(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अरबी समुद्रातील शिवस्मारक

    मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकारचे भुमीपुजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भुमीपुजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि आ. विनायकराव मेटे यांनी दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    आंतराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक गरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटरवर समुद्रात असलेल्या एका पाण्याखालच्या दगडावरील १५.८६ हेक्टरवर उभारले जाणार आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारला जाणार आहे. या चौथऱ्यासहित या स्मारकाची उंची २१० मीटर उंच असून पुतळा १२६ मीटर, तर फक्त चौथऱ्याची ८४ मीटरचा असणार आहे. एकूण ३६०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प साकारला जाणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात २५०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ ला पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. समुद्रातील या स्मारकासाठी तांित्रक समितीचीही स्थापना करण्यात आली असून ईजीआयएस या फ्रान्सच्या कंपनीद्वारे स्मारकाचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मा. मेटे यांनी दिली.

    शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचा भुमिपुजन सोहळा पार पडत असून त्यासाठी महाराजांचे वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नािशक, आग्रा, तंजावर आणि श्री शैलम या ठिकाणांवरून माती आणली जाणार आहे. यासह राज्यातील विविध नद्यांचे पाणी भुमीपूजनासाठी वापरले जाणार असल्याचेही मा. मेटे यांनी सांगितले. येत्या गुरूवारी (२२ डिसेंबर) या साऱ्या वस्तूंच्या कलशांचे मुंबईत आगमन होणार असून त्या कलशांचे भव्य स्वागत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच २३ डिसेंबराला हे सर्व कलश गेट आॅफ इंडीया येथे आणण्यात येतील. भुमिपुजनाच्या दिवशी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुपूर्द करणार असून त्यांच्या हस्ते या कलशातील माती, दगड आणि पाण्याने भुमीपूजन सोहळा पार पडेल.

    छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट असेल स्मारकाचे आकर्षण

    छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट हे या स्मारकाचे आकर्षण असणार आहे. थ्री डी आणि फोर डीच्या सहाय्याने शिवकालीन वातावरणाची निर्मिती करणारा एक लाईट व साऊंड शोही या ठिकाणी सादर केला जाणार आहे. याशिवाय दररोज दोनशे कलाकाराच्या माध्यमातून राज्यभिषेकाचा प्रसंगही सादर केला जाणार असून स्मारकाच्या ठिकाणी दोन जेटींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे. या शिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी उपहारगृह तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

    स्मारकाची वैशिष्ट्ये

    जलदुर्गाशी साध्यर्म असणारी दगडातील समुद्र तटबंदी.
    आई तुळजाभवानी मंदीर.
    कला संग्रहालय.
    ग्रंथ संग्रहालय.
    मत्स्यालय
    अॅम्पिथिएटर / हेलीपॅड.
    आॅडीटोरीअम.
    लाईट व साऊंड शो.
    विस्तीर्ण बाग बगीचे.
    रुग्णालय
    सुरक्षा रक्षक निवासस्थाने.
    आयमॅक्स सिनेमागृह.
    प्रकल्प स्थळ ठिकाणी २ जेट्टी.
    चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनासाठी सोय.
    पर्यटकांना प्रकल्प स्थळाकडे जाण्यासाठी गेट वे आॅफ इंडीया, नवी मुंबई व इतर ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था
    स्मारक ठिकाणी शिवकालिन वातावरण निर्मिती

  • गिरिजात्मक किर-किर (वात्रटिका)

    गिरिजात्मक किर-किर

    झोपडीत प्रतिभेचा स्पर्श नसतो

    गिरिजाताई किरकिरल्या आहेत.

    अध्यक्षीय लढाई अगोदरच

    उगीच वाकड्यात शिरल्या आहेत.

  • प्रादेशिक अस्मिता शिकायची आहे? उघडा डोळे बघा नीट, देवभूमी केरळ!

    केरळ ला निसर्गाने जे दिले आहे ते महाराष्ट्राला सुद्धा भरभरून दिले आहे. परंतु मराठी जनतेची आणि राज्यकर्त्यांची मानसिकता बदलत नाही. प्रादेशिक अस्मिता लोप पावल्यामुळे महाराष्ट्राची धर्मशाळा झाली आहे. मराठी भाषा आणि मराठी माणसाला महाराष्ट्राच्या राजधानीत आणि पुणे नाशिक, नागपूर सारख्या शहरात दैन्यावस्था आलेली आहे.

  • एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – १

    १)आयुष्यातील सगळी गणितं निव्वळ बेरीज,वजाबाकी,गुणाकार आणि भागाकार यांच्या मदतीने सुटत नाहीत वा उत्तराबद्दल ठाम भाकीत करता येत नाही.या गणिताचं संपूर्ण ज्ञान आणि भरपूर सराव काही हमखास उत्तरं मिळवण्याचा मार्ग नव्हे.शेवटी नियतीनं तिच्यापाशी राखून ठेवलेला एक हाच्चा सगळी गणितं सोडवीत असतो . आणि याच हाच्च्याचा ज्याला अर्थ कळला त्याला आयुष्यभर गणिताची भीती उरत नाही.--- गणित हा सरावाचा विषय आहे.एकदा विशिष्ट प्रकारच्या गणिताला सोडविण्याची रीत कळली नि तशी भरपूर गणित सोडविण्याचा सराव केला कि परीक्षेतील शंभर पैकी शंभर गुणांची बेजमी झालीच म्हणून समजा....पण आयुष्यातलं गणित हे कुणालाच न कळलेलं कोडं आहे....इथं काही भाग्यवंताना ते सुटलेले असते...पण ते इतरांना समजावून देण्यात त्यांना यश येईलचं याची शाश्वती नाही....किंबहुना ते त्यांना सुटलेले आहे याचा भास होत असावा....काही भाबड्याना या सुटलेल्या कोड्याची खबर होत नाही ...ते पुन्हा पुन्हा पाप – पुण्याचा ताळा करीत बसतात...प्रत्येकाला आपल्यापेक्षा शेजाऱ्याचे प्रश्न...कोडी सोपी वाटतात...शेजारच्या घरातील तोळाभर आनंदाचे ओझे त्याला स्वत:च्या मणभर दु:खापेक्षा जड होत असते...पूर्वी पावकी...निमकी..मुखोदगत असणाऱ्या जमान्यात स्वत:ची गणितं स्वत:च सोडविण्यास फार जिकिरी कधीच होत नव्हती...पण या कलियुगात ... जिथं आजची तारीख विचारली तर मनगटावरल्या घड्याळाला विचारलं जातं ... तिथं सगळ्याच सोप्या सोप्या पायऱ्यावर कुठल्या ना कुठल्या कुबड्यांची मदत अपरिहार्य ठरत आलीय...वास्तविक अशा परावलंबी वृत्तीने माणसाची प्रतिकारशक्ती...विचारशक्ती...नि स्व-गुण ...कौशल्य...ओळखायची...जोपासायची सवय लुप्त झाली आहे...कायम साखळदंडात बांधला गेलेल्या सर्कशीतील हत्तीला जसं साखळदंडातून मुक्त केलं तरी मुक्त होण्यासाठी त्याचा पाय उचलत नाही ...तसं आपलं होतं...शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित झाला पण सुसंस्कृत झाला असं म्हणायला काही जीभ रेटत नाही...कारण सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतपणा या दोन वेगळया गोष्टी आहेत...या दोन गोष्टींपैकी पहिल्या गोष्टीचा केवळ अभ्यासाशी नि दुसऱ्या गोष्टीचा नेक संवादाशी संबंध आहे .भूकेपुरते खाणे ही झाली प्रकृती....भुकेपेक्षा जादा खाणे ही झाली विकृती....नि स्वत:च्या चतकोर भाकरीतला नितकोर तुकडा कुणा भुकेल्या प्राण्यास देणे ही झाली संस्कृती...आणि ह्याच संस्कृतीचा वारसा आपल्या पिढ्यांनी चालवावा असं म्हणणे हीच नाही का माणसाची माणूस म्हणून ओळख

    १७.०४.२०१३

  • नागपूर जवळील वन्यजीव अभयारण्य सफारीचा अनुभव

    एक प्रवास वर्णन....नागपूर जवळील उमरेड कऱ्हान्डला वन्यजीव अभयारण्य सफारीचा हा एक अदिव्तीय प्रवास अनुभव....

    पुणे स्थित Insearch Outdoors आयोजित (८-१३ जून २०१६) ह्या वन्यजीव अभयारण्य सफारीला जायचा योग आला आणि धन्य झालो. माझ्या आयुष्यातील हा एक फारच आगळा वेगळा अनुभव म्हणावा लागेल. सर्वप्रथम ह्या सगळ्याचे श्रेय मी Insearch Outdoors संघाला देईन. अप्रतिम व्यवस्थापन, जबरदस्त नियोजन, उत्कृष्ट संघटन, वक्तशीरपणा, तसेच व्यावसाईक परंतु एकसंध कौटुंबिक जिव्हाळा असलेला तरुणाईचा हा संघ मला तर खूपच भावला. खास करून हे श्रेय शौरी सुलाखे आणि मयुरेश कुळकर्णी ह्यांना जाते. वय वर्ष ८ ते ८४ सगळे मिळून २३ जणांचे बांधलेले कडबोळे तर वाखाणण्याजोगेच म्हणावे लागेल. ह्या पोरांना असलेली जैवविविधतेची, प्राण्यांची, निसर्गाची आणि भौगोलिक माहिती तर तोंडांत बोटेच घालावयाला लावते. ही नुसती एक जंगल सफारी नसून आपल्या तुटपुंज्या ज्ञानात भरच टाकणारी एक कार्यशाळाच होती. माझ्या साठी तर हा आयुष्यातील वयाच्या ५३व्या वर्षी आलेला एक सुखद असा धक्काच होता. मी तर मंत्रमुग्धच झालो होतो.

    तसेच उमरेड येथील श्री. निशांत बरडे ह्यांच्या श्री साई शीतल विश्राम मध्ये केलेली निवास व जेवणाची व्यवस्था तर अगदी घरच्या सारखी होती. त्यांचे काळजी घेणारे कुटुंबीय तर कौतुकास पात्र आहेत. त्यांनी केलेला आमचा पाहुणचार (व्यावसाईक असूनही) अगदी घरच्या सारखा होता हे फारच विशेष आहे. असो.. वरील प्रस्तावनेनंतर मूळ मुद्द्या कडे येतो.

    मी आणि आमचे कुटुंब २०११ साली आयुष्यातील पहिल्या वहिल्या, केनिया येथील मसाई मारा ह्या जंगलातील सफारीला गेलो होतो, त्यानंतर वाटले की भारतातील जंगलामध्ये ही मजा येणारच नाही. परंतु माझा हा एक भ्रमच होता असे मला उमरेडला जाऊन आल्यानंतर वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबांबरोबर अशा सहलीला जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव आणि तो ही इतका अविस्मरणीय आहे की मी तर आता ठरवलेच आहे की सहलीला अथवा सफारीला जायचे असेल तर Insearch Outdoors बरोबरच जायचे.

    गरीब रथ ह्या रेल्वेने ८ जूनला संध्याकाळी पुण्यातून प्रवास सुरु झाला. सगळ्यांशी ओळखी होत होत सर्व सामान लावून मस्त पैकी गप्पा मारत मारत घरून नेलेल्या जेवणाचा आनंद घेत ९ तारखेला सकाळी १० वाजता नागपूरला कधी पोचलो हेच कळले नाही. तेथून नाष्टा करून उमरेडच्या प्रवासाला बसने सुरवात केली. वातानुकुलीत रेल्वेतून वातानुकुलीत बस मध्ये बसलो. येथपर्यंत ठीक होते. जेंव्हा उमरेडला उतरलो तेंव्हा एकदम नागपूरच्या वातावरणाची झलक मिळाली आणि साधारण विदर्भी उन्हाच्या तडक्याचा अंदाज आला. पोहचल्यावर काही वेळात जेवण करून लगेचच पहिल्या सफारीला जंगलामध्ये निघालो. चार जिप्सी मध्ये आम्ही २३ जण विभागलो गेलो (एका जिप्सी मध्ये सहा) आणि जी काही धमाल आली ती तर सांगणेच कठीण आहे. आहो वाघ राहिला लांबच, वरून सूर्यदेव तळपत होते आणि आम्ही उघड्या जिप्सी मध्ये जीव मुठीत घेऊन बसलो होतो. साथारण निवासस्थान ते जंगल हा १५ किलोमीटरचा प्रवास दुपारच्या २.३० च्या नागपूरच्या तळपत्या उन्हात तो ही उघड्या जिप्सी मध्ये म्हणजे आमची फाटलीच होती असे म्हणायला हरकत नाही. पण जेंव्हा कऱ्हान्डला जंगलाच्या दरवाज्याशी पोचलो तेंव्हा एक वेगळीच उर्जा शरीरात निर्माण झाली. तेथील एकंदरीत वातावरण व जवळ जवळ अजून २५ जिप्सी पाहून तर हुरुपच आला आम्हांला. चला आता वाघ बघायचे आहेत असे म्हणून सोबत आणलेल्या थंड पाण्याच्या अर्धी बाटली संपवली व कानाला पंचा बांधून तयार होऊन बसलो. ३.३०ला जंगलाचा दरवाजा उघडला आणि एक एक करून सर्व २५ जिप्सी आत जायला निघाल्या. पण आपल्याला संयम असतो का.. तर नाही. १५ – २० मिनिटे झाली जिप्सीत बसून पण एकही वाघ दिसला नाही. झाले आमची म्हणजे माझी कटकट सुरु झाली. बायको, मुलगी, मुलीच्या सासू बाई तर माझ्या मुक्ताफलांमुळे वैतागून गेले होते. मी मला माझ्या जावयाने व मुलीने (रेल्वेच्या प्रवासात) भेट म्हणून दिलेला फोटो काढण्याचे यंत्र (कॅमेरा) सरसावून बसलो होतो पण वाघ काही दिसत नव्हता. इतर प्राणी, चितळ, नीलगाय, माकडे, सरडे, खूप सारे पक्षी, गवे, घोरपड दिसत होते पण वाघोबा गायब होते. थोडासा वैतागलोच होतो.. ते बघा ते बघा असे सगळेजण एकमेकांना सांगत होते. मी म्हणालो पक्षी का प्राणी हे जरा मला समजून सांगा, म्हणजे मला फोटो काढण्यासाठी तसे तयार राहायला. आमचा गाईड जिप्सीतून वाघाला शोधत होता. आता इकडे गेला असेल, त्या पाणवठ्यावर असेल, येईलच लवकरच पाण्यावर वगैरे वगैरे.. पण वाघोबा काही दर्शन द्यायला तयार नव्हते. आम्ही साधारण ४०-५० किलोमीटर जंगल पालथे घातले पण पालथ्या घड्यावर पाणीच पडले. हा दिवस आमचा नव्हताच. संध्याकाळी ७ वाजता परत जंगलाच्या मुख्य दाराशी आमची जिप्सी अयशस्वी होऊन आली. सगळे एकमेकांना विचारायला लागले.. सगळ्याचा वाघाने पोपट केलेला होता हे समजल्यावर मी जरा शांत झालो. परत निवासस्थानी उघड्या जिप्सीतून आलो व वऱ्हाडी जेवणावर ताव मारून झोपायच्या तयारीला लागलो. तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने येऊन सांगितले की उद्या पहाटे ३.०० ला सगळ्यांनी तयार राहायचे आहे. आपली उद्याची पहिली सफारी पहाटे ४ वाजता आहे. झाले. माझे तर अवसानच गळाले होते. पण मानसिक तयारी करून झोपायचा प्रयत्न केला व १२.०० वाजता झोपलो.

    दुसऱ्यादिवशी पहाटे आमची फौज पहाटे ३.३० ला पुन्हा एकदा जंगलाच्या दिशेने उघड्या जीप्शीतून मार्गस्थ झाली. पहाटेचा गार वारा त्यात उघडी जिप्सी. साला मना मध्ये एक विचार आला की हा वाघ ही मंडळी इकडे निवासस्थानीच का आणत नाहीत उगाच एवढ्या पहाटे उठून त्याला कशाला बघायला जायचे.. बायकोला म्हणालो अग तुझ्यासाठी सुद्धा मी एवढा फिरलो नाही किंव्हा तुझीसुद्धा एवढी प्रतीक्षा केली नाही मी कधी. हा वाघ कोण लागून गेला. असे काहीतरी मुक्त संवाद चालू होते माझे.. अर्थात जीप्सितच.. तेवढ्यात मयुरेशची जिप्सी आम्हांला दिसली आणि त्याने सांगितले की त्यांना वाघ दिसला.. नुसता दिसला नाही तर जवळ जवळ ४५ मिनिटे तो त्यांच्या जिप्सीच्या पुढे चालत होता.. त्याने रस्त्यात शू केली, शी पण केली, झाडावर ओरखडे मारले, स्वतःच्या धुंधीत हा जंगलाचा राजा चालत होता. आमच्या चार जिप्सी पैकी दोन जिप्सींना हा सगळा सोहळा चित्रित करण्याची संधी मिळाली व त्यांचा आनंद गगनात मावेना असा होता. चला आमच्या पैकी निम्म्या लोकांना वाघाने दर्शन दिले ह्या विचाराने आम्ही आमच्या जिप्सीवाल्याला गाडी दामटायला सांगितले व एक झलक तरी मिळते आहे हे पाहायला वळलो. पण त्याने आमचा परत एकदा पोपट केला होता. पण आम्ही थोडे खुश थोडे नाराज असे परतीच्या प्रवासाला लागलो. वर लिहिल्या प्रमाणे ८ वाजता निवासस्थानी परत आलो थोडेसे आवरून जेवणा साठी तयार झालो व तेवढ्यात शौरी आणि मयुरेशने दुपारच्या सफारीसाठी ३.०० वाजता निघायचे आहे अशी वर्दी दिली. सगळे पट पट जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांतीसाठी जावून विसावलो.

    दुपारी परत तोच उघड्या जिप्सीतून रणरणत्या उन्हात प्रवास.. एक वेगळाच आनंद आणि आता तरी वाघ दर्शन देणार ह्या आशेने तयार होऊन निघालो. ह्या सफारीलाही आपला पोपट होऊ नये अशी आशा करत जंगलाच्या वाटा तुडवीत आमची जिप्सी धुराळा उडवीत वाघाला शोधात फिरत होती. ३.३० ते ६.१५ वाजेपर्यंत साधी झलकही दाखवली नाही पठ्ठ्याने. अगदी दिग्मुड होऊन परत निघालो. काही जिप्सी दुसऱ्या दिशेला शोधात होत्या तर काही अजून इकडे तिकडे आशेवर फिरत होत्या. जंगलाच्या नियमानुसार फक्त शेवटची १५ मिनिटेच राहिली होती आणि तेवढ्यात आमच्या पुढील ५०० मीटर लांब असलेल्या जिप्सीला एका ओढ्यात झोपलेली एक वाघीण दिसली आणि आमच्या जिप्सी वाल्याने लगेच गाडी दामटून त्या ओढ्याशी नेली व आम्हांला त्या वाघिणीचे दर्शन घडवले. एकदाचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. जो तो फोटो काढण्यात गुंग होता. ती वाघीण (चांदी/बरखा) शांतपणे ओढ्यात पहुडली होती आणि तुच्छतेने आमच्या कडे हे कोण वेडे आलेत म्हणून पाहत होती. (ह्या जंगलात प्रत्यक वाघाला नाव दिले आहे. तेवढ्यात जवळ जवळ १०-१५ जिप्सी तेथे येऊन धडकल्या आणि प्रेतेकाला त्या वाघिणीचे फोटो काढण्याची एक स्पर्धाच मला जगलात अनुभवायला मिळाली. लोक ओरडत होते, भांडत होते. सगळे नियम धाब्यावर बसवून जेवढे शक्य होईल तेवढे त्या वाघीणीस त्रास होईल असेच वागत होते. पण करणार काय येथे आलेला प्रत्यके प्रवासी हा फक्त वाघ बघायला आला असल्यामुळे कोणाचेच कोणाशी काहीच चालत नव्हते. पण एकदाचा एक तरी वाघ दिसला ह्या आनंदात आम्हीं वेळ संपत आली म्हणून मुख्य प्रवेश द्वाराच्या दिशेने वाटचाल करायला सुरवात केली होती. एकंदरीच मजाच आली होती. काळवंडलेले सगळे चेहरे वाघ दिसल्यामुळे थोडेसे उजळले होते एवढेच. परत निवासस्थानी ८ वाजता पोचलो. दमलेले काहीजण जेवण करून झोपायच्या तयारीला लागले होते आणि काहीजणांनी म्हणजे परुष लोकांनी गप्पांची मैफिल रंगवली होती.

    इतक्यात शौरी आणि मयुरेशने सागितले की उद्या पहाटे दोन जिप्सी ३० किलोमीटर लांब असलेल्या गोठणगावं जगलात पहाटे जाणार आहोत व दोन जिप्सी दुपारी जाणार आहते. जे सकाळी गोठणगावंला जाणार नाहीत ते जवळच एका जंगलात पक्षी दर्शनाला जाणार आहेत. आमचा नंबर पहाटेचा होता त्यामुळे गपचूप गप्पांची मैफिल उरकती घेवून जेवण करून झोपयला गेलो.

    भल्या पहाटे म्हणजे २.३० वाजता उठून ३.१५ ला ३० किलोमीटर उघड्या जिप्सीतून प्रवास करून आम्ही गोठणगावं जंगलात पोह्चोलो. हा अनुभव गोठवनाराच होता पण जंगल वेगळे असल्यामुळे व येथे वाघ दिसण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे आशावादी होतो. सफारी सुरु झाली. जंगल खूपच छान होते. गाईड मुलगी होती. पण वाघ साहेब आजही आमच्यावर नाराज होते. घूम घूम घुमवले पण साहेबांनी काही आम्हांला दर्शन नाही दिले. काही लोकांना मिळाले पण साले आमचे नशीबच जरा गांडू होते. पण एक मात्र चांगले होते की बाकीचे प्राणी मात्र अगदी जवळून पाहता आले. पक्षी तर फारच छान होते. माकडांनी तर त्यांच्या माकडचेष्टांनी आमची खूपच करमणूक केली होती. कोणीतरी सांगितले की काल मयुरेशला दिसलेला श्रीनिवास नावाचा वाघ आज ह्या जंगला मध्ये आलेला आहे व त्याने काही जिप्सींना दर्शन दिले आहे तसेच T६ नावाची वाघीण सुध्दा दिसली आहे. आम्हांलाच दिसली नव्हती. असो. पण मला एकंदरीत सर्व सफारी मध्ये जी काही मजा आणि अनुभव येत होता तो अफलातून असाच होता. वाघ दिसणे न दिसणे हे नशिबाचा भाग समजून मी संपूर्ण सफारीचा मनमुराद आनंद लुटत होतो. खरोखर मी ह्या सगळ्या वातावरणात रंगून गेलो होतो आणि माझ्यातील कवीला साद घालत होतो...आणि सुचले की अंदाज वाघांचा कधी बांधलाच नाही... वाघ हा असा मला सहज दिसलाच नाही...वाघासाठी केली वणवण.. त्याने केला आमचा पोपट.

    तिकडे आमचा दुसरा समूह सकाळी जाऊन दुसऱ्या जंगलात जाऊन खूप पक्षी पाहून आला होता व एकदम खुश होऊन मस्त पैकी निवासस्थानी आराम करत होता कारण त्यांना दुपारच्या सफारीला जायचे होते. परत एकदा ३० किलोमीटरचा उघड्या जीप्सीतील प्रवास करून दुपारी ११ वाजता पोचलो... नाष्टा केला आणि आडवे झालो.

    तेवढ्यात मयुरेश आला आणि म्हणाला जिप्सीत एक जागा आहे.. कोणाला दुपारच्या सफारीला यायचे आहे का.. झाले...मी लगेच तयार होऊन बसलो.. व निघण्याच्या तयारीला लागलो कारण मला असाही पक्षी बघण्यात फारसा रस नव्हता.

    परत तोच पहाटे सारखा प्रवास दुपारच्या विदर्भातील चांदण्यात, एक वेगळाच अनुभव आणि मनाला उभारी देणारा असा प्रवास का सोडायचा ह्या भावनेने तयार झालो आणि जिप्सीत जावून बसलो. वाघ दिसो अथवा न दैसो मला त्याच्या काही घेणे देणेच नव्हते. कारण जगलात तर वाघ आहेच पण असा अनुभव परत घेता येईल का नाही ह्या विचारांनी मला थोडीशी भुरळच घातली होती. तसा मी वर्धा, हिंगणघाट, नागपूर, चंद्रपूर, भांदक येथे २० वर्षांपूर्वी फिरलेलो होतो पण ते कामा निमित्त. दुपारी ३.१५ ला परत मुख्य प्रवेशद्वाराशी पोचलो, ३.३० ला जंगलात प्रवेश केला.. सचिन नावाच्या गाईडशी गप्पा मारल्या, जो पुण्यात नोकरीला होता. मला जरा वाघ दिसण्याची अथवा तो नक्कीच दाखवेल अशी वेडी आशा मनात निर्माण झाली. पण हे समजलेच नाही की हे जंगल आहे आणि येथे राज्य त्या वाघाचे आहे सचिनचे नाही. तरीही खूप खूप प्रयत्न करूनही ह्या सफारीलाही अगदी ३०-३० मिनिटे एका ठिकाणी थांबून वाट पाहूनही वाघ साहेबांनी दर्शन दिले नाही. पण माझी काहीच तक्रार नव्हती. कारण मला दोन तीन प्रवाश्यांनी सागितले होते की ही त्यांची १६वी सफारी आहे पण अजून त्यांना वाघ दिसला नाही. मी तर खूपच नशीबवान होतो की मला तिसर्याच सफारीला वाघाचे दर्शन झाले होते. असो. ह्या वेळेसही खूप सारे प्राणी आम्हांला दिसले जे सुध्दा ह्या जंगलाचा एक भाग आहेत. पण लोक फक्त आणि फक्त वाघच बघायला येतात आणि स्वत:चा हिरमोड करून घेतात. उशिरा का होईना मला हे समजले आणि मी संपूर्ण सफारीचा आनंद घेऊ शकलो हे मात्र एकदम खरे आहे.

    रात्री परत निघालो आणि पावसाने आम्हांला गाठले. जिप्सी उघडी असल्यामुळे थोडेशे भिजायला झाले पण तो ही एक मस्त अनुभव मनातील करपलेल्या कातडीला प्रफुल्लीत करून गेला आणि रात्री गप्पांच्या फडात आपसूकच एक उर्जा देऊन गेला. कधीही न भेटलेल्या व्यक्तींशी ओळख होऊन गप्पा व प्रत्येकाचे अनुभव ऐकण्यात गुंग होऊन गेलो. माझ्या काही कहाण्या ऐकवल्या व त्यांच्याही ऐकल्या तसेच काही वयस्कर मंडळींकडून मोलाचे सल्ले व आपुलकीच्या चार गोष्टी ऐकून मन कसे भरून आले होते. कोण कुठली ही माणसे पण दोन रात्रीत अगदी घरचीच वाटायला लागली होती. हेच तर ह्या सहलीचे फलित होते असे मला तरी वाटले.

    सहलीचा शेवटचा दिवस, सकाळी ६ वाजता उठून जवळील एका जंगलात पक्षी पाहण्यासाठी बाहेर पडलो.. खूप पक्षी व पावसाच्या आगमनाची चाहूल देणारे किडे पाहायला मिळाले. शौरीने आम्हांला एकंदरीतच ह्या विषयातील दिलेली माहित मला तर अचंबित करून गेली. आपण किती अज्ञानी आहोत ह्याची जाणीव झाली. शौरी आणि मयुरेश काय किंव्हा Insearch Outdoors चा संघ काय, तुम्हांला फक्त जंगलात फिरवत नाहीत तर आपल्या सृष्टी सौदर्याची आपल्याला जाण करून देतात हे त्यामधील वैशिष्ट्य म्हणावे लागेल. निसर्ग सौदर्य कसे अनुभवायचे व कसे पाहायचे आणि किती आजमवायचे हे आयुष्यात उशिरा का होईना मला शिकवून गेले.

    पक्षी पाहून आलो तर नाष्टा तयार होता. परतीच्या प्रवासाची तयारी करायाची होती आणि थोडासा आरामही. दुपारी १.३०ला जेवण करून आम्ही तयार होतो न होतो तोच आम्हांला नागपूरला पोहोचवायला बस तयार होती. परत ४ वाजता नागपुरात प्रवेश आणि प्रसिद्ध हल्दीराम दुकानातील संत्रा बर्फी खरेदी उरकून सगळेजण रेल्वेच्या वातानुकुलीत प्रतीक्षालयात विसावलो व ६.३० मिनिटांनी सुटणाऱ्या गरीब रथ गाडीची वाट पाहत पहुडलो होतो. आमच्यातील काही जाणकार (माझ्यासारखे) जवळील उपहार गृहातून गाडी मधील रात्रीच्या जेवणाच्या व्यवस्थेत गुंतून गेलो.

    एकंदरीत ही जंगल सफारी खूपच छान आणि अगदी व्यवस्थित पार पडली. खूप सुखावून गेली आणि परत परत अशा सहलींना जाण्यासाठी मनाची तयारी करून गेली. मी तर ठरवले आहे की आता अशा सहलींची एकही संधी सोडायची नाही. अर्थातच Insearch Outdoors बरोबरच.

    -- रविंद्र कामठे, पुणे

    भ्रमणध्वनी -९८२२४०४३३०

  • दिस उजळला

    दिस उजळला
    रात सरली
    बात उरली
    अंधाराची

    काजवे सावल्या
    गोड चांदण्या
    चंद्र कहाण्या
    ओठांवरी

    सुर किड्याचे
    बोल घुबडाचे
    तोल मनाचे
    ढललेले

    -- शरद अर्जुन शहारे

  • प्लॅस्टिक चलनाने समस्या सुटतील का?

    प्लॅस्टिकच्या चलनी नोटा आता काही शहरात थोडयाच दिवसात व्यवहारात येणार आहेत असे वृत्तपत्रातून वाचनात आले. पॉलिप्रॉपलीन नावाच्या पॉलिमरपासून या नोटा तयार करण्यात येणार असल्याने खराब झाल्यानंतरही त्यांचा पुनर्वापर शक्य होणार आहे.

