मला वाटते आज नव्याने जगावे
तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे
पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी
मिठीत तुझ्यासवे विसावून जावी ।
पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची
थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची
तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी
रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी ।
विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता
ना कुठल्याही दुःखाची आठवण यावी
मिसळावेत श्र्वासात श्र्वास अपुले
ना भीती कुणाची कुणा ही स्मरावी ।।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
१० आक्टोंबर २०१८
झाकोळल्या नभांगणी
कृष्णमेघना अनावर...
जीवा, ध्यास श्रावणी
सरसरसर धारा सुंदर...
वर्षा ऋतू बरसणारा
स्पर्श ओलेता मनोहर...
शब्द गझला अर्थवाही
भावगंधी ओंजळ सुंदर...
चिंबचिंबली पानफुले
झुळझुळतो नाद सुंदर...
अतर्क्य रूप चैतन्याचे
लावण्य रुपडेच मनोहर...
नाचत नाचत येते वर्षा
ओथंबलेले गगन सुंदर....
रचना क्र. ७८
२०/७/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
पुढे मुंबईलाच परळच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात (Bombay Veterinary College) १९८० ते १९८४ मधे पशुवैद्यक पदवी शिक्षण पूर्ण केले. या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे वैशिष्ठ्य म्हणजे हे एशिया खंडातले सर्वात जुने (१८८६ साली ब्रिटीशांनी सुरु केलेले) पशुवैद्यकीय महाविद्यालय. त्याला जोडूनच असलेले सुसज्ज पशु इस्पितळ. जुन्या दगडी इमारती आणि भरपूर झाडीने भरलेल्या या महाविद्यालयाच्या प्रांगणामधे (Campus) आल्यावर आपण मुंबईत आहोत यावर चटकन विश्वास बसत नाही. पूर्वी हे कॉलेज मुंबई विद्यापीठाशी संलग्न होते. कृषी विद्यापिठांची स्थापना झाल्यानंतर हे कॉलेज दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न झाले.
पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे कृषी / पशुवैद्यक या शाखांना येणारा विद्यार्थी वर्ग हा प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणारा. बर्याच जणांकडे थोडी बहुत शेती असायची. बहुतेकांच्या घरी शेतीच्या कामासाठी बैल आणि थोडया फार गायी, म्हशी वगैरे जनावरे असायची. काही जणांचा कोंबडयांचा व्यवसाय असायचा. बहुतेकांनी ग्रामीण भागातलं पशुवैद्यकाचं जीवन जवळून बघितलेलं असायचं. या सगळ्या पार्श्वभूमी लाभलेल्या विद्यार्थ्यांमधे आमच्यासारखी नावापुरती थोडी शहरी मुलं / मुली असायची. पूर्वी पशुवैद्यक शाखेकडे जाणार्या मुलींचा कल फारच कमी होता. ७५ विद्यार्थ्यांच्या बॅचमधे क्वचित असली तर एखाद दुसरी मुलगी असायची. आमच्या आधीच्या बॅचमधे आणि आमच्या बॅचमधे १४-१५ मुली आल्या होत्या. आता सारं चित्रच बदलून गेलंय आणि वर्गातील जवळ जवळ निम्या किंवा थोडया अधिकच मुली विद्यार्थिनी म्हणून असतात.
पशुवैद्यकीय महाविद्यालयात मित्र मिळाले ते शहरी तसेच ग्रामीण भागातले. त्यातला १५-२० जणांचा जिगरी दोस्तांचा ग्रूप तर आयुष्यभरासाठीचं मित्र मंडळ देऊन गेला. त्यांच्यातल्या बर्याच जणांमुळे ग्रामीण महाराष्ट्राची आणखी ओळख होत गेली. पुढे ६ महिने इंटर्नशिपसाठी ग्रामीण भागातच विविध ठिकाणी जाऊन काम केलं. वेगवेगळ्या NSS Camps आणि extension work निमित्ताने खेडयापाडयातून फिरुन ग्रामीण भागाशी अधिक जवळीक निर्माण झाली. आमच्या बॅचमधले बरेच जण पदवी घेऊन, महाराष्ट्र सरकारच्या सेवेत दाखल होऊन, महाराष्ट्रातल्या गावांत आणि खेडोपाडी पांगले.
आपल्याकडे पशुवैद्यकीय पेशाला अजूनही म्हणावा तसा मान नाही. गावाकडे तर गाई म्हशींचा डॉक्टर म्हटला की “ढोर डॉक्टर” म्हणूनच संभावना व्हायची. नाटकं सिनेमामधे देखील माणसांच्या डॉक्टर ऐवजी ‘ढोर डॉक्टराला’ आणून एक हमखास हशा मिळवण्याची सोय केलेली असायची. यातून सुटका व्हायचा मार्ग म्हणजे पाळीव प्राण्यांचा, ‘कुत्र्या मांजरांचा’ डॉक्टर व्हायचं. त्यामुळे शहरात प्रॅक्टीस करता येते आणि समाजात थोडा अधिक मान मिळतो. माझ्या बहुतेक सार्या शहरी मित्रांनी सूज्ञपणे एकतर हा मार्ग पत्करला किंवा मार्केटींग सारखे पांढरपेशी क्षेत्र निवडले. मी मात्र पशुप्रजनन या विषयामधे पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करून गाई, म्हशी, घोडयांसारख्या मोठया जनावरांच्या जगामधे प्रवेश केला. त्या निर्णयाबरोबरच माझं पुढचं बरचसं आयुष्य गाई घोडयांच्या फार्मसवर आणि ग्रामीण वातावरणात जाणार हे देखील नक्की झालं.
पुढे नोकरीच्या निमित्ताने पुण्याजवळ तळेगावला घोडयांच्या फार्मवर दीड वर्षे आणि गुजराथमधे आणंद जवळ गाई म्हशींच्या फार्मवर साडे सहा वर्षे घालवली. फार्मवरचे कामगार म्हणजे आसपासच्या खेडयांतले गरीब खेडूत. त्यांच्याबरोबर एक होऊन दिवस रात्र काम केलं. रात्री बेरात्री त्यांच्या खांद्याला खांदा लावून गाई म्हशींची आणि घोडयांची बाळंतपणं केली. उन्हातान्हात त्यांच्याबरोबर जीपमधून फिरलो. त्यांच्या खोपटांमधे, झोपडयांमधे बसून त्यांनी प्रेमाने दिलेला गुळाचा चहा आणि चटणी भाकरी खाल्ली. भुकेच्या वेळेला जीप थांबवून रस्त्याकडेच्या टपर्यांमधे त्यांच्याबरोबर जे मिळेल ते खाणं खाल्लं. महाराष्ट्र, गुजराथ आणि पंजाबमधे कामानिमित्त खेडयापाडयांत खूप भटकलो. खेडयातलं जीवन जवळून पाहिलं, अनुभवलं.
या सगळ्या पार्श्वभूमीमुळे सर्वसाधारण शहरी माणसापेक्षा मला ग्रामीण भागाची अधिक जान पेहचान झाली. कदाचित याच पार्श्वभूमीमुळे अमेरिकेच्या ग्रामीण भागाशी माझी तार लवकर जुळली असावी. अमेरिकेतलं ग्रामीण जीवन मी भारतातल्या ग्रामीण जीवनाच्या चष्म्यातून पाहू शकलो, समजू शकलो. कदाचित भारतीय आणि अमेरिकन ग्रामीण जीवनात काही समान धागा दिसल्यामुळे, मी तो पकडायचा प्रयत्न केला. हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय हे वाचकांनी ठरवायचं आहे. अर्थात मी कितीही ग्रामीण भागाशी जवळीक दाखवायचा आव आणला तरी शेवटी मी एक जातीवंत मुंबईकर आहे. माझ्याजागी जर एखादा खराखुरा गावकरी किंवा हाडाचा शेतकरी असता, तर कदाचित त्याच्या लेखणीतून ही ‘गावाकडची अमेरिका’ अधिक अस्सल उतरली असती.
तेजोनिधीच्या आगमनाने, सारे जागे झाले चराचर,
सोनेरी लख्ख प्रकाशाने,
उजळत जसे धरणीचे अंतर,---
अंधाराच्या सीमा ओलांडत ,
रविराजाचे पहा येणे,
उजेडाच्या सहस्रहस्ते,
पृथेला हळुवार कुरवाळणे,--!!!
झाडां-झाडांमधून तेज,
खाली सृष्टीपर्यंत पोहोचे,
अजूनही आहे निसर्गच श्रेष्ठ,
मित्राचे त्या मूक सांगणे,--!!!
किमया आपली न्यारी करे, अव्याहत ते चक्र चालते, ब्रम्हांडातील सारे खेळ हे,
पृथ्वीवर सर्व देत दाखले,--!!!
सूर्यकिरणांची तिरीप,
कणाकणांपाशी पोहोचे,
जिवंत ठेवण्या सृष्टीला,
दिनकर हा सदैव विराजे,--!!!
