मुके बसा
कायी सांगु नोका
मायीत हाये आमाले।
गांधी बाबा चा..किती..
पुळका हाये तुमाले।
कायी सांगु नोका..
ते गांधी बाबा चे तीन माकडं।
तुमचं न त्यायचं त
भल्ल हाये वाकडं।
बस झाले तुमचे ते
सूत अन चरखे।
मायीत हाये..गांधीजी
किती आपले न परके।
कायी सांगू नोका..की
गांधीजी हात नोटावर।
रोज लावता थुका...
घेऊन दोन बोटावर।
कायी नोका सांगू आमाले
सत्त्याग्रह अन मिठाचं।
कायले करता कौतुक
काढेल टपाल तिकिटाचं।
कायी हाये तुमी ...
म्हणता देश स्वच्छ करू।
अन त्या नावाखाली..
सोताचेच खिसे भरू।
गांधीजीच नाव घेऊन
जाता मतं मांग्याले।
तुमाले तरी समजले का गांधी...
चालले मोठे ..आमाले सांग्याले।
आबे गांधीजी का कोणी माणुस हाये..
ते त विचार धन हाये।
आमचा जीव की प्राण...
आन आमचं मन हाये।
-- नारायण जाधव, खामगाव.
चो रु न बघणे माझे तसेच अन तुझेही तसेच
काही न जमणे माझे तसेच अन तुझेही तसेच /
संधी येती पुन्हा पुन्हा कितीतरी अनेकदा
धिटाई न करणे माझे तसेच अन तुझेही तसेच /
किती काळ जाई आणि किती भवताल हासे
काही न करणे माझे तसेच अन तुझेच तसेच /
खुणावी बट तुझी गालावर येऊन जरा
काही न घडणे माझे तसेच अन तुझेही तसेच /
पदर साडीचा वळवळतो उगाच का ?
काही न कळणे माझे तसेच अन तुझेही तसेच /
# कौशल
वाहत असते जीवन सारे, वाहने जीवनाचा गुणधर्म
स्तब्ध राहता जीवन आपले, कसे घडेल हातून कर्म
वाहात होते, वाहात आहे, भविष्याते वहात जाईल
सतत चाले ही प्रक्रिया, जीवन करण्यास सफल
आजही शास्त्रज्ञ हेच सांगतो, निर्जिव वस्तूसुद्धा प्रवाही
अणूची ती बनली असूनी, प्रचंड हालचाल आत होई
अणूत असूनी तीन भाग, अतिशय वेगाने फिरती
केवळ त्यातील वेगामुळे, स्थिर साऱ्या वस्तू त्या भासती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
भोवतालच्या जगाकडे मी जेव्हा डोळसपणे पहातो
मनाचा आरसा माझा मी अलगद उघडतो
वाटतो मला आंधळा
जगाच्या अधोगतीकडे पाहून
घेत असेल डोळे मिटून
वाटतो मला एकांध
घेत असेल संधी
एक डोळा मारुन
दाखवत नसेल ना लंगडा जीवनातला अधूरेपणा
पृथ्वीवर असता एक डोळा दूजा चंद्रावर रोखून
वेध नसेल ना घेत अनंताचा एखादा चकणा
पुढे आलेले दात दिसतात गाताना रडगाणे
पुढे आलेले डोळे वाटतात ओंगळवाणे
करतो विचार तेव्हा मी कसा असेन
मनाच्या आरशात माझ्या मीच कसा दिसेन
कदाचित दाखवीत नसेन ना मी
दोन पायांवर उभा असलेला एक पशू?
- यतीन सामंत
मैत्र बनून आलीस जीवनी
न्हवते कधी ध्यानी-मनी
गुंफून स्नेहाचे धागे रेशमी
व्यापलीस तू , माझी अवनी !
कधी राग, कधी लोभ
कधी चिडू, कधी गोडू
कैरीची लज्जत, हापुसी गोडवा
दिलास मैत्रीला,आयाम नवा !
शांत सुखी जीवन सागरी
आली कैक तुफानी वादळे
भिरभिरती नौका सांभाळत
उभी तू, जणू दैवी सुकाणू !
नाही कसला गर्व, तुला
निरागस स्नेहाचा, तू झरा
सर्वांच्या मदतीला तुझा हात
जणू समाजसेवा हेच तुझे व्रत !
