ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.

जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.


जागतिक बॅंकेचे परिवहन विषयातील सल्लागार असलेले अरुण मोकाशी झांझीबारमध्ये विश्व बॅंकेमार्फत “परिवहन विशेषज्ज्ञ” म्हणून दोन वर्षासाठी गेले असतांना त्यांनी लिहिलेली ही झांझीबार डायरी. त्यात त्यांनी वर्णिला आहे – आफ्रिकन लग्न सोहोळा आणि लगीनघाई, आफ्रिकन लोकांचे बिअर सेवन, सेरेगेटीतील प्राण्यांचे टान्झानिया-केनिया-टान्झानियाचे अदभूत स्थलांतर, बेटावर रहाणारा पण हवेत उडणारा कोल्हा, व्हिक्टोरिया नदीच्या पात्रातल्या आता निर्वंश होत चाललेल्या मासोळ्या, एक बलाढ्य कासव, जंगलातले जिराफ, आफ्रिकेत रहाणार्या भारतीयांचे गृहजीवन, समुद्रात बुडालेली एक अविस्मरणीय नौकाडुबी – अशा पंचवीस चित्तथरारक कथा !






प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी, अनेक व्यथा, व्याधी असतात. त्यासकट आनंदी कसे रहायचे, स्वतःशी मैत्र कसे जोडायचे आणि परस्परांशी संवाद साधून या मैत्राला विश्वरुप कसे द्यायचे याच्या ५२ कथा या संग्रहात आहेत.
नीला सत्यनारायण यांचे हे २६ वे पुस्तक. प्रशासकीय सेवेत त्या जेवढ्या रमल्या तेवढ्याच साहित्याच्या प्रत्येक प्रांतात त्यांनी रसिकतेने पाऊल ठेवले. त्यांची पुस्तके विविध विषयांवरची असून कवितेपासून सुरुवात होऊन कथा, कादंबरी, ललित लेखन सर्व विषयांत त्यांनी लिखाण केले आहे. साहित्यकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या ६५ पैकी सुमारे ३६ वर्षे पत्रकारिता केली. ते उच्च दर्जाचे पत्रकार होते. त्यांची पत्रकारिता मूकनायकच्या माध्यमातून आवाजहीनांचा आवाज बनून सुरू झाली आणि प्रबुध्द भारताच्या माध्यमातून प्रबुध्द भारत घडवण्याचे स्वप्न घेऊन संपली. मूकनायक ते प्रबुध्द भारत हा त्यांचा प्रवास विचार आणि संघर्ष या दोन्हींचा होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्रे आसपासच्या घटनांची माहिती देणारे व्यासपीठ नव्हते. वसाहती काळातील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनाशी वाटाघाटी करणाऱ्या त्या चळवळी होत्या, वंचितांचे आवाज होते.
या आवाजांचा परिणाम राजकीय सक्रियता आणि विविध संघटनांच्या विचारांमध्ये दिसून आला, ज्यामुळे विचारांचे स्फटिकीकरण झाले.



दैनिक लोकसत्ता, दैनिक केसरी या वृत्तपत्रांचे माजी संपादक श्री. अरविंद व्यं. गोखले यांनी तीन वेळा पाकिस्तानला भेट देऊन लिहिलेल्या थरारक आठवणींचा हा संग्रह. पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरांना भेट देऊन तेथील राजकीय / सामाजिक परिस्थितीचे मार्मिक चित्रण श्री. गोखले यांनी केलेले आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती बेनझीर भुट्टो यांची परखड मुलाखत हेही या संग्रहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य.
पाकिस्तानविषयी कुतुहल असणाऱ्या वाचकांना आणि अभ्यासकांनाही हा संग्रह उपयुक्त वाटेल.


Copyright © 2025 | Marathisrushti