(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • माह्या गुरजीची गाडी

    फेसबुकवरुन आलेली ही अस्सल कथा भावनाविवश करणारी...... फारच सुंदर वाटली म्हणून शेअर केलेय. अवश्य वाचा....


    तो एक नवयुवक.... डीएड झालेला... गुरुजीची नोकरी लागली... पण दूरच्या जिल्ह्यात.... एका पारधी समाजाच्या तांड्यावर.... जिथं शिक्षण आणि शाळा पिढ्यानपिढ्यापासून कशाशी खातात हेच माहित नाही अश्या ठिकाणी... पण तोही अस्सल गुरुजी.... नव्या पिढीचा.... नव्या विचारांचा... अर्थात तुमच्या-माझ्या सारखा.... ज्या दिवशी रुजू झाला तो दिवस शाळा नावाच्या वास्तूला समजून घेण्यातच गेला. दिवसभर एकही पोरगं शाळेकडं फिरकलं नाही.... पण त्याने हार मानली नाही. तो रोज पालावर जायचा. पोरांच्या आई-बापांना पोरांना शाळेत पाठवायला सांगायचा. हळूहळू त्या अडाणी लोकांना पटायला लागलं आणि वेगवेगळ्या वयाची कधीही शाळेत न गेलेली ती रानफुलं शाळा नावाच्या तुरुंगात येवून बसू लागली.... रानावनात लीलया फिरणारी ती मुलं शाळेत मात्र अवघडल्यासारखी बसत... पण आपला मित्रही काही कमी नव्हता. त्याने अशी काही जादू केली कि त्या पोरांना गुरुजी आवडू लागला.... अन् रानात, काट्याकुट्यात ससा, तितर सहज पकडणारे हात ग म भ न गिरवायला लागले.

    नोकरी मिळाल्यावर आपल्या मित्राने त्याची ड्रीम बाईक घेतली. रोज सकाळी तो स्वतः आंघोळ करण्यापूर्वी गाडीला साफ-सुफ करायचा... मगच शाळेची तयारी. नव्या कोऱ्या बाईक वरून शाळेच्या ठिकाणी जावून-येवून करण्य्यात तो रोज थ्रिल अनुभवायचा. ती गाडी त्याची जिवाभावाची मैत्रीणच बनून गेली होती जणू... एक साधा ओरखडा किंवा थोडीशी धूळही गाडीवर पाहून अस्वस्थ व्हायचा तो.... रोज शाळेच्या समोर एका झाडाखाली गाडी लावून शाळा सुरु व्हायची....

    आनंददायी शिक्षण पद्धती वापरल्यामुळं गुरुजीवर मुलांना रागवायची पाळीच कधी येत नव्हती. पोरं रोज गुरुजीची गाडी यायची वाट बघत शाळेजवळ येवून थांबत आणि गाडी गेल्यावरच घरी जात....

    पण............भर झोपेत मोठा आवाज झाल्यावर दचकून झोप मोडावी अन् सुंदर स्वप्न सहज भंग पावावं तसं झालं त्या दिवशी.... रोजच्याप्रमाणे तो गाडीजवळ गेला आणि त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसेना... गाडीच्या टाकीवर कुणीतरी टोकदार दगडांनी काहीतरी कोरलं होतं. त्याच्या आवडत्या गाडीच्या टाकीवर ओढलेले ओरखडे पाहून तो प्रचंड संतापला. पोरं समोरचं उभी होती. कधीही न सुटलेला त्याचा तोल गेला. तो त्या पोरांना अद्वा-तद्वा बोलू लागला. त्याच्यातील सदसद्विवेकबुद्धी पार हरवून गेली. फक्त राग आणि राग.... पोरं घाबरून गेली. त्यांनी आपल्या गुरुजींना कधीही एवढं रागवलेलं पाहिलं नव्हतं. नेहमी प्रेम करणारा त्यांचा गुरुजी.... पण आज मात्र प्रचंड संतापून त्यांना शिव्या-शाप देत होता आणि एकच विचारात होता.... सांगा कुणी गाडी खराब केली? माझ्या गाडीवर ओरखडे कुणी ओढले?

