(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तुझंच नाव घेता गझल होत आहे

    तुझ्या सुंदरतेसाठी शब्द शोधत आहे,
    मनाच्या ओंजळीत स्वप्नं वेचत आहे.

    नाहीतर कविता-शायरी मला कुठे येते,
    तुझ्याच आठवांनी कागद भिजत आहे.

    पहाटेच्या दवासारखी तुझी ती निरागसता,
    तिच्याच उजेडात जीव न्हाऊन निघत आहे.

    तुझ्या हास्याची सर नाही फुलांच्या बहराला,
    तोच गंध श्वासागणिक दरवळत आहे.

    तुझ्या डोळ्यांच्या त्या शांत गहिऱ्या सरोवरात,
    माझं प्रतिबिंब हळूच हरवत आहे.

    मी ना कवी, ना शब्दांचा कुठला जादूगार,
    तुझ्यामुळेच ओठांवर गीत उमटत आहे.

    तुझ्या सहवासाची आस मनात जपून,
    प्रत्येक क्षण तुझीच वाट पाहत आहे.

    तुझ्या सुंदरतेसाठी शब्द शोधत आहे,
    शब्द संपले तरी प्रेम बोलत आहे...

    नाहीतर कविता-शायरी मला कुठे येते,
    तुझंच नाव घेता गझल होत आहे...

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 12, 2026


  • गावाचं घर

    मराठी कविता

      July 24, 2011


  • गर्भावस्थेतील आनंद

    जीवनातील परमानंद, केंव्हां लाभतो त्या जीवना ?

    मातेच्या त्या उदरामध्ये, शांत झोपला असताना....१,

    असीम ‘आनंद’ अनुभव, घेत असे तो जीवात्मा

    सोsहं निनाद करूनी, सांगतो मीच परमात्मा....२,

    आनंदाने नाचू लागतो, मनांत येता केंव्हां तरी

    मातेलाही सुखी करती, त्याच्याच आनंदी लहरी....३,

    पुढे त्याचे प्रयत्न होती, मिळवण्या तोच आनंद

    सुख, दु:खाच्या चक्रामध्ये, विसरूनी जातो तो नाद.....४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 5, 2018


  • सुखाचे मृगजळ

    धांवत असे मन आमचे, शोधण्या नेहमीं सुखाला
    सुख तर आहे मृगजळ, फसवित राही सर्वाला...१

    मृगजळाचे धावूनी पाठी, निराशा हाती येत असे,
    वेडी आशा मनीं बाळगुनी, सुखासाठी तडफडत असे...२,

    आपल्या हाती नसेल तेथें, सुख आम्हा भासत असे
    जवळ जातां प्रयत्न करूनी, सुख नसूनी दुःखची भासे...३,

    खरे सुख कशांत बघतां, तें तुमच्या मनींच वसत
    बाह्य जगी शोधत असतां दुःख तुमचे हातीं लागते...४,

    दुःख असे अंवती भंवती, सुख तुमच्या अंतर्यामीं
    बाह्य जगातील सुख परि कधीं न येती तुमचे कामीं....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 20, 2015


  • दुःख

    दुःख असे मानव निर्मित जाणती हे सगळे ।

    परि दुःखात शोक करिती हे कुणा न कळे ।।१

    आपण कर्म केलेले आपणचि भोगतो ।

    फळ कर्माचे आलेले तेच आपण चाखतो ।।२

    आहे तुजसी हे ज्ञान माहीत सर्वाना ।

    खंत द्यावी सोडून नको दाखवूं भावना ।।३

    इतरांसाठीं आहे ती भावना उदरीं ।

    सहानुभूती पाहे इतर जनांचे पदरी ।।४

    शोक भावना दाखवी तुझ्या दुःखाची ।

    नसतां तुज निर्दयी ठरवी हीच भीति जनाची ।।५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 19, 2020


  • जीवन मार्गातील अडसर

    जीवनातील वाटे वरती,
    कडेकडेने उभे ठाकले,
    परि वाटसरूंना सारे ते,
    यशातील अडसर वाटले ।।१।।

    वाट चालतां क्रमाक्रमानें,
    बाधा आणून वेग रोकती,
    ध्येयावरल्या उच्च स्थळीं,
    पोहचण्या आडकाठी करीती ।।२।।

    षडरिपूचे टप्पे असूनी,
    भावनेवर आघांत होतो,
    सरळ मार्गाच्या विचाराला,
    आकर्षणाचा खेंच बसतो ।।३।।

    पवित्र निर्मळ भावनेमध्ये,
    रंगाच्या त्या छटा उमटती,
    गढूळपणाच्या वातावरणीं,
    सारे कांहीं गमवूनी बसती ।।४।।

    थोडे राहता गाफील तुम्ही,
    जाळ्यामध्ये अडकून जातां,
    जीवनाचे जे साध्य असते,
    स्वकर्माने गमवून बसतां.।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 28, 2015


