
निराशाग्रस्त माणूस बसला होता
त्याला मी ओळखत नव्हतो,
त्याच्या निराशेला ओळखत होतो,
त्यामुळे मी त्याच्या जवळ गेलो
मी त्याला हात दिला
माझा हात पकडून तो उभा राहिला,
तो मला ओळखत नव्हता
मी पुढे केलेल्या हाताला
तो ओळखत होता
आम्ही दोघे एकसाथ चालू लागलो
आम्ही एकमेकाला ओळखत नव्हतो
दोघे एकसाथ चालण्याला ओळखत होतो
++++
मूळ हिंदी कविता - विनोद कुमार शुक्ल
अनुवाद - विजय नगरकर
मिळता मजला बाह्य एकांत,
छळते गर्दी विचारांची
मन गुंतविण्या कुणी नसता,
चलबिचल होते भावनांची...१,
शब्द वर्णांचा घेवून आधार,
भावना काढी मार्ग आपला
आविष्कार घडविण्यासाठी,
विचार करितो मदत तिला...२,
शब्दांना नटवी थटवी,
ध्वनी लहरी नि सूर गेयता
अलंकार मिळता अंगी,
रचली जाते एक कविता...३
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
भरून राहिला! कंठ दिगंबरा!
दत्त योगेश्वरा ! गुरू दत्ता!!१!!
दर्शनास जीव! आतुर भक्ताचा!
दत्त दर्शनाचा! वाटे हेवा!२!!
त्रिगुण धारक ! तुम्ही योगीराज!
चिंतनाने आज ! बोलावले!!३!!
आलो दत्ता ठायीं! भेटही सुखाची!
घडो नयनांची ! दृष्टादृष्ट!!४!!
गुरूंचा आधार! दत्त नाम ओठी!
सुटतील गाठी! संभ्रमांती!!५!!
गुरू बळ लाभे ! जन्माची पुण्याई!
समजावें आई! बाळबोध!!६!!
परमोच्च क्षण ! भक्तीचा संगम!
आत्म्याच्या उगम! दत्तात्रय!!७!!
@ काव्य प्रतिभा
प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर`
Shabdaraanjan.blogspot.in
लय फोफावलय तणकटं....
धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं.....
रान कमी पडलं मनुन काय की,
आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं...
आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं,
निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं...
काल घरातुन निंघताना भिंतीवर
एक पिंपळाचं झाड पाह्यलं...
मनात विचार आला,
मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय,
मनुनं ईथबी एक उगवलय काय की?
लय फोफावलयं....
गल्लीतंबी अन दिल्लीतंबी,
घरातंबी अन दारातंबी...
कुठं नाही मनुन सांगु,
ईथं जागाचं शिल्लक राह्यली नाही...
रस्त्यावुन पुढ चलतांनी,
याच तनकटांचे दोरखंडं व्हवून,
माघं खेचतायतं मलं...
असं वारंवार जाणवायलय आजकालं...
आज तं कहरच झाला...
मह्याच मस्तीत विहरत असतांनी ,
अचानक तनकटाच्या दोरखंडांनी,
महे पायचं आवळून जागीच थिजवले...
तसं पाह्यलं तं त्या तणकटाचं,
मह्या मार्गावर,
अतिक्रमनचं व्हतं ते......!
मी पुर्ण ताकदीनिशी मुक्तं व्हवू पहातं व्हतो....
जोर जोरातं ओरडतं मदतीची याचना करत व्हतो....
पण कुनिही मह्या मदतीलं येतं नव्हतं....
जो तो मह्याकडं पाहूनं हसतं व्हता...
मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न करतं व्हतो.....
पण न का जाने मह्याबी मनातं घालमेलं चालली व्हती....
क्षणातचं मह्याबी अंगावरं सळसळत्या गवताची,
हालचाल जानवाय लागली व्हती...
रोम आता राह्यलाचं नव्हता...
मह्या रोम रोमात तणकटं भिनतं व्हतं....
का मीच तणकटं बनतं व्हतो...?
मी भांबावलो,बावचळलो.....
सहज आजुबाजुलं पाह्यलं .....
आत्ता सगळ्या लोकांच्या डोक्यावरं
मलं तणकटं दिसतं व्हतं.....
अन त्याची मुळं,
आरपार मेंदुतं रूजलेली जानवतं व्हती.....
मी ओरडलो....तळमळलो....शेवटी हतबल झालो....
मग शेवटी त्या विधात्यालचं मनलो,
हे विधात्या.....,
तणनाशकानं शेतातल्या तनाचा नाश करता येईल रे....
पण मेंदुतल्या तनाचा नाश कुठल्या तननाशकानं करायचा.....?
©गोडाती बबनराव काळे
9405807079
प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,
मनी आस ती राहत असते, उचलून त्यास घ्यावे
शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे...२,
प्रयत्नात त्या साथ न मिळता, खालती कोसळते
विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,
विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एका मोठ्या कारखान्याचा मालक,
भासत होता छोट्या विश्वाचा चालक
लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,
मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण
उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,
लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,
खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत
पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे
पण नशीब दुर्दैवी बिचारे,
मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,
वर्ज्य केल होत साखर व मिठाला
नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी
भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.
जगण्यासाठी आहार नियंत्रण
समजला होता हे तत्व.
वात पित्ताची प्रकृती त्याची.
थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची.
लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,
कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,
आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये,
कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर
व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.
पाने मागे पुढे चाळीत होता,
मध्येच मान वर करून बघत होता,
विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता,
हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर
सारे उभे होते सभोवताली.
माना त्यांच्या झुकत होत्या,
शब्द त्याचे ते उचली,
कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार
चेहऱ्यावर चमकत होता.
आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या
उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे
या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले
लिंबू सरबताचे घोट पित होता... सरबत....
स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस.
साखर मिठ वर्ज्य असलेले,
हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,
तरी देखील हे सारे माझे आहे,
हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नवरंग नवरात्रीचे !
प्रतीक शक्ती-भक्तीचे !!
पिवळा रंग सोन्याचा !
शुद्ध तेजस क्षणांचा !
हिरवा रंग सृष्टीचा !
वृध्दी,सुख-समृध्दीचा !!
करडा रंग भाग्याचा !
निरामय आरोग्याचा !!
केशरी रंग निर्मितिचा !
राजमंगल पताकांचा!!
पांढरा रंग शांतीचा !
एकोपा अन मैत्रीचा !!
लाल रंग कुंकवाचा !
सर्व मांगल्य मांगल्याचा !!
निळा रंग अस्मानाचा !
निर्मळशा हृदयाचा !!
गुलाबी रंग प्रितीचा !
अबोधशा यौवनाचा !!
जांभळा रंग नवलाईचा !
सखी रेणुका अंबाबाईचा !!
-- जयश्री दाणी
https://www.facebook.com/jayshri.dani.14
भास्करा दिन कालचा काळा, प्रेमास फुलत्या तुझ्या माझ्या,
मध्यभागात येऊन जसा,
चंद्रमाने आणला अडथळा ,--!!!
काही काळ दर्शना तुझ्या,
जीव कासावीस माझा,
कोलाहल माजतां उरां,
नुरला कुठलाही आसरा,--!!!
न्यारी प्रेमाची खुमारी,
चंद्राने अशी वाढवतां,---
स्वर्ग दोन बोटे राहिला ,
जशी ग्रहणाची सांगता,--!!!
मात देत सकल अंधारा,
उगवशील माझ्या राजा,
जरी तु होशी झाकोळतां,
उणीव नाही तुझ्या तेजां,--!!!
तारे वारे आणि चंद्रा,
सांगते रे मी कितीकदा,
सूर्यदेवाची करते पूजा,
तो एकमेव माझा त्राता,--!!!
चांद मध्ये असा डोकावतां,
खळबळ तनामनां,माजतां, दिनकराच्या किरणा तरसतां,--- आधार सहस्रबाहुंचा मला,--!!!
काय वर्णू त्याचा महिमा,
माझ्या राजाच्या वेगळ्या थाटां,
न कोणी धजावे लावण्यां, हाता,
महाराणी शोभे सम्राटां,--!
ग्रहण येवो काही अथवा,
फिकिर नाही मजला,
प्रियकर एवढा तेजाळतां,
अंधाराचीही नाही तमा,--!!!
© हिमगौरी कर्वे
Copyright © 2025 | Marathisrushti