मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 24, 2017
भटकतो आहे कवि विचारांच्या सागरांत
वाहात चालला आहे व्यवहारी जगांत
आधार नाही त्याला पैशाच्या शक्तीचा
कुचकामी ठरत आहे प्रयत्न त्याचा जगण्याचा
अर्धपोटी राहात असतो भाकरीच्या अभावी
लिहीत चालला आहे काव्यरचना प्रभावी
उदासपणे बघतो आहे " हाऊस फूलची " पाटी
लिहीली होती नाट्यगीते त्यानेच सर्वासाठी
टाळ्यांचा तो कडकडाट बाहेर ऐकू येई
उपाशी होते त्याचे पोट खिन्नतेने निघून जाई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 9, 2018
तू असा, तू तसा,
तू कायसा, कायसा,
अनंत रुपे भगवंता,
घेतोस कशी रात्रंदिवसा,--!!!
कधी वाऱ्याचा स्त्रोत तू,
कधी, खळखळणारे पाणी,
कधी खोल खोल दरी तू,
कधी कोकिळकंठी मंजूळगाणी,-!!
शोधावे कुठे तुला, तळ्याकाठी,
झऱ्याजवळ का धबधब्यात,
सोनेरी उन्हात राहशी,
का डोंगरातील कपारीत,--!!!
बाळाच्या हास्यात दडशी,
का अंधारल्या गुहेत,
प्राण्यांच्या दिमाखी बघावे,
का पक्ष्यांतील सौंदर्यात,--!!
जगातील आश्चर्यात पहावे,
की, माणुसकीच्या ओघात,
देवघरात असशी का तू,
का सज्जनाच्या हृदयांत,--!!!
फुलांतील सौंदर्य, गंध तू,
की फळातील मधुरपण,
माणसातील विवेक तू का, त्याच्यातीलच *सूज्ञपण*,
कुठे कुठे पाहू तुला,
न पाहताच भासशी तू,
आहेस अंतरातील खूण,
नि काळजांतील धून,--!!!
©️ हिमगौरी कर्वे.
March 22, 2020
हरवुनी जाता क्षण श्वासासंगे
आयुष्य, विलया जात आहे
जीवसृष्टीची जरी ही सत्यता
मुक्ती जीवाची मन:शांती आहे।।
क्षणोक्षणी, शिकत जगावे
गतं न शोकं! सिद्धांत आहे
जे जे चांगले,ते नित्य स्मरावे
दुःख, वेदनां प्रारब्धभोग आहे।।
जीवनी, पेलुनिया आव्हानांना
संघर्ष करणे हाच पुरुषार्थ आहे
जन्म मानवी, कृपा दयाघनाची
तोच एक सद्बुद्धी देणारा आहे।।
विवेकी, सत्संगात सदा रहावे
मीत्व सोडुनी जगी जगणे आहे
केवळ मानवता, हाच एक धर्म
हेच सत्य जगण्याचे मर्म आहे।।
जगती, कुणीच कुणाचे नसते
एकटे येणे, एकटेच जाणे असते
जे घडते, सारी ईच्छा भगवंताची
ते आनंदे स्वीकारणे कर्तव्य आहे।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ११६.
१५ - ४ - २०२२
April 30, 2022
ध्यावा गानिं दिसावा विठ्ठल
कायम मनीं वसावा विठ्ठल ।।
नच जाणत मी निर्गुण ब्रह्मा
मजला केवळ ठावा विठ्ठल ।।
जगतीं ऊन नि खड्डे काटे
वाटेवरी विसावा विठ्ठल ।।
अंध पुरा मी, मार्ग दिसेना
तडफड ही – कवळावा विठ्ठल ।।
थांबायाचें जेव्हां हृदया
तेव्हां मुखीं असावा विठ्ठल ।।
सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
November 1, 2017
नको जाणे सिनेमाला,
गर्दीचा आहे पहिलाच दिवस
याच विचाराने थिएटर पडले ओस
चला जावू सिनेमाला, आजच्या दिवशी शेवटी.
निराशली मंडळी, बघूनी हाऊस फूल पाटी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 19, 2019
दिपूनी गेले नयन त्या क्षणी
बघता तिची सोज्वळ मुर्ती ।
हाक निघाली अंतःकरणीं
तुझ्याचसाठी निर्मीली कृती ।।
जरी बघीतल्या अनेक सुंदरी
ठाव मनाचे हिने जींकले ।
सहचारीणी ही होईल तुझी
अंतरमनी शब्द उमटले ।।
अनामिक जे होते पूर्वी
साद प्रेमाची ऐकू आली ।
योग्य वेळ ती येता क्षणी
ह्रदये त्यांची जुळुनी गेली ।।
शंका भिती आणि तगमग
असंख्य भाव उमटती मनी ।
विजयी झाले ऋणानूबंधन
बांधले होते भावबंधनी ।।
उचंबळूनी दाटूनी आला
ह्रदयामधला ओलावा ।
स्नेह मिळता प्रेम मिळाले
जगण्यासाठी दुवा ठरावा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 3, 2019
देह मनातील, तफावत दिसून येते ।
चंचल असूनी मन सदैव, शरीर परि बदलत राहते...१,
चैतन्ययुक्त मन सदा, स्थिर न राहते केव्हांही ।
जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही...२,
परिस्थितीच्या चौकटीमध्यें, विचारांचा दबाव राहतो ।
शरीराच्या सुदृढपणाचा, मनावरती परिणाम होतो...३,
दिसून येते केव्हां केव्हां, मन अतिशय उत्साही ।
परि शरीराचा अशक्तपणा, मनास त्याक्षणी साथ न देई....४
विचित्र होते वातावरण ते, जेव्हां मनास साथ ना मिळे ।
विचारांच्या चुका होऊनी, दु:खी होते जीवन सगळे...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 25, 2020
ग्रामीण संस्कृती आणि परंपरा या यात्रौत्सवानिमित्त पहायला मिळते.
March 18, 2017
कितीक गावांच्या अंगणात रमलो
स्थिर कुठेच होऊ शकलो नाही ||
पोटभरू पाखराची भटकंती ती
दानापाणी सरता थांबू शकलो नाही ||
भरभरून दिले त्या माणसांनी
घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही ||
मायेचे झरे या माणसांच्या मनात
दुस्वास त्यांचा करू शकलो नाही ||
साधी भोळी माणसे होती फार ती
माणसांना अंतर देऊ शकलो नाही ||
भाषा वेगळी अडसर नाही भासला
बोललो भाषा ती लिहू शकलो नाही ||
उमेदीच्या वर्षात आधार दिला यांनी
कुणालाच विसरू शकलो नाही ||
त्यांच्या कडून शिकलो थोडे फार
बरोबरी त्यांची करू शकलो नाही ||
-- अरुण वि. देशपांडे - पुणे.
9850177342
March 4, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti