(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हलकं-फुलकं – ओळख

    जनार्दन गव्हाळे

  • लक्ष्मीपूजन

    अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.

  • महान व्यक्ति अल्पायुषी!

    बरीच महान व्यक्तिमत्वे अल्पायुषी झाली.आपले दैवत शिवाजी महाराज अवघ्या पन्नासाव्या वर्षी स्वर्गवासी झाले.सर्व शत्रूंचा बिमोड करून हिंदवी स्वराज्याला उर्जितावस्था येणार आणि त्याचवेळेस राजे स्वर्गवासी झाले.काय हा दैवदूर्विलास!त्याचे कर्तृत्व बहरतानाच हे असे व्हावे,आपले नशीबच फुटके झाले.
    अस काही महाराजांच्याच बाबतीत झाले असे नाही.भारताच्या इतिहासात अशी बरीच उदाहरणे दिसून येतात. विवेकानंद,आगरकर,सुभाषचंद्र बोस,थोरले बाजीराव,माधवराव पेशवे वगैरे अशी अनेक उदाहरणे मिळतील.या सर्व व्यक्तींचे कर्तृत्व अफाट,त्यांच्या कर्तृत्वाने देशाला उर्जितावस्था आली असती,पण काळाने त्यांच्यावर अवेळी झेप घेतली आणि त्याना देशबांधवांपासून तोडले.आता "त्याना आणखी आयुष्य लाभले असते तर..."असे म्हणण्याची पाळी आपल्यावर आली.
    ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यामुळे समाज त्यांच्या सत्संगतीस मुकला.त्यानी समाधी घेऊन समाजाचा त्याग केला.त्यानी वयाच्या एकविसाव्या वर्षीच समाधी घेतली.त्यानी समाधी का घेतली याचे महत्वाचे कारण सांगण्यात येते ते असे.आता आपले या जगातील कार्य संपले आता जगाचा त्याग करणे बरे असे त्याना वाटले,म्हणून ते समाधीस्थ झाले असे म्हणतात.लहानपणापासून समाजाने त्यांची बरीच छळवणूक केली.आपले नाणे खणखणीत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याना चमत्काराचा आसरा नाइलाजास्तव घ्यावा लागला.आपले अलौकिकत्व सिद्ध झाल्यावर त्यानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.त्यात भक्तीमार्गाबरोबर सदाचरणाचा मंत्र दिला.पण बहुसंख्य समाजाने भक्तिमार्गाला प्राधान्य दिले आणि तो अधिकतम आत्मसात केला.मग झाले काय सदाचाराची शिकवण मागे पडली,भक्तिमार्गामुळे अनंतपापराशी क्षणात लयाला जातील हा विचार बळावला.भक्तिमार्ग श्रेष्ठ वाटू लागला.
    त्यामुळे सदाचाराची शिकवण समाजात दृढ करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जगात राहणे गरजेचे होते.त्याच्या आवाहनाला लोकानी मान दिला असता असे वाटते,कारण त्यांचे ग्रंथ ज्याप्रमाणे समाजाने प्रमाण मानले त्याचा विचार करता त्यांच्या आवाहनाला परिणामकारक प्रतिसाद मिळाला असता असा माझा आशावाद.म्हणून त्यानी समाधी घ्यायला नको होती असे उगाचच मनात येते,उगाचच म्हणतो कारण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
    सदाचाराची वाट|असावा जीवनाचा थाट|
    घालावा त्याचा घाट| भक्तीमार्गाआधी ||
    अर्थ- सदाचाराची वाट अनुसरणे हा जीवनाचा मुख्य हेतू असावा.देवभक्ती करण्याआधी सदाचार आत्मसात करणे महत्वाचे.
    --शरद प्रभुदेसाई.
  • काही माणसं

    काही माणसं

    मैत्रीने खांद्यावर हात टाकतात
    दु:खातही कायम साथ देतात.

