(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • नव्याने

    मी तुला स्वप्नात पाहू लागले
    दूर रानी मोर नाचू लागले
    दिवस हे नाहीत जरिही पावसाचे
    का अवेळी मेघ बरसू लागले?
    चाललो एकत्र इतुकी पावले
    मी नव्याने तुज बघाया लागले
    फिरुन का मी षोडषी झाले आता?
    हृदय माझे धडधडाया लागले
    काय हे माझे तुझे नाते असे?
    हृदयास मी माझ्या पुसाया लागले
    तू नको देऊ उजाळा आठवांना
    काठ डोळ्यांचे भिजाया लागले

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

  • जीवन

    विसरुनिया अस्तित्वाला
    निसर्गात एकरूप व्हावे
    क्षणक्षण प्रगाढ़ शांततेचा
    एकांती आत्ममुख व्हावे....

    शमता अशांत कोलाहल
    हळूच मागे वळूनी पहावे
    शिशुशैवव, पौगंड यौवन
    पुन:, पुनः,पुनः आठवावे....

    वास्तव, हे भाग्य भाळीचे
    ते, वात्सल्यप्रेम आठवावे
    व्याकुळ उर, भरूनी येता
    मौनी अश्रुंना प्राशित रहावे....

    जे लाभले ते दान प्राक्तनी
    अंतर्मुख ! सदा होत रहावे
    सुख,दुःख, संवेदनां, चिंता
    रेतीवरच्याच, रेषा समजावे....

    वास्तवता ! विरणाऱ्या लाटा
    क्षण जीवनाचे मीठीत घ्यावे
    सावरणारा, तो एक विधाता
    त्या कृपावंताला शोधत रहावे....

    –वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र. १९६

    १२/८/२०२०

  • गोदावरी तिरी

    गोदावरी तिरी,
    नाशिक माझे गाव
    तोच आहे जिल्हा,
    द्राक्षनगरी असे भाव

    महाराष्ट्रातील नाशिक कुंभमेळा,
    असे मजला ठाव
    कणखर, दगडांच्या देशाची कन्या,
    माणिक माझे नाव

    सौ. माणिक (रुबी)

  • शब्दाची ठिणगी

    ठिणगी पडूनी पेटे ज्वाला, आकाशाला जावूनी भिडती

    नष्ट करूनी डोंगर जंगल, हा: हा: कार तो माजविती...१

    शब्दांची ही ठिणगी अशीच, क्रोधाचा तो वणवा पेटवी

    मर्मघाती तो शब्द पडतां, अहंकार तो जागृत होई...२,

    सूड वृत्तीचा जन्म होवूनी, वातावरण ते दुषीत होते

    संघर्षाचा अग्नी पेटूनी , जीवन सारे उजाड करिते...३,

    कारण जरी ते असे क्षुल्लक, विनाश व्याप्ती होई भयकंर

    केवळ तुमचे प्रेमळ शब्द, दुष्ट चक्र ते थांबवी सत्वर ….४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • पचास साल की आयु

    पचास साल हुए जिंदगीके, गोल्डन ज्युबली मनायी गयी ।
    हंगामा और जल्लोष मे, पूरा दिन पूरी रात गयी ।।

    सारे बच्चे और रिश्तेदार, जमा हुए इकठ्ठा ।
    फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे, जब खानेको था मिठा ।।

    सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर ।
    हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार ।।

    जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना ।
    जीन गुणोंको हमनेही ना पहचाना ।।

    वो हमारेमे संकरीत है, उसकी दिगयी हमे कल्पना ।
    आदर्शवाद, सच्चाई और प्यार के पूजारी ।।

    देखी किसीने हमारे मे थे बाते सारी ।
    आचंबेके साथ सोंच रहे थे गंभीरतासे ।।

    के इन गुणोंका पता उन्हे लगा कैसे ।
    जीन गुणोंका अर्थ हमने, आज तक ना जाना ।।

    कैसे मिला उनका उन्हे ठिकाना ।
    जो कुवेमेही नही था, वो बालटी मे कैसे आया ।।

    और इन बातोंका हमे आश्चर्य हुआ ।
    शायद यह हो सकती है पार्टी की मिठाईयां ।।

    नैतीक दबाव उनपर जीस वझेसे आया ।
    खिलानेवाले की कुच तो इज्जत करो ।।

    उसके आसलीयत पर मत उतरो ।
    कमसे कम इतनी उमरबाद, होने दोजी खूष उसे ।।

    सोचा हुंगा किसीने, मन मे ऐसे ।
    कलतक दे रहे थे जो गालीयां ।।

    दिखी आज हमारेमे उनको खुबीयां ।
    चार झुठ एक सच्चे के बराबर, जब रेटकर कहा जाता है ।।

