(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • कृष्ण बाललीला

    चकित झाले गोकूळवासी
    बघून बाललीला
    सांगा कोण आहे तरी कृष्ण ?
    विचारी यशोदेला ।।१।।

    प्रासादातील मोदक खातां
    तोंड ते उघडले
    मुखामध्ये मोदक नसूनी
    ब्रह्मांड ते दिसले ।।२।।

    उच्छाद मांडूनी कालीयाने
    पाणी केले दुषित
    मर्दन करण्यासाठीं त्याचे
    उडी टाकी डोहात ।।३।।

    पूतना असूनी राक्षसिण
    स्तनांत होते विष
    स्तनपान करुनी त्यानें
    तीला केले कासाविस ।।४।।

    खोड्या बघूनी यशोदेनें
    उखळाला बांधले
    उखळासहीत झाडे पाडूनी
    चकीत त्यानीं केले ।।५।।

    अनेक अशा लीला करुनी
    अचंब्यात पाडले
    बालमुर्ति तो ईश असूनी
    सर्वांस गुंगविले ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मन:शांती

    जगायचे अजुनही राहिले किती
    जगुनही जगती या कळले नाही
    आठविती सारे क्षण ते भोगलेले
    आसक्ती, लालसा संपली नाही
    हव्यास, जीवनी असावा किती
    याचाच अंदाज बांधता येत नाही
    समाधानी वृत्ती सदा मनी असावी
    त्यावीण दुजी जगती सुखदा नाही
    सुखदुःख, आनंद, दान भाळीचे
    भोगण्याविण दुसरा पर्याय नाही
    जे जे लाभले ते ते दान भगवंताचे
    त्याच्या कृपेविण जीवा सद्गती नाही
    हसत खेळत जगुनी जीवा जगवावे
    संघर्षात कदापिही मन:शांती नाही
    ठेविले अनंते, तैसेची जगी रहावे
    याविण दूजा, जीवनाचा अर्थ नाही
    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. १२८.
    ५ - ५ - २०२२.
  • का पुन्हा पुन्हा मी

    का पुन्हा पुन्हा मी
    गुंतून जात आहे,
    कशी ओढ ही मग
    तुझ्याकडे ओढते आहे..

    नको होते मोहक
    तुझी आठवण ती,
    परी होते रोज मग
    तुझी गोड साठवण ती..

    न विसरले तुला मी
    न विसरल्या भावना,
    अबोल वेदना हृदयात
    उरल्या आठवणी पुन्हा..

    मन दुःखी होते असे
    ओढाळ होतात भावना,
    नको गुंतणे मग हे
    विरतात नाजूक जाणिवा..

    -- स्वाती ठोंबरे.

  • उपकार

    कृष्ण कमळ-

  • शब्दांविना संवादू

    शब्दांविना संवादू,
    असंभव"" तो वाटतो,
    किमया त्यांची न्यारी",
    अर्थ मर्म दाखवतो,
    शब्दांवाचून किती भाषा,
    मानव नेमका वापरतो,
    परंतु त्यांच्यासम हा ,
    म्हणत म्हणत कसा,
    वर्चस्व त्यांचे मानतो,--
    स्पर्श बोले कधीकधी,
    मात्र शब्दांसारखा,
    तान्हुल्यांची खास सोय,
    जाणे बाळ ममता, माय--!!!
    , हाच स्पर्श जादू करे,
    प्रेमभावना व्यक्त करे,--!!
    आबालवृद्धां आधार वाटे ,
    इतुका बोलका अगदी भासे,--
    खाणा-खुणा करत लोक,
    बोलती काही एकमेकांशी,
    मूक सांकेतिक भाषा जणू,
    मदत करे सार्थ अशी,--!!
    चित्रलिपी केव्हातरी,
    आंतरिक संवाद साधे,
    मार्मिक प्रसंग रेखाटुनी,
    हृदयांशी हृदये जुळवे,
    कित्येक कलाही बोलती,
    आत्मिक संवाद साधती,
    खूण पटे आत्म्याला आत्मी, यथोचित अबोल भाषा साची,
    नयनांची भाषा आगळी,
    फक्त डोळ्यांमधुनी बोले,
    कधी अनेक शब्द हारती,
    असे भाव प्रदर्शित करे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • सतत बरसणारी दया

    प्रभू दयेची बरसात, चालू असते सतत ।।

    ज्ञानाची गंगोत्री वाहते, पिणाऱ्यालाच ती मिळते ।।

    प्रत्येक क्षण दयेचा, टिपणारा ठरे नशिबाचा ।।

    जलात राहूनी कोरडे, म्हणावे त्यास काय वेडे ।।

    फळे पडतां रोज पाही, त्याची कुणा उमज न येई ।।

    परि न्यूटन एक निघाला, बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।।

    चहा किटलीचे झाकण हाले, स्टिफनसनने इंजीन शोधले ।।

    जीवनातील साधे प्रसंग, शास्त्रज्ञांची बनले अंग ।।

    प्रभू असतो सतत तयार, ठरवा तुम्ही दया कशी घेणार ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • जाणीव

    माझ्या कविता,माझ्या कथा
    माझ्या नसतात,त्या तिच्या असतात

    त्या जगाला,तिच्या असण्याची
    माझ्या आजूबाजूला, आणि माझ्या अस्तित्वातील जगण्यात
    तिच्या भूमिकेची जाणीव करून देत असतात...

    ©कवी - निलेश बामणे

  • पावन हो तू आई

    पावन हो तू आई
    पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।।
    संसाराचा खेळ मांडला
    खेळविसी तूं मजला
    थकूनी मी जाई ।।१।।
    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    रात्रंदिनीं ध्यास लागला
    जीव माझा तगमगला
    झोप तर येतच नाही ।।२।।
    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    आळवितो मी तुजला
    विसरुनी देहभानाला
    नयनी तव रुप पाही ।।३।।
    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    देह झिजविला
    दुर सारुनी सुखाला
    कां तप फळा न येई ।।४।।
    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    साद दे हांकेला
    पेटलो आहे हट्टाला
    नसता परत जन्म घेई ।।५।।
    पावन हो तू आई तव चरण शरण येई

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • भावनेस हसती विचार

    भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,

    तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,

    भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,

    बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२

    आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,

    आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३

    इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी

    तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४

    काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून

    विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • देह मनाचे द्वंद

    दोन स्थरावर जगतो मानव, आंत बाहेरी आगळा ।
    भिन्न भिन्न ते दर्शन घडते, यास्तव कांहीं वेळा ।।

    एकच घटना परी विपरीत वागणे ।
    दुटप्पेपणाचा शिक्का बसतो, याच कारणे ।।

    देहा लागते ऐहिक सुख, वस्तूमध्ये जे दडले ।
    अंतर्मन परि सांगत असते, सोडून दे ते सगळे ।।

    शोषण क्रियेत आनंद असतो, ही देहाची धारणा ।
    त्यागमधला आनंद मग तो, कसा कळे आत्म्याविणा ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com