(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • हे टिपूर चांदणे

    हे टिपूर चांदणे,सख्या तुला बोलावे,
    आकाशातील घनमाला,
    घराची तुला वाट दाखवे, --||१||

    डोईवरचा चंद्रमा,
    माझिया प्रियाला स्मरण देई,
    एक चंद्र घरी वाट पाहे,
    सारखा सूचित करत राही,--||2||

    शांत नीरव वातावरणी,
    बघ सजणा बोल घुमती,
    विरहव्याकूळ तुझ्या प्रियेचे,
    कानात कसे गुपित सांगती,||3||

    भवतीचा काळोखही,
    येण्याची तुझ्या वाट पाहे,
    मिलन कल्पून मनाशी,
    दोन जिवांची संगत देई, --||4||

    सुगंधित रातराणी
    मिलाफाचे गान गाई,
    दरवळ आपुला पसरत,
    शेज सुगंधित करत राही,--||5||

    दाराचा उंबरा पहा,
    वाट किती पाहतो,
    तोच आधी प्रतीक्षेत,
    तुझ्या सखीचे काम करतो,--||6||

    सभोवार झाडे उभी,
    डौलदार ती स्वागतां,
    माना झुकवून वाट पाहती,
    धनी कधी यायचे आता,--||7||

    तुळशीजवळ पणती,
    जीव धरून पाहे,
    कितीही उशीर झाला तरी,
    सखी सोबत करत राहे,--||8||

    नादखुळा वाराही झेपावे,
    बघ ना रे तुझ्यासाठी,
    तू आल्याची खबर सांगे,
    पुढे येऊन तुझ्या आधी,-!!||9||

    हिमगौरी कर्वे.©

  • हळदीचे गाणे (कोळी बाजाचे)

    हर्षद - प्राची जोरी बाई गो
    जोरी ही लग्नाची
    कामे करूनी थकली बाई गो
    दमली आयशी वराची

    गजाननाला आवतन केलं
    माय आयली डोंगराशी

    हिरवा शालू नेसली वरमाय
    चोळी घातली बुट्ट्याशी
    अंबार्‍यावर वेनी शोबे
    वेनी गो फुलांची

    कानात कुर्‍या बुगर्‍याबाल्या
    नाकात नथनी सोन्याची
    भांगामंदी बिंदी खाली
    टिकली मोठी कुंकवाची

    टिक् ठूशी नी बानू ल्याली
    नाकात नथनी मोत्याची
    पायात पैंजन कमरेला पट्टा
    जोरवी गो चांदीची

    गोट पाटल्या तोरे हातभर
    बांगरी गो वर्खाची
    पांच खर्‍यांच्या अंगठ्या बोटी
    चमचम गो हिर्‍यांची

    बर्‍हारी गांवकरी सगेसोयरे
    करा तयारी लग्नाची
    नाच नाचूनी दमली बाई गो
    दमली रानी रावांची

  • जीवन एक “जाते”

    जात्याच्या पात्यामध्ये, भरडला जाई दाणा ।

    दोन चाकांत येईल, मोडेल त्याचा कणा ।।

    जीवन मृत्यूची चाके, सतत फिरत राही ।

    येई जो मध्ये त्याच्या, मागे न उरेल काही ।।

    मध्यभागी राही स्थिर, आंस त्यास म्हणती ।

    वरचे चाक फिरे, त्याच्या भोवती ।।

    आंसाजवळील दाणा, दूर तो चाकापासूनी ।

    परिणाम चाकाचा तो होईल, मग कोठूनी ।।

    जन्म मृत्यूची चाके, ईश्वर हा फिरवतो ।

    जवळीक त्याची मिळता, दु:खातून मुक्त होतो ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • तीची गगनभरारी

    विधात्याची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री
    अबला नाही तर दुर्गा असलेली स्त्री
    शरीराने असली नाजूक तरी रोजची कसरत करते ती
    मनाने असली हळवी तरी खंबीर असते ती
    माहेर, सासर जन्मापासून सगळी नाती सांभाळत असते
    स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी आयुष्यभर जगत असते
    स्त्री म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याची खाण असते
    चार भिंतीना घरपण देऊन घराचे पावित्र्य राखत असते.
    स्त्रीवर अत्याचार करणे आता थांबवा
    महिला दिनाचे औचित्य वर्षभर राखा
    मुलगी जन्मास आली तर तिला नाकारू नका
    उलटपक्षी महिलांचे सक्षमीकरण करा
    स्त्री शक्तीचे पाऊल आता पुढे पडू दे
    उंच गगनभरारी तिला तिच्या अवकाशात घेऊ दे
    स्त्री पुरुष संसार रथाची दोन चाके
    बरोबरीने चालतील तरच आयुष्य होईल ओके
    आयुष्य होईल ओके ।

    - मिनल आठल्ये

    व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी - महिला विशेषांकातून साभार

  • मोक्ष अंतीम फळ

    मागील कर्म पुढे चालूनी,

    कर्माची होई शृखंला,

    फळ मिळते कर्मावरूनी,

    मदत होई मुक्तीला ।।१।।

    चांगले कार्य करीतेवेळी,

    मृत्यू येता अवचित,

    पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां,

    खेचतो त्याच कार्यात ।।२।।

    अपूरे झाले असतां कार्य,

    ज्ञानेश्वराच्या हातून,

    पुनरपि येऊनी पूर्ण केले,

    आठरा वर्षे जगून ।।३।।

    ध्रुव जगला पांच वर्षे,

    अढळ पद मिळवी,

    कित्येक जन्मीचे तपोबल,

    पांच वर्षांत पूर्ण होई ।।४।।

    कर्म मुक्तता मिळे आत्म्याला,

    जन्म-मृत्यू पासूनी,

    ‘कर्म’ फळानेच जे साधते,

    ‘मोक्ष’ म्हणती कुणी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • कठीण खेळ

    चंचल केलंस मन, स्थिर करण्यासांगे ।

    दिलेल्या गुणाची मग, बदलेल कशी अंगे ?