  • बोलणं

    बोलणं म्हणजे काय तर मनातील
    भावना व्यक्त करणं!अगदी साधं,
    सहज,सुंदर,रागाचं,लोभाचं
    कसही असावं,पण बोलणं असावं.
    शब्द आणि त्याचे अर्थ इतके सुंदर असतात.
    की मोह पडावा असे.माणसाने प्रत्येक वेळेला व्यक्त व्हायला हवे असही काही नाही.कधी समोरच्याचे विचार,बोल ऐकणं हे पण खूप सुंदर असतं....
    प्रत्येकाला मन असतं,आणि त्या मनात सतत
    काहींना काही चालू असत.
    वेगवेगळ्या भावनाचं कल्लोळ होणं म्हणजे मन गुंतण. तुम्ही जसे मनात विचार कराल तसे त्याचे पडसाद बाह्य रुपावर दिसतात. अतिशय नितळ,तरल,स्वच्छ मन असलं की तुमचं बाह्य रुप पण तितकंच सुंदर दिसतं.शांत भाव चेहेऱ्यावर उमटतो.तरीही प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात.त्या व्यक्त होतात, कधी अव्यक्त राहतात.....
    अंतर मन ही तर एक तरल, सुरेख जाणीव असणारी प्रकिया.त्यात फक्त भाव आणि प्रेम हेच असतं. आपण कुणाच्या मनात असणं फार सुंदर असत.आपल्या मनात अनेकांना जागा द्या! चागल्या रुपात,नक्कीच तुम्ही पण दुसऱ्याच्या हृदयात
    व्यक्त होतात......
    हृदय तरी असत, पण मन हा अवयव नसतो.पण मनाने जो वागतो तो मनाचा राजा.जिथं शब्दांचे सूर अलवार गुंफले जातात तिथंच हळुवार भावना जुळतात.मग शब्दांचीही गरज पडत नाही.
    भाव सांगुन जातात.'शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलीकडले प्रथम तुला पाहियले आणि घडू नये ते घडले'. खरच अतीशय सुंदर भाव की अश्या क्षणी शब्दांची गरज नसतेच....
    काढला तर अर्थ नाहीतर अनर्थ,
    दिसलं तर सुंदर नाहीतर कुरुप.
    शोधला तर आनंद नाहीतर दुःख.
    काय मिळेल जीवनात हे प्रत्येकाच्या
    नशिबानुसार असतं. पण काय मिळवायचं हे तर आपल्या मनात असतं....
    मन आणि अंतर मन ह्यात कुणाला स्थान द्यायचं हे एकदा ठरवलं की जीवनात आनंद मिळतो आनंद घ्यायचा, द्यायचा असतो.कधी व्यक्त होऊन कधी अव्यक्त राहून,मनातील तरल भावना ज्यात फक्त आपण आपले गुंततो तिथं व्यक्त नाही झालं तरी सहज, सुंदर असतं....
    -- स्वाती ठोंबरे.

      November 8, 2021


  • कविची श्रीमंती

    खंत वाटली मनास
    कळला नसे व्यवहार ।
    शिकला सवरला
    नाही जाणला संसार ।।१।।

    पुढेच गेले सगे सोयरे
    आणिक सारी मित्रमंडळी ।
    घरे बांघूनी धन कमविले
    श्रीमंत झाली सगळी ।।२।।

    वेड्यापरी बसून कोपरी
    रचित होता कविता ।
    कुटुंबीय म्हणती त्याला
    कां फुका हा वेळ दवडीता ।।३।।

    सग्यांच्या उंच महाली
    बैठक जमली सर्व जणांची ।
    श्रेष्ठ पदीचा मान देवूनी
    कौतुके झाली कवितांची ।। ४।।

    व्यवहारी निर्धन जरी तो
    विराजमान मनीं दुजांचे ।
    ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे
    गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      February 26, 2016


  • मुंबईतील मराठी माणसांची व्यथा

    मुंबईतील मराठी माणसांची व्यथा व्यक्त करणारी कवी नायगावकरांची ही कविता प्रत्येकास विचार करायला भाग पाडते -

    'टिळक,तुम्ही चौपाटीवर इथे
    कशासाठी उभे आहात ?
    अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं
    हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे
    आणि आम्ही तो रोज मिळवणारच.....
    तुमचे डोके ठिकाणावर आहे काय टिळक ?
    तुम्ही डॉलर मिळवा
    लोक बघा किती आनंदात
    बिअरच्या ग्लासासारखे फेसाळलेत
    तुम्ही स्वदेशी बार टाका, मस्त जगा ..''
    हे फटकारे त्यांनी टिळकांचे नाव घेवून सर्वांवरच ओढले आहेत. या कवितेतले टिळक आपल्या अंगावर धावून येतात आणि आपली झाडाझडती घेतात.

      December 29, 2017


  • पक्षी – मुलातले प्रेम

    स्वैर मनानें भरारी घेई, पक्षी दिसला आकाशीं ।

    स्वछंदामध्यें विसरला , काय चालते पृथ्वीशीं ।१।

    एक शिकारी नेम धरूनी, वेध घेई पक्षाचा ।

    छेदूनी त्याचा एक पंख, मार्ग रोखी उडण्याचा ।२।

    जायबंदी होवूनी पडला, जमीनीवरी ।

    त्वरीत उचलून पक्षाचे, पाय बांधे शिकारी ।३।

    ओढ लागली त्यास घराची, भेटन्या मुलाला ।

    आजारी असूनी पुत्र त्याचा, चिडचिडा तो झाला ।४।

    चकित झाला बघूनी मुलाला, अंगणी खेळतांना ।

    बघत होता रोज त्याला रडत असतांना ।५।

    झाडा वरती दोन पक्षी, नाचुन गात होते ।

    मुलास त्याच्या आनंद देवूनी, रिझवीत होते ।६।

    गहींवरूनी गेला दृष्य बघूनी, पक्षी- मुलातले प्रेम ।

    सोडून दिला हातातला पक्षी, लावून त्यास मलम ।७।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 17, 2016