(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • पाहुणचार

    जीव भुलोकीचा पाहुणा
    अनिश्चिती,या स्पंदनांचा
    संपता, पाहुणचार दैवी
    घेतो जगी निरोप सर्वांचा।।

    गतजन्मांचीच सारी नाती
    याच जन्मी, ऋणमुक्तीची
    चित्रगुप्ताच्याच चोपडीत
    चोख हिशेब सारा सर्वांचा।।

    सलोख्याने ऋणमुक्त व्हावे
    निजानंदी! निजसुख घ्यावे
    निरपेक्षी सुखदा ही आगळी
    मना ध्यास असावा मुक्तीचा।।

    जीवनी, सुखरूपताच शांती
    निर्मोही! प्रीतीस्पर्श सदानंदी
    वरदान! कृपावंती तेच ईश्वरी
    श्रद्धाभाव रुजवावा भक्तीचा।।

    -- वि. ग. सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ४१.

    ९ - २ - २०२२.

  • बघून सूर्यपूजा पावन झालो

    हांसत आली सूर्य किरणे

    झरोक्यातून देव्हारयांत

    नाव्हू घालूनी जगदंबेला

    केली किरणांची बरसात

    पूजा केली किरणांनी

    जगन्माता देवीची

    प्रकाश स्पर्शुनी चरणाला

    केली उधळण सुवर्णांची

    तेजोमय दिसू लागले

    मुखकमल जगदंबेचे

    मधुर हास्य केले वदनी

    पूजन स्वीकारते सूर्याचे

    रोज सकाळी प्रात:काळी

    येउनी पूजा तो करितो

    भाव भक्तीने दर्शन देउन

    स्रष्टीवर किरणे उधळतो

    कोटी कोटी किरणांनी

    तो देवीची पूजा करितो

    केवळ त्याची पूजा बघुनी

    मनी पावन मी होतो

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • विशाल आपुले पंख फैलावुनी

    विशाल आपुले पंख फैलावुनी,
    उंच उंच आभाळी उडावे,
    मनसोक्त रमतगमत दूरवरी, विहरत --विहरत गात जावे,--||१||

    नको कुठले ताणतणाव,
    नकोच कुठल्या चिंता,
    भोवती निळा आसमंत,
    मेघ सारे नि विद्युल्लता,--||२||

    वाटले तर वृक्षांवर बसुनी,
    निवांत करावी फक्त टेहळणी, स्वातंत्र्य फक्त राहावे जपत,
    नको कोणाचीच मनधरणी,--||३||

    अपमान, मानभंग, दुःखे,
    कोणीच नको करायाला,--
    नातीगोती टोचती सारी,
    अवघ्या मानवजातीला,--||४||

    आपल्या दिलाचा मीच राजा, काळवेळ कसले बंधन नसे, एकमेकात लढून सारखे ,
    गुंता वाढवणेही नसे,--||५||

    निळ्या आभाळात बागडत, मुक्तपणे वर वर जावे,
    पैसा सत्ता प्रतिष्ठा सोडुनी,
    पक्षीजगातील आनंद लुटावे,--||६||

    गोड फळे झाडांवरची,
    तृप्त होत खात राहावे,
    माणसांना चिडवत चिडवत, फांदीवरती उंच बसावे,--||७||

    हिरव्या हिरव्या धरेवरी,
    स्वैर सगळे सुख लुटावे,
    धुंदीतच राहून आपल्या शेवटी इथेच आपुले प्राण सोडावे,--||८||

    हिमगौरी कर्वे ©

  • देही स्पर्श मयुरी

    गंगाभागिरथी, किनारी
    ओलेती सांजाळ केशरी
    अस्ताचली बिंब लालगे
    गंगाजळी, चैतन्य लहरी
    उजळलेली तिन्हीसांजा
    मंद, मंद तेवते गाभारी
    तनमनअंतर प्रसन्न सारे
    गंगौघाच्या शांत किनारी.
    आसक्त! अधीर यामिनी
    गहिवरलेले प्रीतभाव उरी
    शीतल,झुळझुळ लाघवी
    मनगंगेच्या, या लाटावरी.
    गगनी,घननीळ सावळा
    देही, सारेच स्पर्श मयुरी
    वेद! मनी, आलिंगनाचे
    पुण्यप्रदी,गंगेच्या किनारी
    ब्रह्मस्वरूपी, राधा, मीरा
    लोचनी, तो श्रीरंगमुरारी
    द्वैत,अद्वैताचे रूप मनोहर
    घुमते मंजुळ हरिची पावरी
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ७०.
    ४ - ३ - २०२२.
  • प्रेम झरा

