दयावंताला पाझर फुटला ,
पक्षी पिंजऱ्यातून सोडला,
विहंगम तो आनंदला,
भरारी घेऊनी, उडाला,--!!!
निळे आसमान ते,
खुणावत सारखे होते,
पिंजऱ्याच्या बंधनाला,
मूक मन झुगारत होते,--!!!
कोण येईल पुढे अन्
स्वातंत्र्य देई मजला,
देवाचा दूतच तो,--
मज तेव्हा तो वाटला---!!!
कोण आहे त्राता माझा,
मज स्वातंत्र्य देणारा,
वाट पाहतो जीव सारखा,
उडायाला आसुसला,--!!!
बोलावे मज हिरवी धरा,
झाडे वृक्ष वेली लता,
प्राण येथेच सोडेन मी,
इथून सुटका नसतां--!!!
दुःख माझे कोण जाणेल,
हात देईल मदतीचा,
जागेत संकुचित या,
जीव घुसमटे हो माझा,--!!!
कोण आला जवळी हा,
दरवाजा उघडे पिंजऱ्याचा,
माणूस निष्ठुर भारी ना,
नको, नको रे धरू बाबा,--!!!
घेऊन कुठे चालला हा,--?
निघाला का मारावया,
भीती वाटे मज फार,
मारतील धरून गळा,--!!!
मी मागे थरथरत उभा,
काळीज हाले लपालपा,
दयावान तो पुढे येता,
दार उघडतो बघतां-बघतां,--!!!
बाहेर येता जीव थोडा,
जागचा की हाललो,--
उडालो सरळ गगनांतरी,
घेतली मोठीच भरारी
देवा त्याचे कल्याण करी,
हीच विनंती तुज खरी,--!!!
हिमगौरी कर्वे.©
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे ।
संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।।
चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा ।
लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।।
संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा ।
कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।।
संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते ।
सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कृष्णासम ही नटखट अवखळ
लाघवी कवीता हळूच पाऊली येते
मयुरपिसी मखमली मृदुल करांनी
अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ।।१।।
कदंबतरुच्या साऊलीत या
साक्षात बीज प्रतिभेचे फूलते
शब्दफुलांच्या या वटवृक्षावर
भावगंधले गीत कोकिळा गाते ।।२।।
कालिंदीच्या! डोहातूनी त्या
सुरेल, ताल सप्तसुरांची येते
राधे! बघ सामोरी कृष्णमुरारी
धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते ।।३।।
शब्दशब्द मनी भाव उमलता
वास्तव! हॄदयातूनी ओघळते
रसिक मनांच्या गाभाऱ्यातुनी
सोज्वळतेचे रूप! उजळूनी येते ।।४।।
-- वि.ग. सातपुते(भावकवी)
9766544908
रचना :- क्र १२.
१२ - ०१ - २०२२
बंधन मुक्तीसाठीं असतां,
बंधनात ते पाडी
कर्मफळाचे एक अंग ते,
टिपे दुसरे बाकी ।।१।।
साध्य करण्या जीवन ध्येय,
देह लागतो साधन म्हणूनी,
सद्उपयोग करूनी घेतां,
साध्य होईल हे घ्या जाणूनी ।।२।।
हिशोब तुमचा चुकून जाता,
तोच देह बनतो मारक,
विनाश करीतो मागें लागतां,
मिळविण्यास ते ऐहिक सुख ।।३।।
बंधन पडते आत्म्याभोंवती,
शरिरांतल्या वासने पायी,
वासनेच्या आहारी जातां,
बंधनास ती बळकटी येई ।।४।।
तपसाधनेचे कष्ट करूनी,
देह करीतो आत्म्यास मुक्त,
देहाचे बंधन पडते,
जेव्हां बनतो वासनायुक्त ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी मा.सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली.
विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला,
रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गाऊनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां,
प्रसंग जरी तो गेला निघुनी, राहते जिवंत कविता ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जगण्यात रोज मरतो
मरण्यास खास जगतो..
साधून संधि मीही
मनसोक्त येथ चरतो ..
उत्कर्ष का कुणाचा
पाहून आत जळतो ..
खड्ड्यात तोहि पडता
का मी हळूच हसतो..
अपघात दूर दिसता
मागे खुशाल पळतो..
-- विजयकुमार देशपांडे, सोलापूर
9011667127
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी ।
अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी ।।
परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी ।
उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी ।।
दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी ।
शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी ।।
बळी कुणाच्या पडली तू गे, मार्ग रोखीले तुझे कसे ते ।
अपयश येता सत्यालाही, म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’ ।।
आज न आले यश जरी, न्याय येईल उफाळूनी ।
अंतिम विजय हा सत्याचा, जाणीव आहे ह्याची मनी ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हातातील काडी घासतां पेटीवरी
अग्नि त्याच्यातील ज्वाला त्या धरी
लपलेला अग्नि घर्षणाने पेटतो
अज्ञान झटकता ज्ञानी उजाळतो
चितांत असतो प्रभू सदैव शांत
ओळखण्या त्यासी लागताती संत
संत हाच गुरु मार्गदर्शक असे
चित्तातील प्रभूला जागवित असे
उजळण्या मन घर्षण लागे संताचे
पेटवा ज्ञानाग्नि सार्थक होई जीवनाचे
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
(गझलनुमा गीत)
रंग तुझा सावळाच, नांव पांडुरंग कसें ?
लक्ष भक्त पाहतात लक्ष तुझे रंग कसे ?
हात कटीवर ठेवुन विटेवरी स्तब्ध उभा
रूप तुझें ठायिं ठायिं तरि भक्तांसंग कसें ?
रौद्र ऊन थंडी वा मुसळी पाऊस असो
दुर्लक्षुन ऋतु, नामीं वारकरी दंग कसे ?
नाचतात वैष्णवजन, देहभान विस्मरुनी
वेड असें लावतोस भक्तांना, सांग, कसें ?
फक्त स्वानुभवानेंच आकळतें हें मनुजा –
‘पांडुरंग’ नाम मना आणतसे झिंग कसे ।।
दामाजीचा ‘महार’, नाथांचा श्रीखंड्या
विठुराया, नित्यनवें वठवतोस सोंग कसें ?
पंढरिच्या भेटीनें भीमा बनते ‘गंगा’
नवल नसे - अमृत बनती तिचे तरंग कसे ।।
बह्मांडाहुन विशाल तूं, धूलिकणच मी
तरि वसशी मम हृदयीं, फेडूं तव पांग कसे ?
शीश तुझ्या चरण नत, पुरव हेंच मागणें –
शिकव - ‘जन्ममृत्युचक्र करायचें भंग कसे’ ।।
-- सुभाष स. नाईक
पंढरीचा राणा
Copyright © 2025 | Marathisrushti