आत्मविश्वास जागृत ठेवूनी,
कार्य घेवूनी तडीस नेती ।
कधीही न राही अवलंबूनी,
मदतीसाठी दूजा वरती ।।
ईश्वर करीतो मदत तयांना,
मदत करी जे आपले आपण ।
आपल्यातची तो ईश्वर आहे,
असते याची जयास जाण ।।
विश्वासाने हुरूप येई,
जागृत करीती अंतर चेतना ।
लक्ष्य सारे केंद्रीत होता,
यश चमकते प्रयत्नांना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
लोंबकळलेल्या खाली शेपट्या,
पिल्लू मौज करे कशी,---?
शोधक बुद्धी, चौकस नजर,
अफलातून फळते अशी,--!!
युक्ती,शक्ती, बुद्धी,
जिवाला आहे देणगी,
सदुपयोगाने करा किमया,
मौजेने जगा,ही वानगी,---!!
दिसे पिल्लू छोटेसे,
तरी मस्त आहे कल्पनाशक्ती,
आरामात कसे झोके घेई,
दुनियाच भासे त्यास छोटी,---!!
डोळे मिचकावत, पिल्लू बघते
आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे,
भरभरून लुटेन आनंद मी,
सोडवेन निसर्गाचे अनवट कोडे,!
©️ हिमगौरी कर्वे.
भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले
करण्यास तव जवळीक, कामास तेच आले
जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम
उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म
भक्तीभावाची करिता बात, ती तर असे आगळी
पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी
भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन
नाचत गांत राहिली, केले तुझ पावन
दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले
त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले
सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी
भावनेची ज्योत पेटतां, कदर तुच करिसी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
रुजला पाहीजे विचार मनांत
सारेच प्रभुचे असे ह्या जगांत
जो वरी आहे मी माझे येथे असे
त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे
स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे
मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे
बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं
प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील हा घडलेला किस्सा. या निवडणुकीच्या वार्तसंकालानासाठी एका खेड्यात जाण्याचा प्रसंग आला होता. दुपारची वेळ होती. चहा घेण्यासाठी म्हणून गावाबाहेरील रोडवर असलेल्या हॉटेलात बसलो होतो. दिलेल्या ऑर्डरचा चहा येण्याची वाट पहात होतो,
माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही म्हणायला ९-१० वर्षांचा होईपर्यंत मी आजोळी (आईच्या माहेरी) डोंबिवलीला वाढलो. डोंबिवली म्हणजे मुंबईपासून ५० कि.मि.वर ठाणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. मध्य रेल्वेवर ठाणं आणि कल्याण या दोन मोठया गावांच्या मधे आणि रेल्वेच्या लोकल सेवेने मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर. १९६५ – १९७० च्या सुमारास देखील डोंबिवली फार वेगळं होतं. त्यावेळी ते उच्चभ्रू, सुसंस्कृत लोकांचं, मुंबईच्या धकाधकीपासून दूर पण तरीही सोईस्कर अंतरावर वसलेलं असं एक छोटंसं वसतिस्थान होतं. गावाच्या सुसंस्कृत वातावरणाची साक्ष पटवण्यासाठी पु.भा. भावे आणि शं.ना.नवरे यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक / नाटककार डोंबिवलीला आपलं घर मानून रहात होते.
आजीच्या घरातून पाठीमागे भाताची शेती दिसायची. पुढच्या अंगणात पेरू, चिंचा, जांभूळ आणि पपईची झाडं होती. त्यामुळे घरची फळं खाण्याचा आनंद उपभोगला होता. आजीच्या घरापुढच्या रस्त्याच्या कडेलाच भाजीवाले, फळवाले टोपल्या घेऊन विकायला बसायचे. त्यावेळी डोंबिवलीत व आजूबाजूच्या खेड्यांमधे आगरी लोकांची वस्ती खूप होती. आगरी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. कमरेला जेमतेम फडकी गुंडाळलेले आगरी पुरुष आणि चापूनचोपून नेसलेल्या रंगीबेरंगी लुगडयातल्या आगरी बायका कायम दिसायच्या. सगळे रापलेले आणि काटक. पुरुषांच्या कमरेला उघडे कोयते आणि बायकांच्या केसात भरपूर फुलं. काही आगरी बायका आजीकडे वर्षानुवर्षे घरकामाला होत्या. कुणी शेतातले तांदूळ घेऊन यायचं, कुणी वरी, तर कुणी करवंद. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड, टरबुजांनी भरलेल्या बैलगाडया घेऊन आजूबाजूच्या खेडयांतून आगरी लोक यायचे. आजीच्या घरासमोरच बैलगाडया सोडून बैलांना बांधून ठेवलं जायचं. या बैलगाडया घेऊन येणारे काही आगरी लोक आजीच्या चांगले ओळखीचे झाले होते. मग ते कधी कधी विकायला आणलेल्या कलिंगडांची रास आजीच्या घरातच लावून जायचे.
