स्वराज्याची अर्थव्यवस्था भक्कम असावी याकडे त्यांचे लक्ष होते. अर्थव्यवस्था, लष्करी यंत्रणा, प्रशासन यावर त्यांची उत्तम पकड होती. जिंजीच्या वेढ्यात असताना मोगलांचे संकट टाळण्यासाठी झुल्फिकार खानाबरोबर त्यांनी अंतःस्थ मैत्री प्रस्थापित केली, राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले.
चष्मा लावूनी करित होतां, ज्ञानेश्वरीतील पारायण
दृष्टीमधले दोष काढले, चाळशीचा आधार घेवून....१,
फूटूनी गेला एके दिवशीं, चष्मा त्याच्या हातामधूनी
पारायणे ती बंद पडली, दृष्टीस त्याच्या बाध येवूनी...२,
चालत असता सरळपणे, दैनंदिनीचे कार्यक्रम
खीळ पाडूनी बंद पाडी, क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम...३,
वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती
तोलण्यास ते धन न लागे, मूल्य मापन जेंव्हां होती....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें....१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे...२,
शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
चल सखये,जरा विसावू नदी किनारी
बघ आठवांचा खोल डोह या किनारी
गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची
साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।।
वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती
ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी
ओढ निरंतर, सारितेला मिलनाची
चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।।
मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना
भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी
रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी
चल न्याहळू त्या निरव शांत किनारी।।३।।
दरवळ! प्रितीचा बघ गगनी गंधला
इंद्रधनुचे प्रतिबिंब, तरंगते किनारी
भावासक्त! प्रीती दैवी जन्मांतरीची
अखंड वाहते गं बघ या गंगाकिनारी।।४।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १२८
२ - १० - २०२१.
रुजविता बियाणें
अंकूर फुटती
असतील दाणे जसे
तेच उगवती
पेरता आनंद
आनंदचि मिळे
प्रेमाची बियाणें
प्रेम आणी सगळे
शिवीगाळ करुनी
आदर येई कसा
शत्रुत्त्वासंगे नसे
मैत्रीचा ठसा
घृणा दाखवूनी
कसे येई प्रेम
क्रोधाच्या मोलाचे
शांती नसे दाम
पेरावे तसें उगवतें
नियम हा निसर्गाचा
सुख दुःखाला कारण
स्वभाव ज्याचा त्याचा
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
प्रिय हा अती श्रीगणपती देव लाडका
नाहीं जगीं कोणी गणेशासारखा ।।
तुंदिलतनू, सोंडेमधें मोदक धरी
तोलीतसे भरलें तबक हातावरी
एकवीस हा नैवेद्य प्रिय या गजमुखा ।।
मांडीवरी पद ठेवुनी ऐटित बसे
तोंडावरी स्मित नेहमी विलसत असे
हातीं धरी निज-दंत मोहक मोडका ।।
बांधीयलें अपुल्या कटीवर फणिधरा
त्या बंधनें सांभाळिलें पीतांबरा
जागा दिली पायींच वाहन मूषका ।।
दावीतसे भक्तांस लोभस रूपडें
पण रौद्र बनुनी विघ्न-दुष्टांशी लढे
नाशून त्यांना वाढवी अमुच्या सुखा ।।
मज मार्गदर्शक लाभला गणनायक
करतो विनायक पथ पुढिल निष्कंटक
मजसंगतीं गणपति गुरू, बंधू, सखा ।।
प्रथमेश हे, अतिश्रेष्ठ तूं देवांमधे
अमुच्या मनां तव दर्शनें उन्मेश दे
आम्हांवरी ठेवी कृपा, गणनायका ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
ही पुण्यदा गंगामाई
हिचाच अगम्य डोह
डुंबता मनी प्रसन्नता
तिचाच मजला मोह
सुखदुःखा गिळूनिया
अविरत तिचा प्रवाह
नाही कुणाचाच द्वेष
तिचाच मजला मोह
ती विरक्तीचा सागर
तिच्यात शमतो दाह
ती भगिरथाची गंगा
ठायी तिच्या निर्मोह
जीवनांतीगंगोदक
दृष्टांत मुक्तीचा सोहं!
(सोहं --- ब्रह्मानंद!)
-- वि. ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५०.
१३ - १२ - २०२१.
विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला,
रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गाऊनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होऊन गेले काव्य, अमर राहिले आतां,
प्रसंग जरी तो गेला निघुनी, राहते जिवंत कविता ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
येरे मना, येरे मना
नको जावू दूर, दूर, दूर
येथे नाही रे आता
जीवाला हुर, हुर, हुर.....।।धृ।।
सोडूनी दे रे, ते तुझे
नवे, नवे बहाणे
सोडूनी दे रे ते तुझे
आज इथे अन उद्या तिथे
झुळझुळणाऱ्या वारुसंगे
नकोस उधळू दूर, दूर, दूर....।।१।।
चल पाहू या रे
विवेकी सुंदर गांव
चल घेवूया या रे
शांती सुखाचा श्वास
करू निर्धारी ते
दुःख पहाडी दूर, दूर, दूर....।।२।।
येईल रे येथे सारे
मंगलतेचे वारे
असेल येथे सारे
स्वर्गसुख ते सारे
सोडूनी ये सत्वर
स्वार्थ तुझा दूर, दूर, दूर....।।३।।
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २७९
१/११/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti