च्या भैन .. .. एक बाई माया बायकोवानी दिसत होती…. मी तिच्याकडं पाहो ती मायाकडे पाहत होती……..
तू माझाच
श्वास तुच
ध्यास तुच
आस तुच
तू माझाच
आहे राम
घनश्याम
स्वप्नी शाम
तू माझाच
प्रियकर
युगे युगे
हा गिरधर
तू माझाच
गोकुळीचा
कृष्णसखा
मुरळीचा
तू माझाच
भेटतोस
वृंदावनी
रमतोस
तू माझाच
मी तुझीच
अलगुज
ही माझीच
अलगुज
ही माझीच
-- सौ. माणिक (रुबी)
नाशिक
प्रदीप निफाडकरांची गझल
मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी
झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।
शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,
लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना ।।२।।
तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी,
माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी ।।३।।
आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,
सेवा शक्ति मला छळे, तुला कांहीं न कळे, ।।३।।
थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,
तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।४।।
उभा केलेस मजला तू टाकलेल्या विटेवरी,
मग्न आई-बाप सेवेत, निघूनी गेला दूरी ।।५।।
होऊनी गेली, अठ्ठावीस युगे,
आज देखील, मी वाट बघे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला नाही
आता काय बोलायाचे
आता काय ऐकायाचे
घडणारे ते घडूनी जाते
सारे समजून घ्यावयाचे
तडजोडित, मन:शांती
शल्य कुणास सांगायाचे
स्वप्नी आठवांचे मोहोळ
सांगा ? कसे थोपवायचे
ऋणानुबंध गतजन्मांचे
सारे सावरित जगायाचे
मैत्र! निर्मोही सावरणारे
तेच सदा अंतरी जपायचे
मुक्तिचाच ध्यास जीवाला
हरिनामात सुखी रमायचे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०४
२५/११/२०२२
(चाल : आरती साईबाबा)
जयदेवी मंगलमाता, मनोभावे पुजू आता,
महिन्यांचा श्रावण राजा, मंगळवारी करती पूजा
फळे फुले, नानापत्री, हळदी कुंकू नारळ खण,
धूप दिप उजळोनी ओवाळती निरांजन ।। जय......
सोळा घरच्या सोळा जणी, व्रत करती सुहासिनी
नानापरी नैवेद्याच्या, थाट असे उत्सवाचा,
झिम्मा फुगड्या, गोफविण, करती रात्री गाजरण ।। जय......
नाग आणि कलश दान, साडी चोळी सौख्यदान,
मायमाता तोषवोनी, लेक करी उद्यापन
अखंडित सौभाग्याचे मागतसे वरदान ।। जय......
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें.
१.
सुवर्णमहोत्सव हा
सुवर्णाक्षरांनी लिहा
क्रमांक पहिला' फलक वाहा
असूं देत क्रम नऊ-दहा.
'महाराष्ट्र हें राज्य महा'
फलद्रूप होईल मंत्र हा
अनंत वाट पहा ।।
२.
नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा
घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा
मस्तक उन्नत, समारंभ शत, वाद्यघोष उन्मत्त
इमल्याचा या खचतो पाया, कुणां खबर ना खंत ।।
३.
संदर्भ : उष:काल होतां-होतां काळरात्र झाली
अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली ।
(कवी - सुरेश भट)
उष:काल होणें नच , ना संपणार रात्र
चुडे पेटवाया , आशा नुरे नाममात्र
महाराष्ट्रीं दिवा ना समई, काजवा न तारे
वाट उजेडाची बघतां जीव चालला रे !
४.
कालचा अभिमान उज्ज्वल, आज पण अंधारलें
फोल, तरिही ढोल हा - 'भवितव्य फारच चांगलें'!
उंचवाया मान अमुची झुंजला राजा शिवा
लढत राजे आज-उद्याचे कापण्यां अमुचे गळे ।।
५
वाचत भ्रामक प्रगतीपाढा , प्या कटु दुर्गतिकाढा
कळे न तरि - पळतोहे परि गर्तेत चालला गाडा ।।
६ -
राष्ट्राचें-महाराष्ट्राचें नच आतां काहिं खरें
आम्ही बापडे, बांधु झापडें ; आम्हां तेंच बरें ।।
७
सगळी पानें गळती , तरिही पुनश्च रानें फुलती
जरि हत झाली आशा, तरि जागेल पुन्हां खचितच ती
आज जरी महाराष्ट्र-प्रगतिची खात्री नाहीं आम्हां
तरि ठाउक, अवसेमागुन येतिल पुनवेच्या राती ।।
- सुभाष स. नाईक
Copyright © 2025 | Marathisrushti