पदार्थाचे गुण जाणता, एक गोष्ट दिसून येते,
सूक्ष्म भाग अणू असूनी, त्यांत सुप्त शक्ती असते...१,
या शक्तीची तीन रुपे, तीन टोकावर राही,
अधिक उणे नी सम, विद्युतमय प्रवाही....२,
हेच तत्त्व निसर्गाचे , तीन गुणांनी बनले,
उत्पत्ती लय स्थिती, यांनी सर्वत्र व्यापिले...३,
ब्रह्मा विष्णू महेश, प्रतिकात्मक ही रुपे
अणूरेणूच्या भागांत, समावताती स्वरूपे...४,
याच विद्युत शक्तीला, चेतना म्हणती कुणी,
अणूरेणूत लपलेली, ईश्वरमय गुणांनी...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे
वैराण वाळवंटातील भगभगीत वारे
नात्यांचे आखीवरेखीव बंध काही
आपुलकीचा आनंद गंध नाही
हास्याच्या कृत्रिम कवायती या
अंतरीचा त्यात उन्माद नाही
भावनांना यांच्या ओल नाही
जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही
आटलेल्याच मनोनद्या साऱ्या
पात्र कुणाचेच खोल नाही
आपुलकीची ओसरतीही सर नाही
भावनांना कुणाच्याही घर नाही
अहिल्याच्या शिळांना तर आता
कुणा श्रीरामाचा कर नाही
काळजात सल कधी उठत नाही
आतड्यातही यांच्या का तुटत नाही
मनं कशी कुणात गुंततच नाही
नाती जुळलीच जर, तर कळत नाही
देणगी भेटी, दिखाव्याचा महापूर
भावनेचा ओलावा नाही ताकास तूर
कातळात उमलत नाही आज अंकुराचा अंश
सुदाम्याच्या पोह्यांचा झाला केव्हाचा निर्वंश
कोरडा मी, कोरडा तू, कोरडपाषाण सारे
विमनस्क अशा आभाळी विखुरले तारे
नाळ आमची लुप्त झाली होऊनी शततुकडे
पताका प्रगतीची मिरविती मनाचे हे नागडे
नव्या युगाचे श्रीमंत भिकारी आम्ही
भावनांचा बाजार मांडाया सज्ज होतो
रसरशीत कांतीच्या चालत्या बोलत्या
मडद्यांच्या गर्दीत सामावण्या धावतो
(आजच्या व्यवहारी (केवळ व्यावहारिक?) जगामध्ये वावरताना पुष्कळदा एक तटस्थ कोरडेपणा जाणवतो. माणसं सारी चांगलीच असतात - वाईट मुद्दामहून कुणीच वागत नाही. पण आपलं असं कुणीच वाटत नाही. अगदी नात्यातसुद्धा वैर कुणाचंच नसतं पण प्रेमही कुणी करत नाही. एक प्रकारचा भौतिक रोखठोकपणा, कोरडेपणा प्रत्येक व्यवहारातला भावनिक ओलावा-आपुलकी फार झपाट्याने शोषून घेत आहे. काळ जसजसा पुढे जात आहे तसा हा कोरडेपणा फारच प्रकर्षाने जाणवतो. कोरडेपणातच जन्म झालेल्या नवनव्या पिढींना कदाचित तो भासणारही नाही पण ज्यांनी भावनिक ओलावा अनुभवला असेल त्यांना ही रखरखीत माध्यान्हं फारच जड जात असतील.)
- यतीन सामंत
ज्या ज्या वेळी धीर ठेवशी
मिळेल कांहीतरी
गडबड मनां होऊन जातां
निराशाच पदरीं ।।१।।
शांत चित्त आपुले
तूं ठेव प्रत्येक समयी
मिळेल यश पदरी तुझ्या
खात्री याची घेई ।।२।।
आत्मविकास तूं सोडूं नको
आपल्या कामाचा
मोबदला मिळेल तुजला
योग्य प्रयत्नाचा ।।३।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
अविरत भक्त करत वारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम्
अथक जन ज़ात विठूदारीं, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ऊन नि पाउस यांची नाहीं एकाला पर्वा
ध्यास एकची लागे सर्वां - तो विठ्ठल बरवा
भारले सारे वारकरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
कठिण शेकडो मैल तुडवती मराठदेशातले
अखंड नाचत भक्त शेकडो, कुणिही नच दमले
देइ चैतन्य मनां पंढरी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
समान असती विठुमार्गावर सारे वारकरी
कुणांशी न कोणांस करावी लागे बरोबरी
सर्वच हर्षद-शेज़ारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
वारकर्यांच्या वसतो हृदयीं पांडुरंग सांवळा
उभा विटेवर, हात कटीवर, तुलसीमाळ गळा
विठूमय झाले नरनारी, हॅटस् ऑऽऽफ् टु देम् ।।
ज़ातिपातिचें ना बंधन, ना लहानथोर इथें
शतकांपासुन अशीच वारी पंढरिला निघते
