माझे म्हणूनी जे मी धरले,
दूर होई ते मजपासूनी,
दूर ही जावूनी खंत न वाटे,
घडत असते कसे मनी ।।१।।
बहुत वेळ तो घालविला,
फुल बाग ती करण्यामध्ये,
विविध फुलांची रोपे लावूनी,
मनास रमविले आनंदे ।।२।।
कौतुकाने बांधी घरकूल,
तेच समजूनी ध्येय सारे,
कष्ट करूनी मिळवी धन,
खर्चिले ते ह्याच उभारे ।।३।।
संसार करूनी वंश वाढवी,
संगोपन ते करूनी त्यांचे,
थकूनी जाई देह आता तो,
चित्त लागते ईश चरणाचे ।।४।।
ओढ आतां उरली न काही,
ज्याच्यासाठी तगमगलो,
निवृत्तीची वृत्ती मिळूनी,
समाधानी तो होऊ शकलो ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
गेले सारे आयुष्य परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं
बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता केली शरीरा करिता
तरुणपणाची उमेद जिंकू वा मरु ही जिद्द
करुन प्रयत्नांची पराकाष्टा बनवी जीवन मार्ग निष्ठा
संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव
काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पुजेत जाई वेळ ज्ञान गोष्टी सांगे सकळ
आता झालो देह दुर्बल प्रभू चिंतनात जाई वेळ
वाट बघतो निरोपाची ओढ फक्त जगदंबेची
आयुष्य संपता सारे खंत येऊन मन विचारे
कां न प्रभू भेटला ह्याची रुखरुख मनाला
आत्म चिंतन करिता जाणवे मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार कर्म करी त्यास साकार
दया क्षमा शांती ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण हीच ईश्वराची खूण
जीवनांतील समाधान ईश्वर प्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत आनंदी भाव हाच भगवंत
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हे कसले जगणे …
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला
शोषून शोषून जमविता,
झुरुन झुरुन मरुन जाता
पैशांनी भरलेल्या पिशव्या
फाटून जातील
हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र
तुमची आसवे पुसण्यासाठी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Bknagapurkar@gmail.com
जगी भेटली माणसे
अनभिज्ञ ती सारी...
जोडली नाती
निराशाच पदरी...
नव्हता जिव्हाळा
भावशून्य सारी...
नाही कुणी कुणाचे
छळे सत्य जिव्हारी...
जखमांचे झिरपणे
नि:शब्द वाहते अंतरी...
असले कसले जगणे
प्रीत उदास हृदयांतरी...
हा कल्लोळ असह्य
भावनांचे रुदन भीतरी...
रचना क्र ७०
१०/७/२०२३
- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
चालला घेऊन तो, श्रीरामाला वनवासाला,
नौकानयन करत करत,
पाण्यातील प्रवासाला,
नौका चालवे नावाडी,
नदी तरुन जाण्या,
श्रीरामासंगे जानकी,
लक्ष्मण रक्षण करण्या,
त्रिकूट' चालले जलप्रवासा,
जसे ओलांडती भवंसागरा,--!!!
नावाडीच श्रीराम ते,
संसार सागरातून तारण्या,--!!
प्रवासीच इथे खरा नावाडी,
अन् नावाडी असे प्रवासी,
संसार सागर उफाळतां,
नावाड्याचे कसब पणाशी,--!!
हिमगौरी कर्वे.©
गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे
संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे
ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी
गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी
चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी
बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी
धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो
जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो
यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा
साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी १
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य
राघूच्या वाणीनें शिकविले सत्य २
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी
चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि ३
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला
कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला ४
घारीची भरारी स्वछंद केले मनां
मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा ५
विजेची चपळता चंचल बनवी
धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी ६
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत आनंदी होण्या जीवन ७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
-- स्वाती ठोंबरे.
Copyright © 2025 | Marathisrushti