(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • जानेवारी तीस नंतर….

    श्री वसंत चिंचाळकर हे नाव ललित लेखनाच्या वाचकांना सुपरिचित आहे. निरनिराळ्या वृत्तपत्रांमधून, मासिकांमधून प्रसिद्ध होणारे त्यांचे लेखन हे चोखंदळ वाचकांच्या पसंतीस उतरलेले आहे. समाजातील स्थित्यंतरांचा त्रयस्थपणे वेध घेणारी पत्रकाराची नजर, मूल्यांच्या होत जाणार्‍या र्‍हासामुळे तळमळणारे संवेदनशील मन आणि या दोहोंची यथार्थ सांगड घालणारी बुद्धी यांचा त्रिवेणी संगम चिंचाळकरांच्या या कथांमधून वाचकाला दृष्टीस पडतो.

    जानेवारी ३० नंतर….

    लेखक – वसंत चिंचाळकर

    पाने – १६० ; किंमत- रु. १७५

    नचिकेत प्रकाशन

    ऑनलाईन खरेदी करा

  • “जोखीम”

    आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.

  • तो ताठ मानेने गेला म्हणून

    क्रिकेटच्या मैदानात किंवा मैदानाबाहेर क्रिकेटबाह्य कारणांसाठी गाजलेल्या खेळाडूंची संख्या काही कमी नाही.
    एक दिवसीय सामन्यात न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सहा धावा हव्या असताना,कर्णधार व आपला वडीलभाऊ ग्रेग चॅपलच्या आदेशावरुन (मी माझ्या दिड वर्षाच्या नातवाला टाकतो तसा) ट्रॅव्हर चॅपलने फलंदाजाला सरपटी चेंडू टाकला होता.

  • बळीराजाचे वैकुंठधाम

    नमस्कार मंडळी. जगातील सर्वात मोठ्या बळीराजाच्या वैकुंठधामात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या देशाच्या महाराष्ट्र नावाच्या राज्यातील हा भाग एकेकाळी विदर्भ व मराठवाडा या नावांनी ओळखला जात असे. पण आता शेतकऱ्यांच्या या स्मशानभूमीला जगभरात प्रसिध्दी मिळाल्यामुळे विदर्भ व मराठवाडा ही नावं इतिहासजमा झाली आहेत आणि हे जगाच्या नकाशावरील एक महत्त्वाचं पर्यटनस्थळ झालं आहे. पाचशे एकरात पसरलेल्या या अवाढव्य स्मशानभूमीचं आमच्या देशातील लोकांना काहीही कौतुक वाटत नाही कारण बहुसंख्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांची अशी लहान-मोठी स्मशानं उभी राहात आहेत !

    बळीराजाच्या या वैकुंठधामाला आवर्जून भेट देण्यासाठी अनेक देशांमधून आलेल्या आपल्यासारख्या पर्यटकांना सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. माझं नाव राम. मी या स्मशानातच राहतो. माझ्या घरासमोर ज्या दोन कबरी आपण बघत आहात त्या आहेत माझ्या आई-वडिलांच्या. दोघेही शेतकरी होते. वडिलांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आईला तो धक्का सहन न झाल्यामुळे तिनेही लवकरच या जगाचा निरोप घेतला आणि शिक्षण नाही, खिशात फुटकी कवडी नाही अशा अवस्थेत वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी मी पोरका झालो. आईला मूठमाती देण्यासाठी या स्मशानात आल्यानंतर घरी परत न जाता अंत्यसंस्कारासाठी लाकडं पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडे पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट उपसू लागलो. या दोन कबरी बघून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आत्महत्या करण्याआधी बाबांनी माझ्या आईसाठी एक पत्र लिहून शेवटची इच्छा व्यक्त केली होती की पूर्ण आयुष्य ज्या मातीने मला साथ दिली त्याच मातीला माझा मृतदेह अर्पण करा. या जगाचा निरोप घेतल्यानंतरही माझ्या आईला बाबांची साथ सोडायची नसल्यामुळे तिलाही बाबांच्या शेजारीच माती देण्यात आली. लाकडं विकणाऱ्या ज्या कंत्राटदाराकडे मी अनेक वर्षे काम केलं त्याचं वार्धक्याने निधन झाल्यानंतर मी कंत्राटदार झालो आणि विदर्भातल्या एका शेतकऱ्याचा हा मुलगा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चिता रचण्यासाठी लाकडं विकून भरपूर पैसे कमवू लागला !

    देशोदेशीच्या पर्यटकांनो, माझी थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर आता आपण या जगप्रसिध्द स्मशानभूमीची ओळख करून घेऊया. काल रात्री उशिरा ज्या शेतकऱ्याला अग्नी देण्यात आला त्याची ही चिता. अजूनही तिच्यातून धूर निघतो आहे. पंधरा दिवसांपासून रणरणत्या उन्हात तो तूर विकण्यासाठी बाजार समितीच्या आवारात ठाण मांडून बसला होता. पैशाअभावी त्याच्या तरुण मुलीचं लग्न खोळंबलं होतं. अखेर उन्हाच्या तडाख्याने व मानसिक तणावाने तो कोसळला आणि या वैकुंठधामाकडे त्याची वाटचाल सुरु झाली. या शेतकऱ्याने ज्याला मतदान केलं होतं तो नेता मंत्री झाला व ऐन तारुण्यात जग सोडून जाणाऱ्या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही न बघता अभ्यास दौऱ्याच्या बुरख्याआड ऐश करण्यासाठी परदेशवारीवर रवाना झाला. मृत्यूच्या खाईत ढकलल्या गेलेल्या निष्पाप शेतकऱ्यांच्या मुलांनी हातात शस्त्रे घेऊन पराकोटीच्या स्वार्थी, भ्रष्टाचारी, मग्रूर व बेमुर्वतखोर नेत्यांना एक दिवस याच स्मशानभूमीत रवाना केलं तर मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही !

    या स्मशानभूमीत सर्वांचा धर्म व सर्वांची जात एकच असते जिचं नाव आहे ‘शेतकरी’. कोणाची चिता रचली जाते तर कोणाचा देह मातीच्या स्वाधीन केला जातो. पर्यटकांनो, ही कबर बघा. या मातीच्या ढिगाखाली एक तरुण शेतकरी चिरनिद्रा घेतो आहे. केवळ एक लाखाचं कर्ज फेडता न आल्यामुळे निष्ठूर सावकाराच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केली. त्याच्या धक्कादायक मृत्यूने सैरभैर झालेली त्याची तरुण बायको कडेवर कोवळं मूल घेऊन वेळीअवेळी इथे येते व कबरीवर डोकं टेकवून धाय मोकलून रडते. काळीज चिरून टाकणारं ते दृश्य मला माझ्या घरातून दिसतं, तिचा टाहो कानावर पडतो आणि मला माझ्या आई-बाबांची तीव्रतेने आठवण येते. त्या दोघांचा जीव वाचविण्यासाठी मी काहीही करू शकलो नाही.

    केवळ दोनच शेतकऱ्यांची ओळख करून दिल्यानंतर तुम्ही सुन्न झालात आणि तुमच्या डोळ्यात अश्रू आलेत? या विस्तीर्ण स्मशानभूमीत आज हजारो व निकट भविष्यात लाखो शेतकऱ्यांची ओळख तुम्हाला करून घ्यायची आहे. आमच्या देशात सरकारजवळ मेट्रो, बुलेट ट्रेन, अवाढव्य स्मारकं, वेतन आयोग, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचं अत्यंत आलिशान आयुष्य, त्यांच्या परदेशवाऱ्या आणि अशा अनेक गोष्टींसाठी अब्जावधी रुपये आहेत, पण त्यांना जेवू घालणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मात्र आरक्षित आहे हे बळीराजाचं वैकुंठधाम ! डोळ्यात मगरीचे अश्रू आणून, शेतकऱ्यांची खिल्ली उडवून, खोटी आणि फसवी आश्वासने देऊन व भाकड यात्रा काढून देशोधडीला लावलेल्या दरिद्री शेतकऱ्यांची अनेक मुले आज नक्षलवादी बनण्यासाठी एका पायावर तयार आहेत आणि हे वैकुंठधाम शेतकऱ्यांऐवजी नेत्यांसाठी आरक्षित करणे हे त्यांचे एकमेव लक्ष आहे.

    पर्यटकांनो, यानंतर पुन्हा तुम्ही जगातील या सर्वात मोठ्या स्मशानभूमीला भेट देण्यासाठी इथे याल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांच्या कबरी व चिता दिसणार नाहीत. या देशातील शेतकरी मजेत असतील आणि सोन्याने मढविलेल्या कबरींनी सजलेल्या या स्मशानाच्या प्रवेशद्वारावर लिहिलं असेल ‘नेत्यांचे वैकुंठधाम’!

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • गृहनिर्माण संस्थेतील प्रस्ताव आणि ठराव याबाबत

    मागील लेखात आपण वाचले की, सभासदांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहण्यासाठी व्यवस्थापन समिती निवडली जाते. सभासदांचे प्रतिनिधी म्हणून निवडीन दिलेल्या समिती सदस्यांनी संस्थेच्या दैनंदिन कारभाराबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असतात. सदर निर्णय चर्चा व विचारविनिमय करून घेणे आवश्यक असते. आजच्या लेखात आपण प्रस्ताव आणि ठराव यातील बारकाव्याबाबत माहिती देण्यात आली आहे.सदर माहिती आपणास आवडल्यास इतरानाही पाठविल्यास त्यानाही माहिती होईल.

    प्रस्ताव (Proposal)

    सभेपुढे चर्चेसाठी/विचारार्थव निर्णयासाठी विधानांच्या स्वरुपात ठेवलेला विषय म्हणजे प्रस्ताव होय. प्रस्ताव हा सभेपुढे ठेवलेली सूचना होय. प्रस्तावाने चर्चेला सुरुवात होते. सभाध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात. प्रत्येक उपस्थित सभासदाला प्रस्तावावर चर्चा करण्याचा अधिकार असतो. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास तो ठराव म्हणून ओळखला जातो.प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीस ‘सूचक’ असे म्हणतात व प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस ‘अनुमोदक’ असे म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते. प्रस्ताव हा लेखी स्वरूपात असावा. प्रस्तावामध्ये अनेक दुरुस्त्या सुचविता येतात किंवा मतदानापूर्वी त्यात बदल करता येतो. प्रस्ताव सभेच्या परवानगीने मतदानापूर्वी मागेही घेता येतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत व कार्यक्रम पत्रिकेतील विषयांसंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा सभासदांवर व संस्थेवर बंधनकारक नसतो. प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदाच बोलता येते. पण, सूचकाला प्रस्ताव मांडताना आणि सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण दोन वेळा बोलता येते. प्रस्तावाच्या सहाय्याने सभेत ठराव मांडता येत असल्याने प्रस्ताव हे ठरावाचे साधन आहे.

    ठराव (Resolution)

    सभेने प्रस्तावावर चर्चा करून अंतिमरीत्या मान्य/मंजूर केलेला निर्णयम्हणजे ठराव होय. ठराव हा सभेचा कौल असतो. सभेने संमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा चर्चेचा/प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो. एकदा मंजुर केलेल्या ठरावावर कोणत्याही सभासदाला चर्चा व बदलही करता येत नाही. ठरावाचे दोन प्रकार आहेत.

    १) साधा ठराव

    २) निबंधकाकडे मंजुरीसाठी सादर करायचे विशेष ठराव. सहकारी संस्थेला पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर केले जातात व हे ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावे लागतात. निबंधकाच्या मंजुरीनंतरच परिसंस्थेच्या ठरावाची अंमलबजावणीकरता येते. ठराव हा सभेचा निर्णय असतो. सभेने मंजुर केलेला ठराव कोणत्याही परिस्थितीत मागे घेता येत नाही. प्रस्ताव मांडून ठराव पास करता येत असल्याने ठराव हे प्रस्तावाचे साध्य आहे. सभेतील ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनतो.

    -- अ‍ॅड. विशाल लांजेकर.

  • श्रीरामरक्षास्तोत्र

    .. ॐ श्रीगणेशाय नमः ..

    अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य . बुधकौशिक ऋषिः .