    नाही गेली अटूनी माया,
    आजही वाहते झऱ्यासारखी,
    उगांच कां तू खंत करशी,
    न होशील मज पारखी ।।१।।

    वाहत असता फुटले फाटे,
    जीवनातील वळणावरी,
    जो तो घेई उचलूनी वाटा,
    नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।

    कसा राहील 'साठा' आता,
    मनसोक्त ते जाण्या वाहूनी,
    तृप्त करील परी तृष्णा तुझी,
    ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।

    कुणीतरी आहे पाठीराखा,
    आनंदाने चालत रहा,
    थकूनी जाता देईल पाणी,
    आखंडीत प्रेम झरा ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पूजाविधी गाभा

    सोडूनी दिली पूजाअर्चा, समाधान मज ज्यात न लाभले,
    दैनंदिनीच्या कार्यक्रमातील, एक भाग तो सदैव वाटले ।।१।।

    बालपणी कुणी शिकविले, पूजाअर्चा आन्हकी सारे,
    ठसले नाही मनात कधीही, भक्तीला हे पोषक ठरे ।।२।।

    पूजाअर्चा विधीमध्ये, लक्ष केंद्रीत होते,
    हळदी कुंकू गंध फुलें आणि, दीपधूप हे मधूर जळते ।।३।।

    सुबकतेच्या पाठी लागूनी, यांत्रिकतेसम आम्ही झालो,
    अर्थ ज्याचा कधी न कळला, मंत्र मुखोदगत वदू लागलो ।।४।।

    वास्तव्य ज्याचे सदैव सागरी, स्नान तयाला काय घालता,
    नैवैद्य ज्याला अर्पण करीतो, तो विश्वाचा असे अन्नदाता ।।५।।

    प्रेमभाव भक्तीसाठा उचंबळूनी, तेव्हा न आला,
    तांत्रिकतेच्या आहारी जावूनी, मुख्य गाभा विसरूनी गेला ।।६।।

    पूजा विधी मार्गदर्शक, समरस होण्या प्रभू चिंतनी,
    रेंगाळूनी जाता वाटेवरती, वेळ दौडतो ध्येय विसरूनी ।।७।।

    चिंतन मनन ध्यानामध्ये, पूजा अर्चा जावे विसरूनी,
    हेच खरे ते साध्य आहे, जे समर्पीत होते ईश्वर चरणी ।।८।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मातीचा देह मातीला शरण गेला

    आजी आजोबा होते थकलेले
    थकलेल्या वाड्यात रहात होते.

    काळाने केला भयानक घात
    सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात

    पण पडताना वाड्याने हात टेकले
    आजी आजोबांना त्याने वाचविले

    जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले
    अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले

    आजी मात्र एकटीच राहिली धीराने
    वाडा नाही सोडला तिनं हट्टाने

    म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं
    या तूम्ही सारी असेच दर वर्षी हौसेनं

    आम्हीही अधुन मधुन तिकडे जात राहीलो
    वाड्याच्या अंगा खांद्यावर खेळत राहिलो

    एके दिवशी आजीने देह सोडला
    आणि आमचा उन्हाळा करपून गेला

    एकाकी वाडा खूणवत होता
    आतुरतेन आम्हाला बोलवत होता.

    खचलेल्या वाड्याने मग धीर सोडला
    मातीचा देह मातीला शरण गेला.

    - डॉ. सुभाष कटकदौंड

  • शैव माझे यार झाले…

    प्रदीप निफाडकरांची गझल

  • स्वागत नववर्षाचे

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

  • एक शोषण

    शोषून शोषून जमविता,

    झुरुन झुरुन मरुन जाता

    पैशांनी भरलेल्या पिशव्या

    फाटून जातील

    हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र

    तुमची आसवे पुसण्यासाठी

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com