  • मोहक गारा

    "अनोळख्याने ओळख कैशी
    गतजन्मींची द्यावी सांग;
    कोमल ओल्या आठवणींची
    एथल्याच जर बुजली रांग!!"
    कविवर्य मर्ढेकरांच्या या ओळी म्हणजे "गारा" रागाची ओळख आहे असे वाटते. खरे म्हणजे मर्ढेकरांची ओळख म्हणजे "सामाजिक बांधलकी" जपणारे आणि मराठी कवितेत मन्वंतर घडवणारे कवी. परंतु असे "लेबल" किती एकांगी आहे, याची यथार्थ जाणीव करून देणारी ही कविता!!
    वास्तविक हा राग तसा फारसा मैफिलीत गायला जात नाही पण वादकांनी मात्र या रागावर अपरिमित प्रेम केले आहे तसेच उपशास्त्रीय आणि सुगम संगीतात तर, या रागाला मानाचे स्थान आहे. सुरवातीला थोडे अनोळखी वाटणारे सूर, एकदम हळव्या आठवणींची सोबत घेऊन येतात. या रागाच्या समयाबद्दल मात्र दोन संपूर्ण वेगळे विचार आढळतात. काहींच्या मते, या रागाचा समय उत्तर सकाळची वेळ आहे तर काहींच्या मते, उत्तर संध्याकाळ योग्य असल्याचे, ऐकायला/वाचायला मिळते. "षाडव/औडव" जातीचा हा राग, आरोही सप्तकांत "रिषभ" स्वराला अजिबात जागा देत नाही तर अवरोही सप्तकांत मात्र सगळे सूर लागतात. या रागाची आणखी नेमकी करून घ्यायची झाल्यास, "गंधार" आणि "निषाद" स्वर हे "कोमल' आणि "शुद्ध" लागतात तर बाकीचे स्वर शुद्ध लागतात. काफी थाटातला हा राग, सादर करताना, "खमाज" रागाच्या अंगाने सादर केला जातो. याचा अर्थ इतकाच, या रागावर "खमाज" रागाची किंचित छाया आहे. जरा बारकाईने ऐकले म्हणजे हा फरक लगेच कळून घेता येतो. या रागाचे वादी/संवादी स्वर आहेत - गंधार आणि निषाद. अर्थात एकूण स्वरसंहती बघितल्यास, या दोन स्वरांचे प्राबल्य जाणून घेता येते. या रागातील प्रमुख स्वरसंहतीकडे लक्ष दिल्यास, खालील स्वरसमूह वारंवार ऐकायला मिळतात. "सा ग म प ग म ग","रे ग रे सा","नि रे सा नि ध".
    सतार वादनात दोन "ढंग" नेहमी आढळतात. एक "तंतकारी" वादन तर दुसरे "गायकी" अंगाचे वादन. अर्थात, कुठल्याही प्रकारे राग सादर केला तरी त्यातून आनंद निर्मिती त्याच अननुभूत आनंदाने प्रतीत होते.फरक पडतो तो, स्वर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सांगीतिक अलंकाराचे दर्शन यामध्ये. दोन्ही प्रकारच्या धाटणी भिन्न आहेत परंतु व्यापक सांगीतिक अवकाश निर्माण करण्यात कुठेही कमी पडत नाहीत. उस्ताद विलायत खान साहेब, यांनी, सतार वादनात गायकी अंग पेश केले आणि सतार वादनाच्या विस्ताराला नवीन परिमाण दिले. तसे बघितले तर सतार हे तंतुवाद्य आणि तंतुवाद्यातून, सलग "मिंड" काढणे आणि "गायकी" अंग पेश करणे ही निरातिशय कठीण बाब. तरीदेखील, वाद्याच्या तारेची "खेच" आणि त्यावर असलेला बोटांचा "दाब", यातून गायकी अंग उभे करायचे, ही बाब केवळ अभूतपूर्व म्हणायलाच लागेल.
    "गारा" रागाच्या सादरीकरणात, याच गुणांचा आढळ झालेला आपल्याला ऐकायला मिळतो. मला नेहमीच असे वाटते, रागाची खरी मजा, जेंव्हा राग आलापीमध्ये सादर केला जातो तेंव्हाच. या रचनेतील आलापी खरच ऐकण्यासारखी आहे. तारेवरील खेच आणि त्यातून काढलेली मिंड, केवळ अप्रतिम आहे, असेच म्हणावे लागेल. पुढे द्रुत लयीत तर आणखी मजा आहे. लय द्रुत लयीत चालत आहे आणि एका विविक्षित क्षणी, इथे आलापी सुरु होते!! हे केवळ उस्ताद विलायत खान (च) करू शकतात!!
    संगीतकाराच्या हाती अप्रतिम शब्दकळा आली की तो संगीतकार, त्यातून किती असामान्य रचना निर्माण करू शकतो, याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे, "हम दोनो" चित्रपटातील "कभी खुद पे कधी हालात पे" हे गाणे. साहिर हा, गाण्यात काव्य कसे मिसळावे, याबाबत खरोखरच आदर्श होता. आता, चित्रपट गीतांत "कविता" असावी की नसावी, हा वाद सनातन आहे पण जर का संगीतकाराची, शब्दांची समज तितकीच खोल असेल तर अगदी "गूढ" कवितेतून देखील "भावगीत" निर्माण होऊ शकते आणि अशी बरीच उदाहरणे देता येतील. या गाण्यातील रफीचे गायन देखील ऐकण्यासारखे आहे. शब्दातील भाव ओळखून, शब्दांवर किती जोर द्यायचा, ज्यायोगे शब्दातील दडलेला आशय अधिक "खोल" व्यक्त करता येतो. गाण्याची चाल तशी अजिबात सरळ, सोपी नाही. किंबहुना चालीत विस्ताराच्या भरपूर शक्यता असलेली गायकी ढंगाची चाल आहे. ताल देखील, चित्रपट गीतांत वारंवार वापरलेला "दादरा" आहे पण, जयदेवने तालाची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की, या तालाच्या मात्रा सरळ, आपल्या समोर येत नाहीत तर आपल्याला मागोवा घ्यायला लागतो. बुद्धीनिष्ठ गाणे असते, ते असे.
    "कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया,
    बात निकली तो, हर एक बात पे रोना आया".
    अतिशय चांगल्या अर्थाने, जयदेव हे चांगले "कारागीर" होते, असे म्हणता येईल. रागाचा निव्वळ आधार घ्यायचा पण रागाला लगेच दूर सारून, गाण्याच्या चालीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायचे, या कारागीरीत, जयदेव यांचे योगदान केवळ अतुलनीय असेच म्हणावे लागेल. असे करताना, गाण्यात, स्वत:चे काहीतरी असावे, या विचाराने, चालीत गुंतागुंतीच्या रचना अंतर्भूत करणे आणि तसे करत असताना, लयीला वेगवेगळ्या बंधांनी खेळवणे, हा या संगीतकाराचा खास आवडीचा खेळ!! याचा परिणाम असा होतो, शब्दातील भावनेचा उत्कर्ष आणि तिचे चांगले स्फटिकीभवन होते!! पण तसे होताना आपण सुरावटीची पुनरावृत्ती ऐकतो आहोत असे न वाटता एका भारून टाकणाऱ्या स्वरबंधाची पुन: प्रतीती येते. गाण्यातील वाद्यमेळ योजताना देखील अशाच विचाराचा प्रभाव जाणवतो. वाद्यमेळातील वाद्यांतून सुचकतेवर भर देणाऱ्या स्वनरंगांचे या संगीतकाराला आकर्षण होते. आणखी एक वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास, आपली रचना निर्माण करताना, स्वररचना, कधीही शब्दांवर कुरघोडी करत आहेत, असे कुठेही वाटत नाही. इथे शब्द वावरतो तो भाषिक तसेच सांगीत ध्वनींचा समूह म्हणून. अर्थानुसार जरूर पडल्यास, तालाच्या आवर्तनास ओलांडूनही चरण वावरताना दिसतो!!
    गाण्याची चाल बांधताना, रागाचा उपयोग करायचा आणि तसा उपयोग करताना, चालीत शक्यतो रागाचे "शुद्धत्व" पाळायचे, असा संगीतकार नौशाद यांचा आग्रह होता की काय? असा समज मात्र, त्यांच्या बहुतांशी रचना ऐकताना होतो. आता, चाल बांधताना, राग आहे त्या स्वरुपात वापरायचा की त्यात स्वत:च्या विचारांची भर टाकून, रागाला बाजूला सारायचे? हा प्रश्न सनातन आहे आणि याचे उत्तर तसे सोपे नाही. अर्थात, बहुतेक रचनाकार, रागाचा आधार घेऊन, रचना तयार करतात असे आढळते पण, रागाचे शुद्धत्व राखले तर काय बिघडले? या प्रश्नाला तसे उत्तर मिळणे कठीण. चित्रपट "मुघल ए आझम" मधील "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे" हे गाणे "गारा" रागावर आधारित आहे आणि त्या दृष्टीने ऐकायला गेल्यास, "गारा" रागाचे लक्षणगीत म्हणून, हे गाणे संबोधता येईल. गाण्यात, दोन ताल वापरले आहेत, त्रिताल आणि दादरा आणि तालाच्या मात्रा इतक्या स्पष्ट आहेत की त्यासाठी वेगळे प्रयास करण्याची अजिबात गरज नाही. ऐकायला अतिशय श्रवणीय, सरळ, सोप्या वळणाचे नृत्यगीत आहे आणि चालीचे खंड पाडून, त्यानुरूप ताल योजलेले आहेत.
    "मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे,
    मोरी नाजूक कलैया मरोड गयो रे."
    इथे एक बारकावा नोंदणे जरुरीचे वाटते. चित्रपटांतील गाणे या क्रियेपेक्षा चित्रपटगीत हे जात्या व गुणवत्तेने निराळे असते आणि असावे, ही संकल्पना पक्केपणाने रुजविण्यात, नौशाद आपल्या कसोशीच्या प्रयत्नाने यशस्वी झाले. चित्रपटगीताच्या बांधणीची एक निश्चित पण काहीशी आधीच अंदाज करता येईल अशी कल्पना वा चौकट, त्यांनी चांगली रुजवली. थोडक्यात, गाण्याच्या सुरवातीचे सांगीत प्रास्ताविक, मुखडा, मधले संगीत, सुमारे तीन कडवी आणि कधीकधी ललकारीपूर्ण शेवट, अशी रचना केली म्हणजे चित्रपटगीत उभे राहते, असे जणू "सूत्र" नौशाद यांनी तयार केले, असे ठामपणे म्हणता येईल. हाच विचार पुढे आणायचा झाल्यास, गाण्यात, "मुखडा","स्थायी","अंतरा" अशी विभागणी, त्यांच्या रागाधारित बहुतेक रचनांमधून ऐकायला/बघायला मिळते आणि त्या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे आलाप म्हणजे रागविस्तार करणाऱ्या सुरावटी आढळतात. हे सगळे असेच घडते कारण, संगीतकाराचा, रागाचे शुद्धत्व कायम राखण्याचा पिंड!!
    ऐसे तो ना देखो, के हमको नशा हो जाये;
    खुबसुरत सी कोई, हमसे खता हो जाये."
    "तीन देवीयां" चित्रपटातील हे सदाबहार गीत. संगीतकार एस. डी. बर्मन यांची एक खासियत नेहमी सांगता येईल. चित्रपटाचा विषय, प्रसंग याबाबत त्यांचा विचार फार खोलवर दिसायचा. त्यानुरूप गाणी तयार करण्याचे त्यांचे कसब केवळ अजोड असेच म्हणायला हवे. अर्थात याबाबत त्यांना रफीच्या गायकीचे देखील तितकीच सुरेख जोड मिळाली. तसे जरा बारकाईने बघितले तर रफी सारखा गायाक, एस.डी. बर्मन सारखे काही तुरळक संगीतकार वगळता, बऱ्याच संगीतकारांकडे गाताना "नाटकी" पणाकडे अधिक झुकलेला आहे पण इथे संगीतकाराने "चाल"च अशी बांधली आहे की उगीच खोटा नाटकीपणा औषधाला देखील दिसत नाही.
    गाण्यातील प्रसंग प्रणयी आहे तेंव्हा तोच नखरा चालीतून दिसेल याची काळजी संगीतकाराने घेतली आहे. गंमत म्हणजे इथे "राग गारा" देखील फिकटसा दिसतो, किंबहुना हा राग आपल्या समोर कधीच स्पष्टपणे येत नाही. अर्थात, गाणे म्हणून ही रचना निश्चित वाखाणण्यासारखी आहे.
    "रोक सके ना राह हमारी, दुनिया की दिवार;
    साथ जियेंगे,साथ मरेंगे, अमर हमारा प्यार,
    जीवन मे पिया साथ रहे
    हाथो में तेरा, मेरा हाथ रहे".
    "गुंज उठी शहनाई" चित्रपटातील एक अप्रतिम प्रणयी थाटाचे गाणे. संगीतकार वसंत देसायांनी याची चाल बांधली आहे. या गाण्यात मात्र "गारा" रागाची छाप दिसते. विशेषत: "जीवन में पिया तेरा साथ रहे" ही ओळ या रागाची स्पष्ट ओळख करून देते. संगीतकार म्हणून वसंत देसायांनी नेहमीच भारतीय राग संगीताचा आधार, अगदी शेवटपर्यंत घेतला होता पण त्यांनी रागांतील स्वरावलीची खुबी नेमकेपणी जाणली होती. एखादा सूर जरा वेगळ्या पद्धतीने घेतला की रागाचे स्वरूप कसे बदलले जाते, याची नेमकी जाण त्यांच्या रचनेतून वारंवार बघायला मिळते. या गाण्यात गारा रागाचे स्वरूप असेच काहीसे अंधुक, अर्धुकलेले पण तरीही सतत खुणावीत असलेले, असे बघायला मिळते.
    - अनिल गोविलकर

