राम नाम ओठी जपता
रामराया हॄदयी वसतो...
करावा रामनामाचा धावा
तो सदैव श्वासात नांदतो...
राम नाम सागर मोक्षानंदी
दुःख वेदनांतुनी सावरतो...
राम अवतार विश्वात्म्याचा
साऱ्या ब्रह्मांडाला रक्षितो..
तो देवगुणी , सदविचारी
सकलांच्या मना उजळीतो..
विध्वंसक तो षडरिपूंचा
शाश्वती ब्रह्मांडी नांदतो...
जीवन रामनामी सन्मार्गी
जाणता जीवा मोक्ष लाभतो..
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२९
८/९/२०२२
सुखात येऊ दे स्मरण,
दुःखी विचरता, काही पळें, संकटातून मज सोडवत,
तुझा हात नित्य मिळे,,---
पाठबळ असता अविरत, कशासाठी आम्ही घाबरावे,
प्रार्थित, पूजित तुला सदैव,
त्राता म्हणुनी भाकावे,--!!!
तूच बंधू ,तूच सखा,
तूच रक्षक आमुचा,
विधाता म्हणत म्हणत,
दावा करते मी साचा,--!!!
हे गुरु, हे माय बापां,
लौकिक या सुखदुःखात,
दूर करशी अशा व्यापातापा,--
आमुचा तसा तू पाठीराखा--!!!
पाप-पुण्याचे हिशोब,
कर्म शेवट फळ देते,
जसे ज्याचे असते कर्म,
तशी मनुष्यजात भोगते,--!!!
सद्भावना, आचार-विचार, माणुसकीही कृतिशील होते, अहिंसेच्या पडद्याआड,
शाब्दिक हिंसा सारखी घडते,--!!!
वास्तू देते आशीर्वाद,
तथास्तू सारखी म्हणते,
आई बापात पहावा ईश्वर,
ती तशीच साक्ष देते,--!!!
कलहांमाजि ठेवले काय, कोणासही ना कळते,
विधात्याचे विधीलिखित,
मग कामास लागते,--!!!
सत्ता, स्वार्थ, पैसा, अहम,
जगण्याची झाली सूत्रे,
काय आहे तुमच्या हातात ,
कळून येईल क्षणमात्रे ,---!!!
पाऊस, ओला दुष्काळ, पूर, परमेश्वराची किती साधने,
जागा नाही होत माणूस,
जाणत आपुली दुष्कर्मे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
-- विनोद
भाळी ! असावे दान जीवाला
विवेकी ! संस्कारी सहवासाचे
जन्मदात्यांच्या , मंगल उदरी
प्राशावे अमृतघट सात्विकतेचे
जन्माजन्मातुनी जन्म मानवी
वैभवी सुखदा , दान संचिताचे
सत्कर्माची नित्य कांस धरावी
नीतिमूल्य ! जपावे मानवतेचे
हवेत कशाला ते दुष्ट हेवेदावे
रुजुदे , ऋणानुबंध वात्सल्याचे
जगणे केवळ बुडबुडा क्षणाचा
मिथ्याच जीवन ! सत्य युगाचे
लाभावी , गुरुकृपाच आगळी
शापित ! सरावे सारे जीवनाचे
तो अगम्य हरि एक सावरणारा
हे केवळ अटळ सत्य जीवनाचे
हृदयांतरी त्याचे स्मरण असावे
तत्व ! हेच अंतत: मुक्तीमोक्षाचे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी )
9766544908
रचना क्र.१५३.
१५ - १२ - २०१.
खेळाच्या एका मैदानावर कोपऱ्यात बसलो होतो. समोर काहीं मुलांचे खेळ चालू होते. ते बघण्यात मी स्वतःची करमणूक करीत होतो. अचानक माझे लक्ष्य शेजारी गेले. बऱ्याच मुंग्यांची तेथे जा ये चालू होती. कदाचित् जवळपास कांहीतरी त्यांचे खाद्य पदार्थ पडलेले असतील. म्हणून ती मुंग्यांची वर्दळ असावी.