पाहुनी म्हणतो स्वत: हरी – ‘हॅटस् ऑऽऽफ् टु देम्’ ।।
- - -
हॅटस् ऑऽऽफ् टु देम् : Hats Off To Them
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
(काव्य, १५ ऑगस्ट २०१८ स्वातंत्र्यदिनाप्रीत्यर्थ )
आम्ही स्वतंत्र झालो , आम्ही स्वतंत्र आहो
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
गर्जलो, “गटापुढती कुठल्या न नमवुं माथा”
अन् ‘पंचशील’-तत्वीं विश्वास पूर्ण होता
बदललो परी नंतर, नाहीं ‘अलिप्त’ उरलो
त्या पंचशील-तत्वा पुरते अम्ही विसरलो
निज राजकारणाचा अभिमान , परी, लाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
प्रगतिचें नांव घेउन वाढत ‘आयात’ राही
परकीय-चलन सरलें, आश्चर्य यात नाहीं
गंगाजळीच संपे , हातीं कटोरा धरला
जागतीकरण मारी देशी उद्योगाला
इंडस्ट्री ग्रस्त अजुन, ऐशीच ध्वस्त राहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
मुठभर सुदूरदेशीं ‘आय्. टी.’ मधून जाती
झालें भलेंच, होवो, पण लाख अन्य मरती
जणुं बनवतां न येती ‘कंझ्यूमर-गुडस्’सुद्धा
परदेश धरत लावुन ‘आयात-शुल्क’-मुद्दा
उणवलें शुल्क, प्रार्थत, ‘चलनी-प्रवाह वाहो’ ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
बेकायदाच रस्ते भूमीत बांधुनीया
साळसूद-देश म्हणे, ‘आमुच्या संगतीं या’
शेजारी, जो अपुला ‘व्यापार-पार्टनर’ही
घुसती दहशतवादी, त्यांना आधार देई
कळुनही विसंगति, कां, तूं गप्प वज्रबाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
परदेशी-कंपन्यांची चंगळ बहू जहाली
देशी उत्पादनांचा आलेख जाइ खाली
बेरोजगार वाढत , पसरते हलाखीही
डोळ्यावरील अमुच्या हटतच ‘झापड’ नाहीं
वदतो , ‘शाबास ! ऐशा प्रगतीत देश नाहो !’
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
कळलेंच ना अम्हांला दुर्दैव हाय ! अमुचें
बनलो ‘अधीन’ आम्ही परदेशवासियांचें
पश्चिम व पूर्व इथुनी ‘कंटेनर’ रोज येती
नागरीक बेपर्वा , तो विकत माल घेती
‘टोचणी’स निजलेल्या, निद्रा अशीच वाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
निज चालते न मर्जी, कैसा असे स्वतंत्र ?
परकीय गारुड्यांचे चालती येथ मंत्र
राष्ट्रें पुढारलेली पिरगाळतात हाता
उघडलें दार आम्हिच, सार्या उगाच बाता
बोळ्यानें दूध पितो, त्या काय म्हणावें हो ?
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
किति ही अदूरदृष्टी ! लांबचा विचार नसे
पत्ता न, पतन-खड्डा पायाखालीच असे
शेतें उजाडलेली , पुरते न वीज, पाणी
आयुष्य जाहलें हें, ‘अघोषित-आणिबाणी’
‘जयकार’ झाकतो की - जन फोडतात टाहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
ऐसे नव्हे , कुणाला कांहींच ठावकी ना
प्रतिसाद मिळेल कसा कोणाचिया प्रयत्नां ?
करण्यांस साध्य, कोणां उरली न संधि कांहीं
लागली चटक, त्याला रोखणें शक्य नाहीं
एकल्या-यत्नवंतां लोभी-जगत् न दाहो ।।
‘स्वातंत्र्य’ हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
सगळेंच सत्य, दोस्ता, अतिशयोक्ती न कांहीं
सारेच आपण दोषी, तूंही, तसाच, मीही
चकमा न खाउं, जोखूं अपुलेंच आपण स्वत्व
दावूं ममत्व कोठें , देऊं कशां महत्व
ठरवूं या - हृदयिं खरें निजदेशहितच राहो ।।
स्वातंत्र्य हें अबाधित आचंद्रसूर्य राहो ।।
- - -
लाहो : लाभो, मिळो, प्राप्त होवो
वज्रबाहू : ज्याचे हात वज्राप्रमाणें आहेत असा
(अर्थात्, आपल्या सेनेमधील वीर सैनिक )
-
- सुभाष स. नाईक
( M- 9869002126).
उतरते ऊन पुन्हा
परसातल्या दारातुनी
उजळले दीप पुन्हा
शिशिराच्या सांजेतुनी
हवेहवेसे होते कधी
समुद्रवाऱ्याचे शहारे
मागून का मिळते कधी
पहाटेचे स्वप्न गहिरे?
शोधताना चांदणे
वेचले उन्हाचे कवडसे
राहिले मग दूर मागे
दिव्यांचे बिलोरी आरसे...
---आनंद
प्रयत्न करितां जीव तोडून, जेव्हां यश तुम्हा न येई
सोडून देता त्याला तुम्हीं, नशिबास दोष देत राही..१
दोष नका देवू नशिबाला, मार्ग निवडले तुम्ही चुकीचे
का न मिळाले यश तुम्हां, मूल्यमापन करा प्रयत्नाचे...२
चूक दिशेने प्रयत्न होतां, वाहून जातो सदा आपण
यश जेव्हा मिळत नसते, निराश होवून जाते मन...३
पुनः पुन्हा प्रयत्न करूनी, यश न आले तुमचे हातीं
प्रयत्नाची दिशा बदलतां, जुळून सहजच सारे येती...४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
असावा सुन्दर पापलेटचा बंगला
चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला
पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार
धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार
दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन
हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन
मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार
बांगड्यांना अंगभर खवले फार फार
बंगल्याच्या छतात कालवा रहातो
शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो
लांब लांब करल्यांचा नाच रंगला
बोंबिलाचा मासा मस्त चांगला
किती किती चवीचा पापलेट्चा बंगला
सोलकढी भातासंगे मस्त हाणला
(व्हॉटसऍप वरुन)
प्रवास लोकलचा...
खिडकी जवळचे सीट
दोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागा
फॅन खालचे सीट
दरवाज्यात उभे राहून हवा खाणे
सामान वर ठेवणारा स्वयंसेवक
गरजूना जागा देणारे दयाळू
कुठे उतरायचे ते सांगणारे गाईड
स्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे
चौथे सीट
मसाज घेत उभे राहण्याची धडपड
हाडे मोडतील ही भीती
मोबाईल, पाकीट मारले जाईल ही भीती
फाटलेले पत्रे आणि बॉम्बची भीती
धक्का-बुक्की, घाम, वास
दारूचा वास आणि धुंदी
गाडीतून पडून मरण्याची भीती
लाटेसारखा येणारा आणि जाणारा गर्दीचा दबाव
दुसऱ्याच्या पायात घातलेला पाय, घवले वळणे
खेटणे, दाबणे, बलात्कार, लाल-पांंढरी थुंकी, रक्त, शु, शी आणि उलटी
ढोलकी, टाळ आणि पत्ते
कोपरापासून तुटलेला की कापलेला हात
गुडघ्यापासून तुटलेला की कापलेला पाय
घुंगरू, डफ आणि नाच
शेम्बडी गोड बाळे आणि त्यांच्या अस्थीपंजर आया
मोबाइल गेम्स, डाउनलोड केलेल्या फिल्म्स, सिरिअल्स
भिकारी, व्यापारी, मवाली, गर्दुल्ले
बहुभाषिक शिव्या आणि भांडणे
चणे, शेंगा, आलेपाक, गोळ्या
चित्रांची पुस्तके, टाचण्या, पिना आणि रबर
खास कंपनीने स्वस्तात दिलेले
तीन सीटांवर निश्चिंत झोपलेली माणसे
दरवाजात मांडी ठोकून बसणारी माणसे
स्थितप्रज्ञ गार्ड आणि ड्रायव्हर
टपावरची माणसे
आणि चाकाखालचीही माणसे
प्रेत आणि नवजात
सुख आणि दुःख
माझे आणि तुझे
मान आणि अपमान
अभिमान आणि दुराभिमान
चांगले आणि वाईट
स्वच्छ आणि घाण
आणि आपले स्टेशन आले की...
एका क्षणात
सगळा खेळ खल्लास...
अगदी थेट आयुष्यासारखा
-- शुभराज बुवा
ना आई ना सूनबाई होते, ना राजाची पटराणी होते !
इवल्या मायेच्या राजवाड्यात, गोड बाबांची नकटी राजकुमारी होते !!१!!
हसवून खिदळून घर सजत होते, दिवसांमागून दिस घेत होतें झोके,
झोक्यानेही भुर्रकन हिंदोळा घेतला, लग्न आकाशी तो जाऊनी ठेपला !!२!!
कन्यादानाचे त्यांसी पुण्य लाभले, मंगळसूत्राने साजरे रूपही सजले,
ललना सुंदरी सुवासिनीं नटले, किंतू अंतरपाटने अंतर दूरवर ओढले !!३!!
आईची परी पाठवणीत आश्रूंनी भिजली, बाहुली बाबांची हृदयातच निजली,
खळी गालांवरची ओठांत मिठली, मायेची ममता हुंदक्यात थटली !!४!!
मग माझ्याच घराचे बारसे जाहलें, माहेर म्हणवून पाहुणी बसवले,
हक्काच्या सदनीं पाहुणचार लडिवाळला, चार दिवसांत परतीचा निरोप गोंजारला !!५!!
माप ओलांडता लेक परके धन झालीं, नाळ कपल्याची वेदना मज तेव्हा बोचलीं,
कुठलं माहेर अन् कुठलं सासर होत? पोरकेपणात गुंफवणारी होती रेशीम गोठ !!६!!
-- कु. श्वेता काशिनाथ संकपाळ.
" गोठ " (१२/११/२०१९)
Copyright © 2025 | Marathisrushti