
    किलबिल करून वळून पहा
    दाणे भरविल्या चोचीला

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • संमेलन

    सम्मेलन भरली गेली पाहिजेत
    एकमेकांना मीठी मारून रडण्यासाठी
    एकमेकांना मीठी मारून हसण्यासाठी
    एकमेकांची सुख दुःख जानून घेण्यासाठी I

    सम्मेलन भरली गेली पाहिजेत
    जातिवाद मिटवण्यासाठी
    धर्मवाद मिटवण्यासाठी
    एकमेका बद्दलचे द्वेष मिटविण्यासाठी l

    सम्मेलन भरली गेली पाहिजेत
    सर्व धर्म समभावासाठी
    अज्ञानाचा अंधकार मिटविण्यासाठी
    गुणी गोविंदाने कसे रहावे ते सांगण्यासाठी l

    केवळ आपला मोठेपणा मिरविने
    स्वताचा मान सम्मान कमवीने
    इतर सम्मेलन भरवीता कशासाठी
    बाकीचे विषय उगाच कोणासाठी l

  • उमलत्या फुलांत गंध सारे

    उमलत्या फुलांत गंध सारे
    अलगद बेधुंद मन व्यापून आहे
    मोगऱ्याचे आल्हाद धुंद बहरणे
    जीव गुंतून हलकेच बावरुन आहे
    कळ्यांचे गाणे फुलांशी जोडले आहे
    नाजूक कळ्यांत श्वास वेढून आहे
    पानांत हिरव्या मन ओलं जपून आहे
    मोहक निशिगंध अंतरी फुलून आहे
    लाजून अबोली केसांत माळून आहे
    ओल्या स्पर्शात प्राजक्त गंधाळून आहे
    प्रियेचे लाजणे रातराणीत लपून आहे
    प्रेमाचे प्रतीक गुलाब मोहक सजले आहे
    प्रत्येक फुलांत सजून प्रीत हृदयी आहे
    केवड्याचा गंध केसात भरुन आहे
    अबोल प्रीत लाजरी प्रियेच्या स्पर्शात आहे
    फुलांचे गाणे अलवार चाफ्यात दरवळून आहे

    -- स्वाती ठोंबरे.

  • एक कप चहा…

    कामाच्या पहिल्याच दिवशी लिखाण राहिले बाजूला लिखाणाच्या माध्यमातून जाहिराती कशा मिळविता येतील, जास्तीत- जास्त लोकांपर्यत पोहचून लिखाणाच्या माध्यमातून पैसे कसे उभे करता येतील यावरच चर्चा होऊ लागली.

  • आयुष्यात कधी केव्हा

    आयुष्यात कधी केव्हा
    काही अकल्पित घडतं,
    नियतीच्या हातातील सूत्र
    अचानक मग बदलतं..
    काळ नावाचा घाला
    अवचित आयुष्यात येतो,
    होत्याचं नव्हतं एका
    क्षणात सगळं होतं..
    नशीबापुढे माणूसही
    हतबल असह्य होतो,
    जितकं असेल जीवनात
    तितकचं दान पदरी पडतं..
    क्षणभंगुर आयुष्य सारं
    शाश्वती कसलीच नसते,
    आज आहे तर उद्याची
    खात्री नक्कीच नसते..
    भोग असतात जीवनात
    भोगून जायचे असतात,
    चार प्रेमळ माणसं भेटता
    आयुष्य नौका सहज तरतात..
    जीवनच उसन असतं
    विधात्याचं पानं असतं,
    बोलावणं आलं यम दारी
    की हे देवाचं दान असतं..
    खांदा द्यायला चार जण तर
    अश्रू पुसायला पण हवं असतं,
    अंतिम यात्रा किती मोठी मग
    माणसाचं मोठेपण त्यात असतं..
    कोण कसा जीवनी येतो
    हे विधात्याचं गणित असतं,
    माणसं जोडावी आपुलकीने प्रेमळ
    हे मात्र आपल्या हातात असतं..

    -- स्वाती ठोंबरे.

  • नामस्मरणाचे कोडे

    मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
    कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
    कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।

    श्वास चालतो रात्रदिनीं,
    लक्ष्य न घेई खेचूनी,
    ऊर्जा मिळते देहातूनी,
    परि मनास बंधन नसावे....१,
    कोडे हे उकलून घ्यावे

    एकचि कार्य एके क्षणी,
    एकाग्रता येई दिसूनी,
    अवसर मिळे मग कोठूनी,
    त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२,
    कोडे हे उकलून घ्यावे,

    संसाराचे ‘जू’ मानेवर,
    ओढण्यासांगे ईश्वर,
    मार्ग सारे असता खडतर,
    कसे त्यास वळवावे पाहावे......३,
    कोडे हे उकलून घ्यावे.

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • दृष्टीची भ्रमंति

    बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं

    लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी १

    चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे

    फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे २

    वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले

    भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले ३

    मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला

    स्थिरावली ना दृष्टी तेव्हां, क्षणभर देखील एका बिंदूला ४

    दृष्टीला परि पडले बंधन, एका दिशेने बघण्याचे

    व्यवहारातील जगामध्ये, पडता पाऊल तारुण्याचे ५

    प्रवाही होते जीवन सारे, जगण्यासाठी धडपड लागे

    रम्य काय ते मधुर काय ते, विसरु गेली जीवन अंगे ६

    राग लोभ आणि प्रेम गुणांचे, दृष्टीमध्ये मिश्रण होते

    अहंकाराने ताठर करुनी, प्रेमाने कधी झुकविले होते ७

    दुजासाठी मी आहे येथे, विवेक सांगे हे दृष्टीला

    शोध सुखाचा घेता घेतां, थकूनी गेलो संसाराला ८

    तन मन जेव्हां झाले दुबळे, दूर दृष्टी ही गेली निघूनी

    आकाशातूनी क्षितीजावरती, आणि तेथूनी आतां धरणीं ९

    वाकूनी गेले शरीर आणि, ह्रदय स्थरावर दृष्टी लागली

    दाही दिशांनी धुंडत धुंडत, अखेर देहा भवती वळली १०

    फिरली दृष्टी जीवनभर जी, वैचित्र्याला शोधीत असता

    डोळे मिटूनी नजीक पहा, सांगे तिजला निसर्ग आता ११

    आनंदाचे मुळ गवसले, अंतर्यामी वसले होते

    आज पावतो विश्व फिरुनी, मुळ ठिकाणी आले मग ते १२

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • पारिजातकाची फुले आम्ही

    पारिजातकाची फुले आम्ही, विसावलो या डहाळीवर,
    फुलण्या सगळ्या अंगोपांगी, कळीकळीने केला कहर, --!!!

    जगणे असावे लोभसवाणे,
    सुंदर आणि कसे निशांत,
    पाहून आमचा असा बहर,
    माणूस होऊन जातो कृतार्थ,

    रंग पांढरा आमुचा शांतीचा, त्याखाली देठ रक्तरंगी,
    पाकळ्या फुलल्या चहूबाजूच्या, सौंदर्य ओसंडे विविध ढंगी,--!!!

    असे किती असावे जगणे,
    फार नाही, आम्ही अल्पायुषी, तरीही आम्ही फुलत राहतो,
    मानत त्यात खरी राजीखुशी,-

    पहाटवेळी होते पखरण,
    फूल एकेक करुन ढळते,
    संगत आमुची सोडून जाती, भाईबंद बघा ना , कायम ते,--!!!

    नाही दु:खी आम्ही त्यावरून, जगणे सारे जगां अर्पियले,
    आरक्त आम्ही मोहक संन्यासी, करत विरक्तीचेच मार्ग खुले,--!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

  • गेट सेट गो २०२५

    …. पण ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतुकीच्या साधनांचा विचार केल्यास आपले विचार किती मर्यादित आहेत आणि वाहतुक व्यवस्थेबद्दलची आपली माहिती किती त्रोटक आहे हे लक्षात येते.