सृजनाचे सारे काम हे,
अविश्रांत ते करत राहणे,
सुट्टी रजा नच कधीच, कर्तव्यपरायणता निभावणे ,--!!!
असंख्य दूत किरणांचे,
धावधावुनी सेवा -कर्ते ,
भेदाभेद अमंगळ ते,
निसर्ग शिकवे परहस्ते,--!!!
*समानतेचे देत धडे,
निमूट आपुले काम करणे,
स्वतः जळून,- झिजून,
दुनिया सारी उजळून टाकणे*,--!!!
© हिमगौरी कर्वे.
दिन दुबळे रोगी जर्जर, कितीक पसरले या संसारी
काटे काढूनी जीवनावरचे, सुगंध घ्या कुणीतरी....१
शून्यामधले कितीकजण, शून्यची सारे अवतीभवती
परिस्थितीच्या वणव्यामध्ये, धगधगणारे जीवन कंठती....२
आज हवे त्यांना कुणीतरी, फुंकार घालील दु:खावरती
सहानुभूतीचा शब्द, निर्माण करील सहनशक्ति....३
क्षीण होता दृष्टी, दिसेल कां धडपड
श्रवणदोष येण्यापूर्वी, ऐकून घे दु:खी ओरड...४
चपळ सारे अवयव असता, धावपळीचे जीवन बघ तू
संगे जावून जाण त्यांचा, जगण्यामधला हेतू...५
जेव्हां असशील विंवचनेत, लक्ष केंद्रीत स्वदेहा भवती
कोण जगतो कसा काय , जाणून घेण्या सवड कुणा ती...६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ठेचकळे आंधळा मी काळोख्या पथात
आधाराचा हात देई पंढरीचा नाथ ।।
चुकीचाच धरला रस्ता, असा चालतो मी –
विषयवासनांच्या पंकीं अजुन लोळतो मी
मद-मत्सर-मोह यांचा संग नसे जात ।।
जरी मी न जाऊं शकलो कधी पंढरीला
मंदिरीं न पाहूं शकलो विटेवर हरीला
भाग्यवंत परि मी, विठ्ठल भेटला मनात ।।
पाडुरंगनाम येतां एकदाच माझ्या तोंडीं
स्वर्गानंदाच्या स्पर्शें पावन झाली कुडी
झरा अमृताचा अक्षय प्रगटला मुखात ।।
जगत्-भान हरपे माझें, अंतरीं निवालो
पाप सर्व जळलें माझें, पुण्यवंत झालो
जन्मचक्र-भीती विठ्ठल तोडतो क्षणात ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
नव्हतो आम्ही आमचे कधींही बनले जीवन दुजामुळे ।
कर्तेपणाचा भाव तरीही येतो कां मनी ? ते न कळे ।।
कसा आलो या जगतीं ठाऊक नव्हते कांही मजला ।
कसा वाढलो हलके हलके जाण आहे याची मला ।।
जेंव्हा झालो मोठा कुणीतरी वाटू लागले कांही करावे ।
काळाने परि दिले दाखवूनी जीवन प्रवाही वाहात जावे ।।
परिस्थितीच्या काठामधूनी जीवन सरिता वाहात जाते ।
वाहात असता त्याच दिशेनें इच्छीत ध्येय हातीं नसते ।।
होते सारे अखेर तेचि आखून ठेवते नियती जे जे ।
अज्ञानानें समजत राही हे केले मी, अन् हे माझे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शत्रु तुमचा तुम्हींच असूनी तुम्हींच कारण दुःखाचे
सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं हात असती केवळ तुमचे
बी पेरतां तसेंच उगवते साधे तत्व निसर्गाचे
निर्मित असतो वातावरण क्रोध अहंकार मोहमायाचे
कसे मिळेल प्रेम तुम्हांला घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता
क्रोध करुन इतरांवरी मिळेल तुम्हांस कशी शांतता
शिवीगाळ तो स्वभाव असतां आदरभाव तो कसा मिळे
शत्रुत्वाचे नाते ठेवतां सलोख्याचा सांधा ढळे
इच्छा मात्र असते सुखाची सदैव मिळावा तो आनंद
शक्य होण्या वातावरणी हवा प्रेमळ सुसंवाद
आवलंबून ते सारे असते वागतां कसे तुम्हीं ह्या वरती
वाईट वागण्याचे बी पेरुनी चांगले मग कसे उगवती
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti