(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रंगांची आरास

    कुठून आले हे निळे पाखरू,
    पाहून त्याला वाटे उल्हास, निसर्गाचा महिमा, जादू ,
    ही तर रंगांची आरास,--!!!

    झुलत्या फांदीवर बसतां, पुढेमागे ते बघा झुले,
    देखणे वाटे, नजर फिरता,
    रंग पांच त्यात मुरलेले,--!!!

    इवलेसे, मुठीत मावेल,
    जीव तरी केवढासा,
    लकलक डोळे, छोटे शेपूट तपकिरी रंग त्याचा,--!!!

    चटकन हेरे सावज,
    नजर भिरभिरत बघे,
    खुट्टट आवाज होता ,
    बनते एकदम सावध,--!!!

    पाठीवर निळा रंग पहा,
    पंखांवर पांढरट पट्टे ,
    आखीव रेखीव कसे ते,
    आहेत कोणी चितारलेले,?--

    मानेवर केशरट झालर,
    त्यातून काढे चिमणे डोके,
    कडेकडेने हिरवी मखमल,
    डोकी पिवळा तुरा शोभे,--!!

    कारागिरी पाहून उठावदार,
    निसर्गा प्रणाम पुन्हा एकवार,
    किती मोठा तू चित्रकार,
    जाणीव ठेव मानवा थोर,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

      August 17, 2019


  • तूच सुगंधा

    तुझे नित्य येणे जाणे
    हळूच वळूनी पाहणे
    नाही कधी विसरलो
    तुझे ते लाघवी लाजणे

    आठव ते सारे सुखद
    निःशब्दी, प्रीतचांदणे
    तुझे कटाक्ष सांत्वनी
    निर्मली तुझे गंधाळणे

    निष्पाप त्या जाणिवा
    मनास भुलवुनी जाणे
    तूंच हसरी कमलिका
    सालस ते तुझे वागणे

    अजूनही मी स्मरतो
    रुप तुझे गोजीरवाणे
    तू स्मरणगंधी सुगंधा
    तुझे उमलुनी बहरणे

    -- वि..सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २२५

    ४/९/ २०२२

      October 3, 2022


  • गीता – जीवनाची एक उकल

    रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी

    जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ//

    अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती

    सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी

    कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते

    सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते त्याची

    तूं आहेस अर्जुना सोंगटी प्रभू ईच्छे फिरे पटावरी //२//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कर तूं, नसे तुझे ते कर्म हा आहे केवळ प्रभूधर्म

    सोडून द्यावीस फलआशा न येई केव्हां तुज निराशा

    तत्वे सांगुनी आर्जुनासी संशय त्याचा दूर करी //३//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    विचार कर तूं आहेस कोण जाणार कोठे, येई कोठून

    चक्रे फिरती अनेक तूं आहेस त्यातील एक

    स्वतंत्र असूनी कांही अंशी अवलंबून तूं दुजावरी //४//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    गीता सांगे अपूर्व ज्ञान जीवनाची करी उकलन

    प्रश्न त्यांचे सारे सुटती आत्मचिंतन जेव्हां करिती

    केवळ समजतां गीतेला खरें समाधान लाभे उरीं //५//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      June 13, 2020


  • विधी लिखीत

    विधी लिखीत असे अटळ त्याच प्रमाणे होई निश्चित
    कोण बदले मग काळाला प्रभूचा सहभाग असे ज्यांत ।।१।।

    राम राज्याभिषेक समयीं असता सर्वजण आनंदी
    राज्य सोडूनी वनी जाईल जाणले नव्हते कुणी कधीं ।।२।।

    नष्ट करुनी सर्प कुळाला तक्षकावरही घात पडे
    परिक्षिताचे प्रयत्न सारे फिके पडती नियती पुढे ।।३।।

    आकाशवाणीचे शब्द ऐकतां हादरुनी गेला कंस मनीं
    काळाने त्या झडप घातली प्रयत्न त्याचे निष्फळ करुनी ।।४।।

    दुर्दैवी होते विधी विधान हरिश्चंद्र तारामती यांचे
    राजा राणी असूनी दोघे जीवन गेले परि कष्टाचे ।।५।।

    सुख दुःखानें भरले असे प्रत्येकाचे व्यक्ती जीवन
    सहज लीलेने घ्यावे सारे प्रभूचेच आहे समजून ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmai.com

      January 23, 2019


  • आला ! आला रे पाऊस !

    आला ! आला रे पाऊस !

    धरणीला मीलनाची आंस //धृ//

    गेली होती तापूनी रखरखली सारी,

    अंग जाता वाळूनी भेगा पडती शरीरी ।।

    थकली ती सोसूनी उकाड्याचे चार मास

    आला ! आला रे पाऊस !

    धरणीला असे मीलनाची आंस ।।१।।

    पाणी गेले आटूनी नदी नाले कोरडे,

    पहाटेच्या दवातूनी झाडे जगती थोडे ।।

    गेली हरळी जळूनी बीजे टाकूनी आसपास

    आला ! आला रे पाऊस !

    धरणीला मीलनाची आंस ।।२।।

    आता येईल वनीं चैतन्य लपलेले,

    तरुवेली जाती फुलूनी पडणाऱ्या जलामुळे ।।

    जाती सारे आनंदुनी दरवळत मातीचा सुवास,

    आला ! आला रे पाऊस !

    धरणीला असे मीलनाची आंस ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      September 5, 2019


  • लोभस चांदणे

    चंद्र आज एकला नभी उगवला ।

    रात पुनवेची मधूर भासला ।। १

    मेघांचा गालीचा आज नाहीं दिसला ।

    शितल वारा अंगी झोंबू लागला ।। २

    उलटून गेली रात्र मध्यावरती ।

    लुक लुकणारे तारे आतां दिसती ।। ३

    पेटल्या गगनीं असंख्य फुलवाती ।

    तीव्र-मंद प्रकाशानें त्या चमकती ।। ४

    त्या असंख्यात चंद्रमा एकची सापडे ।

    जो लोभसवाणा म्हणूनी सर्वा आवडे ।। ५

    उघडूनी देई मनाची प्रेम कवाडे ।

    निघूनी जाई रात बघतां त्याजकडे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      March 19, 2021


  • सदैव नामस्मरण

    प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।
    ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।

    चमत्कार दिसून आला एके दिवशी ।
    राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।

    विज्ञानाने उकल केली या घटनेची ।
    खात्री करिता सत्यता पटली याची ।।

    चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।
    त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।

    शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।
    शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।

    जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।
    शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।

    हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।
    निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।

    सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।
    रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      August 30, 2015


  • भाव जाण तू देवा

    कर पडले चरणीं

    भाव जाण देवा ।।धृ।।

    देह झुकला पुढती

    लिनतेनें मान वाकती

    मनाची करूनी एकाग्रता

    भावनेला वाट देतां

    अश्रू दाटले नयनी अंतरीचा दिसे ओलावा १

    कर पडले चरणी भाव जाण देवा,

    प्रथम येई भावना,

    जागृत करते मनां

    मनाचा ताबा देहावरी

    तेच तुजला प्रणाम करी

    घे प्रभू जाणूनी अत:करणातील ठेवा २

    कर पडले चरणी भाव जाण देवा

    मुखीं नाम तुझे घेई

    देह सारा शहारून जाई

    आनंदाची फूटते उकळी

    नाचते मन सर्व काळी

    मनाचा चंचल स्वभाव समजोनी तूं घ्यावा ३

    कर पडले चरणी भाव जाण देवा

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 13, 2016


  • काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात

    काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात
    कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात
    कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन
    आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून
    मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो
    कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो
    इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात
    स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात
    कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं
    आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन जातं
    शब्दांचे बाण जिव्हारी फटकन लागतात
    चुकलेल्या वाख्येत मनाला घाव बसतात
    शब्दांचा खेळ सारा रोज बोथट करतो
    रोज नव्याने घाव आल्हाद होत जातो
    अश्रूनाही फारशी किंमत उरत नसते
    माणस माणसांना वापरुन धार बोथट होते
    टाईमपास हा कधी कधी शिकवून जातो
    कळ्यांचा भाव फुलांना न कळतो
    सहज कुणी आयुष्यात येऊन जातं
    विखुरलेले रंग विस्कटून आल्हाद जातं
    विश्वासात अविश्वास सहज खपून जातो
    माणूस माणसाला बोलून तोडून टाकतो
    निःशब्द मन अलवार हरवून जातं
    त्यालाही माहीत नसतं खेळ मनाचा उरतं
    अशी कशी बोच एकाकी मग रुतते
    कोण दुःखी होतो तर कोणाचे मन हर्षते
    भावविश्वात प्रेम कुणावर करु नये
    गुंतल मन अलवार तर मोहात रुतु नये
    शब्दांचे घाव कुणी मनावर सहज करतात
    असे कसे अश्रू अंतःकरण रडवून जातात
    आईच्या वात्सल्यात ऊब मायेची असते
    कोण हलकेच रडवून आयुष्य मिटून जाते
    संथ पाण्यात सायंकाळ केशरी भिजते
    जीव लावला अंतरी तर सल कातरी बोचते
    -- स्वाती ठोंबरे.

      April 27, 2022


  • ओसाड जमीन

    ब्रिटीश कवी T. S.Eliot यांच्या Waste Land या कवितेने प्रेरित होऊन मी लिहलेली ओसाड जमीन ही कविता

    कित्येक गढूळ लोंढे प्रत्येक ऋतूत
    शहराच्या गल्लीबोळात शिरतात
    रिकाम्या निर्जन शांततेच्या सागरात
    चेहरा नसलेली धक्का खात फिरतात

    पेरणी करून अथवा तरव्यासाठी कोवळं पेटवूनही
    येथे प्रेतांना धुमारे फुटतच नाहीत
    खाली मान घालून अंत्ययात्रेत सुतक पाळणारे
    एकमेकांना ओळखू येतीलच असे नाहीत

    संवेदना सुगंधीत कफनात गुंडाळून
    अर्धमेलेले मृत्यू भासावेत तसे
    कांचन,रंगद्रव्यांनी माखलेले बुरखे
    खरे खोटे ओळखावेत कसे

    झऱ्यांचं शुभ्र खळखळतं हसणं दिसत नाही
    वाऱ्यांचे मंजुळ नाद कोणाच्या कानात गुंजणार नाहीत
    ज्यांनी ही सुंदर फुललेली जीवनाची बाग नाकारली
    ते शाश्वत व अटळ मृत्युंची आशा धरणार नाहीत

    दुपारी शरदाच्या तपकिरी धुक्यात
    येथे सर्वच काही वास्तव राहत नाही
    दबलेल्या , ओझ्याखाली यंत्रवत झालेल्या
    ओसाड जमिनीत शुद्ध प्रेम मात्र उगवत नाही

    प्रकाश भोसले
    मल्हारपेठ - सावर्डे
    9421974209

      February 19, 2023