कौशल ईनामदार एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात..
एकदा एक विचार मनात आला.
कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..?
मुकेश हे लिंबू सरबत आहेत.
जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..!
मन्ना डे हे दूध आहेत.
पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !
गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत.
येवू घातलेली झोप उडवतात.
आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि फक्त नशा अनुभवावी.
महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत.
सोनेरी, उत्तम दर्जा आणि ...!
तलत मेहमूद...म्हणजे उसाचा रस..!
एकदम गोड आणि थंड पण एक किंवा
जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स.
जास्त घेवू शकणे अशक्य...!
महेन्द्रकपूर..म्हणजे ताक..!
जमलं तर एकदम फक्कड नाहीतर जावू दे.
किशोर कुमार चहा आहेत.
कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा.
दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून,
जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो
म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा,
इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तचं वाटतो.
शिवाय माझंही ते आवडतं पेय आहे..!
आणि शेवटी....
लता मंगेशकर. त्या पाणी आहेत..!
नितळ,पारदर्शक, स्वच्छ,शुद्ध..!
तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय..!
धन्यवाद
उद्याच्या चिंतेत आजचा आनंद कशाला हरवायचा,
आजचा प्रत्येक क्षण मनभर आनंदाने जगायचा.
कालच्या आठवणींना प्रेमाने निरोप द्यायचा,
उद्याच्या काळजीचा भार वेळेवरच सोपवायचा.
जे आपल्या हातात नाही, ते नियतीच्या स्वाधीन करायचं,
मनावरचं प्रत्येक ओझं हसत हसत हलकं करायचं.
संकटं येतातच आयुष्यात ऋतू बदलल्यासारखी,
पण आशेची ज्योत मात्र कधीच मावळू द्यायची नाही.
सुखात साथ देणारे अनेक भेटतात वाटेवर,
दुःखात हात धरणाऱ्यांनाच मनात कायमचं स्थान द्यायचं.
क्षणभंगुर आहे हा सुंदर प्रवास आयुष्याचा,
म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने, समाधानाने आणि हसतमुखाने जगायचा.
कारण...
आनंद वाटला की तो अनेकपटींनी वाढतो,
दुःख वाटलं की मन हलकं होतं.
माणुसकीनी नाती जपली की,
आयुष्य खऱ्या अर्थाने फुलून येतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
मातेच्या उदरांत असतां,
जाण असते त्या जीवाला,
प्रभूचाच मी अंश आहे,
सांगत असतो तो सर्वाला ।।१।।
सो s हं चा निनाद सतत,
कानास आमच्या ऐकूं येतो,
'तो' मीच आहे शब्दाने,
आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।
मातेच्या उदरांतूनी बाहेरी,
पडतां स्वतंत्र जन्म मिळे,
नाश पावूनी साऱ्या स्मृति,
स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।
आतां त्याचा निनाद ‘को..हं’,
प्रश्न युक्त तो भरला असे,
“मी कोण आहे ?” विचारी सर्वां,
उलघडा त्यास होत नसे ।।४।।
जाणून घेण्या स्वत: विषयीं,
सारे आयुष्य खर्च करती
पुनरपि येतां स्मृति त्याला,
प्रभूमय हे सारे भासती ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
भेट तिची माझी थेट नभ-धराची
सुख क्षण भराचे आस जीवनाची
भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी
आठवांचा ताटवा,असे सदा सोबती
सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची
कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना
कोण घेईल समजून,माझ्या यातना
माणसाचे जग की,दुनिया पत्थराची
जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव
कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज
कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची
भावना अनावर होती,सांज सकाळी
बावऱ्या मनाला, नच सुचे काही
जीवघेणी भासे, ती वेदना विरहाचि
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.
सप्तसुरांचा जसा गंधार राजा
सण दिवाळी , हा सणांचा राजा
अविवेकाची विझवीत काजळी
आनंददीप उजळीत सुखदा आली ।।१।।
स्वर्ग ! त्रैलोक्याचा जणू अवतरला
दिप नभांगणीचेच सजवीत धरेवरी
अमंगळा सारुनी महन्मंगला आली
उधळीत आनंदाला दीपावली आली ।।२।।
क्षण क्षण , अत्तरी सुगंधात नाहला
प्रीतवात्सल्ये ओवाळीली निरांजने
दारी , अंगणी रंगली सडा रांगोळी
दीवाळी ऐश्वर्यसुखदा घेऊनी आली ।।३।।
वसुबारस , धनतेरस ,नरकचतुर्दशी
पाडवा , लक्ष्मीपूजन , भाऊबीजेची
पंचूकली ! दिपावलीची आनंदघनी
परंपरंगत , सुखदा तेजोमयी आली ।।४।।
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४१
२ - ११ - २०२१.
अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार ।
कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार ।।
खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी ।
वादळ वारा ऋतू बदले, चूक न होई त्यांत जराशी ।।
घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत ।
हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत ।।
प्रत्येक कालक्रमणाच्या आखून, दिल्या मर्यादा ।
ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा ।।
जरी भासे नवीन कुणा, नाविन्य सारे त्याचेसाठी ।
बघत नाही जूनेपण तो, येई नंतर त्याचे पाठी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उपास तापास करुनी, शिणवित होतो देहाला,
भजन पूजन करुनी, पूजीत होतो देवाला ।
कथा कीर्तनें ऐकूनी, पुराण मी जाणिले,
माळ जप जपूनी, प्रभू नामस्मरण केले ।
वेचूनी सुमनें सुंदर, वाही प्रभूचे चरणीं,
फुलांचे गुंफूनी हार, अर्पण केले कंठमणीं ।
जाऊनी तीर्थ यात्रेत, दर्शन घेतले तीर्थांचे,
प्रसिद्ध देवालयांत, चरण स्पर्षिले मूर्तीचे ।
मनामध्यें ठेऊन शांती, मूल्यमापन केले जीवनाचे,
कांहीं न मिळाले हातीं, व्यर्थ दवडिले क्षण वेळेचे ।
संसारातील प्रेम व राग, ह्यातच मन गुरफटले,
कर्तव्यातील एक भाग, प्रभू भक्तीसी संबोधले ।
परमार्थ आणि संसार, भिन्न नाहींत दोन,
प्रभूचाच आहे संसार, मनी तूं हे जाण ।
कर्म फळ आशा, बाळगूं नको मनीं,
तेंव्हा न येईल निराशा, कर्म करीता क्षणीं ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एकदा एका अस्वलाने झाडामागे लपून सिंहाला जंगलात फिरताना पाहिलं.
जंगलचा राजा सिंह जंगलात रुबाबात फिरे. थोडसं चालून मग पुन्हा एकदा मागे वळून बघे.
अस्वलाला वाटलं…
‘आपण ही जंगलचा राजा व्हावं.
सिंहासारखं रुबाबात फिरावं.’
पचास साल हुए जिंदगीके, गोल्डन ज्युबली मनायी गयी
हंगामा और जल्लोष मे, पूरा दिन पूरी रात गयी
सारे बच्चे और रिश्तेदार, जमा हुए इकठ्ठा
फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे, जब खानेको था मिठा
सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर
हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार
जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना
जीन गुणोंको हमनेही ना पहचाना
वो हमारेमे संकरीत है, उसकी दिगयी हमे कल्पना
आदर्शवाद, सच्चाई और प्यार के पूजारी
देखी किसीने हमारे मे थे बाते सारी
आचंबेके साथ सोंच रहे थे गंभीरतासे
के इन गुणोंका पता उन्हे लगा कैसे
जीन गुणोंका अर्थ हमने, आज तक ना जाना
कैसे मिला उनका उन्हे ठिकाना
जो कुवेमेही नही था, वो बालटी मे कैसे आया
और इन बातोंका हमे आश्चर्य हुआ
शायद यह हो सकती है पार्टी की मिठाईयां
नैतीक दबाव उनपर जीस वझेसे आया
खिलानेवाले की कुच तो इज्जत करो
उसके आसलीयत पर मत उतरो
कमसे कम इतनी उमरबाद, होने दोजी खूष उसे
सोचा हुंगा किसीने, मन मे ऐसे
कलतक दे रहे थे जो गालीयां
दिखी आज हमारेमे उनको खुबीयां
चार झुठ एक सच्चे के बराबर, जब रेटकर कहा जाता है
और किसीकी तारीफ, हकीकत बनती
जब आखों मे पानी लाकर कहा जाता है
यह तो पता हुआ उनकी तारीफ से,
के आसलीयत मे जिंदगी होनी चाहीए कैसी
इन ताऱिफ और गुलदस्तोकी चौकटने प्रसन्न किया हमारा चित्त
और ख्यालोंकी दुनीयांने बिती सारी रात
करवटे बदलते बदलते सोचना मजबूर किया
के जो कुछ जिंदगी मे सच्चा हुआ, तुने क्या पाया
जिंदही का मकसद क्या, जरा सोच इन बातों पे
यही विचार झाकने लगा मन मे, उमरके इस मोड पे
रईस बापकी इकलोती आवारा आवलाद
देखी हमने पैसोको करते बरबाद
लक्ष्मी के मोलको वो गधा जानेगा कैसे
वह तो समझताहै पैंसो को पानी जैसे
समयका मोल हमने किया उस आवारा भाती
और खो बैठे वो महान संपत्ती
गया वख्त फिर हात आता नही,
बचपन मे शिक्षकने घोल घोलकर बाते कही
अर्थ उन पक्तीओंका तो हम जान गये थे
पर मतलब से उसके बहूत दूरी पर थे
पचास साल जानेके बाद, पंक्तीओंका दोहरा रहे है करते याद
पर अब तो ये बेफूझूलकी हुई ना बाते
दुनीयांके चक्करको कैसे वापीस फिराते
पेंडीग रखो इन बातोंको, फूरसतसे करेंगे हम उनको
कर दिया इन्ही बेफीकीर आदतोंनो सर्वनाश
और समय खो जाने पर आता था हमे होश
खेल कुद और तंदुरस्ती को जान
विद्यार्थी दशा मे नही हुयी इसकी पहचान
समझते थे खाईंगे पियेंगे बनेगे नवाब,
खेलेंगे पढेंगे बनेंगे खराब
चार बच्चोंका अड्डा जमाए, झाडके तले बैठते थे
और दुसरे दोस्त, जो खेल रहे, उनपर कॉमेट्स करते थे
बगैर खेले मैदान मे, खेलोंपर करते थे मार्गदर्शन
किसीसे कुछ सुना, या अकबारपढा, यही था हमारा ग्यान
बातें बनाना यही कला, हमने सिखी पढाईके जमानेसे
और उमरके हिसाबसे जो मिला ग्यान, निकालते उगालकर दिमागसे
उन बातो मे ना कुछ अनुभव था, ना अभ्यास किया पंक्ती
बकते थे भडाभड जो मुहसे निकल आती
खेल कुद मे रहे पिछए और लिख पढाईमे निचे
इसी कारण जिंदगी मे रहे कच्चे
ग्यानी अनुभवोंकी थी हमारेमे कमतरता,
सिर्फ उमरके अनुभवोंको कोन पुछता
अब आपही सोंचो जरा,
जीसके जिंदगी मे था खाना पिना मौज उडाना
समयको फूकटका माल समझकर बरबाद करना
कैसे इन लोगों ने हमे आदर्शवादी माना
यह तो हुआ जबानी जमाखर्चा, क्या झूठ और क्या सच्चा
पर एक सज्जनने जो कही बात,
उसमे दिखी मुझको जिंदगी की हकीकत
उसने सुनाया हमारे तारीफ का राज
वही बना जिंदगीके तस्सलीका आवाज
ये दुनीया देखनेमे है खूबशूरत, पर काटोंसे भरी हुयी अनगीनत
हर कदमपर जिंदगी के लीए चाहीए झगडा
एक एक दिन गीने इन्सान आगे बडा
सोचना पडता था के गया दिन कैसा
आनेवाले दिन का नही था भरोसा
यह संसार है बेरहेम, बेदर्द औऱ जालीम
इसी जिंदगीमे हम जिये थे ५० साल कमसे कम
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti