(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • अनुभवाचे शहाणपण

    बदलून गेले जीवन
    अर्थ कळल्यानंतर
    परिस्थितीची आली जाण
    जाग आल्या नंतर ।।१।।

    श्रीमंतीच्या नादानें
    ऐषआरामी झालो
    पैशाच्या गर्वाने
    माणुसकी विसरलो ।।२।।

    तारुण्यातील उर्मीने
    अहंकारी बनविले
    शरिरातील गुर्मीने
    निर्दयी मज ठरविले ।।३।।

    धंद्यामध्ये येता खोट
    निराश अति झालो
    गरिबीची चालतां वाट
    प्रेमळ मी बनलो ।।४।।

    देह बनला दुर्बल
    विकार तो जडूनी
    जर्जर- पिडीतां बद्दल
    सहानुभूती आली मनी ।।५।।

    अनुभवासारखा
    शिक्षक नाहीं कुणी
    शहाणा करी अनेका
    परिस्थीती समजावूनी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गोदावरी

    अश्रद्धेकडून श्रद्धेकडचा प्रवास’… चित्रपटाचं उपशीर्षक एक प्रकारची हमी, सकारात्मकता देऊन जातं …आमच्यासारख्या सर्व सामान्य प्रेक्षकांना ‘and they lived happily ever after’ ची इतकी सवय आहे कि सिनेमा म्हटलं कि पहिल्यांदाच ‘शेवट गोड होतोय ना ‘ या कडे लक्ष लागून राहतं. ..आणि ते , ‘गोदावरी’ हा चित्रपट पूर्ण करतो..

  • बहीणीची हाक

    राखण करितो पाठीराखा, भाऊ माझा प्रेमळ सखा

    विश्वासाचे असते नाते, एकाच रक्तामधून येते....१

    आईबाबांचे मिळूनी गुण, तुला मला हे आले विभागून

    हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या....२

    प्रकाश झाला परंपरेनें, त्याला माहित पुढेच जाणे

    मार्ग जरी भिन्न चालले, मूळ तयाचे खालीं रूजले....३

    अघात पडतां तव वर्मी, दु:खी होवून जाते बघ मी

    दिसत नाही कुणा हे बंधन, जीव श्वासाचे अतूट स्पंदन....४

    भांडत रूसत हासत होतो, जगण्यामधला भाग असे तो

    खेच खेचता ढील सोडतां, सुटत नाहीं मग तो गुंता....५

    बाह्यांगीं तूं दूर आहे जरी, तव प्रतिमा ही राही अंतरी

    बघत राहते तुझी भाऊबीज, आठवणीत मी जगते आज....६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • आत्मशांती

    आत्माराम हा पांडुरंग माझा
    अंतरीचा हाच विश्राम माझा।।धृ।।

    सदानसदा चालतो सांगाती
    सदासर्वदा देई मज सन्मती
    जागवितो, जगदिशा अंतरी
    कृपाळू हा आत्माराम माझा।।१।।

    जगत , व्यवहारी तो रमतो
    सत्कर्माची चाल चालवीतो
    निष्काम! सत्यरुप दावितो
    निर्विकार , आत्माराम माझा।।२।।

    जन्मूनीही , मरणच जीवाला
    व्यालेले , हेची सत्य सृष्टीला
    स्मृतीगंध तो सात्विक गंधावा
    सांगतो आत्माराम हा माझा।।३।।

    सत्यात वाहते , निर्मल शांती
    असत्यात, असे अंती अशांती
    जन्मात लाभावी आत्मशांती
    भजण्यास आत्माराम माझा।।४।।

    वैखरीवरी विठ्ठल! विठ्ठल!!
    आत्मरंगी , रमतो आत्माराम
    उघडता कवाडे मोक्षमुक्तीची
    नेत्री नांदतो आत्माराम माझा।।५।।

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १६१

    २५ - १२ - २०२१.

  • बालपणी रमतांना (ओवीबद्ध रचना)

    इवलेसे लहानसे
    होते विश्व ते छानसे
    चार भिंतितले कसे
    ते मोरपंखी जसे।।१।।

    मनमानी वागायचे
    हवे तेव्हा उठायचे
    दिस कोड कौतुकाचे
    पिलू आई-बाबांचे।।२।।

    भोकाड पसरायचे
    लोटांगण घालायचे
    ढोंगी बगळा व्हायचे
    खोटच रडायचे।।३।।

    पोट दुखतं म्हणावे
    घरी खुशाल लोळावे
    आईच्या मागे फिरावे
    अभ्यासाला टाळावे।।४।।
    बालपणी रमतांना
    गमती आठवतांना
    खुप खुप हसतांना
    गंमत वाटतेना।।५।।

    सौ.माणिक शुरजोशी

  • आनंद ‘ भावना

    ध्येय असावे तुमचे नेहमीं

    आनंद मिळवण्याकडे

    'आनंद ' हाचि ईश्वर असतो

    समजून घ्याहो हे कोडे ।।१।।

    शरीर देई 'सुख ' तुम्हांला

    क्षणिक ते तर असती

    सुखाच्या पाठीशी छाया असते

    'दुःख ' तयाला संबोधती ।।२।।

    सुखाबरोबर नाते असते

    सदैव अशाच दुःखाचे

    वेगळे त्यांना कुणी न करती

    जाणा तत्त्व हे जीवनाचे ।।३।।

    'आनंद ' भावना असे एकटी

    नसे तेथे दुजी भावना

    'मोक्ष' तयाला म्हणती कुणी

    आस्तित्व त्याचे तुमच्याच मनां ।।४।।

    व्यर्थ जातील प्रयत्न तुमचे

    'आनंद' शोधता बाहेरी

    विसरुन जाता जर देहाला

    मिळेल तुम्हां ते अंतरी ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पडछाया!

    चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती

    संगे माझ्या, माझी छाया, मागून येत होती

    वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग

    खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग

    तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली

    समरस होण्या माझ्यामध्ये, पायी घुटमळली

    ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला

    प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला

    पडू लागले पावूल माझे मंद मंद आता

    श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता

    दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी

    काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी

    एकटाच मी होतो तेथे, अंधाऱ्या रात्री

    प्रकाश्यातली साथ लाभली, ती छाया नव्हती

    सुखामधली सोबत सुटते, दु:खाच्या वेळी

    सगेसोयरे साथ सोडती, पडत्या संकट काळी

    पहाट होता बघू लागलो, पुनरपि छायेला

    सोडून गेली रात्री, त्याचा निषेध नोदविला

    छाया म्हणते:

    रविकिरणांच्या संगे गेली, मीही त्यांच्या मागे

    आठव देण्या रवि उदयाची, त्याला मी सांगे

    तुझे नि माझे अतूट नाते, त्याच्या अस्तित्वाने

    पुनरपि आले तव सहवासे, त्याचाच साक्षीने

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • भारतीय

    आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लीहलेल्या काही ओळी.....

    भारतीय ! (१५-०८-२०१८)

    नको हो माण, नको हो पैसा,
    नको तो वायफळ जातीवाद,
    कानी पडावी एकच गोष्ट,
    भारतीय असल्याची तीक्ष्ण साद...!!

    जो तो उठतो लढत बसतो,
    वैयक्तिक वाद कुठेच नसतो,
    सोडता ठिणगी राजकारण्यांनी,
    हल्लाबोल कसा अंगी सळसळतो?!!

    थोडातरी विचार करावा,
    समजून उमजून निर्णय घ्यावा,
    एकजात उरात आम्ही भारतीय,
    अंती भारत मातेचा आदर उरावा.....!!

    हे अशोकचक्रा पाहता तुझी शान,
    गगनी भिडते अभिमानाने उंच मान,
    हाच अहंकार प्यारा रे मजला ,
    स्वीकार मानाचा मुजरा रे तुजला...!!

    ... श्र्वेता संकपाळ.

  • निनावी गुरू

    नव्हतो कधीही चित्रकार,

    परि छंद लागला,

    रंगाच्या त्या छटा पसरवितां,

    मौज वाटे मनाला ।।१।।

    रंग किमया दाखविण्या,

    नव्हता मार्गदर्शक कुणी,

    गुरुविना राहते ज्ञान अपूरे,

    याची खंत मनी ।।२।।

    नदीकाठच्या पर्वत शिखरी,

    विषण्ण चित्त गेलो,

    मन रमविण्या कुंचली घेवून,

    चित्र काढू लागलो ।।३।।

    निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य,

    रंग छटा शिकवी,

    गुरू सापडला चित्र कलेतील,

    हाच तो निवावी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • सिलेंडरच्या भाववाढीने