मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।।
नदी कांठच्या वनीं
थुई थुई नाचूनी
पिसारा फुलवुनी
तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु ।।१।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
मोरपिसे सुंदर
रंग बहारदार
दिसे चमकदार
बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं ।।२।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
रुप डौलदार
चाल ऐटदार
भासे रुबाबदार
बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं ।।३।।
मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
उत्साहाने आला होता, मुंबई बघण्याकरिता,
रम्य स्थळांना भेट देणे, ही योजना मनी आखता ।।१।।
मान्य नव्हती त्याची योजना, नियतीच्या चाकोरीला,
पाकीट पळवूनी त्याचे, घाला कुणीतरी घातला ।।२।।
धन जाता हाता मधले, योजना ती बारगळली,
अवचित त्या घटनेने, निराशा तेथे पसरली ।।३।।
जात असता सरळ मार्गी, दुष्टपणाला बळी गेला,
समाजाला धडा शिकवण्या, सूडाने तो पेटून गेला ।।४।।
वाम मार्गी जावून त्याने, तेच धन पुन्हा कमविले,
सूड घेतला असून देखील, समाधान ते नाही लाभले ।।५।।
दुष्ट वृत्तीची वलये ती, फिरत असती सभोवती,
सूड अहंकार लोभही, त्यानाच गतीमान करती ।।६।।
एका वरचा राग तुम्ही, फैलविता सहजपणे,
तोडून टाका ही वलये, प्रेम दया या भावनेनें ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
एका हिंदी कवितेचा अनुवाद,थोडे काही शब्द घालून माझे,--!!!
सोडून आले आहे मी सगळे,
आपल्यात घडलेले सारे,
माझे तुझे सारे किस्से,
खरंच मी सोडून आले,
रडले डोळे माझे,
अगदी हमसाहमशी,
तुझ्याच फक्त घरापाशी,
सोडून आले सगळे,
रुसणं, रागावणं, मनवणं
मुद्दाम जिद्दीने भेटणं,
अशा कित्येक स्मृती,
सोडून आले तुझ्या दाराशी,-!!!
एकत्र घालवलेले रम्य क्षण, डोळ्यात साठवलेले,
अशा सगळ्या रात्री,
सोडल्या तुझ्या दाराशी, --!!!!
अगदी अगदी बेवारशी,
जिथे सुखाचे आभाळ,
येऊन सामावत होते,
तिथे त्याला पेलणारे ,
हातच मी सोडून आले,
तुझ्या दाराशी बेवांरशी,---!!!!
त्यात काही विजाही,
येऊन भेटायच्या मला,
त्यावेळी होणारी सुखाची बरसात, सोडून आले मी तुझ्या दाराशी,--!!
मिलनाच्या वाटेवरच,
विरहाचे होते चटके,
एका अनामिक भितीने,
आसुसलेपण त्या प्रेमातले,
सोडून आले तुझ्या दाराशी,--!!!
तुझ्या दाराशी,---!!!!!
हिमगौरी कर्वे.©
एकाच दिशेने जातां,
प्रभू मिळेल सत्वरी,
रेंगाळत बसाल तर,
गमवाल तो श्री हरी ।।१।।
तुम्ही चालत असतां,
अडथळे येती फार,
चालण्यातील तुमचे,
लक्ष ते विचलणार ।।२।।
ऐष आरामी चमक,
शरिराला सुखावते,
प्रेम, लोभ, मोह, माया,
मनाला ती आनंदते ।।३।।
शरिराचा दाह करी,
राग द्वेष अहंकार
मन करण्या क्षीण,
षड् रिपू हे विकार ।।४।।
सुख असो वा ते दु:ख,
बाह्यातील अडथळे
सारेच सारता दूर,
प्रभू तुम्हास मिळे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिल्लीचा वारा
विषाहून विखार
जणू यमाचा पाश.
काळ्या-कुट्ट स्मागात
दिसला यमाचा चेहरा
कासावीस झाला प्राण.
शरीर एक साधन, साध्य करण्या प्रभूला,
शुद्ध देह- मनांत आठवा त्याला ।।१।।
व्यायाम आहार, नियमित वेळी,
शरीर तंदुरस्त, सुदृढ ठेवी ।।२।।
सुदृढ असता देह, करावे मनाला शांत,
टाळत असतां मोह, न येई तो भावनेत ।।३।।
षडरिपू हे विकार, काढा विवेकांनी,
निर्मळ ठेवा शरीर, पवित्रता राखूनी ।।४।।
देह आहे मंदीर, गाभारा तो मन,
आत्मा तो ईश्वर, आनंद देई आंतून ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आम्हा वारकऱ्यांचा प्रश्न कुठे शोधिशी काशी अन कुठे शोधिशी रामेश्वर म्हणत शेतमजुरी करताकरता मुखी तुझे नाव घेवूत सावंता माळ्या सारखे.
श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. या कथेला अनुसरुन हा काला व दही हंडी फोडण्याची प्रथा सुरु झाली असावी.
सध्या याला काही ठिकाणी विकृत स्वरूप येत आहे. कोणत्याही रंगाच्या हंड्या बांधतात, त्या फोडतात. त्यामुळे तो रंग एक-तर दोन-तीन दिवस जात नाही तर काही वेळा त्याचे नको ते परिणाम भोगावे लागतात.
-श्री करंदीकर गुरुजी
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
Copyright © 2025 | Marathisrushti