ललित साहित्य, कवितासंग्रह, वैचारिक लेखनाची पुस्तके येथे वाचा.
अनघा प्रकाशन 2019 या वर्षीचा हा दिवाळी अंक. नामांकितांच्या बालपणीच्या आठवणींवर आधारित असलेल्या या अंकाचा विषयच ‘रम्य ते बालपण‘ हा आहे.

जगातील सर्वात उंचावरून म्हणजे १६००० फूटांवरून धावणाऱ्या आगगाडीचा प्रवास’. तिबेट हा देश तसा भेट देण्यासाठी अवघड असल्याने खूपच वेगळे काहीतरी वाचल्याचा अनुभव येईल. नाझकाच्या अगम्य रेषा शाळेत शिकलेल्या भूगोलाची आठवण करून देतील. तर ‘इजिप्तमधले पिरॅमिडस व नाईलच प्रवास’, ‘उरोसची तरंगती बेटे’, ‘जपानचा साकुरा’, ‘स्वित्झर्लंडचे झरमॅट’, ‘दक्षिण आफ्रिकेतील ‘माबुला लॉज’ची वर्णने तिथे जाण्याची इच्छा मनात निर्माण करतील. दुबईसारख्या वाळवंटी प्रदेशातील बागा बघायला जाण्याचा नक्कीच मोह पाडतील व तिथे गेल्यावर ‘कशासाठी पोटासाठी’ मध्ये वर्णन केलेल्या कॉर्निशला भेट देण्याची आठवण नक्कीच येईल. ‘तांबोपाटा’ मधील व ‘वाईटामो केव्हज’ मधील वर्णन आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद देईल. चिनी लोकांची मुखवटा बदलण्याची कला खूपच वेगळी वाटण्याजोगी आहे. हा प्रवास कसा सुरू झाला, त्यातली ‘अडथळ्यांची शर्यत’ कशी संपली याचे वर्णन वाचून प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रवासाची आठवण आल्याखेरीज राहाणार नाही. सिंगापूरला गेल्यावर पहिले काही दिवस कसे गेले, तिथे रुळायला काय काय करावे लागले हेही ‘सिंगापूरच्या आठवणी’ वाचल्यावर काहीजणांना त्यांच्या बदल्यांमुळे आलेले अनुभव आठवायला लावतील.
या पुस्तकातील लेख हे कोणत्याही देशाच्या स्थळाच्या वा प्रवासाच्या वेळेला अनुसरून लिहिलेले नाहीत. सगळे लेख वेगवेगळे आहेत. त्यामुळे मागचा कोणताही संदर्भ मनात न धरता कधीही कोणताही लेख काढला तर तो नवीन वाटला पाहिजे. आपल्याला तसा तो वाटावा ही अपेक्षा


जागतिकीकरणाबद्दल चिंतन करणारे काही मुद्दे मांडले आहेत या पुस्तकात, लेखक श्री सुभाष नाईक यांनी.
श्री गणेशाविषयी ११ प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे दिली आहेत विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी या पुस्तकातून. त्यांच्या लेखणीतून साकारलेली इतरही अनेक ई-पुस्तके… आता वाचा मराठीसृष्टीवर… इ-पुस्तक स्वरुपात.
श्रीदत्तगुरूंचे अखंड निवास स्थान असलेल्या गिरनार पर्वताचा भौगोलिक आढावा, जुनागढ संस्थान काळातील गिरनार, राजकीय संदर्भ, पुराणातील मान्यता, गिरनार पवर्तावरील मंदिरांची माहिती व त्याविषयीच्या कथा, दंतकथा, आध्यात्मिक संदर्भ अशी विस्तारीत माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रथमच येत आहे.
ह्या पुस्तकाचे मूळ लेखक जुनागढचे स्थानिक इतिहासकार प्रो. डॉ. प्रद्युम्न भ. खाचर हे आहेत. याचे मराठी भाषांतर सौ. वैजयंती गिरीश गुप्ते आणि श्री. गिरीश म. गुप्ते यांनी केले आहे.


Copyright © 2025 | Marathisrushti