(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • अश्याने पुढारलेले बनू का?

    || हरी ॐ ||

    आपल्या देशाला थोर परंपरा ऋषींची,
    संतांची आणि देशभक्तांची !
    विज्ञान आणि तंत्रज्ञानात नाही ताबेदारी कुणाची,
    उकल करू पाहतो न समजलेल्या ग्रहांची !

    अश्या थोर इतिहासाला आणि प्रयासाला,
    बट्टा लागला देश हिताला समलिंगी संबंधाचा !
    नाही पटत मनाला, कीव येते बुद्धीची
    समलैंगिक संबंधींची !

    घटनेप्रमाणे लोकशाहीत मतस्वातंत्र सर्वांना,
    तरी समलिंगी स्वैराचार नाही पसंत कायद्याला !
    अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली,
    माणूसच स्वत:चा बुद्धिभेद करू लागला !

    काय त्या पुढारलेल्या चारपाच राष्ट्रांनी
    समलिंगींसाठी कायद्यात केले बदल !
    पण माहित नाही त्यांना
    भविष्यात काय वाढून ठेवले आहेत बदल !

    नुकसान आहे स्वत:चे,
    राष्ट्राचे, मानवतेचे,
    भविष्यात राष्ट्राला
    कारण नाही कुटुंबनियोजनाचे !

    असे कसे काही शहाणे सुरते,
    वागतात बुद्धीभेदाने पछाडल्यासारखे?
    हेच का देशप्रेम आणि भक्ती?

    जगदीश पटवर्धन, दादर

  • सासरी जाताना

    हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला

    विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला.... ।। धृ ।।

    खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,

    पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी

    सैल कर तू पाश आपला...१,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

    संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी

    कुठे लोपला आज विश्वास तो, जागृत होता सदैव मनी

    नकोस देऊ वाव शंकेला...२,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

    ते तर केवळ घर निराळे, मायेने परि आहे भरले,

    जसे मिळवले प्रेम माहेरी, वाटीत जाईन सासरी सगळे

    आठवण करीता येईन भेटीला...३,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ऋतुचक्र सृष्टीचे

    आरवलं कोंबड

  • आरशात चेहरा बघतां

    आरशात चेहरा बघतां,
    किती असेच चेहरे दिसती, मुखवट्यांचे जग हे,
    अवतीभोवती कसे नाचती,--!!!

    लागत नाही मुळीच पत्ता,
    अशावेळी विलक्षण फसगत,
    होत जाते,केवळ फरपट,
    तडफड होते मैत्री करतां,,-!!!

    कोण कुठला आहे तो,
    पक्के ठाऊकही नसते,
    तरी नवांगताची पण ओढ,
    अनावर की असते,--!!!

    त्याच मोहाच्या क्षणी,
    घ्यावे आपण आवरते,
    करती खूप साखरपेरणी,
    गोड गोड बोलती मुखवटे--!!!

    अनुभव कडू-गोड देतो,
    वर जिवाची होते लागणी,
    असा भोवरा तो बघा,
    माणूस खोल खोल जातो,--!!!
    मैत्रीच्या गुंत्यांमध्ये,
    गटांगळ्या खात राहतो,--!!!

    वर हात देण्या न कुणी,
    होते दारुण अवस्था,
    कशी जिवाची होते तगमग,
    कुठे जाऊ, काय करू आता,--!!!

    सगळ्यात असून कशातच नसणे,
    --- हे तत्त्व फक्त ठेवावे,
    गोड बोलण्यावर फक्त,
    उदासीन की राहावे,--!!!

    वागणे" तटस्थ म्हणुनी,
    अशावेळी, कामी येते,
    प्रतिक्रियाच कुठली नसता,
    क्रिया अर्थहीन ठरते,--;;!

    मुखवटे पांघरूनी जगात,
    असे कितीक भेटती,
    दुर्दैवाने कधीकधी ,
    जवळचेही यात मोडती,--;;!

    नाते असूनही ते नसणे,
    ताप देते किती जिवा,
    नात्यांचा अर्थ कधी,
    लागतो केवळ दुरावा,--!!!

    असे अंतर सांभाळणे,
    मुखवटाच तो पांघरुनी,
    जीव लावावयाचाच नाही,
    ठरवावे ठाम ठरवावे मनी,--!!!

