सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं
सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी....१,
भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा,
काळाची ती भूक असूनी, माहीत असते सर्वांना....२,
अविरत चालू लपंडाव , जगण्या मरण्याचा
शेवट हा जरी निश्चीत असला, हक्क तुम्हां खेळण्याचा....३,
खेळती काही तन्मयतेने, रिझविती इतरजणां,
खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां....४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुणी तरी असावं...
हाकं मारताच परत येणारं
डोळे पुसायला कणीतरी असेल तर ,
रुसायला बरं वाटतं .......
ऐकायला कुणी असेल तर ,
मनातलं बोलायला बरं वाटतं.....
कौतुक करणारं कुणी असेल तर ,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं......
नजर काढणारं कुणी असेल तर ,
नटुन मुरडायला बरं वाटतं.....
आशेला लावणारा कुणी असेल तर,
वाटं बघायला बरं वाटतं...
आपल्यावर जीव ओवाळणारं असंल तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं......
- दिप....
-- सौ. सुधा नांदेडकर
रविवारला नवरा स्वयंपाकखोलीत घुसला
चल ...आजतरी तुला मदत करतोच म्हणाला
मी म्हणाले ,मला आधी दिवाणखान्यात जावू द्या
पेपर वाचता वाचता तुमच्यासारख्या बातम्याही बघू द्या..
अगं, तुला मदत करायला आलो तर तुच बाहेर जाते!
भाजी पोळी करायला मला एकट्याला कुठे येते?
रोज कसं तुम्ही आँर्डर सोडता तशा आॅर्डरी मला करु द्या
कसं वाटतं मनामधी तुम्हालाही.. जरा अनुभव तर येवू द्या!
तो तयार झाला....लागला स्वंयपाकाच्या कामाला
हजार वेळा... डबा कुठाय,मसाला कुठाय..पातेलं कुठे वगैरे विचारत राहिला.
मला मेलीला, आॅर्डर करायची वेळच नाही दिली ..
येथून सांगण्यापेक्षा आत गेलेलं बरं.. म्हणून मीच खोलीत गेली
नवर्यांला संधी मिळाली तसा तो बाहेर सोफ्यावर पळाला
एक दिवस म्हणून आराम नाही आम्हा बायकांच्या जातीला
उद्यापासुन दिवाणखान्यातच गँस,ओटा,भांडे ठेवणार आहे
स्वंयपाकखोली नांवाचे तुरुंगाला सुंरुगच लावणार आहे!
-- श्रीकांत पेटकर
मनाला जुळती मन....
नाते उदयास येते....
'माना'ची मातंबरी
मन गुंतुनि जाते....
भावनांचा खेळ....
'मान'ली तरच नाती....
आज करावा गोड...
उद्या कुणाचे हाती....
दु:ख ही गोड मानावे..
गोड ही विष ठरते......
कुण्या 'मधुमेही'च्या
मनात शिरून जाणावे....
बिंदुला जोडुनिया बिंदु....
रांगोळी बनते.....
तयासी रंगत
आपले 'जीवन' रंगते.....
लाभता ध्येय....
अन् उद्देश....
हा 'जीव' भरतो रंग....
जगण्याचे तरंग...
भाव बुडबुडे....अन्
मानलेले 'गोता'वळे....
कधी अर्थ....
सर्वार्थाने निरर्थक.....
अथांग....
अबोध.....
अनंत.....
न उमजे मज....
बिंदु शी बिंदु.....
जीवनाचे कोडे....
न उलगडे मज.....
डॉ.दीपक सवालाखे....
यवतमाळ.
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
मार्ग निसर्गाचे सदा, निश्चीत आणि अढळ
चालतो त्याच दिशेने, जसजशी येते वेळ....१
चालत आसता थांबे, भटके वाट सोडूनी
करूया काही आगळे ठरवी तो विचारांनी....२
आगळे वेगळे काय, त्याला जे वाटत असे
नियतीची वाट मात्र, त्या दिशेने जात नसे....३
परिस्थितीचे कुंपण, टाकले जाते भोवती
कळत वा नकळत, मार्गी त्यास खेचती....४
करून घेतो निसर्ग, वाटते त्याला हवे जे
अकारण तुम्हा वाटते, हे तर आहे माझे....५
जीवनाच्या सांजवेळी, बघता मागे वळूनी
प्रवास केला आगळा, हेच येते समजूनी....६
मिळूनी काही आगळे, समाधानी वृत्ती येते
आनंदाने निरोप घ्या, नियती तुम्हा सांगते....७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिन दिन दिवाळी
शब्द कानी पडती
आली आली दिवाळी !
