(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जीवनाची उपयोगिता

    दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची

    मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जी जीवनाची....१,

    वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरिर कुणाला,

    मना मारूनी बसावे लागे, ईश्वरी नाम घेत सर्वाला....२,

    निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन

    दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून...३,

    बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले

    दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व ते आज जाणले....४,

    जेंव्हां करितो स्वत: करिता, स्वार्थी भाव तो लपला असे

    दुजासाठी ते करिता सारे , स्वार्थी भाव ते राहील कसे ?....५,

    शेवटचे ते सरते जीवन, प्रभू चरणी ते समर्पण व्हावे

    हात जोडूनी विनंती करतो, दुजाच्या सेवेतच निघून जावे...६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • निसर्गावर अवलंबून

    कितीही सारी धडपड करशी
    लाचार ठरतो अखेरी
    जाण माणसा मर्यादा तव
    आपल्या जीवनी परी ... ।।

    क्षणाक्षणाला अवलंबूनी
    जीवन असे तुझे सारे
    पतंगा परि उडत राहते
    जसे सुटत असे वारे... ।।

    निसर्गाच्याच दये वरती
    जागत राहतो सदैव
    कृतघ्न असूनी मनाचा तूं
    विसरून जातो ती ठेव... ।।

    निसर्गाच्या मदती वाचूनी
    जगणे शक्य नसे तुजला
    जीवन कर्में करीत असतां
    आठवित जा त्या प्रभूला... ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पाणी – कपात

     

  • राज विराज

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • समाधानी वृत्ती

    कशांत दडले समाधान ते,

    शोधत असतो सदैव आम्ही,

    धडपड सारी व्यर्थ होऊनी,

    प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।

    बाह्य जगातील वस्तू पासूनी,

    देह मिळवितो सदैव सुख,

    क्षणीकतेच्या गुणधर्माने,

    निराशपणाचे राहते दुःख ।।२।।

    'समाधान' ही वृत्ती असूनी,

    सुख दुःखातही दिसून येती,

    चित्त तुमचे जागृत असतां,

    समाधान ते सदैव मिळते ।।३।।

    सावधतेने प्रसंग टिपता,

    समाधान ते येईल हाती,

    सुख दुःखाला दूर सारता,

    अंतरभागी समाधान दिसती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • कोण आहेस तूं कृष्णा ?

    कोण आहेस तूं कृष्णा ?
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ? ।।धृ।।

    जीवन तूझे 'बहूरंगी'
    सर्व क्षेत्री अग्रभागीं
    आवडतोस तूं सर्वाना ।।१।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    दहीं दूध खाई लपून
    तूप लोणी नेई पळवून
    'खादाड' वाटलास सर्वांना ।।२।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    फळे चारली बागेमधली
    गोपींची शिदोरी नेली
    'चोर' वाटलास सर्वांना ।।३।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    गौळणीचे उचली कपडे
    दगड मारुनी मटकी फोडे
    'खोडकर' वाटलास सर्वांना ।।४।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    मधुरगीत बांसरीतूनी
    नाचलास तूं तन्मय होऊनी
    'कलाकार' वाटलास सर्वांना ।।५।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    कंसाला तूं ठार मारले
    कित्तेक राक्षसा संहारले
    'रक्षणकर्ता' वाटलास सर्वांना ।।६।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    वेडे केले तूं प्रेमानी
    भवती जमल्या सर्व गौळणी
    'प्रेमिक' वाटलास सर्वांना ।।७।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    पाठीराखा द्रौपदीचा
    मान राखला सुभद्रेचा
    'प्रेमळ बंधू' वाटलास सर्वांना ।।८।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    राज्य करण्यातील तंत्र
    पांडवा दिले तूं मंत्र
    'राजकारणी' वाटलास सर्वांना ।।९।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    जीवनाचे महान ज्ञान
    दिलेस तू गीता सांगून
    'महाज्ञानी' वाटलास सर्वांना ।।१० ।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    दाखवूनी जीवनद्वार
    ठरलास तूं 'पू्र्णावतार'
    आदराने झुकती तुजपुढें माना
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ।।११।।
    सांग मला रे, कोण आहेस तूं कृष्णा ?

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • जगणे असते होरपळ

    जगणे असते होरपळ,
    तना-मना-भावनांची,
    रोज रोज प्रत्येक पळ,
    जाणीव होई असुरक्षेची,
    षट्रिपुंचे जगात वर्चस्व,
    ते जनांवर हक्क गाजविती, माणुसकी करुणा अहिंसा,
    भावना थोर मागे पडती,
    सत्ता पैसा लालच,---
    अधिकार फक्त ठाऊक असती, कर्तव्य खाती कशाशी,
    कुंठित झालेली मती,--!!!
    असते कोणाचे कोण-?
    ना आई बापा विचारती,
    *अंधश्रद्धेखातर केवळ,
    लेकरेबाळे बळी देती*,
    सत्य सुंदर शिव,
    सगळ्यांना खुपसले पोटी, सैतानाचे नाव मानव,
    ही शोकांतिकाच मोठी,
    अशा या दुनियेत प्राण,
    देवा माझे घुसमटती,
    सुटका व्हावी आता यातून,
    कित्येक तुला असे आळवती,
    कुठे दिसेना खरे प्रेम,
    मद माया मोह असती,
    सूत्र जीवनाचे किती उथळ,
    सर्व त्याच्या आहारी जाती, जिवाची ही अशी तडफड,
    सांगा कुठे कशी लपवावी
    प्राणपक्षी उडण्या उत्सुक,
    मरणवेळही का तरसावी,--??

    हिमगौरी कर्वे. ©

  • बदलते भाव

    कसा वागतो दोन प्रकारे, दिसून सर्वा येते

    राग दाखवी क्षणात, आणि प्रेमळ ही वाटते....१

    देहस्तरावरले प्रश्न सारे, सुख-दु:खानी भरले

    अंतर्मनातील भाव परि, आनंदीच वाटले....२

    देहाशी त्या येवून संबंध, राग लोभ दाखवी

    केवळ त्यातील आनंद शोषण्या, अंतरात्मा शिकवी...३

    जड होता पारडे एकाचे, भाव येई दिसून

    भावांचे रंग बदलती, अंतर बाह्यावरून...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • झरे वाहती

    झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे
    कुणी योजिल्या भव्य येथे शिळा
    तरुवल्लर्रीचे इथे मुक्त गाणे
    फुले डोंगराचा पिसारा निळा

  • वठलेल्या वडाला मोह

    वठलेल्या वडाला मोह
    आम्रतरुचा झाला आहे
    काष्ठवत फांद्यांवर पर्ण
    पिसारा फुलून आहे..
    मनातील सारे न कळून आहे
    प्रेमाच्या सावलीत भाव रडून आहे
    दुःखाच्या मागे व्यथा निःशब्द आहे
    वठलेला वड आज फकीर आहे..
    न कळत्या दुःखाना वेदनेची
    अस्पष्ट करुण किनार आहे
    मरणाची वाट जवळ येईल कधीही
    अंतरात दुःख विरजून अनामिक आहे..
    आम्रतरुचा झोका मदमस्त
    एकाकी वड उन्मळून आहे
    मोहाच्या मिठीत अलगद
    पालापाचोळा मन व्यथित आहे..
    सांज गूढ सावल्यांना
    क्षितिजाची आस आहे
    न कळत्या मनातला मोहर
    का पुन्हा एकाकी दुःखी आहे..
    दूर कुठे गातो फकीर गाणे
    बोल त्याचे अंतरी ठाव आहे
    सगळेच अर्थ न उलगडतात
    शब्दांचे खेळ काव्यांत बहरुन आहे..
    मोहरल्या आम्रतरुच्या प्रेमात
    वठलेला वड एकांती आहे
    स्वार्थ न कसला गंधाचा तो
    आम्रतरुचा मोह मन फुलून आहे..
    उन्मळून पडेल वड एकाकी
    सावलीत पांथस्थ न कोण आहे
    वडाचे दुःख मिटून हलकेच
    मोहरणाऱ्या आम्रतरुत आहे
    न सोसवतो वारा बेफाम
    न वादळ सोसते आहे
    पर्णाचे दुःख अंतरी आल्हाद
    वेगळे दुःख पाचोळ्याचे आहे..
    प्रत्येक शब्दांचे अर्थ भावार्थ
    वेगवेगळे वेढून काव्यांत आहे
    विस्तीर्ण वडाचे दुःख एकाकी
    मोहरल्या आम्रतरुत अव्यक्त आहे..
    -- स्वाती ठोंबरे.