(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मायेचा बाप

    मायेचा बाप
    कष्टकऱ्या धाप
    आम्हाला सुखी माप....१

    कर्तव्य फार
    शिस्तिला हो धार
    लळा अपरंपार.......२

    घराचे छत
    गावात ही पत
    उद्योगी पारंगत.......३

    खर्च मोजून
    जावक योजून
    हौस भरभरून.......४

    समसमान
    वागवतो छान
    शिकविण्यास रान.....५

    अबोल फार
    महान विचार
    झाला नाही लाचार....६

    करू सन्मान
    सदा असो भान
    घरादाराची शान.....७

    हा ताणा बाणा
    भाव मनी जाणा
    हा संसाराचा कणा....८

    -- सौ. माणिक (रुबी)

  • तो

    त्याच्या चांगुलपणावर
    ती पूर्ण हरते,
    स्त्री कमी की पुरुष अधिक
    ह्याची व्याख्या तिला न कळते..

    तिच्या समजण्याच्या बाहेर
    त्याचा चांगुलपणा तिला कळतो,
    स्त्री पेक्षा पुरुष जास्त
    कणखर नक्कीच असतो..

    तिच्या पेक्षा तो
    जास्त सरस तिला जाणवतो,
    तिच्या अस्तित्वाच मूल्य तेव्हा
    तिला नकळत बोचतं..

    त्याच्या अव्यकतेत
    तिच्या चुका तिला कळतात,
    अबोल पणात त्याच्या
    तिच्या भावना कोमेजतात..

    ती स्त्री आणि तो पुरुष
    हाच मोठा फरक असतो,
    मन दोघांना असतं पण
    फरक दोघांच्या भावनेत असतो..

    त्याला समजतांना ती
    कमी नक्कीच पडते,
    कुठेच कमी नाही तो हीच
    का पुरुष असण्याची व्याख्या असते..

    अल्लड वागते ती
    तो समज दाखवतो,
    कळतं असते तिला ते
    पण तीच स्त्रीच मन असतं..

    निसर्गतः पुरुष कणखर
    नक्कीच असतो,
    तिला तो समजतो
    पण तीच मन कोमल असतं..

    स्त्री च्या नाजूक भावनेत
    तो जरा अलिप्त असतो,
    ती स्त्री आणि तो पुरुष
    हाच फरक तो असतो..

    स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण..
    दोघांच्यात शाररीक, भावनिक, मानसिक
    फरक असतो..
    दोघांना भावना आणि मन असतं,
    पण स्त्री च मन कोमल व्यक्त..
    तर पुरुषाच मन अव्यक्त काहीसं असतं..
    निसर्गतः बदल दोघांत असतो..
    त्याच्या पुरुष पणाच्या व्याख्येत तो
    बरोबर असतो..
    पुरुषांना पण तरल भावना जाणवतात..
    मनाच्या नाजूक तारा कळतात..
    मग ह्या कवितेत तिला म्हणजे स्त्रीला
    भावलेला, कळलेला पुरुष शब्दबद्ध केला आहे...

    © स्वाती ठोंबरे

  • एका नाट्यमय संसाराची ५० वर्षे

    ही गोष्ट एका लग्नाची
    गोष्ट प्रेमाची
    लग्नाची बेडी नाटकाची
    यशस्वी अर्धशतकी प्रयोगांची

    ५० वर्षापूर्वी ह्या टॅामला
    जेरीच प्रपोजल आल
    आणि फायनल ड्राफ्ट तयार होऊन
    स्वयंवरही झाल

    तू तिथे मी ची शपथ घेऊन
    ह्यांची वार्‍यावरची वरात निघाली
    आणि नवा गडी नव राजं म्हणत
    संसाराची नांदी झाली

    सुख म्हणजे नक्की काय असत
    शोधताना जरा फॅमिली ड्रामा झाला
    आणि सुखाशी भांडतो आम्ही दोघ म्हणाले
    तरी अवघा रंग एकचि झाला

    आता विच्छा माझी पुरी करा
    तिनही बेचकीत पकडल
    एक यू टर्न आल्याच मात्र
    एका क्षणात त्याला उमगल

    मग काय विचारता?
    तो नाइट रायडर, ती व्हाईट लिलि
    फुलराणीच्या वेलीवर
    लेकूरे उदंड जाली

    पुढे मोरावळ्यासारख्या संसारात
    थोडा संशयकल्लोळ थोड मानापमान
    अगदी शाब्दीक वस्त्रहरण सुध्दां झालं
    पण कुणासाठी कुणीतरी, हिमालयाची सावली ही बनल

    आणि बघता बघता ५० वर्षाचा हा संसार
    असा सही रे सही झाला
    भावी वैवाहिक जीवनासाठी
    ऑल द बेस्ट तुम्हांला

