(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • एकदा तरी हो म्हणं !

    आई ह्या शब्दाची व्याख्याच करता येणार नाही. आई सारखे दुसरे दैवत जगात नाही. आईचे ऋण काश्यानेही भरून येणार नाहीत त्यासाठी आईच व्हावे लागेल. एक प्रयत्न..!

  • ज्येष्ठ तबला वादक झाकिर हुसेन

    आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.

  • शास्त्रीय संगीतातील विविध रागांचे गुण-विशेष

    खास संगीतप्रेमींसाठी काही महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.

    भारतीत शास्त्रीय संगीतात अनेक राग आहेत. आपण जुन्या गोष्टीमध्ये वाचले आहे की तानसेनने राग गाता गाता पाऊस पाडला वगैरे. अशाच प्रकारे प्रत्येक रागाचे काही खास वैशिष्ट्य आहे. ते पुढे बघूया.....

    १. राग दुर्गा – आत्मविश्वास वाढविणारा

    २. राग यमन – कार्यशक्ती वाढवणारा

    ३. राग देसकार – उत्थान व संतुलन साधणारा

    ४. राग बिलावल – अध्यात्मिक उन्नती व संतुलन साधणारा

    ५. राग हंसध्वनी – सत्य असत्याची जाणिव करून देणारा राग

    ६. राग शाम कल्याण – मुलाधार उत्तेजीत करणारा व आत्मविश्वास वाढविणारा

    ७. राग हमीर – आक्रमकता वाढविणारा, यश देणारा व शक्ती आणि उर्जा निर्माण करणारा

    ८. राग केदार – स्वतःच्या कर्तुर्त्वावर पूर्ण विश्वास निर्माण करणारून भरपूर उर्जा निर्माण करणारा तसेच मुलाधार उत्तेजित करणारा

    ९. राग भूप – शांतता निर्माण करणारा व संतुलन साधून अहंकार संतुलनात आणणारा

    १०. राग अहिरभैरव – शुद्ध इच्छा प्रेम आणि भक्तीभाव निर्माण करणारा व आध्यात्मिक उन्नतीस पोषक वातावरण निर्मिती करून समाधान देणारा

    ११. राग भैरवी – इडा नाडी सशक्त करणारा भावनाप्रधान राग सर्व सदिच्छा पूर्णकरून प्रेम वृध्दिंगत करणारा असा सहस्त्राराचा राग

    १२. राग मालकंस – अतिशय शांत - मधुर राग प्रेमभाव निर्माण करणारा व संसारिक सुख वृध्दिंगत करणारा

    १३. राग भैरव – शांत वृत्ती व शुध्द इच्छा निर्माण करणारा राग हा आध्यात्मिक प्रगतीस पोषक असून शिवतत्व जाग्रुत करणारा असा आहे

    १४. राग जयजयवंती – सुख समृद्धि देणारा राग असून यश दायक आहे विशुद्धीच्या सर्व समस्या दूर करण्याची क्षमता बाळगतो

    १५. राग भिम पलासी – संसार सुख व प्रेम देणारा

    १६. राग सारंग – कल्पना शक्ती व कार्यकुशलता वाढीस लावून नवनिर्मितीचे ज्ञान प्रदान करतो आत्मविश्वास वाढीस लावून परिस्थितीचे भान देणारा अत्यंत मधुर राग

    १७. राग गौरी – शुध्द ईच्छा , मर्यादाशिलता , प्रेम , समाधान , उत्थान इत्यादी गुणवर्धक राग. डाव्या विशुद्धीच्या सर्व बाधा नाहिशा करणे.

  • प्रेझेन्टेशनच महत्त्व

    अभियांत्रिकी पदवी घेऊन मुंबईत आलो आणि सोरोस एन्ड टौरस – एस एन टी या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत अभियांत्रिकी पदवीधर ट्रेनी म्हणून जॉब मिळाला. घर सोडतांना अभिनंदन, शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव झाला असला तरी मुंबईत कुणाला फार कौतुक दिसत नव्हते.

  • चारोळी

    आवाज माझ्या कवितेचा

    माझ्यापेक्षा मोठा आहे

    माझा फक्त कानापर्यंत

    त्याची झेप थेट हृदयात आहे

  • नाचावेसे वाटले म्हणून

    अगदी शिरीष कणेकरांच्याच शब्दांत सांगायचे तर आजकालच्या भेसळीच्या आणि बनावटीच्या कलियुगात आम्हाला अतिशय शुद्ध आणि सात्विक स्वरुपात कॅब्रे आणि तत्सम नृत्यप्रकार दाखविल्याबद्दल माझ्या आधीच्या दोन (पक्षी : माझे पप्पा व माझा थोरला चुलतभाऊ),माझी व माझ्या नंतरची एक (पक्षी : माझा धाकला आत्तेभाऊ ) अशा आमच्या चार पिढया हेलनच्या कायमस्वरुपी ऋणात आहेत.