    निसर्ग नियमाच्या, कोण विरूद्ध जाईल ।

    फायद्याचे ते का त्याचे परि होईल ?

    चपळता जसा गुण, स्थिरपणा असे दुजा ।

    आगळ्यातील आनंद, हिच त्यातील मजा ।।

    देहा ठेवून चंचल, सांगे स्थिरावण्या मन ।

    हा उलटा खेळ कसा, खेळण्या भासे कठीण ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • “आनंद” हाच भगवंत

    गेले सारे आयुष्य

    परि न कळला ईश

    इच्छा राहिली अंतर्मनीं

    प्रभू भेटावा एके दिनीं ।।

    बालपणाचा काळ

    करुनी अभ्यास नि खेळ

    मनाची एकाग्रता

    केली शरीरा करीता ।।

    तरुणपणाची उमेद

    जिंकू वा मरुं ही जिद्द

    करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा

    बनवी जीवनमार्ग निष्ठा ।।

    संसारातील पदार्पण

    इतरासाठी समर्पण

    वाढविता आपसातील भाव

    जाणले इतर मनाचे ठाव ।।

    काळ येता वृद्धत्वाचा

    दाखवी मार्ग अनुभवाचा

    भजन पूजेत जाई वेळ

    ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।

    आता झालो देह दुर्बल

    प्रभू चिंतनांत जाई वेळ

    वाट बघतो निरोपाची

    ओढ फक्त जगदंबेची ।।

    आयुष्य संपता सारे

    खंत येवून मन विचारे

    कां न प्रभू भेटला ?

    ह्याची रुख रुख मनाला ।।

    आत्मचिंतन करिता

    जाणले मी भगवंता

    ईश्वर निर्गुण निराकार

    कर्म करी त्यास साकार ।।

    सत्य दया क्षमा शांती

    ह्याच ईश्वराच्या शक्ती

    आयुष्यातील आनंदी क्षण

    हीच ईश्वरी खूण ।।

    जीवनातील समाधान

    ईश्वरप्राप्तीचे लक्षण

    नसावी मनी खंत

    ' आनंद ' हाच भगवंत ।।


  • उघडेल कधी दरवाजा

    उघडेल कधी दरवाजा,पक्षी पिंजऱ्यातून उडेल,
    संपतील तणाव चिंता,
    स्वातंत्र्य असे उपभोगेल आनंदाच्या त्या क्षणा, ----
    मोल देत कसा नाचेल ,
    भरारी घेत आभाळा,
    उराशी आपुल्या कवटाळेल, स्वातंत्र्याची नुसती कल्पना,
    सतत रुंजी घालत राहील,--- इवल्याशा त्याच्या मनात,
    *मुक्तीचा आनंद भरेल,
    विश्वास ठेवू तरी कसा,
    मनी भावना उफांळेल,---
    सुटली ही भयानक कारा
    ज्याक्षणी त्याला आंकळेल, भोवतालच्या साऱ्या जगां,
    आता आपल्या कवेत घेईल, झुगारून तुटक्या बंधनांना,
    जगावर साऱ्या राज्य करेल,---
    आता कशा असंख्य वाटा,
    जीव कसा आनंदेल,
    स्वर्गीय स्वरूपीं समाधानां,
    हृदयात तो सांभाळेल,---
    अवलोकत पूर्ण क्षितिजा ,
    कसा‌ मग तो भिरभिरेल,
    पाहून येईल मोक्षद्वारा ,
    जिथे जाणे अंती असेल,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • काजवा

    आभाळ आपल आपणच पेलायच
    आपल्या वाटेवर आपणच चालायच
    कुणाची काठी हवी कशाला
    मनगटातली ताकद दिसू दे जगाला
    बसतील कधीतरी उन्हाच्या झळा
    अन् वाहेल मध्येच बेभान वारा
    सावली तेंव्हा तू शोधु नकोस
    आडोशाला जाऊन बसु नकोस
    उन्हाच्या झळांमध्ये तू रापुन जा
    बेभान वाऱ्यामध्ये तू मिसळून जा
    सोन नाही का विस्तावात चमकत
    सुगंध नाही का वाऱ्याने पसरत
    निर्भीड छातीने सगळ झेलायच
    आपल्या वाटेवर आपणच चालायच
    सूर्य झालास तर अतिउत्तम पण
    काजवा मात्र नक्कीच व्हायच..!
    आपल आभाळ...

    -- धनराज साळवे (Dhanraj Salve)
    dhanrajasalve@gmail.com

  • कल्पकतेमुळे निराशा

    निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें,
    विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।

    जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी,
    धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।

    तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन,
    परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।।

    सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते,
    निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।।

    अस्तित्वाची जाणीव देतो, हर एक घडीचा ठेवा,
    ध्यास लागतो आम्ही, परी कल्पिलेल्या रूपी दिसावा ।।५।।

    निराशा राहते सदैव, दर्शन न मिळता त्याचे,
    पाण्यात राहून देखील, तहानलेला असे याचे ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com