गावाकडच्या खेळाची रंगत भारीच असायची.दुपारच्या वेळी सर्वत्र सूर्य आग ओकत असतांना आम्ही पोरंसोरं मात्र खेळात दंग असायचो.बारवंवरच्या मळयात मोठया केळया आंब्यावर आमचेच राज्य चालायचे..राम्या.मारत्या, देईद्या,सरावण्या, सख्या,डिग्या,दास्या किती नावं घ्यावीत.डाफ नावाचा खेळ एवढा रंगायचा की तहान भूक विसरून जायची.आज हे खेळ नामशेष होत आहेत.
भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनि ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा! तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतररुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी, गोपहि गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामारोष मनीचा मावळला!
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाळा या फुलमाला रम्य फुले-पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना, हर्ष माहीना हृदयात,
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावण महिन्याचे गीत !
आकाशाशी स्पर्धा करणे, हीच मातीची ओढ असे,
खालून मुळ्यांची पेरणी,
झाडाझुडपांचा पायाच असे,
वाढावे असेच उदंड,
खालून वरवर जावे,
कितीही वर गेलो तरी,
पायाला न कधी विसरावे,
गगन विस्तीर्ण भोवती,
बुंध्यातून वाढीस लागावे,
फांद्या पाने ,फुले यांनी,
खोडास सतत बिलगावे,
झाड लेकुरवाळे असते,
तरी किती निस्संग,---!!!
एक निळाई त्याच्या डोळी,
दुसरा न कुठला रंग ,--!!!
*हिरवे असून, आसमानी जाई,
अवती भोवती किती लेकरे,
सोडून सगळ्या ऐहिक गोष्टी, मोक्षाचा फक्त माग काढे*,--!!!
फांद्या, पाने, फुले सारे,
शिकती सारे झाडाकडुनी, दुसऱ्याला देऊन टाकणे,
स्वार्थ कधी नसतोच मनी,--!!!
म्हणूनच का एवढे जाते,
उंचावरती पसरत ते ,------?
कुठून आणे तटस्थ वृत्ती,
संन्यस्त अश्वत्थ बनते,--?
© हिमगौरी कर्वे.
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता,
रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।।
मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला,
पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।।
धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली,
अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।।
जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला,
समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।।
वाम मार्गी जावून त्याने, तेच धन पुन्हा कमविले,
सूड घेतला असून देखील, समाधान ते नाही लाभले ।।५।।
दुष्ट वृत्तीची वलये ती, फिरत असती सभोवती,
सूड अहंकार लोभही, त्यानाच गतीमान करती ।।६।।
एका वरचा राग तुम्ही, फैलविता सहजपणे,
तोडून टाका ही वलये, प्रेम दया या भावनेनें ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जन्मभूमीपासून दूर,मातृभूपासून वंचित,
लहान मुलासारखाच मी, तिच्यासाठी सदैव सद्गदित,---!!!
उठे स्मृतींचे मोहळ,
स्मरणांच्या माशा डंसत,
भारतीय म्हणून मी,----
झुरतो तिच्यासाठी अविरत,---!!!
थांबे ना कुणासाठी काळ ,
मागेमागे धावे मन,
आलो जेव्हा परदेशात,
उदास होतो आत उरांत,---!!!!
खडी करण्या कारकीर्द,
मनात होती खूप उमेद,
आईपासून तुटले मूल ,
सारखी जिवा वाटत खंत,--!!!
नीतिमंत तो भारतीय ,
असे नाव काढाया सज्ज, संस्कारांचा असे प्रश्न,
संस्कृतीचा पाईक अत्यंत,--!!!
वाटे मज अभिमान,
एक भारतीय म्हणून,
चांगले तेवढेच घेत ,
भारतीय मी कर्तृत्ववान,--!!!
कवटाळीत उराशी स्वप्न,
एक दिवस तिथे येईन,
करत आपल्या जनांचा उद्धार,
देशां, माझ्या समृद्ध करेन,--!!!
© हिमगौरी कर्वे.
मला नाही मान,
मला नाही अपमान,
हेच तूं जाण,
तत्व जीवनाचे ।।१।।
कुणी नाही सबळ,
कुणी नसे दुर्बल,
हा मनाचा खेळ,
तुमच्या असे ।।२।।
कुणी नाही मोठा,
कुणी नसे छोटा,
प्रभूच्या ह्या वाटा,
सारख्याच असती ।।३।।
विविधता दिसे,
ती कृत्रिम असे,
निसर्गाची नसे,
ती वस्तूस्थिती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
तू जो दिला होतास ना निशिगंध
तो आता हरवला आहे
पण त्याचा सुगंध येतो नेहमी
कुठल्यातरी कोपऱ्यातून...
तू दिलेलं प्रत्येक फुल
नाही ठेवता आलं जपून
पण त्यांचा सुगंध मात्र दरवळतो
कुठल्या ना कुठल्या तरी कोपऱ्यातून...
-- आनंद
मी आजही अलवार
जीवापाड कुरवाळतो
काहुर अव्यक्त वेदनांचे
मनोमनी शांत सुखावतो..
जे लाभले भाग्य ललाटी
ते निमुटपणे मी भोगतो
घेवुनीया व्रत सत्कर्माचे
मी जगती विवेके जगतो..
जन्म गतजन्मांचेच कर्म
ओंजळीत घेवुनी जगतो
हिशेब साराच पापपुण्णी
चित्रगुप्त तो चोख ठेवतो..
कावडीच सुखदुःखांच्या
सोबती घेवुनी मी चालतो
सरतातही क्षण जीवनाचे
नकळे मज कोण सावरतो..
सारेसारेच अगम्य अतर्क्य
केवळ दयाघना आठवितो
तो एक अदृश्य अनामिक
सर्वत्र अणुरेणुतुनी दिसतो..
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
पारिजातकाची फुले आम्ही, विसावलो या डहाळीवर,
फुलण्या सगळ्या अंगोपांगी, कळीकळीने केला कहर, --!!!
जगणे असावे लोभसवाणे,
सुंदर आणि कसे निशांत,
पाहून आमचा असा बहर,
माणूस होऊन जातो कृतार्थ,
रंग पांढरा आमुचा शांतीचा, त्याखाली देठ रक्तरंगी,
पाकळ्या फुलल्या चहूबाजूच्या, सौंदर्य ओसंडे विविध ढंगी,--!!!
असे किती असावे जगणे,
फार नाही, आम्ही अल्पायुषी, तरीही आम्ही फुलत राहतो,
मानत त्यात खरी राजीखुशी,-
पहाटवेळी होते पखरण,
फूल एकेक करुन ढळते,
संगत आमुची सोडून जाती, भाईबंद बघा ना , कायम ते,--!!!
नाही दु:खी आम्ही त्यावरून, जगणे सारे जगां अर्पियले,
आरक्त आम्ही मोहक संन्यासी, करत विरक्तीचेच मार्ग खुले,--!!
©️ हिमगौरी कर्वे.
Copyright © 2025 | Marathisrushti