    पण या रागाच्या प्रसंगी कोण पुढं येणार... . सगळी पोरं भयचकित होऊन एकमेकाच्या तोंडाकडं बघत होती....

    इतक्यात एक चिमुरडी पुढं आली आणि होणाऱ्या परिणामांची काळजी न करता म्हणाली, ‘ गुरजी, मी लिव्हलं तुझ्या गाडीवर..."

    तो खूप चिडला आणि विचारू लागला का पण....? शेवटी ती बोलू लागली "काल गावातून अशीच एक गाडी चोरीला गेली. मला वाटलं, गुरजीची गाडी कुणी चोरून नेली तर...? . म्हणून मी गाडीवर लिव्हलं..... इतका वेळ फक्त स्वार्थी अविचारी रागाने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता.... पण त्या पोरीचे शब्द ऐकले अन् एकदम भानावर आला तो.... तेव्हा कुठं बारकाईनं पाहिलं गाडीकडं त्यानं... गुरुजींनी शिकवलेल्या बाळबोध अक्षरात त्या चिमुरडीनं गाडीच्या टाकीवर कोरलं होतं....

    "माह्या गुरजीची गाडी "

    टचकन पाणीच आलं त्याच्या डोळ्यात.... इतका वेळ आरोपी सापडला कि त्याला शिक्षा करायला शिव-शिवणाऱ्या हातात त्याने ते चिमुकले हात घेतले आणि त्यांच्यावर ओठ टेकवले............

    अश्रूंना वाट मोकळी करून देण्याशिवाय पर्याय नव्हता त्याच्यापुढे..... मुलं बिचारी गोंधळून गेली... गुरुजी अचानक का रडतायेत... हेच कळंत नव्हतं त्यांना..... पण गुरुजींना मात्र सर्वकाही कळलं होतं.... शब्दांच्या पलिकडलं....

    त्यानंतर गुरुजींनी गाडीवरचे ओरखडे तसेच ठेवले... आजही आपला तो मित्र मोठ्या दिमाखात तीच गाडी वापरतोय... अन् तशीच वापरतोय.. तो जेव्हा गाडीवर बसतो.... त्याची छाती गर्वाने फुगलेली असते....

    कुणी विचारलंच तर तो अभिमानाने सांगतो कि, हा मला मिळालेला राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मोठा पुरस्कार आहे.....!!!

    कथा आवडली तर नक्की सांगा

  • न्यूयॉर्क शहरातील इम्पीरियल थिएटर

    इम्पीरियल थिएटर हे न्यूयॉर्क शहरातील मिडटाउन-मॅनहॅटन मधील २४९ वेस्ट ४५ व्या रस्त्यावर (जॉर्ज अबॉट वे) वर स्थित एक ब्रॉडवे थिएटर आहे. थिएटरमध्ये १४१७ इतकी आसन क्षमता आहे.

  • टर्की.. संताप ! (नशायात्रा – भाग ३०)

    तर आम्ही एकूण चार पाच जणांनी पहाटे बसने जाण्याऐवजी आदल्या दिवशी रात्रीच सटाण्याला जायचे ठरवले होते व त्यानुसार आम्ही तयारी करून गांजा , ब्राऊन शुगर असा पैसे असतील तेव्हढा साठा सोबत घेऊन नाशिक ला सी .बी .एस च्या स्थानकावर जमलो होतो..

  • अध्यात्मिक निसर्गमय सज्जनगड

    प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात,त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड म्हणजेच परळीचा किल्ला वसलेलाजेअसून सातारा शहरापासुन अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उर्वशी नदीच्या खोर्‍यात हा दुर्ग उभा आहे.

  • मराठीचा वापर न करणार्‍यांना दंडाची तरतूद

    जानेवारी महिना सुरु झाला. आता लवकरंच मराठीचा उत्सव साजरा करणार्‍यांच्या उत्साहाला भरती येईल. जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने विविध घोषणा सुरु होतील. राजकीय भाषणंही होतील. दरवर्षी हेच चित्र दिसतं, वेगळ्या सजावटीत सजवलेलं.

    जागतिक मराठी दिन साजरा करताना मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय याकडे आपण कधी बघणार? महाराष्ट्रातील आस्थापनांमधून मराठीचा वापर अनिवार्य करण्यासाठी अनेक कायदे आणि नियम बनवले गेले. मात्र या कायद्यांना सर्रासपणे केराची टोपली दाखवणार्‍यांवर कारवाई करायला संबंधित यंत्रणांनी नेहमीच टाळाटाळ केलेली दिसते.

    महाराष्ट्रात अनेक उद्योग आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, औषधी, शीतपेये, वैद्यकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रातील लहान आणि मोठ्याही उद्योगांचा समावेश आहे. संगणक, मोबाईल विविध उपकरणे वगैरे बनवणारे उद्योगही आहेत.

    महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ मधील तरतुदीनुसार दिनांक १ मे १९६६ पासून सर्व कामकाज मराठीतून बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतांना राज्यात उत्पादित केल्या जाणार्‍या, तसेच विकल्या जाणार्‍या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वस्तू, संगणकीय प्रणाली, माहिती तंत्रज्ञान उपकरणे, भ्रमणध्वनी (मोबाईल फोन), इत्यादींच्या पॅकेजिंग तसेच माहितीपत्रकांमध्ये मराठीचा वापर होत नसल्याचे दिसते. हे जाणीवपूर्वक केले जाते असे अनेकांचे मत आहे. औषधे, सौंदर्य प्रसाधने इत्यादि वस्तुंबाबतही हेच चित्र दिसून येते.

    मराठीच्या बाबतीत दुर्दैवाची गोष्ट एकच आहे ती म्हणजे मराठी आणि हिंदीसाठीही देवनागरी लिपीच वापरली जाते. त्यामुळे बर्‍याच लोकांचा असा समज होतो की हिंदीत लिहिले की मराठी माणसाला वाचता येणारच. हे खरे असले तरी वाचता आले म्हणजे समजले असे नाही ना?

    विक्रीला असलेल्या औषधांच्या वेष्टनांवरील माहिती, शीतपेयांची लेबल्स, भ्रमणध्वनी संच तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने यांचे बॉक्स किंवा इतर अनेक प्रकारचे पॅकेजिंग यावर इंग्रजी, हिंदी, गुजराती, दाक्षिणात्य भाषा इतके काय अगदी उर्दूमध्येही दिलेली असते. या उत्पादनांचे माहितीपत्रकही मराठी सोडून अन्य भाषामध्ये असते. ही माहिती मराठीत नसल्याने ग्रामीण भागातील व्यक्तीला त्यावर काय लिहिले आहे, हे समजत नाही. त्यामुळे फसवणूक होण्याचीही शक्यता अधिक असते.

    कर्नाटक राज्यात उत्पादन झालेल्या वस्तू त्या राज्याबाहेर जरी वितरित होत असतील तरी त्यावरील माहिती इतर कन्नडमध्ये असते. एक साधे उदाहरण आठवते. काही महिन्यांपूर्वी बंगलोरच्या आयकर सेंट्रल प्रोसेसिंग सेलमधून आलेल्या एका पत्रावर त्या सेलचे नाव आणि पत्ता चक्क कन्नडमध्ये होता. वास्तविक मुंबईला पाठवलेल्या त्या पत्रात कन्नडचा सुतरामही संबंध नव्हता. आता मुंबईतील एखादी कंपनी किंवा केंद्र सरकारचे कार्यालय हाच कित्ता गिरवून मराठी मजकूर असलेले पत्र एखाद्या कन्नडिगाला पाठवेल का?

    सध्या सहिष्णूता या शब्दाची चलती आहे. देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सहिष्णूतेबद्दलच शंका घेतली जातेय. इतरांचे काहीही असो, मराठी माणूस मात्र मूळचाच सहिष्णू आहे. त्यामुळे कुणीही यावे आणि टपलीत मारुन जावे असे मराठीच्या बाबतीत नेहमीच होताना दिसते.

    ज्या आस्थापना आणि उद्योग मराठीचा वापर करत नसतील त्यांना शिक्षा आणि दंडाची तरतूद करावी, अशी मागणी अनेक संस्थांनी वेळोवेळी केली आहे. या संदर्भात आमदारांच्या माध्यमातून विधानसभेच्या अधिवेशनात हा विषय उपस्थित करण्यात आला होता. याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने या संदर्भात परिपत्रक काढून ज्या आस्थापना मराठीचा वापर करत नाहीत त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी, तसेच सदर आदेशाची अंमलबजावणी सर्व विभाग/कार्यालय यांनी करावी, असे आदेश दिले होते. मात्र या आदेशालाही केराची टोपली बघायला मिळालेली दिसते.

    शासन परिपत्रक क्रमांक - कपासू-२०१४/प्र.क्र.९४/भाषा-२ नुसार राज्यात विकल्या जाणार्‍या सर्व वस्तू, उत्पादित केल्या जाणार्‍या, तसेच विकल्या जाणार्‍या प्रत्येक भ्रमणध्वनी उपकरणात, संगणकीय प्रणालीत आणि माहिती तंत्रज्ञान उपकरणात मराठी भाषा वापरण्याची, वाचण्याची, टंकलिखित करण्याची सोय असण्याविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. या परिपत्रकाची महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील लिंक खाली दिली आहे. हे परिपत्रक नक्की वाचा.

    दुर्दैवाने खुद्द मराठी भाषा विभागानेच काढलेल्या या परिपत्रकातच शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत.

    आता समजलं.. मराठी भाषा बिचारी दीनवाणी होतेय असं का म्हटलं ते?

    -- निनाद अरविंद प्रधान

    ------
    मराठी भाषा विभाग
    शासन परिपत्रक क्रमांक : कपासू-२०१४/प्र.क्र.९४/भाषा-२
    परिपत्रकाचा संकेतांक : 201409251212142933

  • नमामि गंगे

    उत्तर प्रदेश भारतातलं सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं कृषीप्रधान राज्य.मोहोरी,ऊस आणि बटाटे इथली प्रमुख पिकं.महामार्गांच्या अगदी लगत जर्द पिवळ्या फुलांनी आच्छादलेली लांबच लांब पसरलेली मोहोरीची हिरवीगार शिवारं डोळ्यांना गारवा देत होती.त्यात हवेत अगदी दुपारच्या दोनच्या टळटळीत उन्हातसुद्धा हवेत किंचित असलेला गारवा छान आल्हाददायक वाटत होता.

  • अधिकारी असावा तर असा!