खमंग रुचकर स्वाद
काय पदार्थांच्या लगबगी
बनविण्या गृहिणी सजती !
नटण्याची हौस किती
चारचौघीत उठून दिसण्या
पैठणी झुलती अंगावरी !
मुलींची लगबग रांगोळीसाठी
तर्हे तर्हेचे रंग किती?
रंगसंगती किचकट भारी !
घाई कंदिलासाठी मुलांची
पंचकोनी का षटकोनी
पारंपरिकच बरा दिसे !
गोवत्स द्वादशी दिन
गोवत्साचे पूजन
वसुबारस म्हणती त्यास !
धनत्रयोदशी धनलक्ष्मी दिनी
श्रीहरीगुरुग्रामी श्रद्धावान श्रीयंत्राचे
प्रतिवर्षी पूजन करती !
नरकचतुर्दशी अभ्यंगस्नान
सुगंधी उटणे लाऊन
भल्या पहाटेस अंघोळ !
अश्विन अमावास्या लक्ष्मीपूजन
लगबग दुकानदारांची करण्या
चोपडा पूजन सर्वत्र !
बलिप्रतिपदा दीपावली पडावा
घेण्या आहेर मोठा
नव्या नवरीच्या हेका !
भाऊबीज दिवस भावाबहिणीचा
प्रेमाच्या ‘भेटी’ गाठीचा
दिवाळीचा दिवस समारोपाचा !
जगदीश पटवर्धन
सुगंध पसरे चारही दिशा,
मधुसंचयाचा करत साठा, फुलाफुलांवर बहर केवढा,
वारा वाही, सुवास खासा,--!!!
फांदी फांदी डंवरून येई, फुलाफुलांनी लगडतसे,
किमया सारी निसर्गाची,
तोरणे सतत लावत असे,--!!!
जंगी असे स्वागत एवढे,
खास चालले कुणासाठी,
कोण कोणासाठी झुरे,-
-कोण अवतरे पृथ्वीवरती,---?
सडा पडतो खाली फुलांचा,
का घातल्या पायघड्या,
रंगांची अशी मांदियाळी,
अत्तराचे कोण शिंपी सडे,--!!!
कोमल, मऊ, तरल, तलम, पाकळ्यांचे जादू कशी बोले, हळूहळू पहा उमलत,
फूल झाडावर डोले,--!!!
पानोपानी रंगरंगोटी,
मधूनच कळी डोकावते,
सूर्यकिरणांशी होड चालली,
हळूच खोडाला बिलगे ,--!!!
फुलाफुलांवर रेंगाळत,
भुंगे खेळत राहती,
प्रणायक्रिडा त्यांच्या बघुनी लतावेली गाली हसती,--!!!
भ्रमरांच्या त्या प्रेमलीला,
पाहून त्या रोमांचित होती,
हळूच कवटाळती झाडा,
प्रियकर ना तो शेवटी,--!!!
© हिमगौरी कर्वे.
विजय तेंडुलकर यांनी पेशवाईच्या काळात पुण्याचा कोतवाल राहिलेल्या घाशीराम कोतवाल या व्यक्तिरेखेवर आधारित लिहीलेले हे नाटक पुढे अनेक अर्थांनी गाजलं. महाराष्ट्रीय समाज-जीवनात वादळं निर्माण करून गेलं. १६ डिसेंबर १९७२ रोजी पुण्याच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन’ या प्रायोगिक हौशी नाट्यसंस्थेने, महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावर प्राथमिक फेरीत ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर केला.
भेट तिची माझी थेट नभ-धराची
सुख क्षण भराचे आस जीवनाची
भेटण्यासाठी,प्राण गोळा कंठी
आठवांचा ताटवा,असे सदा सोबती
सुगंधीत मन जसे,कूपी अत्तराची
कोणास वदाव्या,दिलाच्या वेदना
कोण घेईल समजून,माझ्या यातना
माणसाचे जग की,दुनिया पत्थराची
जीव लावणाऱ्याचा,जग घेते जीव
कां तरी ह्या उरी,असे रूजे बिज
कोठे रिती करावी,व्यथा अंतरीची
भावना अनावर होती,सांज सकाळी
बावऱ्या मनाला, नच सुचे काही
जीवघेणी भासे, ती वेदना विरहाचि
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
आपल्या अभिप्रायाचे स्वागत.
आवडली असेल तर नावासह जरूर शेअर करा.
Copyright © 2025 | Marathisrushti