  • संस्थेच्या २५० पेक्षा कमी सभासदांसाठीची निवडणूक नियमावली मंजूर

    नियमावली नसल्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. राज्यातील २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेण्याबाबत नियमावली मंजुर करण्यात आली. परंतु, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम ७३ क मधील तरतुदीनुसार, राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीत जनहिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगष्ट पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका या ३१ ऑगष्ट नंतरच घ्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक)नियम, २०१४ मधील नियम ४ मध्ये सहकारी संस्थांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, व ‘ड’ असे प्रकार करण्यात आले होते.

  • स्मार्ट इंजिन

    आपल्या भारत सरकार तर्फे घेतली जाणारी एम ई ओ क्लास फोर म्हणजे मरीन इंजिनियर ऑफिसर क्लास फोर ही परीक्षा पास केल्यानंतर मला कंपनीने माझ्या सागरी जीवनातील दुसऱ्याच जहाजावर पाठविले. माझे दुसरे जहाज आईस क्लास तर होतेच पण त्याशिवाय या जहाजावरील इंजिन स्मार्ट इंजिन किंवा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड प्रकारचे होते. परीक्षा पास झाल्यावर पहिलेच जहाज असल्याने फोर्थ इंजिनियर म्हणून न पाठवता पुन्हा एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून पाठवण्यात आले होते. पण जहाज जॉईन केल्यानंतर पंधरा दिवसातच चीफ इंजिनियरकडून माझा रिपोर्ट मागवला गेला आणि दुसऱ्याच दिवशी फोर्थ इंजिनियर म्हणून प्रमोट केले गेले.