घर, मैत्री, नाती, सेवा
सर्वांचा तू अतूट दुवा
प्रणाम माझा, तुझ्या चरणी
नकळत माझ्या डोळ्यात पाणी !
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
चार कविता सुंदर रचिल्या, काव्य वाचन केले त्याचे
रसिक जनाची स्तुति ऐकूनी, स्वप्न रंगविले कालीदासाचे....१,
कॉलेजातील रंगमंचावरी, तल्लीन होवूनी भूमिका केली
टाळ्याचा तो कडकडाट ऐकूनी, नटसम्राटाची आठवण झाली....२,
जमले होते शंभर श्रोते, भाषण ज्यांचे समोर केले
श्रोत्या मधली स्फुर्ति बघूनी, गांधी नेहरूसम होवूं वाटले...३,
यश जेंव्हां पदरी पडते, भारावूनी जातो आम्ही त्यावेळी
कर्तृत्व शक्तीचे मूल्यमापन, करीत राहतो चूक सगळी...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मनाची समजूत कशी घालावी
नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची
सांगना मी तुला गं विसरु कसे
हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची
क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते
निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची
प्रीतीविना कां? असते जीवन
लाभते प्रीती, संचिती सुखाची
कोवळ्या कळीत मकरंद मधुर
भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची
सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे
त्याविण नसे, प्रचिती सुखाची
भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे
कृपा सार्थकी, त्या भगवंताची
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५३.
२१ - ६ - २०२२.
लक्षच लागेना कृतीत, करतोहे म्हणुन चुका !
मनस्थिती जाणा, ‘कामातुन गेला’ म्हणूं नका ।।
खिन्नपणा असुनही स्मिताचा यत्न स्तुत्य नच कां ?
राखा रे सन्मान ज़रा, ‘रडवेला’ म्हणूं नका ।।
नयनांचा ओलसर असे पडदा, तो नुरे सुका
तरि या विरहार्ता, ‘डोळे भरलेला’ म्हणूं नका ।।
अश्रूंचा पाझर हलकासा, दिसत नसे इतुका
पण, हळव्याला, ‘धीर मनी धरलेला’ म्हणूं नका ।।
संध्येच्या समयीं बुडली माझी कुटुंब-नौका
‘त्या’ वेळेला कोणी ‘पावन-वेला’ म्हणूं नका ।।
सखि गेल्यावर, टापटिपीच्या घर मुकलेंच सुखा
तरिही घर तें घर !, त्याला ‘तबेला’ म्हणूं नका ।।
मधुर घोट लावतात मजला विसराया दु:खा
अमृतास या, कुणि ‘मदिरेचा पेला’ म्हणूं नका ।।
ती गेली म्हणुनी आला मज वेडाचा झटका
तिची चूक ना, ‘दोषी’ प्राणप्रियेला म्हणू नका ।।
कॅन्सरग्रस्त सखी मम; तुम्हां यमाचाच पुळका !!
त्यानें तिजवर ‘उपाय योग्यच केला’ म्हणूं नका ।।
‘मृत्युस जाणें सामोरें’, मम सखीकडून शिका
मान्य, भले कुणि स्वत:ला ‘तिचा चेला’ म्हणूं नका ।।
नाहीं ठेवायचा मला कोणांवरही ठपका
उंच दोन-वच बोलल्यास, ‘चिडलेला’ म्हणूं नका ।।
हल्ली मज प्रत्येकच माणुस वाटे जरि परका,
मला ‘जगापासुनी पूर्ण तुटलेला’ म्हणूं नका ।।
‘जायचेंच मज आतां इथुनी’, विचार मनिं पक्का
परी, त्यामुळे, कुणिहि मला ‘हरलेला’ म्हणूं नका ।।
‘जीवित-प्रेत’च झालो मी, बसतां असह्य धक्का
तरिही जोवर श्वास, मढ्या या, ‘मेला’ म्हणुं नका ।।
शब्द उमटती, म्हणून, ‘कवि मी’ ही उठली भुमका
हृदयातिल रक्ता, ‘शब्दांचा झेला’ म्हणूं नका ।।
( दिवंगत पत्नी डॉ. स्नेहलता हिच्या आठवणीत )
मम : माझा / माझी / माझें / माझ्या
वच : बोल
भुमका : आवई , अफवा
- सुभाष स. नाईक .
M- 9869002126.
Copyright © 2025 | Marathisrushti