    कसा लागावयाचा निभाव, आपल्या प्रांजळ जिवाचा, बुडत्याचा पाय खोल,
    आणखी खोलच जायचा,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • मी म्हणजे कोण

    मी म्हणजे कोण
    तिलाही तसेच वाटत होते
    आणि त्यालाही
    सुरवातीला चागले होते
    पण कुठे काय झाले हे
    समजलेच नाही
    मी पणाच्या विचारात
    दोघेही दोघे झाले
    मग मात्र मजबुरी
    म्हणून राहू लागले
    प्रेम सुंदर असते
    प्रेम म्हणजे प्रेम असते
    हे शब्द टोचू लागले
    कर्तव्य , व्यवहार करू
    लागले ...संसार करू लागले
    अतृप्तपणे...
    -- सतीश चाफेकर.
  • वेदना

    भेट तिची माझी थेट नभ-धराची
    सुख क्षण भराचे आस जीवनाची

    भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी
    आठवांचा ताटवा,असे सदा सोबती
    सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची

    कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना
    कोण घेईल समजून,माझ्या यातना
    माणसाचे जग की,दुनिया पत्थराची

    जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव
    कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज
    कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची

    भावना अनावर होती,सांज सकाळी
    बावऱ्या मनाला, नच सुचे काही
    जीवघेणी भासे, ती वेदना विरहाचि

    © अरविंद टोळ्ये
    ९८२२०४७०८०
    आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
    आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.

  • काहीही झालं तरीही….

    काहीही झालं तरीही....
    लोकलची गर्दी कमी होणार नाही....,.

    कितीही कायदा कडक केला तरी.....
    सरकारी कर्मचाऱ्यांच लाच घ्यायच कमी होणार नाही...

    कितीही जागृती अभियान राबवले तरीही...
    सुशिक्षितांचा मतदानाचा "आळस" कमी होणार नाही....

    प्रामाणिकपणे भरगच्च कर भरला तरीही ...,,
    सरकारकडुन करांचा छळ कमी होणार नाही...

    कितीही लांब जायच झाला तरीही.., .,,
    स्त्रियांच्या मेकअपची वेळ कमी होणार नाही..

    लग्न होऊन भरपुर वर्षे झाले तरीही....
    पत्नींशी खोट बोलायची सवय पतीची कमी होणार नाही...

    सत्ताधारींनी कितीही राज्यात विकास केला तरी.....
    विरोधकांचे जातीय राजकारण कमी होणार नाही..

    भारतीय आर्मीने मुस्लिम दहशतवाद्यांना ठेचुन कंठस्नास घातले तरीही.....
    पाकिस्तान दहशतवाद्यांच्या भारतातील कारवाया कमी होणार नाहीत.....

    R.T.O कडे रिक्षाचालकांच्या कितीही तक्रारी केल्या तरीही..
    या रिक्षाचालकांची मस्ती व मुजोरपणा कमी होणार नाही.....

    बघाना....
    आपले कितीही कामे अडली असले तरीसुद्धा ...
    सतत "अॉनलाईन" राहणे कमी होणार नाहीच...

