नाव, आडनाव, धर्म, मातृभाषा आिण जात या पाच बाबी, प्रत्येक व्यक्तीला जन्मताच मिळतात. यातील पहिल्या तीन बाबी, म्हणजे,नाव, आडनाव आिण धमर्, ती व्यक्ती मोठी झाल्यावर आवडतातच असे नाही. त्यामुळे त्या आवडीनुसार बदलून घेण्याचा हक्क आपण त्यांना दिलाच पाहिजे.
चीफ इंजिनियरने वयाची पन्नाशी ओलांडली होती. पंचवीस वर्षांपेक्षा जास्त सर्व्हिस झाल्यामुळे, मुंबईत तीन कोटी पर्यंतचे दोन फ्लॅट्स, बी एम डब्लू, नोकर चाकर, मुच्यूअल फंडस्, मोक्याच्या ठिकाणी घेतलेले वाणिज्यिक गाळे त्यातून मिळणारे लाखो रुपयांचे भाडे अशी करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे त्याच्याकडून नेहमी वर्णन ऐकायला मिळायचे.
नमस्कार. मी या शहरातील अत्यंत रहदारीच्या रस्त्यांनी घेरलेल्या प्रमुख चौकातील एक पुतळा. जिवंत असताना या देशातील जनतेच्या म्हणण्यानुसार मी खरंच महापुरुष होतो की नाही हे मला माहित नाही, पण आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दीनदुबळ्यांना त्यांच्या अमानवीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो. या कामाचा अवाका इतका मोठा होता की, मी जिवंत असेपर्यंत हे काम संपू शकण्यासारखं नव्हतं. माझ्या मृत्यूनंतर अनेकांना 'महापुरुष' होण्याची घाई झाल्यामुळे माझ्या जिवंत विचारांऐवजी माझे निश्चल पुतळे जागोजागी उभारणेच त्यांना जास्त सोईस्कर वाटले. माझ्या विचारांशी असलेल्या तथाकथित बांधिलकीची मोठ्या प्रमाणात जाहिरात करून अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या नावांनी राजकारणाची दुकानं थाटली. अनेक दुकानं म्हणजे जीवघेणी स्पर्धा आलीच व जीवघेणी स्पर्धा म्हणजे एकमेकाचे गळे कापणं हेही ओघाने आलंच!
माझ्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अनेक वर्षांमध्ये इकडे एकदाही फिरकण्याची इच्छा न झालेले एक नेताजी अपरात्री माझ्या दिशेने येताना दिसले आणि त्यांची माझ्यावरील निष्ठा बघून मला अक्षरश: गहिवरून आले. पण ते माझ्याजवळ पोहोचताच ती 'निष्ठा' नसून 'विष्ठा' आहे हे बघून मी हादरून गेलो. माझ्या काही लक्षात येण्याच्या आतच नेताजींनी त्यांच्या हातातील विष्ठेने माझा चेहरा माखून टाकला व क्षणार्धात ते अंधारात दिसेनासे झाले. पहाटे तरतरीत चेहऱ्याने मॉर्निंग वॉकला निघालेले 'तेच' नेताजी माझ्या पुतळ्याची अवस्था बघून प्रचंड संतापले आणि बघता बघता त्यांच्या कार्यकर्त्यांचा जमाव माझ्याभोवती जमला. माझ्या विचारांशी बांधिलकी सांगणाऱ्या दुसऱ्या एका नेत्याचे हे दुष्कृत्य आहे अशी बातमी अगदी सुनियोजितपणे पूर्ण शहरात पसरविण्यात आली व अनेक निष्पाप नागरिकांचे जीव घेणारी दंगल पद्धतशीरपणे भडकवून मला विष्ठा फासणारे नेताजी अतीव समाधानाने त्यांच्या आलिशान बंगल्याच्या हिरवळीवर महागड्या व्हिस्कीचे घुटके घेत पुढील राजकीय डावपेचांची आखणी करण्यात गर्क झाले!
माझ्या पुतळ्यावरून झालेली पहिलीच दंगल ही परकीयांसाठी एक सुवर्णसंधी ठरली. अनेकांचे नाहक जीव घेणारी व असंख्यांचे संसार एका दिवसात उद्ध्वस्त करणारी ती दंगल शांत झाल्यानंतर एक दिवस माझी नजर माझ्या चौथऱ्याकडे गेली तर मध्यरात्री तिथे दोन परदेशी नागरिक गंभीर चर्चा करीत बसले होते. त्यांच्या हातात आपल्या देशातील पुतळ्यांच्या लांबलचक याद्या होत्या. पुतळ्यांच्या नावांसमोर त्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्यांचा तपशील लिहिला होता. कोणत्या पुतळ्याला केव्हा मानवीय विष्ठा, शेण किवा डांबर फासायचे, कोणत्या पुतळ्यांच्या गळ्यात चपला व जोड्यांचे हार घालायचे याची योजना तयार करण्यात ते गर्क झाले होते. चर्चेच्या शेवटी एक दुसऱ्याला अत्यानंदाने म्हणाला, ''या पुतळ्यांमुळे आपलं काम किती सोपं झालं. स्वार्थाच्या पोळ्या शेकण्यासाठी महापुरुषांच्या पुतळ्यांचा वापर अत्यंत निर्लज्जपणे जोपर्यंत होत राहील तोपर्यंत या देशात मनसोत्त* धुमाकूळ घालण्यास आपल्याला भरपूर संधी उपलब्ध आहे!''
परकीयांनी आमच्या वागण्याचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला आहे म्हणूनच अगदी क्षुल्लक कारणावरून ते आमच्या देशात मोठ्या दंगली भडकवू शकतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ न निष्पाप नागरिकांना भडकवणारे स्थानिक नेते हे तर त्यांचे बिनीचे सरदारच! मी अंतर्मुख झालो असतानाच जीव वाचविण्यासाठी रस्त्यावर सैरावैरा पळणाऱ्यांना बघून आश्चर्यचकित झालो. एका नेत्याचे पोस्टर दुसऱ्या नेत्याने फ ाडल्यामुळे शहरात प्रचंड दंगल उसळली होती. त्या गदारोळात ते दोन परकीय नागरिक अचानक माझ्या दृष्टीस पडले. विलक्षण आनंदाने एक दुसऱ्याला टाळी देत म्हणाला, ''काल पुतळा, तर आज पोस्टर, तर उद्या आणखी काही. या देशात वर्षानुवर्षे हे असंच चालत राहणार!''
-- श्रीकांत पोहनकर, पुणे
98226 98100
बालपणापासून घराण्याचे उत्तम संस्कार. शरीर मनावर पडत गेले. त्याच प्रमाणे आयुष्याची वाढ होऊ लागली. सर्व कांहीं आदर्शवत, सुसंस्कारीत, तत्वज्ञानाने भरलेले होते. …..
‘नटसम्राट’ हा चित्रपट नक्की कुणाचा? तो फक्त विश्वनाथ दिनकर पाटेकर (वि.दि.पाटेकर) म्हणजेच नाना पाटेकर यांचाच? कारण जाहीरातीमध्ये तर त्यांचाच चेहेरा दिसतो? पण चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते की हा चित्रपट फक्त वि.दि.पा. म्हणजेच नाना पाटेकरांचाच नाही तर अनेकांचा आहे.
हा चित्रपट विक्रम गोखले यांचा पण आहे. तसे पाहीले तर विक्रम गोखले यांची भूमीका तशी दुय्यम आहे. नानाच्या तुलनेने त्यांना मिळालेले ‘फुटेज’ बरेच कमी आहे. पण एका दुय्यम भूमिकेचे सुद्धा कसे ‘सोने’ करता येते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे. ‘नटसम्राट’ हा खरे म्हणजे नाना पाटेकर व विक्रम गोखले या दोन ‘नटसम्राटां’च्या अभीनयाची जुगलबंदी आहे. यात कमी फूटेज मिळालेले विक्रम गोखले नाना एव्हडाच ‘भाव’ खाऊन जातात. एखाद्या भूमिकेचे सोने करणे हे त्या भूमिकेला मिळालेल्या ‘फूटेज’ वर अवलंबून नसते तर अभिनेत्याच्या अभिनय कौशल्यावर अवलंबून असते हे विक्रम गोखले यांनी दाखवून दिले आहे.
नटसम्राट हा चित्रपट मेधा मांजरेकर यांचा आहे. यापूर्वी त्यांनी कोणत्या चित्रपटात काम केले आहे किंवा नाही हे माहीत नाही. तसेच नानांच्यापेक्षा त्या तरुण आहेत. नानासारख्या कसलेल्या अभिनेत्यापूढे ठामपणे उभे रहाणे हेच एक आव्हान असते. असे असुनही त्यांनी उभी केलेली ‘नटसम्राटांची पत्नि’ ‘सरकार’ लाजबाब. वरून शांत दिसणारी पण आतून अत्यंत कणखर असणारी ‘सरकार’ त्यांनी अत्यंत ताकतीने उभी केली आहे.
नटसम्राट हा ‘नटसम्राटांच्या’ सुनेची भूमिका करणार्या नेहा पेंडसे व त्यांच्या मुलीची भूमिका करणार्याा मृण्मयी देशपांडे यांचा पण आहे. सासर्यां च्या उद्योगांना कंटाळून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार्याृ सुनबाई तर वडिलांवर चोरीचा आळ घेऊन त्यांना बदनाम करु पहाणारी मुलगी या भूमिका या दोन अभिनेत्रींनी ज्या दाकदीने उभ्या केल्या आहेत त्याला तोड नाही.
हा सिनेमा यामध्ये छोट्या छोट्या भूमिका करणार्याा अनेक आर्टिस्टचा आहे. नटसम्राटांना वडापाव खायला घालणारी म्हातारी मुसलमान बाई, त्यांना सावलीसारखी साथ देणारा दाढीवाला एनआरआय, शेवटी शेवटी त्यांना साथ देणारा दारुड्या तरूण, तर लंडन रिटर्न्ड तरुणाच्या छोट्या भूमिकेत वावणारे जेतेन्द्र जोशी, तर नटसम्राटांची नात झालेली छोटी चिमुरडी, या सगळ्यांचीच कामे अप्रतीम. हा त्यांचा पण सिनेमा आहे.
या सिनेमाचे संवाद हा प्राण आहे. याचे संवाद लेखन किरण यज्ञोपवीत व अभिजीत देशपांडे यांचे आहे. हा सिनेमा खरे म्हणजे त्यांचा तर आहेच पण या चित्रपटाची उत्कृष्ट फोटोग्राफी करणार्याा अजिथ रेड्डी यांचा पण आहे. ‘लास्ट पण नॉट द लिस्ट’ हा चित्रपट या सर्वांची सुरेख गुंफण करणारे याचे दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर (म.वा.मां.) यांचा तर आहेच आहे.
या चित्रपटाची ‘थिम’ तशी काही नवीन नाही. एक बाप निवृत्तीनंतर आपली सर्व संपत्ती मुलाबाळांना वाटून टाकतो व पुढे मुले त्याला कशी बेघर कराता व त्याला ‘कोणी घर देता का घर’ अशी भीक मागत रस्त्यावरून फिरावे लागते अशी एका ओळीत या सिनेमाची स्टोरी सांगात येईल. याच थिमवर पुर्वी अमिताभ बच्चन व हेमा मालिनी यांचा ‘बागबान’ हा चित्रपट आला होता व तुफान गाजला होता. अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये हमखास डोळ्यातून आश्रु हे येतातच येतात. मग ‘नटसम्राट’ मध्ये वेगळे काय आहे? हा चित्रपट ‘डोळ्यात आंसु आणि ओठांवर हसू’ या कॅटेगरीतला आहे. असे चित्रपट काढणे फार कठीण असते. पूर्वी चार्ली चॅपलिन व राज कपूर यांना ही कला जमली होती. हाच करिष्मा राजा परांजपे यांनी त्यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात दाखवला होता. राजा परांजपे, ग.दि.माडगूळकर व सुधीर फडके यांच्या मुशितून निर्माण झालेली ही अजरामर कलाकृती आहे. त्यानंतर कुठलाच मराठी चित्रपट याच्या तोडीस पोचु शकला नाही. पण ‘नटसम्राट’ ने मात्र ही पातळी आवश्य गाठली आहे. पण तो ‘जगाच्या पाठीवर’ च्या पूढे मात्र गेलेला नसला तरी ही पातळी गाठणे हे ही नसे थोडके.
‘नटसम्राटांच्या’ भाषेत बोलायचे तर हा चित्रपट म्हणजे उत्तम भट्टी जमलेली, डोळ्यात आसू व ओठांवर हसू आणणारी, विलक्षण झींग आणणारी जांभळाची दारू आहे.
आता ही दारू प्यायची की नाही, म्हणजेच हा चित्रपट बघायचा की नाही जे ज्याचे त्याने ठरवावे.
(मी नाना पाटेकरांचा उल्लेख वि.दि.पाटेकर असा केला आहे या बद्दल क्षमस्व. जर चित्रपटाचा देग्दर्शक आपले नाव महेश वामन मांजरेकर असे जाहीर करतो मग नाना पाटेकरांचा उल्लेख विश्वनाथ दिनकर पाटेकर किंवा वि.दि.पा. असा करावयास काय हरकत आहे? असो)
-- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
सचिन नावाच्या गारुड्याची मोहिनी आम्हा भारतीयांच्या मनावर निरंतर राहणार आहे. आणखी शंभर वर्षांनी कोणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही की २१ व्या शतकात सचिन रमेश तेंडूलकर नावाचे वादळ भारतीय क्रिकेट विश्वात घोंगावले होते…………कारण शतकातून एखादाच असा शतकवीर सचिन जन्माला येतो.
जगाच्या संदर्भात इस्लाम ची प्रतिमा, स्वरूप आणि आक्रमक राजकारण हे नेहमीच चर्चेचे, कुतुहलाचे आणि संदेहाचे विषय राहिले आहेत. इराण, स्पेन, इराक, इजिप्त आदी देशांचे इस्लाममुळे सांस्कृतिक, धार्मिक आणि कट्टरवादी राष्ट्रात रूपांतर झाले हा इतिहास आहे.
इस्लामी जगाची चित्रे
श्री. ज. द. जोगळेकर
नचिकेत प्रकाशन, नागपूर
ISBN : 978-93-80232-53-9,
मूल्य : रू.२२०/- फक्त
संकटे एकामागून एक पाठोपाठ देशावर चालून येत आहेत. करोनापासून ते लडाखचा चिघळलेला प्रश्न, व आर्थिक मंदी या सर्वांवर मात करण्याची वेळ आज भारताकडे चालून आलेली आहे. देशापुढे आव्हानं तर आहेतच पण आपला इतिहासही तितकाच उज्वल आहे. त्यातीलच घडलेली ही एक सत्य घटना.
हे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.
Copyright © 2025 | Marathisrushti