    अधिकारी असावा तर असा! 'या' जिल्ह्यात ना ऑक्सिजन ,ना बेड चा तुटवडा,
    हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं.
    ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं
    नंदूरबारः संपूर्ण देशाला सध्या करोना संसर्गानं ग्रासलं आहे. करोना संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राज्यातून होत आहेत. मात्र, ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा, बेडची कमतरता या समस्यांनाही आरोग्य प्रशासनाला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महाराष्ट्रातील नंदूरबार या जिल्ह्यात मात्र पूर्णपणे वेगळी परिस्थीती आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नियोजनामुळं जिल्ह्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आहे.
    आदिवासी बहुल परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदूरबार जिल्ह्यात मागील वर्षी अपुऱ्या यंत्रणेसह करोनाचा लढा दिला. मागील वर्षी फक्त २० बेड असलेल्या नंदूरबारमध्ये आता रुग्णालयात १ हजार २८९ बेड, कोविड केअर सेंटरमध्ये १ हजार ११७ बेड आणि ग्रामीण रुग्णालयात ५ हजार ६२० बेड उपलब्ध आहेत. करोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सक्षम आरोग्ययंत्रणा उभी केली आहे. इतकंच नव्हे तर, महाविद्यालये, हॉटेल, सोसायटी आणि मंदिरांमध्येही बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, ७ हजारांहून अधिक आयसोलेशन बेड आणि १,३०० आयसीयू बेड्स उभे केले आहेत.
    ऑक्सिजनसाठी कधीकाळी दुसऱ्या जिल्ह्यांवर अवलंबून असणाऱ्या या जिल्ह्यानं आता ऑक्सिजन प्रकल्पही उभा केला आहे. हे सर्व शक्य झालं आहे ते जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या प्रयत्नांमुळं. राज्यभरात नंदूरबार मॉडेल राबवण्याची गरज आहे.
    २०१३च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातून एमबीबीएसची पदवी मिळवणारे डॉ. भारुड यांनी करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेत डिसेंबरपासून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास सुरुवात केली. नंदूरबारमध्ये मागील वर्षी सरासरी १५- २० आरटीपीसीआर टेस्टची क्षमता होती. आता जवळपास करोना चाचण्यांची क्षमता थेट १०० पटीने वाढून १५०० पर्यंत गेली आहे. हे सगळं डॉ. भारुड यांच्या प्रयत्नानं शक्य झालं आहे.
    डॉ. भारुड यांनी जिल्हा विकास निधी आणि एसडीआरएफच्या निधीतून ३ ऑक्सिजन प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ३ हजार प्रतिमिनिट ऑक्सिजन तयार होते. ऑक्सिजन बनवण्यासाठी लिक्विड टँक बसवण्याचेही काम हाती घेण्यात आलं आहे. तसंच, कोविड रुग्णांसाठी मागील ३ महिन्यात २७
    रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत.
    डॉ. राजेंद्र भारुड यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी कुटुंबात झाला आहे. त्याच्या जन्माच्याआधीच त्यांच्या वडिलांचे निधन झालं आहे. त्यांच्या आईनंच त्यांचं पालनपोषण केलं आहे. डॉ. राजेंद्र हे मुंबईत शिक्षणासाठी आल्यानंतर जीएस मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजच्या शेवटच्या वर्ष असतानाच त्यांनी यूपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले.
    डॉ. भारुड साहेबांचा आदर्श लाचखाऊ शासकीय अधिकार्यांनी घ्यावा.गरीब जनतेला लुबाडन्यातच धन्यता मानणार्या कलीयुगाच्या प्रतिनिधीनो जागे व्हा.
    संतोष द पाटील
  • कर्णपिशाच्च.. (बेवड्याची डायरी – भाग ३८ वा)

    आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते ...माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ' मंद ' असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..

    एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..' अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ' असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ....

    त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज ...या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले ...हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..

    इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू ...त्वचा ..डोळे ...शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी ...एकाच्या लघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..

    दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ' अजगर ' म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..

    मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..' विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..' सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ' परवा वाहिनी भेटीला आल्या होत्या ना ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? " खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..

    सर म्हणाले " एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील " मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ ...त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. " आपले सर ' मीठी छुरी ' आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात " ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • शुभं करोति

    तेव्हा तिन्हीसंध्याकाळ शांत असायची. हळूहळू ज्योत मालवत जावी तसा सूर्यप्रकाश सरत चाललेल्या डोळ्यांना जाणवायचा आणि कुणा राजमंदिरातल्या दासीनं एकेका महालात एकेक दीप उजळावा तसं एकेक नक्षत्र आभाळात उजळत चालेलंही दिसायचं. दिवस उन्हाळ्याचे असतील तर सुखद आणि हिवाळ्याचे असतील तर बोचरे वारे देहाला स्पर्श करायचे. मनसोक्त मातीत खेळून आल्यावर हात-पाय धुऊन मुलं देवघरासमोर ‘शुभं करोती’ म्हणायची.

  • हिन्दुत्व एकत्वाचे दर्शन आहे.

    सर्व हिंदू हे एकत्वाचे दर्शन आहे. हिंदूचे प्राचीन धर्मग्रंथ ऋग्वेद आहे आणि याच्या अध्यायनाने असे निष्कर्ष काढले जाते कि यांत इंद्र, मित्र, वरूण इत्यादि देवतांची स्तुती केली गेली आहे. अश्या बहुदेव वादाची कल्पना स्वयं ऋग्वेदच करतो.