    और किसीकी तारीफ, हकीकत बनती ।
    जब आखों मे पानी लाकर कहा जाता है ।।

    यह तो पता हुआ उनकी तारीफ से ।
    के आसलीयत मे जिंदगी होनी चाहीए कैसी ।।

    इन ताऱिफ और गुलदस्तोकी चौकटने प्रसन्न किया हमारा चित्त ।
    और ख्यालोंकी दुनीयांने बिती सारी रात ।।

    करवटे बदलते बदलते सोचना मजबूर किया ।
    के जो कुछ जिंदगी मे सच्चा हुआ, तुने क्या पाया ।।

    जिंदही का मकसद क्या, जरा सोच इन बातों पे ।
    यही विचार झाकने लगा मन मे, उमरके इस मोड पे ।।

    रईस बापकी इकलोती आवारा आवलाद ।
    देखी हमने पैसोको करते बरबाद ।।

    लक्ष्मी के मोलको वो गधा जानेगा कैसे ।
    वह तो समझताहै पैंसो को पानी जैसे ।।

    समयका मोल हमने किया उस आवारा भाती ।
    और खो बैठे वो महान संपत्ती ।।

    गया वख्त फिर हात आता नही ।
    बचपन मे शिक्षकने घोल घोलकर बाते कही ।।

    अर्थ उन पक्तीओंका तो हम जान गये थे ।
    पर मतलब से उसके बहूत दूरी पर थे ।।

    पचास साल जानेके बाद, पंक्तीओंका दोहरा रहे है करते याद ।
    पर अब तो ये बेफूझूलकी हुई ना बाते ।।

    दुनीयांके चक्करको कैसे वापीस फिराते ।
    पेंडीग रखो इन बातोंको, फूरसतसे करेंगे हम उनको ।।

    कर दिया इन्ही बेफीकीर आदतोंनो सर्वनाश ।
    और समय खो जाने पर आता था हमे होश ।।

    खेल कुद और तंदुरस्ती को जान ।
    विद्यार्थी दशा मे नही हुयी इसकी पहचान ।।

    समझते थे खाईंगे पियेंगे बनेगे नवाब ।
    खेलेंगे पढेंगे बनेंगे खराब ।।

    चार बच्चोंका अड्डा जमाए, झाडके तले बैठते थे ।
    और दुसरे दोस्त, जो खेल रहे, उनपर कॉमेट्स करते थे ।।

    बगैर खेले मैदान मे, खेलोंपर करते थे मार्गदर्शन ।
    किसीसे कुछ सुना, या अकबारपढा, यही था हमारा ग्यान ।।

    बातें बनाना यही कला, हमने सिखी पढाईके जमानेसे ।
    और उमरके हिसाबसे जो मिला ग्यान, निकालते उगालकर दिमागसे ।।

    उन बातो मे ना कुछ अनुभव था, ना अभ्यास किया पंक्ती ।
    बकते थे भडाभड जो मुहसे निकल आती ।।

    खेल कुद मे रहे पिछए और लिख पढाईमे निचे ।
    इसी कारण जिंदगी मे रहे कच्चे ।।

    ग्यानी अनुभवोंकी थी हमारेमे कमतरता ।
    सिर्फ उमरके अनुभवोंको कोन पुछता ।।

    अब आपही सोंचो जरा ।
    जीसके जिंदगी मे था खाना पिना मौज उडाना ।।

    समयको फूकटका माल समझकर बरबाद करना ।
    कैसे इन लोगों ने हमे आदर्शवादी माना ।।

    यह तो हुआ जबानी जमाखर्चा, क्या झूठ और क्या सच्चा ।
    ** पर एक सज्जनने जो कही बात ।।

    उसमे दिखी मुझको जिंदगी की हकीकत ।
    उसने सुनाया हमारे तारीफ का राज ।।

    वही बना जिंदगीके तस्सलीका आवाज ।
    ये दुनीया देखनेमे है खूबशूरत ।।

    पर काटोंसे भरी हुयी अनगीनत ।
    हर कदमपर जिंदगी के लीए चाहीए झगडा ।।

    एक एक दिन गीने इन्सान आगे बडा ।
    सोचना पडता था के गया दिन कैसा ।।

    आनेवाले दिन का नही था भरोसा ।
    यह संसार है बेरहेम, बेदर्द औऱ जालीम ।।

    इसी जिंदगीमे हम जिये थे ५० साल कमसे कम

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • काळ व कार्याची सांगड

    मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे

    कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे....१,

    जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं

    जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती...२,

    हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा

    काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा...३,

    कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती

    अभाव असता योजनेचा, अपयश ते पदरी पडती....४

    कार्य व्याप्तीची दिशा असावी, शक्ती साधन काळ बघूनी

    जीवन यशाचा आनंद खरा, लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • निरोगी  देही नामस्मरण

    निरोगी असतां तुम्ही,

    नामस्मरण करा प्रभूचे,

    ठेवू नका उद्या करीता,

    महत्व जाणा वेळेचे ।।१।।

    शरिराच्या नसता व्याधी,

    राहू शकता आनंदी,

    आनंदातच होऊ शकते,

    चित्त एकाग्र ते ।।२।।

    व्याधीने जरजर होता ,

    चित्त होई अस्थीर,

    स्थिरतेतत दडला ईश्वर,

    जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

  • शब्दसांत्वनी

    सत्य ! एकमेव हेची जीवनी । पुनरपी जननं, पुनरपी मरणं ।

  • काव्यानुभव

    फळ आज हे मधूर भासते, तपोबलातील अर्क असे ।

    कष्ट सोसले शरिर मनानें, चिज तयाचे झाले दिसे.....१

    बसत होतो सांज सकाळी, व्यवसाय करण्या नियमाने ।

    यश ना पडले पदरी. केव्हा मान फिरविता नशीबाने....२

    निराश मन सदैव राहूनी, मनीं भावना लहरी उठती ।

    शब्दांना आकार देवूनी, लेखणी मधूनी वाहू लागती....३

    लिहीता असता भाव बदलले, त्यात गुरफटलो पुरता ।

    छंद लागूनी नशाच चढली, जीवनामधील रंग बघता...४

    त्या रंगाच्या छटा उमटल्या, फुला फुलातूनी दिसूनी येती ।

    सप्त रंगाचे मिलन दिसले, आकाशाच्या क्षीतीजावरती....५

    काव्यावरती जगेल कोण, हवी भाकरी जगण्यासाठी ।

    मानहानी ती सदैव होई, केवळ अल्पशा पैशापोटी....६

    मदत कुणाची मिळत होती, आला दिवस जाई निघूनी ।

    काव्यातील आनंदात परि, डुबता सारे विसरूनी.... ७

    विवंचना आणि सुख दु:खे, बनली होती स्फुर्ती देवता ।

    अनुभवले जे जे आजवरी, चित्रीत झाले बनूनी कविता....८

    अनुभव होता तना मनाचा, म्हणूनी भासले सत्य काव्य ते ।

    उचलून घेतले जनसामान्यांनी, मनास त्यांच्या पटले होते....९

    लपली असती कला एक ती, सर्व जणांच्या अंतरंगी ।

    परिस्थितीशी झगडा देवूनी, बाहेर आणती कुणी प्रसंगी....१०

    गेलो विसरूनी उदास दिन , आज उमटले चित्र निराळे ।

    सरस्वती नि लक्ष्मी दोघी, आशीर्वाद त्यांचा मिळे.... ११

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • येतात तुझे आठव….

    येतात तुझे आठव, गगनात काळे ढग,
    उरांत फक्त पाझर,
    शिवाय नुसते रौरव,--||१||

    येतात तुझे आठव,
    सयींची होते बरसात,
    चित्तात उठे तूफांन,
    मनात चालते तांडव,--||२||

    येतात तुझे आठव,
    प्रीतीचे हे संजीवन,
    स्मृतींचे मोठे आवर्तन,
    त्यांचे लागती न थांग,--||३||

    येतात तुझे आठव,
    सरींची त्या उधळण,
    शब्दांचे पोकळ वाद,
    कल्पनांचे नुसते डांव,--||४||

    येतात तुझे आठव,
    अश्रू असूनही शुष्क,
    मन मात्र पांणथळ,
    कसानुसा होई जीव,--||५||

    येतात तुझे आठव,
    भोवती दुःखाची पाचर,
    सहवासाचे अमृतथेंब,
    कधी बनती विष:कण,--||६||

    येतात तुझे आठव,
    प्रेमाचे निव्वळ भास,
    आत्म्यात फक्त उलघाल, काट्यांची बनते शेज,--||७||

    येतात तुझे आठव,
    कधी येईल राघववेळ,
    कुशीत तुझ्या शिरून,
    संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--||८||

    © हिमगौरी कर्वे.