January 18, 2014
ॐ गणपते, ब्रह्मणस्पते, हे गजमुखा
विघ्नेश्वरा, वर्धिष्णु कर अमुच्या सुखा ।।
जेव्हांकधी शुभकार्य कुणि आरंभतो
सर्वांआधी, मोरेश्वरा, तुज वंदतो
पहिलें तुझें अर्चन सदा गणनायका ।।
राहत उभी अरिसंकटें भक्तांपुढे
तीं नाशण्यां, हे मोरया, तुज साकडे
अनवत धरा पायावरी, सुखदायका ।।
हेरंब हे , सारे अम्ही पापी ज़री
अविलंब परि वर्षव कृपा अमुच्यावरी
लंबोदरा, पोटात घे अमुच्या चुका ।।
चालून थकलो या जगीं, शक्ती नुरे
अवतीर्ण हो, तव चरणरज कणभर पुरे
नरजन्म तुझिया दर्शनाविण हा फुका ।।
- - -
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
September 14, 2016
नाकासमोर हात ठेवा, लागेल तुम्हां गरम हवा ।
थंड हवा आत जाते, गरम होवून बाहेर येते ।।१।।
अन्न पाणी घेतो आपण, ऊर्जा निघते त्याच्यातून ।
भात्यापरि फुगते छाती, हवा आत खेचूनी घेती ।।२।।
आतल्या ज्वलनास मदत होते, उष्णता त्यातून बाहेर पडते ।
भावना जेव्हां जागृत होती, रोमरोमी पुलकित होते ।।३।।
अवयवे सारी स्फूरुनी जाती, देहामधूनी विज चमकती ।
धनको ऋणको विद्युत साठे, अलग अलग दिसती मोठे ।।४।।
विजातीय लिंग येता जवळी, परिणाम दिसे विजेचा त्यावेळी ।
प्रकाश आहे आपल्या देही, ज्ञानीजन तो सहज पाही ।।५।।
स्थिर करूनी चंचल मना, प्रकाश दिसेल हृदयी सर्वांना ।
उष्णता वीज प्रकाश शक्ती, निसर्गाची रूपे असती ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 12, 2016
गर्दी गर्दी गर्दी,
सर्वत्र त्रस्त करून टाकणारी गर्दी.
गर्दीला पांगविण्याची, कला मला सापडली
वही घेवून संग्रहातील कविता मी वाचली
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 18, 2019
व्हॉटसअॅप वरुन आलेली एक हृदयस्पर्शी कविता. जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पोस्ट केली आहे.
केस अर्पण करून कुठे पुण्य मिळते
नारळ अर्पण करून कुठे भाग्य उजळते
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
सोनं- चांदी अर्पण करून कुठे काय मिळते
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??
कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ
एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..पुस्तकानं माणसाच
मस्तक सशक्त होत.....
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत....
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत...!
शाळेचे छत गळके आणि
मंदिराचे छत मात्र सोन्याचे ?
शाळेत आज मुलांना बसायला
साधी फरशी नाही
मंदिराला मात्र संगमरवरी ?
शाळेला दोन रुपये देतांना दहा वेळा चौकश्या करणारा पालक मंदिराला दोन हजार देतांना अजिबात चौकशी करत नाही......
आपला भारत नक्की महासत्ता होणार ?
पायात घालायची चप्पल ए सी मधे विकायला ठेवतात आणि
भाजीपाला फूटपाथवर.....
म्हणे आमचा देश कृषी प्रधान
आणि आत्महत्या करतो शेतकरी...
शेकडो मैल चालतो वारकरी...
अन विठोबाचे पहिले दर्शन घेतो मुख्यमंत्री..! ....
- व्हॉटसअॅप वरुन
April 6, 2016
December 5, 2016
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
January 15, 2019
एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की प्रेक्षकवर्गांच्या मनामध्ये एकच काहूर माजलेला असतो ते म्हणजे बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली. अर्थहीन संहिता, चुकीची मांडणी पद्धत अशा गोष्टींमुळे काही चित्रपट एक आठवडा सुद्धा सिनेगृहात चालत नाहीत. भारतीय संस्कृती, परंपरा, भाषा आणि कलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्रपट मूळ तत्वांना विसरून विनाशाकडे वाटचाल करीत आहेत.चित्रपट पाहताना काय घ्यावे आणि काय नाही याबद्दल सजग राहणे आमची आणि तुमची जबाबदारी आहे.
January 30, 2019
नदीचा उगम पर्वत/ डोंगरातून होतो त्यामुळेच नदीला गिरीजा, शैलजा अशी नावे आहेत. समुद्र हा नदीचा नवरा मानला जातो. एकदा समुद्राला मिळाल्यावर नदी परत पर्वताकडे जात नाही म्हणून नदीला माहेर नाही असे म्हणतात. गदिमांनी ह्या कवितेत हा समज खोडून काढत जलचक्र किती सुंदर शब्दात सांगितलं आहे..
नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर,
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर
काय सांगू रे बाप्पानो
तुम्ही आंधळ्याचे चेले,
नदी माहेराला जाते
म्हणूनीच जग चाले
सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेसाठी
रूप वाफेचे घेऊन,
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून
पुन्हा होऊन लेकरू
नदी वाजविते वाळा,
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा
-- गदिमा
May 16, 2017
तुझ्या ओढीने आले इथवर
सांग जायचे आता कुठवर...
ओंजळ भरण्यासाठी एकदा
दान टाकशील का रे मूठभर..
बांध फुटतो सांग कितीदा
अश्रू ओघळे ह्या बांधावर ..
कवेत घ्यावे मला कुणीतरी
श्वासातून जीव माझा झरझर..
मुकेच गाते जीवन सरिता
सूर आळवण्या नाही प्रियकर..
दऱ्या खोऱ्यात आटली नाही
पाणी पिते स्वतः च घोटभर..
फुलली वनराई मळे बहरले
लाट उसळली अंतिम टप्प्यावर
चिरंतन तप करून युगांचे
समिप आला अनंत रत्नाकर
July 22, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti