शरीराच्या भुकेसाठी नाही तर पोटाच्या भुकेसाठी गरीब बिचाऱ्या स्त्रिया होत असतात वेश्या… पुरुषातील माणूस जागा झाला कि स्त्री देवी होते आणि पुरुष जागा झाला की मग देवीची वेश्या..
मैत्र एकमेव ऋणानुबंधी नाते
वाटते फार अपमानितासारखे
वागवे शहर विस्थापितासारखे
रोषणाई प्रखर लखलखे रात्रभर
हिंडते चांदणे शापितासारखे
वाढले जसजसे वय, उमगले तसे -
राहिले बालपण संचितासारखे
नागवी भूक धर्माप्रमाणे जणू
लाघवी पोर अन् प्रेषितासारखे
काम झाल्यावरी मी घरी पोचतो,
जेवतो, झोपतो आश्रितासारखे
पूल चोखाळतो वेगळी वाट अन्
पाहतो काठ प्रस्थापितासारखे
ॐकार जोशी
वाऱ्यावर झोके घेत,केस उडती धुंद हवेत
क्रिडतात जणू पवणाशी ते बटांचे क्रीडादूत
अदेत मद्य-मादकता लोचनात धुंद संकेत
ते मधुर लालस्य अन हास्य काय करी अभिप्रेत
उत्फुल देहावरी स्थिरावले अनामिक नेत्र
व्याकुळ कधीचे, झाले तृप्त गात्र नि गात्र
लेखणीतून परी कागदावर झिरपली प्रीत
मजबुरीने अन राहिले गीत मात्र ओठात
- महेश सूर्यवंशी
( पुणे,सासवड)
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र्य मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्येक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासूर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१
दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२
वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३
उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४
एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
हर्ष उल्हासाने मन नाचले, मन भिंगरी होऊन फिरले,
पुत्रजन्माने अंत:करण किती, हर्षभरीत होऊन गेले,--!!!
इवले इवले हात पाय,
अन् टपोरे बाळाचे डोळे,
रंग गोरापान आणि वरती,
केसही काळे कुरळे,--!!!
छोट्या जिवांस पाहून,
मात्र मन हरखून गेले,
किती नवससायास,
केवढी व्रतवैकल्ये,
जो सांगेल तो उपाय ,
जीव टाकुनी सारे केले ,--!!!
हे कोणत्या जन्मीचे,
पुण्य माझे फळां आले,
अखेर ईश्वराने हाक ऐकुनी, चिमुकलेओटीत घातले,-!
कुलदीपक घराण्याचे,
नाव आता वाढवेल,
मरते समयी पाणी
आपल्या हातें घालेल,
आगमने त्याच्या, घर ,
उजळून उजळून गेले,--!!!!
पोटा पोरं नाही म्हणुनी,
लोक टोचून बोलती,
वांझ वांझ असा, जाता-येता सूर काढती,--!!!
एक आई म्हणून मी,
दाखवून की दिधले,
ऐका जनहो सारे,
आज मी आई जहाले,--!!!
हिमगौरी कर्वे.
©

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ही प्रतिज्ञा आपण मोठ्या अभिमानाने म्हणतो, परंतु आज या देशाचे खरेखुरे चित्र कसे आहे? वास्तवरूप कसे आहे, हे डोळसपणे पाहू लागलो तर आपल्याला वेगळेच दर्शन घडते. आपल्या देशात अनेकदा जातीय दंगली माजतात, एकमेकांच्या धर्माचा अपमान करून सामान्य जनतेला चिथावणी दिली जाते. अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, भ्रष्टाचार अशा गोष्टींना उत्तेजन दिले जाते. पुढारी लोक खोटे मुखवटे धारण करून समाजसेवेचा आभास निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र स्वत:चे आणि नातेवाइकांचे हित करून घेतात. स्वतःच्या अधिकारपदाचा वापर करून घेऊन जवळच्या लोकांना मोठमोठी पदे, नोकऱ्या मिळवून देताना इतर बुद्धिमान, आणि वशिलेबाजीचा वापर न करणाऱ्या तरुण वर्गावर अन्याय करतात. अशा परिस्थितीमुळे देशाची विभागणी सरळसरळ दोन वर्गांत होते. एक अत्यंत धनिक वर्ग, जो गरिबांचे शोषण करून स्वतः श्रीमंत होत राहतो आणि दुसरा अत्यंत गरीब, अन्याय निमूटपणे सहन करणारा शोषित वर्ग. अशा प्रकारे शोषक आणि शोषित अशी विभागणी या देशात शतकानुशतके चालत आली आहे. एका बाजूला वैभव मिरवणाऱ्या उत्तुंग इमारती आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्याने खचलेली झोपडपट्टी असे दृश्य भारतातील प्रत्येक शहरात दिसते.
आता न कुणीच उरले असे जीवाचे
ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे
गाभाऱ्यातील प्रकाशज्योत निमाली
अंधारल्या, आठवातुनी कसे जगावे
एकांती छळतो भावप्रीतीचा गारवा
गोठविणाऱ्या वेदनेतुनी कसे जगावे
दाटला सभोवार निर्विकार काळोख
आता उगा, कुणाला शोधित जगावे
आता न कुणीच उरले असे जीवाचे
ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२९१
८/११/२०२२
Copyright © 2025 | Marathisrushti