ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.
सुनिल गोबुरे यांच्या कथांचा हा संग्रह. फेसबुकवरील आम्ही साहित्यिक या ग्रुपचे ते सभासद आहेत.


सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.

जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.


आपल्या Corporate जीवनात आलेले अनेक अनुभव रेखाटले आहेत श्री विश्वास दात्ये यांनी. हे छोटे छोटे लेख व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्यांना पथदर्शी आहेत.


श्री सतीश परांजपे हे मध्य प्रदेश राज्याच्या शिक्षण विभागाच्या डायरेक्टर टेक्निकल एज्युकेशन ह्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाले. त्यांचे विविध वैचारिक विषयांवर लेख मराठीसृष्टी.कॉम या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहेत. त्यांचे लेखन अत्यंत वाचकप्रिय आहे हे त्यांच्या लेखनाला मिळणार्या प्रतिसादावरुनच लक्षात येते.
त्यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या १४ निवडक लेखांचा हा संग्रह.



रेल्वे ही आधुनिक जगाची जीवनवाहिनी. रेल्वे इंजिनाची धडधड माणसांच्या ह्रदयाशी कायमची जोडली गेली आहे. दळणवळणाबरोबरच माणसांच्या भावनिक-सांस्कृतिक विश्वाशीही रेल्वेनं नातं जोडलं आहे.. भारतीय रेल्वेनं जात-धर्म, लिंग भेद दूर करत गरीब-श्रीमंत अशा माणसांना माणूस म्हणूनही एकत्र जोडलं.

Copyright © 2025 | Marathisrushti