    काही माणसं
    गजबजलेल्या शहरासारखी असतात,
    गरज पडली तरच आपला विचार करतात.
    बाकीच्या वेळी ते सगळी नाती विसरतात.
    मात्र काही माणसं
    पिंपळाच्या पानांसारखी असतात
    जाळी झाली तरी मनाच्या पुस्तकात
    आयुष्यभर जपून ठेवतात...

  • भोंडले (१)

  • काळी गाय आणि भोरी म्हस

    पकल्या सावताची बायल, म्हणजे भागिरथी काकूची सून , लगिन झाल्यार आट वर्षानी गावाक ईली.. कारण तसा नाजूकच..... पोरग्या काय नाय पदरात... आता जिनच्या पँटीक पदर खयलो तो ईचारू नको.... तशि कर्तबगार सुन... 22 व्या माऴ्यारल्या मुंबयच्या हापिसातली सायबिन... 50 हजार म्हयन्याचो पगार... मुंबयतल्या सगळ्या डाक्टरांची भर करुन झाल्यार नाईलाज म्हणान म्हयनोभर सासयेच्या सांगण्यान घोवाक घेवन ईली.......

    ईल्याबरोबर काकून तंबी दिल्यान.... पाच दिवस सकाळीच गोठ्यात जावन गायची पूजा कर, पाय धू तिचे... आणि थयच दोन चमचे गोमुत्र घे आणी मग घरात ये.. सुनेन आयकल्यान सासयेचा..... नाईलाज बाकी काय ... रोज सांगल्याप्रमाणे केल्यान... वर सोनपापडेचो नेवेद्य दाखवल्यान.... आणि लवकर रिझट मिळाक व्हयो म्हणान रोज थयच धऱुन पेलोभर गोमुत्र पिल्यान.. असा पाच दिवस केल्यान....

    शेवटच्या दिवशी काकूक संशय ईलो.... काय तरी भानगड हा....... म्हणान ईचारल्यान... गे सुने गाय आपली वायच भुजकट हा...

    तुझ्याकडसून पुजा करून घेतल्यान कशी? सुनेन सांगल्यान... अहो ती काऴी गाय जवळ येऊच देत नव्हती.. पण पांढरी गाय खुप शांत आहे.. सेवा करून घेते.. मी पाच दिवस तिचे पेलाभर गोमुत्र पिते..... पण खरचं मला मुल होईल ना हो?

    काकून कपाळावर हात मारल्यान आणि थयच खऴ्यात बसली........ म्हणता कशी.... नक्की माका नातू जातलो..... कारण वाड्यात काळी गाय आणि भोरी म्हस आसा गे माझ्या आवशी.......

    बापूर्झा
    डॉ. बापू भोगटे....

  • गंगा आरती -एक दिव्य अनुभूती

    आजवर जी आरती दूरदर्शनवर कधीतरी पाहिली होती, ती प्रत्यक्षात अनुभवता आली याचा अतिशय आनंद वाटत होता. आता उठून परत फिरण्याच्या विचारात होतो तोच लाटांवर नाचत छोट्या छोट्या प्रकाशज्योती येताना दिसू लागल्या. मोठ्या मजेशीर दिसत होत्या. त्या पाण्यावर कशा तरंगताहेत याचे आश्चर्य जवळ आल्यावर निवले.

  • सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?

    हे तर अगदी फारच झाले.. आता पुरे झाले यांचे लाड... सगळ्याच गोष्टी फुकट कशाला हव्यात ?

    ठाणे आणि पुणे येथे झालेल्या साहित्य संमेलनातून इतका पैसा उरला तो वापरा की.

    सुभाष जयवंत

  • तार सेवा बंद, बार सेवा सुरु !

    सरकारने पोस्टाची तार सेवा बंद केली यावर भाष्य करणारी ही वात्रटिका

  • पावसाचे बहुरंगी रंग

    महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पावसाचं सुंदर वर्णन केलंय लेखकाने