रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ
टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ....१,
शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड
लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड......२,
ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें
यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें....३,
रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती
वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती...४,
जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे
मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक असे समजावे...५,
रूकू नका एके जागीं, चालणें जीवन होय
प्रभूमय होता येणे, हेच असावे ध्येय....६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
सुक्ष्म बिजाचे रोपण करतां, वृक्ष होई साकार
कोण देई हा आकार ?
तूं तर दिसत नाही कुणाला, घडते मग कसे ?
कोण हे घडवित असे ?
प्रचंड शक्ती देऊनी बीजाते, प्रचंड करितो वृक्ष
कोण देई ह्यांत लक्ष ?
त्याच वृक्ष जातीचे गुणही येती, रुजलेल्या त्या बीजांत
ही किमया असे कुणांत ?
तोच वृक्ष वाढूनी फळे देतो, फळांत असते बीज
फिरवी कोण चक्र सहज ?
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@mail.com
पहिल्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
चिंचा बहुत लागल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।१।।
..............................
दुसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
पेरू बहुत लागले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।२।।
..............................
तीसऱ्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
संत्री बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।३।।
..............................
चौथ्या माशीचा घडवा येतो येतो रे शिरवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
मोसंबी बहुत पिकल्या
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।४।।
..............................
पाचव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
डाळिंब बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।५।।
..............................
सहाव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
द्राक्ष बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।६।।
..............................
सातव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
आंबे बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।७।।
..............................
आठव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
खरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।८।।
..............................
नवव्या माशीचा घडवा येतो येतो रे सडवा
सरता सरता नंदन घराच्या
नंदन घराच्या बगिच्या वरी
टरबूज बहुत पिकले
भुलाबाई राणीचे डोहाळे
तिचे डोहाळे, तिला बाई नेउन टाका पलंग वरी
पलंग फिरे चौक फिरे
शंकर बसिले शेजारी ।।९।।
मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।
रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।
एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।
सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।
सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।
दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।
तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।
परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।
केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।
संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।
डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तुझ्या आठवातुनी रमता, रमता
मी कविता का लिहितो
हे मला खरंच कळत नाही..
मीच, मला घातलेलं कोडं
कांही केल्या सुटत नाही !
कारण जिच्यासाठी मी
रात्रीचा दिवस करतो,
आणि लिहितो, तिच्या पर्यंत
त्या कधीच पोहोचत नाहीत..
आणि माझ्या व्याकुळ मनाची
परत घालमेल नको,
खपली निघायला नको म्हणून,
मी ही त्या परत वाचत नाही..
तरी हि मी लिहितो.....
का लिहितो कळत नाही
लिहायच नाही हे रोज ठरवतो
पण....रात्र होताच लिहू लागतो
विदीर्ण जखमी मनातून
कविता प्रसवत राहते ...
रक्त बंबाळ अंतःकरणातुन
शब्द शब्द स्त्रवत राहते......
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
"प्रेम कुणावर करावं?
प्रेम कुणावरही करावं..
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
प्रेम..
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं.."
प्रेम कुणावरही करावं..
सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..!
असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी 'दिन' पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक 'डे'ची काय गरज आहे?
आपल्याला गरज आहे ती आपली उदात्त संस्कृती जाणून घ्यायची..त्यातील प्रेमाची महती समजण्याची
कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कॄतीचा सारांश..
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि..
भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची एकमेव आशा..!
-- गणेश साळुंखे
रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने….
हाडे, मांस, रक्ताने,
शरीर बनविले छान,
सौंदर्य खुलते त्या देहाचे,
जर असेल तेथे प्राण ।।१।।
प्राण नसे कुणी दुजा हा,
परि आत्मा हेची अंग,
विश्वाचा जो चालक,
त्या परमात्म्याचा भाग ।।२।।
ईश्वरी सेवा, संकल्प मनीं,
प्रेमभरे देह भजावा,
अंतर बाह्य शुद्धता राखी,
समर्पणाचा भाव असावा ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
केशरी, श्वेत, हरित
ध्वज समृद्धी तिरंगा
सौखसुखदा भारताची
मांगल्य ध्वज तिरंगा....
अस्मिता भारतीयांची
ध्वज अभिमानी तिरंगा
शौर्यशक्ती, बलिदानाचे
सत्य रूपक हा तिरंगा.....
ही जन्मभूमी देवतांची
साक्ष संस्कृतीची तिरंगा
श्वासाश्वासात देशभक्ती
रुजवीतो हाच तिरंगा....
जगतवंद्य जगतवंद्य
शांतीदूत राष्ट्रध्वज तिरंगा
वंदे मातरम, वंदे मातरम
मुक्त फड़कवुया तिरंगा....
--वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र.१९७
१३/८/ २०२२
Copyright © 2025 | Marathisrushti