विचार, भावना अंतरज्ञान, संगत असते तिन्हीची
यशस्वी करण्याजीवन, मदत लागते सर्वांची....१
तर्कशुद्धता ठरण्यासाठी, विसंगतीचा घेई आधार
जीवनाचे सत्य उकलन्या, बुद्धी करीत राही विचार...२,
राग लोभ प्रेमादी गुण, जीवनाची चमकती अंगे,
‘भावनेचा’ आविष्कार होतां, एकत्र सर्वां चालन्या सांगे....३,
शोध घेत असता सत्याचा, अनेक अडचणी त्या येई,
सत्य हेच असूनी ईश्वर, अंतरज्ञान तेच पटवी....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
एकांताच्या गुढ किनारी
वादळ आठवांचे घोंगावते
आयुष्य सारे सारे हिशोबी
अलवार अंतरात उलगड़ते
क्षणाक्षणांचे स्मृतीकारंजे
भारूनी नभांगणा सजविते
नीरव , नि:शब्दी नीरवता
मन , मनान्तराला सावरीते
सृष्टिचे रूप सुंदर मनोहारी
लोचनातुनी अविरत तरळते
लडिवाळ , लहर प्रीतरंगली
शब्दागंधल्या गीतास गुंफिते
एकांताच्या या गुढ किनारी
मुग्धगीत मनांतरा भुलविते
-- वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १४४.
२८ - ५ - २०२२.
मातेच्या उदरांत असतां, जाण असते त्या जीवाला,
प्रभूचाच मी अंश आहे, सांगत असतो तो सर्वाला...१
सो s हं चा निनाद सतत, कानास आमच्या ऐकूं येतो,
'तो' मीच आहे शब्दाने, आत्म्याचेच अस्तित्व सांगतो...२
मातेच्या उदरांतूनी बाहेरी, पडतां स्वतंत्र जन्म मिळे,
नाश पावूनी साऱ्या स्मृति, स्वत:सहित विसरे सगळे....३
आतां त्याचा निनाद ‘को..हं’, प्रश्न युक्त तो भरला असे,
“मी कोण आहे ?” विचारी सर्वां, उलघडा त्यास होत नसे.....४
जाणून घेण्या स्वत: विषयीं, सारे आयुष्य खर्च करती
पूनरपि येतां स्मृति त्याला, प्रभूमय हे सारे भासती .... ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शौर्य,ध्येर्य ,कर्तव्यनिष्ठा
हीच प्रभू श्री रामांची ओळख
कौशल्यापुत्र प्रभू श्री राम
दशरथ नंदन प्रभू श्री राम
सत्य,धर्म, सद्गुणांचे प्रतीक
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम
भगवान विष्णूचा सातवा अवतार
सद्गुण,करुणेचे प्रतीक प्रभू श्री राम
कौशल्यापोटी जन्म घेतला
अयोध्यापती श्री राम जन्मला
चैत्र मासातील शुक्ल पक्षाला
प्रभू श्री रामाचा जन्म जाहला
त्रेता युगात धर्म स्थापनेला
पृथ्वीवर प्रभू राम अवतरला
प्रभू श्री रामाचा जन्म सोहळा
रामनवमी म्हणून साजरा झाला .
लेखक - उमेश महादेव तोडकर
मातीचा पुतळा एक
फोडला कुण्या वेड्यानी
जीवंत पुतळे अनेक
जाळून टाकले शहाण्यानी ।।
एक करि तो पिसाट
ठरवी वेडा त्याला
अनेकाची उसळता लाट
धर्माभिमानी ठरविला ।।
अशी आहे रीत
नाहीं समजली मना
करुन विचारावर मात
श्रेष्ठ ठरे भावना ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
पौराणिक कथा सांगते. क्रौंच पक्षाची जोडी रासक्रिडा करीत असता, निषादाने नेम साधला व एकास घायाळ केले. तो तडपडू लागला. जवळून त्याच वेळी महान ऋषी वाल्मिकी जात होते. ते करुण दृष्य बघतांच त्याच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते पद्य रुपातले होते.
" मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः
यत् क्रौंचमिथुनादेकमवधीः काम मोहितम् "
(जगातले तेच प्रथम पद्यकाव्य समजले गेले.)
क्रौंच पक्षाला मुजरा
कारुण्यामधूनी उगम पावला
आद्य काव्याचा झरा
वंदन करितो क्रौंच पक्षा
घे मानाचा मुजरा १
गमविले नाहीं व्यर्थ प्राण ते
निषाधबाणा पोटीं
टिळा लावला काव्येश्वरीनें
मानानें तुझ्या ललाटीं २
ह्रदयस्पर्शी जी घटना घडली
तडफड तव होतां
कंठ दाटूनी शब्द उमटले
पद्यरुप घेतां ३
उगम पावतां काव्यगंगा ही
वाहू लागली भूलोकी
वाल्मिकी, व्यास, ज्ञानोबा,तुका
अशांचे आली मुखी ४
काव्यप्रवाह हा सतत वाहे
कितीक जणांच्या शब्दातूनी
अंशरुपानें काव्येश्वरी ही
बरसे व्यक्त होऊनी ५
(कविता)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
महात्मा गांधींना गोरगरिबांविषयी अतिशय आपुलकी व जिव्हाळा होता, आपल्या प्रत्येक कृतीमधून गरिबाविषयीचा कळवळा ते व्यक्त करीत असता. गांधीजींच्या आश्रमात एक तरुण डॉक्टर सेवक होता. तो परदेशातही जाऊन आला होता. मात्र महात्मा गांधींच्या कार्याने प्रभावित होऊन तो त्यांच्या आश्रमात आला होता. आश्रमात येणाऱ्या रुग्णांवर तो गांधीजींच्या सल्ल्याने निसर्ग उपचार करीत असे.
एकदा सकाळीच आश्रमात एक आजारी महिला उपचार घेण्यासाठी आली. आजारपणामुळे तिला खूपच अशक्तपणा आला होता. महात्मा गांधी त्या डॉक्टरला म्हणाले की, या महिलेला कडूनिंबांची पाने खाऊ घाला! तसेच तिला ताक घ्यायला द्या. काही दिवसांनी ती बरी होईल. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे महिलेला कडुनिंबाची पाने व ताक द्यायला सांगितले. दुपारी गांधीजी व डॉक्टरांची पुन्हा भेट झाली. त्या वेळी गांधीजींनी त्या डॉक्टरला त्या महिलेला कडूनिंबाची पाने व ताक दिले का हे विचारले. त्यावर डॉक्टरने हो, तिला घ्यायला सांगितले होते. त्याप्रमाणे तिने घेतली असेल असे सांगितले. त्यावर गांधीजी त्याला म्हणाले, घेतले असेल म्हणजे? तुम्ही तिला ते स्वतः दिले नाहीत काय? त्यावर डॉक्टरने नकारार्थी मान हलविली.
गांधीजी त्याला म्हणाले की, केवळ औषध घ्या एवढेच सांगणे हे डॉक्टराचे काम नसते तर ते घेतले की नाही हे पाहणेही डॉक्टरांची जबाबदारी असते. त्यानंतर गांधीजी स्वत: आश्रमात फिरले व त्या महिलेला त्यांनी शोधून काढले व तिची विचारपूस केली. त्या वेळी ती महिला म्हणाली की, ग्लासभर ताक घ्यायला देखील माझ्याजवळ पैसे नाहीत. त्या महिलेचे दारिद्रय पाहून गांधीजींना खूप वाईट वाटले. त्यांनी त्या महिलेला आश्रमात ठेवून घेण्याबाबत संबंधितांना सांगितले व त्या डॉक्टरलाही तिच्यावर जातीने देखरेख करून रोज सांगितलेले औषध देण्यास सांगितले. काही दिवसांनी ती महिला खडखडीत बरी होऊन आश्रमातून आपल्या घरी गेली.
खुरटून जाते फूलझाड, गर्द झाडीच्या वनांत,
कोमजूनी चालली स्त्रीलज्जा, धावपळीच्या जीवनांत ....१,
भावनेची नाहीं उमलली, फुले तिची केव्हांही,
नाजुकतेचे गंध फेकूनी, पुलकित झाली नाही...२,
कोमेजूनी गेल्या भावना, साऱ्या हताळल्या जावून,
एकांतपणाची खरी ओढ, दिसेल मग ती कोठून...३,
गर्दीच्या या ओघामध्यें, धक्के-बुक्के मिळत आसे,
प्रेमभावना जातां उडूनी, ओलावा मग राहत नसे...४,
स्त्रीलज्जेची भावना जी, युगानूयुगें जपली
घराबाहेर पडून पाऊल लोप पावू लागली...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
अनामिक जे होते पूर्वी, साद प्रेमाची ऐकू आली
योग्य वेळ ती येतां क्षणी, हृदये त्यांची जूळूनी गेली
शंका भीती आणि तगमग, असंख्य भाव उमटती मनी,
विजयी झाले ऋणाणू बंधन, बांधले होते हृदयानी,
उचंबळूनी दाटूनी आला, हृदयामधला ओलावा
स्नेह मिळता प्रेम मिळाले, जगण्यासाठी दुवा ठरावा
मनी वसविल्या घर करूनी, क्षणीक सुखांच्या आठवणी
जगण्यासाठी उभारी देतील, शरीर मनाच्या दु:खी क्षणी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti