सह्यगिरीच्या डोंगररांगा
हिरवाईने नटून बहरल्या |
रंगबिरंगी रानफुले गोजिरी
भाळावरती त्यांनी माळीली |
संततधारा शिरी बरसात होत्या
मेघातुनी अलवारश्या रेषा |
झाकोळून गर्द रंग हा गहिरा
घननीळ नभातच मिसळून गेला |
वेध लागले सहस्त्ररश्मीला
कधी पाहतो शृंगार धरेचा |
हळूच बाजूला करुनी ढगांना
थोपविल्या त्या झरझर धारा |
अलगद पसरली रवी किरणेही
सोन पाऊली धरणीवर उतरली |
उघडून निळी आभाळाची छत्री
प्रतिबिंब पडे नदीच्या पात्री |
व्योमाच्या या लख्ख उजेडात
सातारा माझा उजळुन निघाला |
सृष्टीच्या ऐकून या काव्या
भैरोबा पेढ्याचा हसला ||
?मी सदाफुली
©✍️संध्या प्रकाश बापट

हिरवेगार तृणपाते,वाऱ्यावर डोलत होते,
मजेत इकडून तिकडे,
मान करत गुणगुणत होते,---
लहान बालिश वय कोवळे,
कंच हिरव्या रंगात खुलत,
खुशीत झोके घेत होते,
बाळां काय ठाऊक असे,
किती कठीण असते जगणे-?
मौजमजा आणि हुंदडणे,
करत करत एकदम कोसळणे वास्तवाशी सामना होतां,
भलेभले धुळीस मिळती,
हे तर इवलेसे तृणपाते,
कितीशी असेल लढाऊ शक्ती,-?
कुणीतरी आले तिकडून,
पाय ठेवुनी उभे राहिले,
हिरवेगार तृणपाते मग,
पायाखाली ,चुरडले गेले,--!!!
वेदना, यातना, भोग प्रवास, तृणपाते कळवळले मनांत,
चिरडल्याने कुठेतरी आंत,
उद्ध्वस्तही सर्व मनोरथ,
किती दिवस आले, आणिक
आलेले ,गेले, संपले,--!!!
तृणपाते कोलमडलेले पुन्हा,
बघां,--उठून उभे राहिले,--!!!
करूण दशा त्याची पाहून,
वारा फुंकर घाली,
काळी आई तळमळून,
खालून त्याला कवटाळी,
सूर्यराज गगनी उभे,
वरुन किरणे सोडती,
प्रकाश देऊन आपुला,
अलगद कसे कुरवाळती,
शेतातील पाटाचे पाणी,
खळबळे सारखे खाली,
थेंब थेंब देई त्याला,
अलोट जगण्याची शक्ती,--!!!
तृणपाते राहिले उभे,
एकवटून सारी जीवनशक्ती,
संकटाशी सामना करते,
सरतेशेवटी इच्छाशक्ती,--!!!!
एवढेसे असून तृणपाते,
शिकवी केवढे आपणां,
डोंगर कोसळले संकटांचे,
तरी दाखवा कणखरपणां,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
देवा मोरया हो , राया मोरया हो
अमुच्या गेहीं जन्म-उत्सवीं प्रतिवर्षीं या हो ।।
हे गौरीसुत मंगलमूर्ती
दिगंत गाजे तुमची कीर्ती
रूप मनोहर, हे लंबोदर, दृष्टि नित्य पाहो ।।
मुख हें, गजमुख-स्तोत्रगायना
कर उधळोत तुम्हांवर सुमनां
तुमच्या पुण्यद पायांवर हा नित माथा राहो ।।
प्रदक्षिणा पद करो मंदिरा
कान ऐकुं दे तव शुभ-मंत्रा
उत्सवसमयीं तुमच्या मूर्तिस अमुचें शिर वाहो ।।
गेह आमुचें करता पावन
देह तुम्हां वंदण्यां समर्पण
सुखमय होण्यां जीवन, आशिर्वाद अम्हां द्या हो ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
होता एक गरीब बिचारा ।
किडूक मिडूक ते जगण्या चारा ।।
कौलारु जुनी पडवी निवारा ।
जन्म दरिद्री दिसे पसारा ।।
परिस्थितीनें गेला गंजूनी ।
आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।।
शरीर जर्जर झाले रोगांनी ।
जगण्याची आशा उरे न मनीं ।।
अवचित घटना एके दिनीं ।
धन सापडे जमिनीतूनी ।।
मोहरांचा तो होता रांजण ।
गेले सारे दारिद्य निघूनी ।।
जन्मभर ते त्याने भोगले ।
घरांत लक्ष्मी, परी सोसले ।।
अज्ञानातची हे घडले ।
असून पाण्यांत तरी तहानेले ।।
शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठा ।
लपला आहे अंतर्यामीं मोठा ।।
नसेल तेथे आनंदा तोटा ।
मिळतील सदैव यश वाटा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण
दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,
फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी
पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,
चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम
खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,
वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती
तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दोन थेंब गंगाजळ
मृत्युच्या दारी
स्वर्गाचे तिकीट
रोज पी गंगाजळ
त्वरित मिळेल
स्वर्गाचे तिकीट.
टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.
बलात्काराच्या बातम्या वाचल्या की लाज वाटते ...
आपण पुरुष असल्याची...
त्या षंढांमुळे पुरुष बदनाम होतो...
प्रत्येक पुरुष स्त्रियांच्या नजरेत दोषी दिसतो...
प्रत्येक पुरुष लबाड असतो पण षंढ नसतो...
तिच्या रक्षणासाठी कित्येकदा तो आपल्या प्रणाचीही बाजी लावतो...
ती मिळविण्यासाठी असतानाही तिला मिळविण्याचा प्रयत्न करतो...
तिला पाहून पुरुष उत्तेजित होतही असेल पण बेभान होतोच असे नाही...
पुरुषाच्या मिठीत स्त्री सुरक्षित असते पण स्त्रीच्या मिठीत पुरुष सुरक्षित असतोच असे नाही...
पुरुषांतला पुरुष नाही तर षंढ बलात्कार करतो पण बदनाम मात्र पुरुष होतो...
स्त्रियांच्या नजरेत आज प्रत्येक पुरुष बलात्कारी दिसतो...
स्त्रीला पुरुषाचा चुकून झालेला स्पर्श ही तिला तिच्यावरील बलात्कार वाटतो...
या षंढांमुळेच स्त्रियांना पुरुष फक्त पुरुष नसतो तो बाप, नवरा, मुलगा, भाऊ ही असतो याचाही विसर पडतो...
प्रत्येक पुरुष षंढ नसतानाही या बलात्कारी षंढांमुळे आज प्रत्येक पुरुष उगाच बदनाम होतो...
कवी- निलेश बामणे
दिवस बदलले तरी
'Middle Class' जात नाही
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
दुधाची साय, तुपाची खरवड
तिळाची वडी, पुरणाची पोळी,
आईच्या जेवणाची सर
पिझ्झाला येत नाही.
हॉटेलात गेले तरी
मेनूवर 'दर' दिसत राही
रिक्षा केली तरी
मीटरवरून नजर हटत नाही.
जीन्स घातली तरी
साडीची हौस सुटत नाही.
घरातून निघताना आजही
पाया पडायला विसरत नाही.
शो रुमचे दर पाहून
पाय ठेववत नाही.
केली खरेदी जास्त
तर झोप येत नाही.
नाताळ साजरा केला,
'विश' केले 'मदर्स डे'ला,
तरी वाढदिवसाला आईने
ओवाळणं सुटत नाही.
घर कितीही मोठ्ठ असो,
सगळे असताना, गप्पा मारत
हॉलमध्ये, ओळीने झोपण्यासारखी
मजा कशातच येत नाही.
पैसा असो पैसा नसो
स्वभाव जात नाही.
सुंभ जळला तरी
पीळ जळत नाही.
आणि त्याचं आम्हाला
काहीही वाटत नाही.
-- WhatsApp वरुन आलेली पोस्ट. आवडली म्हणून शेअर केली.
-- सुशांत
आम्ही साहित्यिक आहोत
रमू सदैव लेखणीत
लिखाणात भाव असोत
चलाख शब्द पेरणीत
सौ.माणिक शुरजोशी
Copyright © 2025 | Marathisrushti