(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • का रमाकृष्ण ना कोणी वदले ?

    का रमाकृष्ण ना कोणी वदले?.....

    राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले
    हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले .....

    ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले
    रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले ....

    तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले
    मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी वाट पाहुनी थकले .....

    तुझी संपूर्ण मी होऊनही, अपूर्ण काहीसे राहीले
    संगम मनाने केला मनाशी, तरी मनोरमा नाही बनले ....

    स्वर गुणगुणनारी ती, बासरी एकदाच तिच्याशी हसले
    जे तुला कधी न कळले, ते सारेच तिने जाणिले ....

    हरि बनुनी येउनी जा, एकदा रमेचे होऊनी जा
    जाता जाता वृंदावनात, रमाला राधा बनवूनी जा ....

    -- स्वाती पवार

  • चोरांची उपासमार

    या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय.

  • द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक

    द्व्यर्थी,तत्वज्ञानात्मक, --

    देहातून आत्मा सुटावा.

    घे स्वैर भरारी,
    माझ्या देखण्या पाखरा,---
    बद्ध पंख हे उचंबळती,
    सोडून ही बंदिस्त कारां,---

    पिंजर्‍याचे दार लागतां,
    जीव तुझा घुसमटे,
    स्वातंत्र्याच्या फोल कल्पना,
    सर्वच विचारा खींळ लागे
    आतल्या आत जीव तडफडे, सीमित जागा, नुसताच हिंडे
    डोळे भिरभिरत कसा शोधशी,
    तू आपला मुक्तपणा, --!!!

    जो येईल तो बोलू बघे,
    इथेतिथे उगा हात लावे,--
    कठोर काळीज करुन आपुले, मानव कधी छेड'ही काढे,-!

    नको नको परतंत्रता,
    पटकन आता झेपाव गगनी, मिसळ जाऊन भाईबंदा,
    स्वातंत्र्याने होशील आनंदी,
    झाडा झाडांवर कर आपला,
    अगदी स्वच्छंद विहार,
    गोड गोड फळे चाखावया,
    कशाला रे उशीर फार ,--?

    या कारे'त काय ठेवले,
    बेचैनी, उलघाल, अस्वस्थता, ताणतणाव विसरून साऱ्या,
    पर" पसरून कर गोड सांगता,-!!

    हिमगौरी कर्वे.©

  • धागा धागा मिळून

    धागा धागा मिळून,
    बांधले,खास घरटे,
    फांदीचा आधार घेऊन,
    उभ्या झाडास लटकवले,
    एक चोंच करी किमया,
    केवढी मोठी कारागिरी,
    पिल्लांस सुरक्षित करण्यां,
    माय बापाची चाले हेरगिरी,
    घर मोठे प्रशस्त हवेशीर,
    वारा चारी बाजूंनी वाहे,
    निसर्ग सान्निध्यातले,
    वाटते मोठे आरामशीर,
    अंडी घालून ती उबवती,
    वाट जन्माची पाहती,
    कारागीरच ते नव्या उमेदी,
    दार घरट्याचे असे बांधले,
    सहजी कोणी उतरू नये,
    पण साप नागांचा दहशतीने,
    रक्षणास तत्पर दोन पाखरे,
    चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
    असे जाळीदार नक्षी,
    आखीवरेखीव जाळ्याला ,
    केले कसे त्रिशंकूकृती ,
    दुनिया सारी घरातच वसे,
    संसार मांडला आगळा,
    समर्थ नर मादी दोघे,
    परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!

    हिमगौरी कर्वे.©

  • देह बंधन – मुक्ती

    बंधन मुक्तीसाठीं असतां, बंधनात ते पाडून टाकी

    कर्मफळाचे एक अंग ते, टिपतां राही दुसरे बाकी...१,

    साध्य करण्या जीवन ध्येय, देह लागतो साधन म्हणूनी

    सद्उपयोग करूनी घेतां, साध्य होईल हे घ्या जाणूनी...२,

    हिशोब तुमचा चुकून जाता, तोच देह बनतो मारक

    विनाश करितो मागें लागतां, मिळविण्यास ते ऐहिक सुख....३,

    बंधन पडते आत्म्याभोंवती, शरिरांतल्या वासने पायी

    वासनेच्या आहारी जातां, बंधनास ती बळकटी येई.....४,

    तपसाधनेचे कष्ट करूनी, देह करितो आत्म्यास मुक्त

    देहाचे ते बंधन पडते, जेव्हां बनतो वासनायुक्त...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मन माझे बावरे

    आई अंबाबाई
    तू दर्शनाला ये गं
    तुझ्या भक्तित लिन मी
    मन माझे बावरे गं

    सातपुडा डोंगर रांगा
    तिथेच तुझी वस्ती गं
    थकला हा जीव माझा
    दर्शना मी कशी येऊ गं

    नवस मला फेडायचा
    जोगवा मला मागायचा
    गोंधळ तिथे घालायचा
    जागर मला करायचा

    मन माझे बावरे गं
    चुकलं का ,ही भिती गं
    आशिर्वच घेण्या तुझे
    मनोमनी आतुर गं
    मन माझे बावरे गं

    -- सौ. माणिक (रुबी)

