जनार्दन गव्हाळे
अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.
काही माणसं
मैत्रीने खांद्यावर हात टाकतात
दु:खातही कायम साथ देतात.
काही माणसं
गजबजलेल्या शहरासारखी असतात,
गरज पडली तरच आपला विचार करतात.
बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
मात्र काही माणसं
पिंपळाच्या पानांसारखी असतात
जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपून ठेवतात...
पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच..... पोरग्या काय नाय पदरात... आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको.... तशि कर्तबगार सुन... 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन... 50 हजार म्हयन्याचो पगार... मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली.......
ईल्याबरोबर काकून तंबी दिल्यान.... पाच दिवस सकाळीच गोठ्यात जावन गायची पूजा कर, पाय धू तिचे... आणि थयच दोन चमचे गोमुत्र घे आणी मग घरात ये.. सुनेन आयकल्यान सासयेचा..... नाईलाज बाकी काय ... रोज सांगल्याप्रमाणे केल्यान... वर सोनपापडेचो नेवेद्य दाखवल्यान.... आणि लवकर रिझट मिळाक व्हयो म्हणान रोज थयच धऱुन पेलोभर गोमुत्र पिल्यान.. असा पाच दिवस केल्यान....
शेवटच्या दिवशी काकूक संशय ईलो.... काय तरी भानगड हा....... म्हणान ईचारल्यान... गे सुने गाय आपली वायच भुजकट हा...
तुझ्याकडसून पुजा करून घेतल्यान कशी? सुनेन सांगल्यान... अहो ती काऴी गाय जवळ येऊच देत नव्हती.. पण पांढरी गाय खुप शांत आहे.. सेवा करून घेते.. मी पाच दिवस तिचे पेलाभर गोमुत्र पिते..... पण खरचं मला मुल होईल ना हो?
काकून कपाळावर हात मारल्यान आणि थयच खऴ्यात बसली........ म्हणता कशी.... नक्की माका नातू जातलो..... कारण वाड्यात काळी गाय आणि भोरी म्हस आसा गे माझ्या आवशी.......
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे....
आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले.
हे तर अगदी फारच झाले.. आता पुरे झाले यांचे लाड... सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?
ठाणे आणि पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनातून इतका पैसा उरला तो वापरा की.
सुभाष जयवंत
सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली यावर भाष्य करणारी ही वात्रटिका
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पावसाचं सुंदर वर्णन केलंय लेखकाने
Copyright © 2025 | Marathisrushti