(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती…..

    आपण वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाल्याची गोष्ट ऐकली आहेच. वाटसरुंना लुटणारा हा वाल्या कोळी या कलियुगातही अवतरला आहे सरकारच्या आणि टोल वसूली कंत्राटदारांच्या रुपाने. तो आता आधुनिक झालाय. त्याने राज्यभरातल्या सगळ्या हमरस्त्यांवर टोलची दुकाने थाटली आहेत. तो एकटा नाही राहिला. त्याच्या पापात नेते, अधिकारी, वसुली कंत्राटदार ही सगळी मंडळी वाटेकरी आहेत.

      April 2, 2014


  • आरतीची पुस्तकं द्या..!

    गणेशोत्सव जवळ आलाय...
    आजपासून फक्त ४० दिवसांवर

    दास रामाचा वाट पाहे "सजणा"
    असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं द्या..!

    "संकष्टी पावावे" म्हणणाऱ्यांना पण आरतीची पुस्तके द्या...
    पण,
    .
    .
    दिपकजोशी नमोस्तुते
    वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पुस्तक द्या..!

    आणि
    .
    "लव्ह लव्ह" ती विक्राला...

    कायेन वाचा "मच्छिन्द्र देवा"...

    "दर्शन म्हात्रे" मन 'श्रावण म्हात्रे' मन...

    असं कॉन्फिडंटली म्हणणाऱ्यांना तर आरतीची पुस्तकं द्याच द्या..!

    आणि...
    .
    .
    .
    "दास रामाचा वाट पाहे सजणा"
    वरुन आठवलं...
    "फळीवर वंदना" आहे तिलाही खाली उतरवली पाहिजे..!

      August 16, 2017


  • इतर टोळभैरवांचे काय ?

    अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर राज्यातील काही बेकायदेशीर टोलनाक्यांना स्थगिती देण्यात आली. पण, या कारवाईनंतरही काही प्रश्न कायम राहतात. ते कोणी विचारतही नाही आणि विचारलेच तर समाधानकारक उत्तर मिळत नाही अशी परिस्थिती आहे. असा प्रकार केवळ टोलनाक्यांबाबतच नव्हे तर अन्य ठिकाणीही सुरू आहे. अशा चुकीच्या प्रघाताबद्दल सरकार गांभीर्याने पावले उचलू इच्छिते का हा खरा प्रश्न आहे.

      December 16, 2010


  • रक्षाबंधन

    श्रावण महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता.

      July 31, 2012


  • मर्ढेकरांची कविता – पिंपात मेले ओल्या उंदिर

    मर्ढेकरांची पिंपात मेले ओल्या उंदिर कविता – दुसऱ्या महायुध्दात झालेल्या ज्यूंच्या हत्याकांडाचा तसेच तत्कालीन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ

      March 24, 2011


  • ५ नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिन

    मराठी रंगभूमी खर्‍या अर्थाने इ.स.१८४३ मध्ये सांगली येथे उदयास आली. सांगली येथील संस्थानिक चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयामुळे कै. विष्णुदास भावे ह्यांनी दि ५ नोव्हे.१८४३ साली सांगली येथे " सीता स्वयंवर " ह्या नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी रंगभूमीचा पाया रचिला.. मराठीतील हे पहिले गद्य पद्यमिश्रित नाटक जन्मास आले.

    नृत्य, गायन, अभिनय, देव, गंधर्व, अप्सरा, ऋषी, विदूषक इ.नी युक्त अशी ही पौराणिक नाटके सर्वसामान्यांची करमणूक करू लागली. मराठी संगीत नाटकांनी तर मराठी माणसाच्या हृदयात कायमचे स्थान निर्माण केले..

    साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावधीस सुरु झालेली मराठी नाट्यपरंपरा तेव्हापेक्षा कितीतरी पटीने अधिक जोशात जोपासली जात आहे. दररोज नवनवीन नाटके रंगभूमीवर येत आहेत, यापुढेही येत राहतील. आजपर्यंत अनेक नाटके मराठी रंगभूमीवर आली. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, निव्वळ करमणूकप्रधान, रहस्यमय असे वेगवेगळे विषय आणि प्रकार मराठी रंगभूमीने हाताळले.

    १७० वर्षाची ही रंगभूमीची परंपरा..आजही २१ व्या शतकातल्या गतिमान युगात, जोपासली जात आहे. ह्या १७० वर्षातील सर्व ज्ञात, अज्ञात कलावंत, तंत्रज्ञ आणि सहायक ज्यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि मराठी रसिकांच्या मनात रुजवली त्या सर्वांचं अभिनंदन !

    मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.

      November 5, 2016


  • सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या सदनिकाधारकांना होणारा त्रास

    अनेकदा झालेले बदल हे सभासदांपर्यंत पोहचत नाहीत. अपूर्ण माहिती असल्याने व सोसायटीचा कारभार चुकीच्या पद्धतीने चालवत असल्याने, सदस्याना त्याचा त्रास होत असतो. यावर सेक्रेटरी चेअरमन आणि उपनिबंधक सहकारी गृहनिर्माण कार्यालयाकडून उलट-सुलट दिली जाणारी उत्तरे यावरून अनेक नागरिक हैराण परेशान असतात.

      June 16, 2021


  • WHO …!

    तरुणांचे मानसिक आरोग्य सांभाळा....

    आज जागतिक मानसिक आरोग्य दिन !
    या वर्षा साठी WHO ने थीम दिलीय ते बदलत्या जगात तरुणांचे मानसिक आरोग्य .....

    या जगात शाश्वत फक्त 'बदल' आहे. कधी तो खूप हळू असतो तर कधी खूप जोरात. इंटरनेट च्या भन्नाट क्रांती ने हल्ली जग भयंकर वेगाने बदलत आहे. 6 महिन्यांपूर्वी नवल असलेली गोष्ट आजच out dated होते आहे. या बदलत्या जगात या वर्षी WHO ने दखल घेतली आहे ती तरुणांची....

    आजची तरुण पिढी गृहीत धरली आहे ती वयवर्षं 14 ते 29. मुळात या वयात जग बदलू अथवा न बदलू पण त्यांच्या अंतर्गत मनपटला वर त्यांचं स्वतःच सारं विश्वच बदलत असतं. शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरे होतात ती नेमकी याच वयात. अंतर्गत सोबत बाह्यजग देखील झपाट्याने बदलत असेल तर त्यांना तो वेग साधावाच लागतो. नाहीतर मागे पडतात मग गर्तेत जातात.....

    तरुण म्हणजे घराचे आणि राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ! या स्थंभा चा पायच कमजोर राहिला तर तो इतरांना सोडा, स्वतःला देखील आधार देऊ शकत नाही. कधी ते व्यसनांच्या जाळ्यात अडकतात तर कधी आत्महत्या करतात. वाममार्गाला जाऊन स्वहस्ते स्वआयुष्याला तिलांजली देतात.

    WHO ने दिलेली वयोमर्यादा पाहता, 30शी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीवर कळत नकळत पालकत्व येतं. मग त्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं प्रत्येकाचं कर्तव्य ठरतं. राहिलं आजूबाजूच्या, कामाच्या ठिकाणच्या किंवा समोर दिसणाऱ्या पण किमान आपापल्या Friend List मधील जे तरुण आहेत त्यांची काळजी घेणं तर आपल्याला शक्य आहे न? हात पुढे करा, कुणीतरी गरजवंत नक्की पकडेल !
    करून तर बघा, तुम्हाला स्वतःला स्वतःचे मोठेपण जाणवेल. तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल. एक वेगळं समाधान लाभेल.....

    तळ टीप :- 70/80 विषयावर हलक्या फुलक्या पोस्ट लिहिल्या नंतर आज एका जड विषयावर, जड भाषेत भाष्य करण्याचे कारण, सर्व FB परिवाराला समजावे की,
    मी हुशार आणि बुद्धिजीवी वग्रे सुद्धा आहे.
    अधून मधून अशी वैचारिक पोस्ट टाकली तर त्या लोकांना "साहित्यिक" म्हणून मान्यता देखील मिळते, म्हणे...

    विनोद डावरे, परभणी.

    ##सहजच सुचलं - 81

      November 1, 2018


  • सुखानंद..

    आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे आनंद..! गमतीची गोष्ट अशी की, मौल्यवान असूनही परमेश्वराने आपल्याला ती विनामूल्य दिलेली आहे. पण त्याहूनही गमतीची गोष्ट अशी की, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना आयुष्य संपेपर्यंत त्याचा पत्ताच नसतो.

      August 31, 2019


  • रिक्शांचे समान दर – निर्णय चांगला पण अंमलबजावणीचे काय ?

    सार्वजनिक प्रवासी वाहतुकीबाबत अनेक तक्रारी उपस्थित होत असतात. त्यातही रिक्षा चालकांबाबतच्या तक्रारींची संख्या अधिक असते. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र रिक्षाचे दर सारखे ठेवण्याचा शासनाने घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत शंका कायम आहे. कारण प्रवासी वाहतुकीसंदर्भातील अनेक निर्णय केवळ कागदोपत्रीच राहिले आहेत. परिणामी ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत.

      July 31, 2010