  • मजुरीनं मारलं

    यावर्षी बळीराजाला,
    सोयाबिननं तारलं !
    पण जगाच्या पोशिंद्याले,
    मजुरीनं मारलं !!१
    ...
    हजार रुपय एकरानं,
    मागील वर्षी सोंगलं !
    दोन हजार एकरानं,
    मजुर यंदा बोंबलं !!२
    ...
    मळणीवाला म्हणतो मला,
    दोनशे रुपये पोतं !
    मी म्हटलं त्याचा काय,
    आता जीव घेतं !!३
    ...
    आलं आभाळ, झाकण्यासाठी,
    ताडपत्री नेतो !
    दोन हजारानं इथे त्याचा,
    खिसा कापला जातो !!४
    ...
    एवढ सार करुन सोयाबीन,
    बाजारात नेतो !
    ओलं आहे म्हणून भाव,
    सोळाशाचा येतो !! ५
    ...
    घरी आल्यावर सारा हिशेब,
    चुकता करुन देतो !
    हाती नाही राह्यलं काही,
    म्हणून रोगर घेवून घेतो !!६
    ...
    यासाठीचं म्हणतो शेतक-याचा,
    वाली कोणी व्हा रे !
    नका देवू दुजे काही,
    हिंमत तरी द्या रे !! ७
    ...
    असाचं जर बळीराजा,
    जहेर पिऊन मेला !
    आपलाही पुढे समजा,
    खेळ खलास झाला !!८
    ...
    सरकारच्या दरबारी,
    आवाज उठला पाहिजे !
    त्याच्यासाठी प्रतिनिधी,
    आमचा झटला पाहिजे !!९
    ...
    जय किसान जय जवान,
    आठवा आता नारा !
    दोघांसाठी खरचं आता,
    काहितरी करा !!१०
    ...

    फेसबुकवरुन आलेली ही कविता... कवी अज्ञात
    प्रेषक - विनय साटम

  • ढोंगी साधू महाराज

    सोडत नसतो केव्हाही, निसर्ग आपुल्या मर्यादा,

    चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा १

    साधूबाबा महाराज कित्येक आहेत ह्या जगती

    नांव घेवूनी प्रभूचे चमत्कार दाखविती २

    अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा

    चमत्कार दाखविण्यामध्ये हात नसतो प्रभूचा ३

    तो महान असूनी क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी

    प्रेमभावना घेण्या कशास पडेल कष्टी ४

    नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या भोंदूनी,

    दु:खींचे शोषण करती वाम मार्गाने जावूनी ५

    आम्ही केवळ भाविक, वेडे श्रद्धाळू असती,

    जो आपल्या अकलेने, उपयोग त्याचा घेती ६

    गंडे, दोरे, जादू - टोणा हे सारे थोतांड,

    चूक मार्गाने जावून शोधत राहतो ब्रह्मांड ७

    विश्वास साधूंवरी देवापेक्षाही जास्त

    म्हणून चटकन लाभे किंमत त्याची स्वस्त ८

    भाषा त्यांची ठरलेली, राहू, केतू, शनी

    जर फारच भोळे असाल तर म्हणती झाली करणी ९

    संकटाचा काळ सांगती तीन वर्षाचा

    दु:ख जावुनी सुखी व्हाल, शब्द देती आशेचा १०

    ह्यात काही नवे नसते, हे तर चक्र निसर्गाचे,

    सुख दु:खाच्या घटना घडते घडणे चालते नित्याचे ११

    विश्लेषण करीता कळेल, आम्हीच करितो घटना,

    परि हिंमत नसते आमची फळ त्याचे घेण्या १२

    आम्हास हवा इतर कुणी झेलण्यास त्या दु:खाते

    शब्द दाखवूनी प्रेमळ लुटीत असतो धनाते १३

    फरक पडत नसतो, आमच्या कर्म फळात,

    त्यांच्या मंत्र – तंत्राने, सहन करतो समाधानात १४

    भयग्रस्त असूनी मन, चिंतेत आम्ही असतो,

    आधाराचा शब्द बोलूनी, आशा आम्हास दाखवीतो १५

    पारखोनी घ्या खरा गुरु दूर रहा भोंदूपासून,

    फरफटत जाल जीवनी मृगजळास नीर समजोनी १६

    गुरु दाखवी मार्ग, तुमच्या आत्मशुद्धीचा,

    त्यातच त्याला समाधान, संदेश देतो ईश्वराचा १७

    जवळ असूनी दूर असतो, हेच सार ईश्वराचे,

    भक्तीभाव ठेवा , यश मिळेल जीवनाचे १८

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • संपदाऽभिषेक

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

  • भावनांची घरें

    घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।

    वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार

    आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,

    घ्याहो निरखूनी ।।१।।

    ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची

    भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,

    घ्याहो निरखूनी ।।२।।

    राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार

    ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,

    घ्याहो निरखूनी ।।३।।

    दया क्षमा शांति प्रेम आनंद उल्हासती

    आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,

    घ्याहो निरखूनी ।।४।।

    प्रत्येक शोधतो आपले घर तसेच करी जीवन साकार

    सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,

    घ्याहो निरखूनी ।।५।।

    घरें बांधली निरनीराळी घ्याहो निरखूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०