(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • एकापेक्षा एक

    झी' ने एक अनाऊन्समेंट केली,
    ऐकून मनाची चलबिचल झाली,
    भाग घ्यायची मी तयारीच केली,
    कारण स्पर्धा होती .... एकापेक्षा एक "आजी" आली |

    हे आणि मुल म्हणे,
    अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ,
    'महागुरुंच्या' डोळ्यात मावेल कां हा 'ढग' ?
    पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट,
    म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप |

    काय नशिब पहा, चक्क मी झाले 'सिलेक्ट'
    आणि कोरीओग्राफरकडे शिकले, डान्स परफेक्ट |
    पडले, गडबडले तरी नाही बाळगली तमा,
    स्पर्धेसाठी शरीराचा, उतरवला होता न विमा |

    बुधवार गुरुवार माझा 'सेफ' झोन प्रत्येक,
    महागुरुंकडून मिळवले, रुपये 'शंभर' कित्येक |
    एकेक करुन गाठली 'महाअंतीम' फेरी
    घरच्यांनी घेतली होती SMS ची जबाबदारी |
    बघता बघता निकालाचा 'क्षण' येऊन ठेपला
    म्हटल दोन लाखांचा चेक नक्कीच 'आपला' |

    हातातला कागद आता महागुरुंनी वाचला,
    आणि विजेती आजी आहे.... आजी आहे.....
    ऐकून, सार स्टेज गरागरा फिरल,
    पडता पडता मला, कुणी तरी धरलं |

    डोळ्यावर सपकन पाणी मारलं,
    झाली वाटतं जागी, कानानी हेरलं
    बाजूलाच उभे होत 'महागुरु' घरचे,
    स्वप्नच कां शेवटी, "बिच्चारा आजीचे" |

    -- सौ. अलका वढावकर

  • पूजा तयारी

    रोज सकाळीं प्रात: समयीं, पूजा करी देवाची ।

    पूजे मधल्या विधीत, चूक न होई कधी त्याची ।।१

    स्नान करोनी नेसूनी सोंवळे, देव घरांत जाई ।

    भाळी लावूनी गंध टिळा, मंत्रपाठ गाई ।।२

    सहयोग देई पत्नी, पूजा कर्मामध्ये त्याला ।

    आधींच उठोनी झाडूनी घेई, स्वच्छ करी देव घराला ।।३

    करूनी सडा संमार्जन तेथें, सारवोनी घेई जागा ।

    देवापुढती रांगोळी काढी, दिसे कशी सुंदर बघा ।।४

    बागेमध्ये जाऊनी मग ती, दुर्वा काढीत असे ।

    पुष्प करंडीत फुले निराळी, ताजी सुंदर दिसे ।।५

    स्नान करूनी ओलेत्याने, पाणी ठेवी पूजेसाठीं ।

    घास घासूनी चंदन मग ते, भरे लहानशी वाटी ।।६

    हरिनाम घेई मुखीं सतत, मंत्र जप ते येईना ।

    पूजेच्या परि तयारीमध्यें, उणीव कधी ठेवीना ।।७

    जमवित होती पूण्य राशी, पतिची सेवा करूनी ।

    द्विगुणीत होई सांठा, प्रभू सेवा लाभूनी ।।८

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • वर्‍हाडातली गाणी – ११

    अक्कण माती चिक्कण माती अशी माती सुरेख बाई

    जातss ते टाकाव अस जात सुरेख बाई

    गहू ते वल्वावे असे गहू सुरेख बाई

    रवा तो पाडावा असा रवा सुरेख बाई

    करंज्या भराव्या अशा करंज्या सुरेख बाई

    तबकात ठेवाव्या अस तबक सुरेख बाई

    शालुनी झाकाव असा शालू सुरेख बाई

    खेळायला सापडते अस सासर द्वाड बाई

    कोंडू कोंडू मारीते …

  • सासू सून संवाद (३)

    सासू : अगं अगं सूनबाई
    सून : काय म्हणता सासूबाई?
    सासू : माझा गाऊन तू, काय गं केला ?
    सून : भांडीवाल्या बाईच्या मुलीला दिला.
    सासू : अगं अगं सून बाई
    सून : काय म्हणता सासूबाई?
    सासू : माझं घड्याळ तू, पाहिलेस का गं ?
    सून : चुन्याची डबी रोज जातं मागं.
    सासू : अगं अगं सूनबाई
    सून : काय म्हणता सासूबाई?
    सासू : माझा विग तू, काय गं केला ?
    सून : क्लबच्या नाटकात हिरॉईनला दिला.

  • मातीचा पुतळा

    मातीचा पुतळा एक

    फोडला कुण्या वेड्यानी

    जीवंत पुतळे अनेक

    जाळून टाकले शहाण्यानी ।।

    एक करि तो पिसाट

    ठरवी वेडा त्याला

    अनेकाची उसळता लाट

    धर्माभिमानी ठरविला ।।

    अशी आहे रीत

    नाहीं समजली मना

    करुन विचारावर मात

    श्रेष्ठ ठरे भावना ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • मातीचा देह मातीला शरण गेला

    आजी आजोबा होते थकलेले
    थकलेल्या वाड्यात रहात होते.

    काळाने केला भयानक घात
    सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात

    पण पडताना वाड्याने हात टेकले
    आजी आजोबांना त्याने वाचविले

    जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले
    अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले

    आजी मात्र एकटीच राहिली धीराने
    वाडा नाही सोडला तिनं हट्टाने

    म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं
    या तूम्ही सारी असेच दर वर्षी हौसेनं

    आम्हीही अधुन मधुन तिकडे जात राहीलो
    वाड्याच्या अंगा खांद्यावर खेळत राहिलो

    एके दिवशी आजीने देह सोडला
    आणि आमचा उन्हाळा करपून गेला

    एकाकी वाडा खूणवत होता
    आतुरतेन आम्हाला बोलवत होता.

    खचलेल्या वाड्याने मग धीर सोडला
    मातीचा देह मातीला शरण गेला.

    - डॉ. सुभाष कटकदौंड

  • मुलगी होणं इतकं सोप्प नसतं…

    ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने, समाजाच्या अपेक्षा आणि तिच्या स्वतंत्रतेच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक कृतीला समाजाच्या विविध दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे

  • नात्यांची मिसळ

    व्हॉटसऍपवरुन आलेली ही कविता. तिचा कवी माहित नाही पण कविता सुंदर आहे म्हणून शेअर केलेय..

  • सासरची आठवण

  • मतांची किंमत

    विलासराव देशमुखांना विचारले- का हो तुम्हाला मुख्यमंत्रीपद का सोडावे लागले? तेव्हा ते म्हणाले- माहित नाही यापूर्वीही असेच झाले होते-

    मनोहरला विचारले
    का रे बाबा का दूर केले?
    म्हणाला माहित नाही

    विलास ला विचारले
    का रे बाबा का दुर केले?
    म्हणाला माहित नाही

    सुशीलला विचारले
    का रे बाबा कधी दूर होशील?
    म्हणाला माहित नाही

    जनतेला विचारले
    का हो का दूर करतात असे?
    जनता म्हणजे माहित नाही

    कारण जनतेला कधी
    आपल्या मतांची किंमत
    कळलेच नाही

    -- विनायक अत्रे.

    दिनांक: १७/०१/२००३.