ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.



व्यास प्रकाशनाचा हा 2022 चा दिवाळी अंक
कायस्थ मंडळी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ ! याला महत्वाचे कारण म्हणजे कायस्थ स्त्रिया पाककला निपुण असतात. कसे तरी रांधून जेवण शिजवावे हे त्यांना पटत नाही. प्रत्येक पदार्थ मोठ्या नजाकतीने तयार करून पेश करणार पण तरीही पारंपरिक कायस्थी पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच तयार होणार. माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी, मावशी, असेल. काकी इत्यादींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले. प्रत्येक कायस्थ पुरुषांचा हाच अनुभव. आधुनिक तरुणींना मौखिक परंपरेने शिकवले जाणारे हे पदार्थ माहित असतीलच असे नाही. त्यांना अनुभवसिध्द मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच खास, चविष्ट तरीही पौष्टिक अशा कायस्थ पदार्थांच्या पाकक्रिया मी प्रसिद्ध करायचे ठरवले. तसेच परंपरागत सणवार कायस्थ मंडळी कशा तऱ्हेने करतात याचेही संकलन करायचे ठरवले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खाद्य संस्कृती आपणासमोर सादर आहे या पुस्तकाच्या माध्यमातून….


श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावरुनच लक्षात येते.
त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.
आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?
अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.
त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?
या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.
अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी

ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.
ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.
Copyright © 2025 | Marathisrushti