    श्रीसीतारामचंद्रो देवता . अनुष्टुप् छंदः .

    सीता शक्तिः . श्रीमद् हनुमान कीलकम् .

    श्रीरामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ..

  • भाव अंतरी उमलत होते…

    दत्ता डावजेकर यांच्या संगीतसाजाने नटलेलं हे गीत डोळ्यांत पाणी उभे करते. किंवा

    ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती

    परि जयाच्या दहन भूमीवर नाही चिरा, नाही पणती…‘

    त्याचप्रमाणे मनात राष्ट्रभक्तीची, मातृभूमीची, मायबोलीची ज्वाला तेजाने तळपत ठेवणारी गीते वेगळेच स्फुरण आणतात. अगदी वाचता क्षणी जीव

    ओवाळून टाकायचीही तयारी व्हावी, इतकं वजन त्या गाण्यांतून असे.

  • अधिष्ठान

    काढून टाका ताई ते चाफ्याचं झाड...पार वठून गेलंया !
    घरामागच्या मोकळ्या जागेत, वाढलेलं गवत काढायला आलेले वयस्कर काका म्हणाले.आता काय ते पुन्यांदा फुटणार नाही...उगाच बोडक्या अंगाने उभय झालं कवाधरनं!
    गेल्या येळेस तुमाला म्हणलो हुतो मी...ते काय पुन्यांदा फुटायचं नाही.

    उगा आळं आडवून ठेवलया. खिडकीतून बघणाऱ्या सासूबाई ऐकतच होत्या...अरे बाबा,तू गेल्या वर्षीपासून म्हणतोयस,आम्ही गेली चार पाच वर्षे झाली तिला सांगतोय...पण ऐकेल तर खरं!त्यांनी फणकाऱ्याने मला सुनावलंच.
    ते काढून दुसरं लावलं असतं तर एव्हांना फुलं येतं झाड झालं असतं.पण त्या वठलेल्या झाडाला पाणी घालणाऱ्यास न बोलणंच बरं.उगाच वाद होतात मग...त्या खिडकीपासून बाजूला होत बोलल्या.

    वठलंय काका ते झाड,मलाही दिसतंय...कळतंय...पण मुळापासून त्याला काढवत नाही...का कुणास ठाऊक...मला वाटतं ते कधीतरी परत नव्याने फुटणार...पांढरा चाफा नव्याने बहरणार...दादांनी (माझे सासरे) लावलय ते...मला चाफा आवडतो म्हणून!ते अचानक गेले अन् फुलं येतं झाड आपलेआप वठत गेलं.त्यांनीच लावलेले आंबा,जांभूळ जास्वंद, मोगरा जोमात वाढले फळं फुलं ही भरपूर आली/येतात...

    ते मला नेहमी म्हणायचे...आंबा जांभूळ काढशील तेंव्हा माझी आठवण काढ बरं...आजोबांनी झाड लावावं आणि मुला नातवंडांनी फळ चाखावीत!
    त्यांची आठवण मागच्या बागेत गेलं की येतेच...
    पण वठल्या चाफ्यावरुन हात फिरवताना एक उसासा निसटूनच जायचा...
    एखादा चाफा लावा दादा मागं! मला फार आवडतो.आणि माझ्या साध्या साध्या इच्छांचा सन्मान करणं,त्यांना जमूनच गेलं होतं.इतके दिवस दोन मुलांचा बाप होतो...आता एका मुलीचा पण बाप आहे मी...!असं म्हणत त्यांनी चाफ्याचे कलम आणून लावले होते.
    त्यांनी माझ्या स्त्रीत्वाचा सून,मुलगी,गृहलक्ष्मी म्हणून अनेक मार्गांनी सन्मानच केला.त्यातील एक सन्मान म्हणजे हा चाफा....
    साध्या सोप्या रंगगंधाचे ते पंचपाकळीचे फूल
    चार चार दिवस झाडावर टवटवीत राहतं.फारशा देखभालीची अपेक्षा न करता.उनपावसात एकलाच ,आपल्यातच मग्न चाफा...पानगळीत भग्नता ही अगदी सहज *सुखदुःखे समकृत्वा* च्या अविर्भावात पेलणारा चाफा,मला फार जवळचा वाटतो.
    तुला पुन्हा फुटायचंय...मी चाफ्याला मनोमन बजावायचे.ते चाफ्याचे झाड म्हणजे माझ्या हट्टीपणाची निशाणीच झाले जणू!
    जवळपास सात आठ वर्षे,माझ्या उंचीएवढा, तो एकदांडीचा भुंडा चाफा व्रतस्थ योग्यासारखा मोगऱ्याच्या शेजारी उभा होता.ना फांद्या ना पानं...फुलं तर लांबचीच गोष्ट...
    आणि...आणि... एक दिवस...मोगऱ्याची फुलं काढताना...
    त्या एकदांडीच्या टोकावर...हिरवट पांढुरकं बोंड फुटल्यासारखं जाणवलं....ओंजळीतली मोगऱ्याची फुलं मोगऱ्यावरच टाकून...मी चाफ्या जवळ गेले...अन् विश्वास बसणार नाही...पण अगदी नखाएवढं किरमिजी पालव त्या शेंड्यावरुन डोकावत होतं.माझ्या डोळ्यात पाणीच आलं...माझी आंतरिक इच्छा जाणणाऱ्या त्या चाफ्याच्या ओबडधोबड देहावरुन मी हात फिरवला, परत पानाफुलात बहर रे...!मी अजिजीने त्याच्यावर झुकले.जिथं इतक्या वर्षांची माझी इच्छा त्याला समजली तिथं हा स्पर्शही त्याच्या वठलेल्या देहमनास समजला असणार.फुटू लागलेल्या कोवळ्या पालवाचे बाल्य ते पान हा प्रवास मग हळूहळू घडतच गेला...अजूनही दोन चार पानं त्या वठल्या कुडीस फुटली. अन् थंडीची चाहूल लागली...शिशिराच्या पानगळीत आलेली पानं ही गळून गेली...!
    परत सडाफटिंग चाफा आपला एकला उभा! पण आशेचा एक किरण मनात उगवला...दोन तीन पानात फुटला म्हणजे पुन्हा नव्याने फुटणार...संपून गेलेल्या चैतन्यांत नव्याने जागे झालेले चैतन्य, मनाला फार गुंतवते.
    मग मात्र त्या चाफ्याच्या वर मी रोजच लक्ष ठेवून राहू लागले.फक्त इतर झाडांबरोबर घातलं गेलेलं पाणी आणि माझ्या मनात खोलवर असलेला चाफ्यावरचा विश्वास... इतक्या भांडवलावर...पाच सहा वर्षांनंतर चाफ्यात हळूहळू नवचैतन्य जागं झालं आणि पानं,फांद्या...चक्क फुलंसुद्धा वर्ष दीडवर्षात येऊ लागली.आताशी चाफा गच्च पानाफुलात बहरता असतो...

    हा चाफ्याचा वठणं ते बहरणं प्रवास म्हणजे मला माझा सन्मान च वाटतो....
    *तुमच्या इच्छा आकांक्षा,कर्मांना चांगल्या,निर्मळ हेतूंचे अधिष्ठान असेल तर...चराचरात कुठेतरी त्याची नोंद मग आपोआप होत असतेच...आणि कधीतरी इच्छापूर्ती देखील होऊन जाते.* फक्त अधिष्ठान सकारात्मक हवे...
    इतकंच...!

    -सौ विदुला जोगळेकर
    आम्ही साहित्यिक या फेसबुक वरुन...

  • माझी मराठी

    भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
    यानिमत्ताने महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्स यांनी एक लेख स्पर्धा आयोजित केली होती. लेखाचा विषय होता माझी मराठी. यासाठी मी लेख पाठवला होता लेख स्वीकारला गेला परंतु बक्षीस मिळाले नाही. ठीक आहे, तरी माझा हा लेख वाचून कसा वाटला याचा अभिप्राय द्या.

  • धनत्रयोदशी

    अश्विन कृष्ण त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हणतात. धर्मशास्त्रानुसार यमराजाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दीपदान केले जाते. या दिवशी घरातील अलंकार, सोने-नाणे स्वच्छ करतात.