सितेसाठीच रामालाही
आज बदनाम केले आहे
श्रीकृष्णाला गोपिकांनीच
आज बदनाम केले आहे
लक्ष्मीनेच तर सरस्वतीस ही
आज बदनाम केले आहे
महाभारता द्रोपदीनेच
आज बदनाम केले आहे
देवांनाही इंद्राने त्या
आज बदनाम केले आहे
कलियुगाने माणसालाच
आज बदनाम केले आहे
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
दिसत नाही काय तुला, त्याच्या मधला ईश्वर ।
‘अहं ब्रह्मास्मी’ सूत्र कसे मग, तुजला कळणार ।।
देह समजून मंदिर कुणी, आत्मा समजे देव ।
त्या आत्म्याचे ठायी वाहती, मनीचे प्रेमळ भाव ।।
आम्हा दिसे देह मंदिर, दिसून येईना गाभारा ।
ज्या देहाची जाणीव अविरत, फुलवी तेथे मन पिसारा ।।
लक्ष केंद्रीतो देहा करीता, स्वार्थ दिसे मग पदोपदी ।
विसरून जातो सहजपणे, अंतर्मनातील देव कधी ।।
माझ्यातील देवही विसरणे, स्वभाव असेल जर माझा ।
कशी दिसेल दुजामधली, मग ती ईश्वरी ऊर्जा ।।
जाणून घे तू अस्तित्व त्याचे, सर्व जीवांच्या अंतर्यामी ।
म्हणशील त्याला ईश्वर तू , अन् ईश्वर आहे मी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
थांबव गंगा यमुना मुली आपल्या नयनातल्या
हंसण्यात जन्म घातला मग ह्या कोठूनी आल्या ? //
हांसत गेले जीवन तुझे फूलपाखरा परी
तसेच जाईल भविष्यातें आशिर्वाद देतो शिरीं //
समजतील दुःखी तुजला नसता तो तुझा स्वभाव
हासून खेळून आनंदाने फूलवित रहा भाव //
जाणून घे स्वभाव सर्वांचे रमुन जा संसारी
चाली रितीचे पालन करावे तुझ्याच नव्या घरी //
आई बाबा दुरावले बाळगु नकोस खंत
पाहशील आम्हाला सासू सासऱ्याच्या रुपांत //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एक परिघ आंखले , विधात्याने विश्वाभोवतीं,
जीवन फिरते , त्याचे वरती ।।१।।
वाहण्याची क्रिया चाले, युगानुयुगें ह्या जगतीं,
कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा, एकांच परिघात फिरती ।।२।।
जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी,
जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं लक्ष्य धरी ।।३।।
मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित करी जगाला,
परिघ सोडूनी जाण्यासाठीं दिसत नसे मार्ग कुणाला ।।४।।
प्रयत्न तुमचा सदा असावा मध्यबिंदूकडे सरकण्याचा,
शक्तीरुप तेथेंच असूनी त्याच्यांत सामावून जाण्याचा ।।५।।
भीती मनीं वसते कसे जाऊं आंसाकडे,
तुकडे होतील देहाचे जेव्हां आसांत पडे ।।६।।
सोडूनी देण्या सारा खेळ केंद्रस्थानी जाणे, मार्ग असे,
विसरुन जाता देहाला प्रभू समर्पण करण्यांत असे ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
आत्मा कोठे असतो, नाभी केंद्रात शोधाल का ?
तो तर दिसत नसे, मग त्यास जाणाल का ?....१,
सर्व इंद्रिये वापरली, परि न झाला बोध,
कोठे लपला आहे, न लागे कुणा शोध....२,
विचार आणि भावना, संबंध त्याचा ज्ञानाशी
मेंदूत आहे इंद्रिय, संपर्क त्यांचा सर्वांशी....३,
मेंदूवरी ताबा असे, नाभीतील मध्य बिंदूचा
समजून घ्या सारे, तेथेच आत्मा देहाचा...४,
मातेचे अपूर्व देण, बाळाच्या नाभीत जमते,
आत्मा हेच ते रूप, जीवन कार्य चालविते.....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सारे धर्म मानव निर्मीत
त्यांतच आणली जातपात ।।
सर्व धर्म महान
तत्वज्ञानाची असे खाण ।।
प्रत्येकाचा धर्म निराळा
जन्मताचि मिळाला ।।
व्यर्थ का भांडता धर्मावरुन
तो तर मिळाला जन्मापासून ।।
भेदभाव जावे विसरुन
त्यातच सर्वांचे कल्याण ।।
स्वधर्म तत्वे पाळा घरांत
बाहेर एक मानवधर्म सर्वांत ।।
मानवधर्म फक्त मानवता
त्यांतची मानवाची श्रेष्ठता ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.
हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ कि. मी. च्या डोंगरपट्ट्यास गर्भगिरी किंवा गर्भाद्रि असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार या लोकप्रिय पोथीतील २३ व्या अध्यायात नवनाथांच्या गर्भगिरीतील वास्तव्याचे व कार्याचे वर्णन आहे. आदिनाथ शिवाचे वृध्देश्र्वर हे प्राचीन क्षेत्र तसेच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ या प्रमुख नाथसिध्दांच्या संजीवन समाध्या यासह अनेक नाथकालीन स्मृतीस्थळांनी हा परिसर गजबजलेला आहे. तीन तालुक्यांच्या भूभागावर इतक्या दाटीने वसलेली नवनाथांची स्थाने भारतात अन्यत्र कोठे अभावानेच असतील.
गर्भगिरीतील नाथपंथ
लेखक : टी. एन. परदेशी
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २५०/- रुपये
पाने : २०८
जाय जाय केलत्
जात पण नाय
कुतल्याच पिल्लू
दुधकाला खाय
लेशमाचं त्याच
मऊ मऊ अंग
तुटतच नाय
त्याचा माहा संग
कानाला धलून
खेलं गाल्या गाल्या
उगल्यात त्याला
मिशा काल्या काल्या
हातभल जीभ कसं
कालतय् बाहेल
बाबाला पाह्यलं त्
चय धूम पलंल
हाय हाय केलं त्
गुयं गुयं कलल्
युव युव केलं त्
गोंदा घोलंल
छोव छोव केलं त्
भोव भोव कलल्
मनीला पाह्यलं त्
तिच्या मागं पलल्
नजल् जली पलल्
माणुसबी दचकत्
गल्लीत मंग माहा
वट जातो वाल्हत्
© विठ्ठल जाधव
@शिरूरकासार, जि.बीड
मो.9421442995
-- स्वाती ठोंबरे.
लक्ष आपले जात असते,
सदैव प्रभूकडे,
मार्ग सारे ठरलेले,
जे मिळती तिकडे ।।१।।
‘को S हं’ शब्दाचा निनाद होतो,
प्रथम मुखातून,
जन्मताच तो प्रश्न विचारी,
“मी आहे कोण?” ।।२।।
मार्ग हा तर सुख दु:खाने,
भरला आहे सारा,
राग लोभ मोह अंहकार,
याचा येथे पसारा ।।३।।
वाटचाल करिता यातून,
कठीण होवून जाते,
जीवन सारे अपूरे पडून,
अपूर्ण ज्ञान मिळते ।।४।।
आयुष्य तुमचे थोडे असूनी,
काळ वेळीच जाणावा,
मिळेल जो क्षण तुमचे हातीं,
प्रभूसाठी तो असावा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti