ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.


ज्या वयात पालक मुलांना बालनाट्य दाखवतात म्हणजे आठ ते चौदा या वयात लेखकाच्या वडिलांनी त्यांना दुसऱ्या महायुद्धावरील अनेक चित्रपट दाखवले. त्यामुळे या संस्कारक्षम वयात लेखकाच्या मनात दुसऱ्या महायुद्धाबद्दल प्रचंड आकर्षण निर्माण झाले. पुढे ते आकर्षण वाढवण्याचे काम विजय देवधर यांच्या दुसऱ्या महायुद्धावरील गुप्तहेर कथांनी केले.
त्यामुळेच श्री वाळिंबे यांना दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेरांवर लेखमालिका लिहावीशी वाटली.
ही लेखमालिका मराठीसृष्टीवर प्रथम प्रकाशित झाली आणि त्यातूनच पुढे या इ-पुस्तकाची संकल्पना आली.
व्यास क्रिएशन्सचा प्रतिभा दिवाळी अंक २०२२


प्रत्येकाच्या जीवनात अनेक अडचणी, अनेक व्यथा, व्याधी असतात. त्यासकट आनंदी कसे रहायचे, स्वतःशी मैत्र कसे जोडायचे आणि परस्परांशी संवाद साधून या मैत्राला विश्वरुप कसे द्यायचे याच्या ५२ कथा या संग्रहात आहेत.
नीला सत्यनारायण यांचे हे २६ वे पुस्तक. प्रशासकीय सेवेत त्या जेवढ्या रमल्या तेवढ्याच साहित्याच्या प्रत्येक प्रांतात त्यांनी रसिकतेने पाऊल ठेवले. त्यांची पुस्तके विविध विषयांवरची असून कवितेपासून सुरुवात होऊन कथा, कादंबरी, ललित लेखन सर्व विषयांत त्यांनी लिखाण केले आहे. साहित्यकार म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत.
कायस्थ मंडळी खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ ! याला महत्वाचे कारण म्हणजे कायस्थ स्त्रिया पाककला निपुण असतात. कसे तरी रांधून जेवण शिजवावे हे त्यांना पटत नाही. प्रत्येक पदार्थ मोठ्या नजाकतीने तयार करून पेश करणार पण तरीही पारंपरिक कायस्थी पदार्थ पारंपरिक पद्धतीनेच तयार होणार. माझ्या लहानपणापासून माझी आई, आजी, मावशी, असेल. काकी इत्यादींनी माझ्या जिभेचे चोचले पुरवले. प्रत्येक कायस्थ पुरुषांचा हाच अनुभव. आधुनिक तरुणींना मौखिक परंपरेने शिकवले जाणारे हे पदार्थ माहित असतीलच असे नाही. त्यांना अनुभवसिध्द मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच खास, चविष्ट तरीही पौष्टिक अशा कायस्थ पदार्थांच्या पाकक्रिया मी प्रसिद्ध करायचे ठरवले. तसेच परंपरागत सणवार कायस्थ मंडळी कशा तऱ्हेने करतात याचेही संकलन करायचे ठरवले. गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही खाद्य संस्कृती आपणासमोर सादर आहे या पुस्तकाच्या माध्यमातून….




सर्वसाधारणपणे अमेरिकेत, किंवा एकूणच परदेशात जाऊन आलेली मंडळी तिकडच्या शहरांविषयीच बोलतात, लिहितात. प्रवासवर्णनेही शहरकेंद्रित असतात. कदाचित पर्यटक म्हणून गेल्यावर शहरातच फिरणे जास्त होत असेल किंवा गावांमध्ये काय बघायचे अशी भावना असेल. या पुस्तकाचं वेगळेपण इथेच आहे.


दैनिक लोकसत्ता, दैनिक केसरी या वृत्तपत्रांचे माजी संपादक श्री. अरविंद व्यं. गोखले यांनी तीन वेळा पाकिस्तानला भेट देऊन लिहिलेल्या थरारक आठवणींचा हा संग्रह. पाकिस्तानच्या सर्व प्रमुख शहरांना भेट देऊन तेथील राजकीय / सामाजिक परिस्थितीचे मार्मिक चित्रण श्री. गोखले यांनी केलेले आहे.
तत्कालीन पंतप्रधान श्रीमती बेनझीर भुट्टो यांची परखड मुलाखत हेही या संग्रहाचे एक प्रमुख वैशिष्ट्य.
पाकिस्तानविषयी कुतुहल असणाऱ्या वाचकांना आणि अभ्यासकांनाही हा संग्रह उपयुक्त वाटेल.

आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ?
अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं.
त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ?
या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’.
अरविंद व्यं. गोखले यांची थरारक कादंबरी
Copyright © 2025 | Marathisrushti