नाथपंथाविषयी रिसर्च करुन तपशिलवार माहिती यात दिलेली आहे. स्थळ, काळाची सुंदर चित्रे सविस्तर टिपण्यासह नाथपंथ, त्याचे तत्त्वज्ञान सामान्य माणसासाठी तयार केले आहे.
हरिश्र्चंद्रगडाजवळ, सह्याद्री पर्वतास पूर्व दिशेकडे जाणारा एक डोंगरफाटा फुटतो. नगर जिल्ह्यातून जाणार्या या डोंगररांगा बीड व उस्मानाबाद जिल्ह्याच्या आंतरभागापर्यंत पसरलेल्या आहेत. यातील सोनई-बांबरी-जेउर-भिंगार (जि. नगर) ते चिंचोली-येवलवाडी (जि. बीड) या दरम्यानच्या सुमारे ११५ कि. मी. च्या डोंगरपट्ट्यास गर्भगिरी किंवा गर्भाद्रि असे म्हणतात. नवनाथ भक्तिसार या लोकप्रिय पोथीतील २३ व्या अध्यायात नवनाथांच्या गर्भगिरीतील वास्तव्याचे व कार्याचे वर्णन आहे. आदिनाथ शिवाचे वृध्देश्र्वर हे प्राचीन क्षेत्र तसेच मच्छिंद्रनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ व गहिनीनाथ या प्रमुख नाथसिध्दांच्या संजीवन समाध्या यासह अनेक नाथकालीन स्मृतीस्थळांनी हा परिसर गजबजलेला आहे. तीन तालुक्यांच्या भूभागावर इतक्या दाटीने वसलेली नवनाथांची स्थाने भारतात अन्यत्र कोठे अभावानेच असतील.
गर्भगिरीतील नाथपंथ
लेखक : टी. एन. परदेशी
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २५०/- रुपये
पाने : २०८
रिता माझा पाळणा अन रीती माझी झोळी गं!
रीती माझी ओटी अन नशिबाची खोटी गं!
कुणा सांगू यातना, कुणा देवू दोष रं?
रित्या माझ्या काळजाला, कुणाची ओढ रं?
वांझ माझी ओटी त्यात माझा काय दोष रं?
आई माझ्या आत्म्यातील तिला नाही झोप रं!
पान्हा देऊ कुणा अन् कुणा देवू ऊब रं?
आईपणाची झाली खोटी, ममतेची दोरी गेली दुरं रं!
- श्वेता संकपाळ (१३/०७/२०२३)
बागेतील तारका-
शांत अशा त्या मध्यरात्री, उंच पलंगी मऊ गादीवरी
लोळत होतो कुशी बदलीत, निद्रेची मी प्रतीक्षा करी....१,
निरोगी माझा देह असूनी, चिंता नव्हती मम चित्ताला
अकारण ती तगमग वाटे, बघूनी दिशाहिन विचारमाला....२,
प्रयत्न सारे निष्फळ जावूनी, निद्रा न येई माझे जवळी
धूम्रपान ते करण्यासाठी, उठूनी सेवका हाक मारली....३,
बऱ्याच हाका देवून झाल्या, परि न सेवक तेथे आला
मागील दारी जावूनी बघता, दिसला तो मज शांत झोपला....४
कांहीं क्षण मी बघत राहीलो, शांत शरिरी शांत झोप ती
हेवा वाटूनी त्या निद्रेचा, येवूनी पडलो गादीवरती...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
"प्रेम कुणावर करावं?
प्रेम कुणावरही करावं..
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
प्रेम..
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं.."
प्रेम कुणावरही करावं..
सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..!
असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी 'दिन' पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक 'डे'ची काय गरज आहे?
आपल्याला गरज आहे ती आपली उदात्त संस्कृती जाणून घ्यायची..त्यातील प्रेमाची महती समजण्याची
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कॄतीचा सारांश..
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि..
भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा..!
-- गणेश साळुंखे
कोण उठविते प्रात:समयी निद्रेमधूनी,
न ऐकीली कधीही हाक तयाची कानी ।।१।।
चाळविली न निद्रा शरिरा स्पर्श करूनी,
नित्य जागवी तरीही तीच वेळ साधूनी ।।२।।
निद्रेसाठी जाण्यापूर्वी प्रभू वंदन केले,
प्रात:काळी ध्यान करावे हेच मनी योजिले ।।३।।
नाम प्रभूचे घेता घेता डोळे मिटले,
निद्रेच्या आधीन जाता जग परि विसरले ।।४।।
तोच अचानक जाग येवूनी बघे जगाला,
कुणी नव्हते जवळी माझ्या त्या घटकेला ।।५।।
तनमन निद्रेमध्ये असता जागे राही कुणी,
पूर्ण करी ते संकल्प मनीचा अंतरयामी राहूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मज नाही अजुनही कळले
नाते, तुझे नी माझे कसले...
परी नित्य ध्यास तुझा अंतरी
हेच सत्य, निरागस मनातले...
श्वासा श्वासात तूच सांगाती
सावलीत रूप तुझे सांडलेले...
बैचन करते हे गूढ अनामिक
सांगु कुणास, मी हे मनातले...
तुही अशीच निःशब्द अबोली
मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले...
तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां
सहजी सांगुनी जाती मनातले...
पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे
जन्मी, ऋणानुबंधी लाभलेले...
जे आहे,जे घडले ईछ्या त्याची
ते सुख, मी ओंजळीत झेललेले...
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२०६
१८/८/२०२२
भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले,
करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१।।
जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम,
उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२।।
भक्तीभावाची करीता बात, ती तर असे आगळी,
पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३।।
भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन,
नाचत गांत राहिली, केले तुज पावन ।।४।।
दया क्षमा शांतीचे भाव, करुणेमध्ये भरलेले,
त्यांत शोधता तुझा ठाव, आनंदी मन झाले ।।५।।
सर्वस्व तुजला अर्पिता, पावन होतो भक्तासी,
भावनेची ज्योत पेटतां, कदर तूच करीसी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हे, सुमन निरागस, लोचनी सुंदरा कौमुदी
आत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती.
Copyright © 2025 | Marathisrushti