माझ्या विचारांना एकदम खंड पडली, ती एका मुंगीने माझ्या हाताला कडकडून चावा घेतल्यामुळे. वेदना झाल्या व मी दुसऱ्या हाताने तीला मारले. मेलेली मुंगी मी झटकून टाकली. मी त्या मेलेल्या मुंगीकडे बघत होतो. तीच्याजवळ एक दुसरी मुंगी आली. नंतर तीसरी. बघता बघता बऱ्यांच मुंग्या निरनीराळ्या मार्गाने तेथे जमल्या. सर्वजणींची हलचाल त्या मेलेल्या मुंगीभोवती होत होती. मुंग्यांचा आपसातील संवाद, मृतमुंगीला स्पर्ष करणे, कदाचित् हूंगणे, तिच्या अवयवाचा लचका तोडणे, तीला तेथून हलविण्याचा प्रयत्न करणे. अशा अनेक लहानसहान गोष्टी होत होत्या. सर्वांचा अर्थ वा उद्देश समजणे, ह्याचे अकलन होत नव्हते. यामागची निसर्ग योजना, काय असावी हे कळले नाही.
हां एक मात्र लक्षात आले. ज्या मुंगीला मारले व टाकले होते, ती मृत होता क्षणीच कोणती तरी प्रक्रिया सुरु झाली. कदाचित् एखादी गंध निर्मीती असेल, की ज्याच्या पसरण्याने संबंधीत जीवजंतूना त्याचे चटकन आकलन व्हावे. तो सजीव प्राणी मृत झाला, ह्याची सुचना मिळावी. त्या मृत देहावर निसर्ग प्रेरीत, वा योजीत सोपस्कार व्हावे. ह्याच साऱ्यांचा उद्देश फक्त एकच वाटला. आणि तो म्हणजे मृत झालेल्या देहाचे विश्लेषन Analysis होऊन त्याच्यामधल्या घटक पदार्थाचे पुनरुजीवन Recycling process व्हावी. कुणीही नाशवंत नाही. तो फक्त आपला आकार बदलत जातो. हे मनाला पटू लागते.
जीवन जशी एक चक्रमय क्रिया असते, तशीच मृत्यु ही देखील चक्रमय क्रिया असते. म्हणूनच म्हणतात जन्म-मृत्युचे चक्र.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आत्मविश्वास जागृत ठेवूनी,
कार्य घेवूनी तडीस नेती ।
कधीही न राही अवलंबूनी,
मदतीसाठी दूजा वरती ।।
ईश्वर करीतो मदत तयांना,
मदत करी जे आपले आपण ।
आपल्यातची तो ईश्वर आहे,
असते याची जयास जाण ।।
विश्वासाने हुरूप येई,
जागृत करीती अंतर चेतना ।
लक्ष्य सारे केंद्रीत होता,
यश चमकते प्रयत्नांना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
प्रयत्न मनाचा सदैव असे, भरारी घेण्याचा
उंच आकाशी तारांगणांना, भेट देण्याचा....१,
मनी आस ती राहत असते, उचलून त्यास न्यावे
शिखरावरती जाता क्षणी, स्थितीरूप घ्यावे...२,
प्रयत्नात साथ न मिळता, खाली कोसळते
विचार दबावापुढती त्याचे, काही न चालते...३,
विचार संस्काराचे वलय, मनाभोवती फिरे
निर्मळ पवित्र मन ते, अवलंबूनी विचारे...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सकाळी गारवा थंडीचा
किलबिलाट घुमतो पक्षांचा
सखी गुथलेली कामात
रुणुझुणुतो ताल पावलांचा
@ शरद शहारे
वेलतूर
आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत.
पायासाठी चप्पल की चपलेसाठी पाय हेच मी विसरले |
माती लागू नये पायाला म्हणून मी ते वेष्टिले || १ ||
चमचमणार्या लखलखणार्या आभाळाला भाळले |
अन्न, वस्त्र, निवारा देणार्या मातीला मी विसरले || २ ||
या मातीचा स्पर्श नको म्हणून मी स्वत:ला जपले |
त्या मंगळाने त्या चंद्राने मलाच दूर फेकले || ३ ||
त्यावेळी कळाली मला या मातीची महती |
तिचा एकएक कण होता माझ्या जीवनाची गती || ४ ||
-- चंदाराणी कोंडाळकर
Copyright © 2025 | Marathisrushti