    -- सौ. अलका वढावकर

  • त्या काजळ रात्री

    त्या काजळ रात्री
    पाऊस बरसत होता,
    घन व्याकुळ मी अशी
    श्वास तो कोंडत होता..
    आरक्त डोळ्यांत अश्रूंचा
    बांध आल्हाद साचला होता,
    पापणी आड अश्रूंचा थेंब
    मिटून हलकेच डोळ्यांत होता..
    कळले होते मला अंतिम
    श्वास माझे त्या वळणावरी,
    जाणार हा देह सोडून
    लांब दूर जग हे सोडुनी..
    परी मन तयार न होते
    त्या अंतिम कातर क्षणी,
    देव देतो जन्म अन मृत्यू
    ऋणानुबंध असतात उरुनी..
    किती आठवणीत जीव
    व्याकुळ भावुक होतो,
    जाणारा अचानक जातो
    जीव दुःखात हलकेच बुडतो..
    जगरहाटी ही न चुकली
    कुणाला जन्माला येउनी,
    मरणं आहे अंतिम खरे
    सत्य न चुकले कुणाला कधी..
    मरणं वाटेवर ह्या असेल
    मी ही अनामिक उभी,
    कधी जाईल जीव क्षणात माझा
    उरतील माघारी शब्दांची कहाणी..
    ध्यास असतो शब्दांचा
    कवी असतो काव्य जगुनी,
    जन्म मरणाच्या फेऱ्यात या
    काव्य राहते ओळख कवीची..
    -- स्वाती ठोंबरे.
  • देशभक्ती (ओवीबद्ध रचना)

    हा भारत माझा देश
    बहू भाषा,बहू वेष
    इथे नांदे हृषिकेश
    नांदतो कल्पेश।।१।।

    ही शुरविरांची भुमी
    शौर्याची नसते कमी
    असे सुरक्षेची हमी
    भाग्यवान हो आम्ही
    ।।२।।

    ही संतांची,महंतांची
    पावन भुमी भक्तीची
    एकी विविध धर्माची
    झोळी भरे पुण्याची
    ।।३।।

    जे देशासाठी लढले
    तयांनी प्राण त्यागले
    अमर हुतात्मे झाले
    देशास्तव जन्मले।।४।।

    त्यांचा आदर्श ठेवूया
    जन उत्कर्ष साधूया
    जनहितार्थ वेचूया
    हा क्षण आयुष्याचा
    ।।५।।

    नकोच झगडे तंटेे
    होतील आपले तोटे
    द्रोहींचे धरा बखोटे
    देशहीत हो मोठे।।६।।

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • नियतीचा फटका

    (भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र)

    एक भयानक रात्र अशी, सहस्त्रावधींचा घेई बळी ।

    नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी ।। १

    मध्यरात्र होवून गेली, वातावरण शांत होते ।

    गादीवरती पडून सारे, स्वप्ने रंगवीत होते ।। २

    तोच अचानक विषारी वायू, पसरला त्या वातावरणी ।

    हालचालींना वाव न देता, श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी ।। ३

    कित्येक जनांचे बळी घेतले, सुलभ रितीने काळाने ।

    शांत निद्रेची महा निद्रा, करूनी टाकीली क्षणात त्याने ।। ४

    भरडून गेले सारे परि, पापी वा पुण्यवान ते ।

    कळला नाही हिशोब त्याचा, मोजमाप काय असते ।। ५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • दान मताचे

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • उतराई

    कोकीळ गातो गाणे
    चैत्राची चाहूल बाई
    कैऱ्यांच्या आडून दडणे
    तो दिसत द्वाड नाही
    हुरहूर उठवी जाणे
    कुजने अंगांग शहारे येई
    तो बोलावतो का कोणे
    साद पल्याड ऐकू येई
    तप्त धरणी आणि राने
    नकोशी कामावरची घाई
    वाटे झुलून हिंदोळ्याने
    थंड झुळूक शांतता देई
    पळस - बहाव्याचे सोने
    पानपानांवर बहरत जाई
    गूढ ग्रीष्म ऋतूचे येणे
    रानफळांची रेलचेल होई
    या सृष्टीचे सुंदर लेणे
    लेऊन सजली आमराई
    विसावू थोडं सावलीने
    माय सृष्टीची होऊ उतराई!!
    -- वर्षा कदम.
  • देह – एक महान वस्ती

    सात कोटीची वस्ती असूनी,
    सुंदर वसले शहर एक ।
    प्रत्येक जण स्वतंत्र असूनी,
    कार्ये चालती तेथे अनेक ।।

    सुसंगता शिस्तबद्ध
    साह्य करिती एकमेकांना ।
    शत्रूची चाहूल येतां,
    परतूनी लाविती त्या घटना ।।

    अप्रतिम शहर असूनी,
    नाव तयाचे असे 'पुरूष' ।
    'पुरू' म्हणजेच गाव असूनी,
    मालक त्याचा आहे 'ईश ।।

    अशीच अगणित शहरे,
    या अथांग विश्वाच्या शरीरी ।
    विधात्याची वास्तूकला,
    अप्रतीम अजोड ठरे खरी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • संधी

    गंगा आली मार्गामध्ये तहान आपली भागवून घे

    संधी मिळता जीवनामध्ये उपयोग त्याचा करून घे

    ठक ठक करुनी दार ठोठवी संधी अचानक केव्ह्ना तरी

    गाफील बघुनि चित्त तुझे निघून जाईल ती माघारी

    चालत राही सुवर्ण संधी हाका देवूनी वाटेवरी

    बोलविती जे प्रेमाने तिज सन्मान तयांचा सदैव करी

    धुंदी मध्ये राहून आम्ही चाहूल तिची विसरून जातो

    जीवनातले अपयश बघुनी नशिबाला परी दोष देतो

    यशस्वी ठरती तेच जीवनी उपयोग करुनी संधीचा

    साथ देऊनी प्रयत्न्याची मार्ग निवडती योग्य दिशेचा

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com