आजीच्या घरासमोरचं अंगण मातीचं होतं. दर आठवडा पंधरवडयाने ते शेणानं सारवलं जायचं. समोरच्या रस्त्याच्या कडेला भाजीवाल्यांनी इतस्तत: टाकून दिलेला सडका भाजीपाला खायला गावातली भटकी गाई-गुरं यायची. ती कधी मधी आजीच्या अंगणात फुलझाडं खायला किंवा अंगणात वाळत टाकलेलं काही हुंगायला यायची. मग त्यांना आरडा ओरडा करून हुसकावून लावलं की मोठंच काम केल्यासारखं मला वाटायचं. शाळेतनं आलं की संध्याकाळी हुंदडतांना आसपास मोकाट गुरांचा वावर कायम असायचा. त्यातले काही सांड कधी कधी एकमेकांवर नाक फेंदारून आणि शिंगं रोखून चालून जायचे आणि त्यांच्या झुंजीमुळे सगळीकडे धुरळा उडायचा. आसपासचे लोक आरडा ओरडा करून, दगडं काठया मारून त्यांना पळवून लावायला बघायचे. मग तो सगळा गलका ऐकून आजी किंवा मामा धावत बाहेर यायचे आणि आम्हा मुलांना घरात घेऊन जायचे.
त्याकाळी डोंबिवली गावाच्या थोडसं बाहेर गोग्रासवाडी म्हणून एक गोशाळा होती. आजूबाजूला भरपूर झाडी आणि शेतं असलेलं ते एक शांत आणि सुंदर ठिकाण होतं. कधीतरी काही सणानिमित्ताने किंवा केवळ सहलीसाठी आजी आणि आजूबाजूच्या बायका आम्हा मुलांना तिकडे घेऊन जायच्या. त्या श्रद्धाळू बायकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं त्या गाई वासरांना हिरवं गवत आणि गूळ खायला द्यायचो आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून नमस्कार ठोकायचो.
माझ्या मामांना भटकण्याची खूप आवड. त्यामुळे शनिवार-रविवारी आसपासच्या खेडयांमधे, टेकडयांवर, खाडयांवर मामांबरोबर मी खूप भटकलो. कल्याण किंवा मुंब्र्याच्या खाडीवर जायचं, करवंदाच्या जाळीमधून फिरून करवंद खायची, शेतांच्या बांधांवरून चालायचं, पावसात भिजायचं हे सारं भरपूर केलं.
एकंदरीत १९६० च्या दशकातल्या डोंबिवलीने मला एका छोटयाशा गावातलं स्वछंद बालपण उपभोगू दिलं. त्या निमग्रामीण वातावरणाचा रंग माझ्या नकळत माझ्या अंतरंगावर पक्का बसला आणि मग पुढे शहरी वातावरणाचे, रंगाचे, कितीही थर त्यावर चढले तरी तो मूळ निमग्रामीण वातावरणाचा गाभा काही पुसला गेला नाही.
१९७१ साली आजोळ सोडून मी माटुंग्याला (मुंबई) आई वडिलांकडे रहायला आलो. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या, त्या काळच्या मुंबईतल्या अग्रगण्य शाळेमध्ये पाचवीपासून शिकू लागलो. दादासाहेब रेग्यांसारख्या (मुलांसाठी “दादा”) शिक्षण महर्षींनी सुरू केलेल्या या शाळेने, मराठी माध्यमाची कास धरून, मध्यमुंबईतल्या कमीत कमी दोन पिढयांवर शुद्ध मराठी मध्यमवर्गीय संस्कार केले.
जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा ।
दोन चाकांत येईल, मोडेल त्याचा कणा ।।
जीवन मृत्यूची चाके, सतत फिरत राही ।
येई जो मध्ये त्याच्या, मागे न उरेल काही ।।
मध्यभागी राही स्थिर, आंस त्यास म्हणती ।
वरचे चाक फिरे, त्याच्या भोवती ।।
आंसाजवळील दाणा, दूर तो चाकापासूनी ।
परिणाम चाकाचा तो होईल, मग कोठूनी ।।
जन्म मृत्यूची चाके, ईश्वर हा फिरवतो ।
जवळीक त्याची मिळता, दु:खातून मुक्त होतो ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
वाहतो पवन बेभान धुंदला
उधळीत गंध शब्दभावनांचे
गडगडता अंबरी कृष्णमेघनां
प्रीतगान, मृदगंघले वसुंधरेचे
ओढ अधीर, अवीट मधुरम
संथ झुळझुळणे ते निर्झराचे
मन ओले, ओले चिंब चिंबले
साक्षात्कार प्रसन्न वर्षाऋतुचे
स्वर, पावरीचे श्रावण श्रावण
सप्तरंगलेले, इंद्रधनु अंतरीचे
हे स्वानंदाचे सात्विक सोहळे
संगीत जणु, कृतार्थ जीवनाचे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२६
५/९/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti