मुक्तछंद हा काव्यप्रकार मला खुप आवडतो.
यमक साधता साधता काव्य सहज प्रभावी व प्रवाही होतं,नाही का?
*काव्य*
काही अर्थपुर्ण मुळाक्षरं गुंफित जावी
अर्थपुर्ण शब्दांची तळी उचलावी
त्या शब्दांतून अलंकृत रचना साधावी
नटली ,सजली की तिला काव्य मैफिलीत सादर करावी
दर्दी रसिकांची दाद मिळवावी
दाद मिळताच मी कवी म्हणून प्रौढी मिरवावी
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
सारे जीवन जाते आपले अन्न शोधण्याकडे
काय उरते आमच्या हाती विचार करा थोडे....१
जीवनाची मर्यादा ठरली आयुष्य रेखेमुळे
आज वा उद्या संपवू यात्रा हेच आम्हांस कळे....२
धडपड करी आम्ही सारी देह सुखा करिता
विचार ही मनांत नसतो इतरांच्या करिता....३
वेळ काढावा जीवनातुनी इतरांसाठी थोडा
सार्थकी लावा आयुष्य तुम्ही जीवन शिकवी धडा....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कपाशीचे ढीग अगणित
विखुरले दिसती आकाशीं
मानव येथें उघडा असूनी
वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।।
कोठे आहे कापड गिरणी
वस्त्र जेथें बनत असें
दयावान तूं मालक असतां
त्रोटक कापड निघे कसे ।।२।।
पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा
लाज राखण्या मानवाची
गरीब बिचारा विवस्त्र तो
कीव करावी वाटे त्याची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे
कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी
घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी
नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें
चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची
असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अवतीभोवती सारे तुझ्या, आहेत गुरू बसलेले
जाण तयांची येण्यासाठी, प्रभूसी मी विनविले ।।
निसर्ग शक्तीच्या सर्व अंगी, काही तरी असे गुण
आपणासची ज्ञान असावे, घेण्यास ते समजून ।।
उघडे ठेवूनी डोळे तुम्ही, बघाल जेंव्हां शेजारी
काही ना काही ज्ञान मिळते, वस्तूच्या त्या गुणापरी ।।
सारे सजिव निर्जिव वस्तू, गुरू सारखे वाटावे
तेच आहेत ईश्वरमय, तुम्हीच ते समजावे ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं...
लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरी मिळवायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसं कित्येकांना वाटत असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं
© कवी – निलेश बामणे ( एन.डी.)
दिनांक – 9 मार्च 2016
ब्लॉकचे पैसे भर ग मुली
भर ग मुली
मग जा आपल्या सासरला
सासरला
ब्लॉकचे पैसे भरले ग आई
भरले गं आई
आता तरी जाऊ का सासरला
सासरला
ब्लॉक ताब्यात घे ग मुली
घे ग मुली
मग जा आपल्या सासरला
सासरला
ब्लॉक ताब्यात आला ग आई
आला ग आई
आता तरी जाऊ का सासरला
सासरला
ब्लॉकची सजावट कर ग मुली
कर ग मुली
मग जा आपल्या सासरला
सासरला
ब्लॉकची सजावट झाली ग आई
झाली ग आई
आता तरी जाऊ का सासरला
सासरला
टेलिफोनचा नंबर लाव ग मुली
लाव ग मुली
मग जा आपल्या सासरला
सासरला
टेलिफोन आता आला ग आई
आला ग आई
आता तरी जाऊ का सासरला
सासरला
नवी गाडी घे ग मुली
घे ग मुली
मग जा आपल्या सासरला
सासरला
नवी गाडी घेतली ग आई
घेतली ग आई
आता तरी जाऊ का सासरला
सासरला
व्यवहार नाही ठाऊक तुला
ठाऊक तुला
मीही येते, रहायला.
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली स्व. सौ. गंगूताई वैद्य यांची हि कविता
गरगर गरगर फिरवू चरखा
दीन जना जो देईल तनखा।।धृ।।
चरख्याचा हा मंजुळ नाद
दशदिशांतुनी घालीत साद
स्वदेशी खादीचा जणू प्रसाद
परसत्तेचा सोडवी विळखा
गरगर गरगर फिरवू चरखा ।। १ ।।
निघती भरभर कोमल धागे
सुबक गुंफुनी विणुया तागे
देश आपुला न राहील मागे
करी निर्भय हा पाठीराखा
गरगर गरगर फिरवू चरखा।।२।।
कवच स्वदेशी निर्भयतेचे
शस्त्र हाती हे संघटनेचे
गीत मुखीचे स्वातंत्र्याचे
जयभारत हा घोषही ऐका
गरगर गरगर फिरवू चरखा ।। ३ ।।
-स्व. सौ. गंगूताई वैद्य
सुखदुःखाचा , मी कधीच
गणिती हिशेब नाही केला
जीवा जगविता , जगविता
कधी अट्टाहास नाही केला
वेदनांतूनही शोधीता सुखा
दुश्वास कुणाचा नाही केला
सुखसमाधान, योग भाळीचे
त्याचा हव्यासही नाही केला
निर्मळी ! सहवासात लाभले
संस्कारांचे रांजण सोबतीला
आघातातही डगमगलो नाही
विवेके , सावरले मनांतराला
खेळ सारेच त्या अनामीकाचे
ना कधी विसरलो दयाघनाला
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१५२
१४ - १२ - २०२१.
Copyright © 2025 | Marathisrushti