  • “नशायात्रा” एक अनिर्बंध प्रवास (नशायात्रा – भाग १)

    देव म्हणजे नक्की काय ? तो कसा असतो ? कसा दिसतो वगैरे प्रश्न मला लहानपणापासून पडत व या प्रश्नांचे सविस्तर उत्तर देखील कोणी देण्यास तयार नव्हते देव्हा-यातील मूर्ती , मंदिरीतील मूर्ती , विविध देवतांचे आकर्षक आणि तेजोवलय असलेले फोटो पाहताना मात्र निश्चितच मनात एक प्रकारचा शांततेचा भाव उमटत असे , कदाचित देवाबद्दल ऐकलेल्या दिव्य कथांचा तो परिणाम असावा ,

  • आशियातील पूल – अकाशी काईको ब्रिज, जपान

    जपानमधील अकाशी काईको या पूलाने सर्वात जास्त लांबीचा, सर्वात जास्त खर्चिक आणि सर्वात जास्त उंचीचा असे तीन विक्रम प्रस्थापित केले आहेत.

  • राहिलंच…..

    आयुष्य जगतांना खूप काही "राहिलंच" ही खंत आयुष्यभर राहाते. अगदी लहानपणापासून काहीतरी राहून गेलेलं असतं. कुणाचं गोट्या खेळायचं राहिलेलं असतं तर कुणाचं गिल्ली दांडू खेळायचं, कुणाचं शाळेला दांडी मारायचं राहिलेलं असतं तर कुणाचं वादविवाद स्पर्धेत भाग घेण्याचं.
    शाळा सोडून कॉलेज ला गेल्यावर सुद्धा काहीतरी राहिलेलं असतं. कुणाचं कॉलेज कट्ट्यावर बसायचं राहिलेलं असतं तर कुणाचं प्रेमात पडायचं राहिलेलं असतं. कॉलेज बुडवून सिनेमा पाहायचं राहिलेलं असतं किंवा सायकल वर बसायचं देखील राहिलेलं असतं.
    हे सगळं "राहिलेलं" राहिलेलं असतं ते कधी दडपणामुळे तर कधी परिस्थिती मुळे. पण जेव्हा मोठेपणी राहून जातं ते मात्र सर्वस्वी स्वतः मुळेच राहिलेलं असतं. याचे खापर फोडायला जेंव्हा वय, परिस्थिती, दडपण कामी येत नाही तेंव्हा मात्र नाईलाजाने स्वतः वर घेणं भाग पडतं ! इथे दुबळ्या मदतीला येतात ते वेळ, Ego, स्टेटस, वय किंवा जवाबदारी.
    आपण आपल्या कार मध्ये बसून कुठल्याश्या ग्रामीण भागात जातो, तिथे कुणाकडे तरी जाण्या साठी रस्ता नसतो मग कार मधून उतरून पायी जात असतो, रस्त्यात मुलं गिल्लीदांडू खेळत असतात, आपल्याला आठवण होते आबक-दुबक-तिबक ची ! खेळावं वाटतं पुन्हा स्टेटस परवानगी देत नाही. मग राहून जातं....
    आपण अधिकारी आहोत, आपल्याकडे काम घेऊन किंवा हाताखाली काम करणारा शाळेतला मित्र असतो, त्याला जवळ घेऊन गप्पा मारायच्या असतात पण आडवा येतो Ego. आपली बदली होते, बदलीच्या ठिकाणी जॉईन होतो आणि लक्षात येतं, गप्पा मारायचं राहिलंच......
    रस्त्याने जातांना एखाद्या लग्नाची वरात जात असते, आपल्या तरुणपणीच गाणं वाजत असतं, गाडीतून उतरून त्या 'बेगानी शादी'त 'दिवना' होऊन नाचावं वाटतं पण आडवं येतं ते वय ! गाडी पुढे आणि वरात मागे जाते तेंव्हा लक्षात येतं, नाचायचं राहिलंच......
    मोठे होतो, कामं वाढतात, वेळ पुरत नाही काहीच करण्यासाठी, मग उरकून घ्यायचं असतं सगळं, याच गडबडीत कधी तरी नकळत प्रेमात पडतो. सुरुवातीला बरं वाटतं ते आल्हाददायक. हळू हळू हे आल्हाददायक आल्हाद'दाहक' कधी होतं हे समजतच नाही. प्रेमाची दाहकता ब्रेकअप पर्यन्त पोचते. वेळेअभावी संभाव्य ब्रेकअप टाळू शकत (कधी कधी इच्छित शुद्ध) नाहीत. घाईघाईने ब्रेकअप चा मुहूर्त ठरतो. वेळ आणि तारीख निश्चित होते. वेळेत पोचतो. तक्रारींची आणि आरोपांची देवाणघेवाण होते. ठरल्या प्रमाणे ब्रेकअप with कॉफी. होतो सुद्धा. घड्याळ पाहून निघू का? विचारतो......
    आणि टॅक्सीत बसल्यावर लक्षात येतं, सालं, एकदा मिठी मारून पोटभर रडायचं "राहिलंच...."

    तर हे "राहिलंच" कधीच राहू देऊ नका. काही राहिलेल्याला पुन्हा संधी मिळते पण काही "राहिलेलं" पूर्ण आयुष्यात कधीच परत येत नाही. ते राहिलेलं राहूनच जातं, कायमचं...

    तळ टीप :- तीन वर्षांपूर्वी माझे नाना(वडील) गेले. त्यांचा देहदानाचा संकल्प मलाच पूर्ण करायचा होता, मेडिकल कॉलेज 80km दूर. मृत्यू नंतर 6 तासांच्या आत मला त्यांना 'घेऊन' पोचायचं होतं म्हणून जेमतेम दिडतासच घरात ठेवून निघालो होतो. जवाबदारी होती न ती माझी, आणि माईची सुद्धा जवाबदारी माझीच !
    पर्यायाने, नानांच्या छातीवर पडून ओस्काबोक्शी रडायचं, राहिलंच....

    विनोद डावरे, परभणी

    ##सहजच सुचलं- 83

  • मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

    मराठीतला पहिला ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारला की पहिले उत्तर असते “ज्ञानेश्वरी”. मात्र ज्ञानेश्वरीच्याही आधी १०० वर्षांपूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो होता “विवेकसिंधू” आणि त्याचे लेखक होते “मुकुंदराज”. ज्ञानेश्‍वरीच्या मोठेपणाला आव्हान देण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानेश्‍वरी मराठीचा आद्यग्रंथ नक्कीच नाही असे मुकुंदराजांच्या अनुयायांचे म्हणणे आहे.

    मराठी जगतेय की मरतेय यावर तावातावाने चर्चा करणार्‍या आणि मराठीचे पालकत्व स्वीकारणार्‍या किती जणांना विवेकसिंधू व त्याचे लेखनकर्ते मुकुंदराज माहीत तरी आहेत का, असा प्रश्न मुकुंदराजांचे अनुयायी विचारतात.

    भाषिक आक्रमणाच्या या काळात मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासह तिच्या विकासासाठी साहित्य संमेलने वगैरेंची नितांत गरज आहे. परंतु अशी संमेलने साजरी करताना ज्यांनी या महाराष्ट्राला मराठी दिली त्या मुकुंदराजांचा उल्लेख कुठेच दिसत नाही, ही मोठीच शोकांतिका आहे.

    महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून केवळ ७० किलोमिटरवर असलेल्या अंभोरा या पाच नद्यांच्या संगमस्थळावर मराठीचा पहिला शब्द कागदावर उतरला. पण किती मराठी सारस्वतांना हे माहीत आहे, याचाही विचार झाला पाहिजे आणि जर माहिती नसेल तर मुकुंदराजांची ही दिव्य साहित्यकृती का उपेक्षित राहिली याचे उत्तरही मराठीच्या उद्धारकांनी दिले पाहिजे.

    महाराष्ट्रातील बहुसंख्यांची भाषा असलेल्या मराठीत समाजाला दिशा देणारा ग्रंथ असायला हवा, अशी हरिहरनाथांची अपेक्षा होती. ती त्यांनी त्यांचे शिष्य रघुनाथांकडे व्यक्त केली. रघुनाथांनी या पुण्यकार्यासाठी त्यांचे शिष्योत्तम मुकुंदराजांना निवडले आणि शके १११० मध्ये विवेकसिंधू प्रत्यक्ष साकार झाले.

    मुकुंदराजांनी आपल्या गुरूंच्या म्हणजे रघुनाथांच्या समाधीस्थळी अंभोर्‍यात बसून विवेकसिंधू लिहिला. ज्ञानेश्‍वरी इसवी सनाच्या बाराव्या शतकात आली. म्हणजे ज्ञानेश्‍वरीच्या शंभर वर्षाआधी मुकुंदराजांनी विवेकसिंधू लिहिला. स्वत: ज्ञानेश्‍वरांनी त्यांचे गुरू आणि वडीलबंधू निवृत्तीनाथांना विवेकसिंधूबद्दल सांगितले व तसाच ग्रंथ पुन्हा लिहिण्याची इच्छा प्रकट केली होती, असे संदर्भ इतिहासात आढळतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की विवेकसिंधू हा ज्ञानेश्‍वरीच्या आधी आलेला ग्रंथ आहे. परंतु ज्ञानेश्‍वरीच्या तुलनेत तो वाचक, समीक्षकापर्यंत पोहचू शकला नाही. म्हणूनच आजही श्री क्षेत्र अंभोर्‍यात मुकुंदराजांचे स्मारक बनू शकले नाही.

    अंभोरा येथे पाच नद्यांचे संगम होत असल्याने रोज हजारो भाविक येतात. परंतु त्यांना या ठिकाणचे मराठीविषयक माहात्म्य माहीतच नाही.

    स्मारक झाले की मराठीचा विकास होईल, असे अजिबात नाही. परंतु महाराष्ट्राला मराठीचा पहिला ग्रंथ कोणता व तो कोणी लिहिला हे कळायलाच हवे, तरच हे मराठीचे उपेक्षित जन्मस्थळ आपले हरवलेले वैभव परत मिळवू शकेल.

    -- दिपक पुरोहित