    -- विवेक जोशी

  • जीवन ध्येय

    प्रभूची लीला न्यारी, विश्वाचा तो खेळकरी

    कुणी न जाणले तयापरी, हीच त्याची महीमा II१ II

    जवळ असूनी दूर ठेवतो, आलिंगुनी पर भासवितो

    विचित्र त्याचा खेळ चालतो, कुणी न समजे त्यासी II २ II

    मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन

    अध्यात्म्याचे ज्ञान घेवून, विश्लेषण करती प्रभूचे II३ II

    कांहीं असती नास्तिक, कांहीं असती आस्तिक

    त्यांत काही ज्ञानी मस्तिक, चर्चा करिती प्रभूची II ४II

    सत्य परिस्थिती ऐसी, कुणी न जाणले प्रभूसी

    सर्वांची चालना तर्कासी, प्रभूच्या अस्तित्वाविषयी II ५II

    फक्त एकमुखी वाच्यता, असे ती सर्वता

    महान शक्ती असता, ह्या ब्रह्मांडामध्ये II ६II

    सर्वांनी जाणले एक, ‘अपूर्व शक्ती’ ह्याचा चालक

    त्याच ऊर्जेचे हे प्रतीक, सारे विश्वमंडळ II ७II

    कुणा नाही दुजा भाव, समजोनी त्या शक्तीची ठेव

    ज्ञानी देती नाव, निरनिराळी त्या शक्तीसी II ८ II

    कुणी म्हणती राम, कुणी म्हणे रहीम

    कुणी संबोधती गौतम, येशू असे कुणाचा II ९II

    परी तत्व नसे वेगळे, नावे होत निरनिराळे

    सामान्यास ते न कळे, हीच खरी शोकांतिका II १०II

    सारे जीवन निघून जाई, परी त्या शक्तीचा बोध न होई

    विश्लेषण करीत राही, त्याच्या अस्तित्वाविषयी II११ II

    जाणावी ती शक्ती, रूप आकार त्यास नसती

    शक्ति समजोनी करावी भक्ती, आदर भाव ठेवून II१२ II

    मानवजन्म श्रेष्ठ ठरविला, विशेष बुद्धी मिळून त्याला

    विचार शक्ती उपजण्याला, मानवामध्ये II १३II

    बहूत झाले विद्वान, कर्तव्य करूनी मिळवी मान

    मानव जातीची ती शान, ह्या संसारी II १४II

    मार्ग निरनिराळे दाखवी, सारे मिळती एक ध्येयी

    सर्वार्पण त्या शक्ती होई, ध्येय मिळतां जीवनाचे II१५ II

    विचार करा मनाशी, आपले वैर आपणाशी

    नसते केव्हां प्रभूशी, हेच मूळ दु:खाचे II१६ II

    वाद नसतो ध्येयापरी, चर्चा असे मार्गापरी

    हीच मानव निर्मिती खरी, सर्व सुख दु:खाची II १७II

    तथा कथित पंडित, सामान्यांत विद्वान होत

    ज्ञान त्यांचे थोडेसे जास्त, बहुजनां पेक्षा II १८ II

    वापरूनी ज्ञान शक्ती, सामान्य जनांस वाकविती

    आपले अस्तित्व स्थापती, प्रभू शक्तीशी विसरून II १९II

    तर्क शक्ती थोर, आहे चा नाही करणार

    नाही ना आहे म्हणणार, ज्ञानाचा खेळ करूनी II२०II

    मार्गाचे करूनी भेद, करीत राही वाद

    जीवन करी बरबाद, विसरूनी ध्येयासी II २१II

    ध्येय असे महान, मार्ग हे साधन

    साधनास साध्य समजोन वाया जाई आयुष्य II २२II

    साध्य नका समजू साधनासी, ठेवा विश्वास साध्यासी

    कोणत्याही साधनाने जातासी, साधका प्राप्त होई ध्येय साध्य II २३II

    निरनिराळ्या मार्गाचे प्रयोजन, ज्ञान शक्ती वापरून

    स्वअस्तीत्व ठेवण्या टिकवून, केले असे II२४ II

    अस्तित्वाची भावना मोठी, प्रत्येक झगडतो त्यासाठी

    आयुष्य खर्ची त्या पोटी, सकळ ज्ञान II २५II

    न कळे त्यास देवपण, भांडण्यास जाई विसरून

    आयुष्य मातीमोल, करून टाकीत असे II २६II

    विसरूनी जा सर्व भेद, मिटवून टाका वादविवाद

    लहान मोठ्याचा संवाद, नष्ट करा त्वरीत II २७II

    सारेच आहेत छोटे, कुणी नसती मोठे

    हे केवळ आपपासातील तंटे, मानवनिर्मित असती II २८II

    जात धर्म होत अनेक, हे मानव निर्मित प्रतिक

    सर्व मार्गाचे ध्येय एक, न कळे अज्ञानामुळे II २९II

    म्हणून जाणावा ईश, सार्थकी लावा आयुष्य

    जात धर्माचे पाश, सोडून घ्यावे II ३०II

    महान शक्ती तीच ईश्वर, दुसरा नसे कोणी वर

    आपणच देतो त्यासी आकार, सगुण रुप देवूनी II ३१II

    मानवता हाच धर्म खरा, आपसातील भेद विसरा

    प्रभू देई तयाना आसरा, जीवन सुखी करण्या II ३२II

    दुसऱ्याची दु:खे जाणा, त्यांच्या सुखात आनंद माना

    प्रभू अंश त्यासी म्हणा, हीच जीवनाची गुरू किल्ली II ३३II

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मोक्ष अंतीम फळ

    मागील कर्म पुढे चालूनी,

    कर्माची होई शृखंला,

    फळ मिळते कर्मावरूनी,

    मदत होई मुक्तीला ।।१।।

    चांगले कार्य करीतेवेळी,

    मृत्यू येता अवचित,

    पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां,

    खेचतो त्याच कार्यात ।।२।।

    अपूरे झाले असतां कार्य,

    ज्ञानेश्वराच्या हातून,

    पुनरपि येऊनी पूर्ण केले,

    आठरा वर्षे जगून ।।३।।

    ध्रुव जगला पांच वर्षे,

    अढळ पद मिळवी,

    कित्येक जन्मीचे तपोबल,

    पांच वर्षांत पूर्ण होई ।।४।।

    कर्म मुक्तता मिळे आत्म्याला,

    जन्म-मृत्यू पासूनी,

    ‘कर्म’ फळानेच जे साधते,

    ‘मोक्ष’ म्हणती कुणी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • ऊन कधी कलतं झालं

    बघतां बघतां
    ऊन कधी कलतं झालं
    तें मला समजलंच नाहीं,
    उमगलंच नाहीं.

    इवलं होतो मुक्त पाखरूं
    वारा पिऊन बागडणारं
    क्षणात रुसणारं-फुगणारं
    क्षणामधें खुदकन् हंसणारं.
    होतं हंसू निर्व्याज मोकळं
    होतं सकाळचं ऊन कोवळं.
    हळूंच सारं पसार झालं
    किलबिलतांना कळलंच नाहीं.

    अचानक येऊन यौवनानं
    ‘टक्-टक्’ करून केलं जागं
    आणि उंबरठा ओलांडून
    मस्तीत राहिलं पुढे उभं.
    मी स्वार होतांक्षणीं
    भरधाव सुटला वारू
    सारं जग जिंकायची
    तुफान दौड झाली सुरूं.
    मनामधें जिद्द होती
    मनगटात होता जोर
    यशशिखर काबीज करायचं
    उद्दिष्टही होतं समोर.

    एकामागुन एक भराभर
    हवं तें सारं मिळवत राहिलो
    वरती-वरती पुढे-पुढे
    स्वत:च स्वत:ला पळवत राहिलो.
    पळत राहिलो, चढत राहिलो
    थांबलो नाहीं फारसा
    दरम्यान चौकट बदलत गेली,
    बदलत गेला आरसा.
    पण आरशावरचं मखमली आवरण
    कधी मुळी मी काढलंच नाहीं.
    खरं म्हणजे, सुचलंच नाहीं.

    खरं तर,
    मला बर्‍याच गोष्टी करायच्या होत्या
    अनेक स्वप्नं होती
    खूपशा इच्छा होत्या.
    करायचं होतं शिवबांसारखं
    कार्य महान, भव्य
    करायचं होतं स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणे
    देशासाठी कांहीं दिव्य;
    पुसायचे होते मला
    पीडितांचे आंसू
    पहायचं होतं दीनांच्या डोळ्यात
    फुललेलं हंसू.
    द्यायची होती
    नृत्य-संगीताला
    दिल खोलूऽन दाद
    घ्यायचा होता कथा-कवितांचा
    मनमोकळा आस्वाद.

    ज्ञानोबा-तुकोबांसारखं
    भक्तिरसात पोहायचं होतं
    पंढरीच्या वारीत
    नाचत-गाऽत जायचं होतं.
    बरंऽच कांहीं करायचं होतं.

    विणून ठेवलं होतं कधीचं
    मी नाजुकसं जाळं,
    पण कवटाळुन अर्धा क्षणही
    घेतां नाहीं आलं;
    बंद कप्पे धुंडाळायला
    मला अजिबात जमलंऽच नाहीं.
    ऊन कधी कलतं झालं
    तें मला समजलंच नाहीं,
    उमगलंच नाहीं.

    - सुभाष स. नाईक
    M : 9869002126.