(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • प्रामाणिकपणा

    दुसर्‍या उपयोग मात्र झालाय याच मला समाधानच आहे. काही लोकांना दुसर्‍यांच्या हक्काच्या मेहनतीच्या पैशावर ही डल्ला मारून स्वतःचा गल्ला भरण्याची सवय असते अशी लोक माझ्यासारख्यांच्या प्रामाणिकपणाचही भांडवल करून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी बर्‍याचदा प्रयत्नशील असतात अशा लोकांचा आपमान मी त्यांच्या तोंडावरच करतो कारण आमच्या प्रामाणिकपणावर लोकांच्या असणार्‍या विश्वासालाच ते तडा देत असतात.

  • हुसेन, दाली आणि रझा – रेषेच्या तीन बाजू

    चित्रकार असो , लेखक असो . कवी असो ज्याचे त्याचे स्वतःचे असे विश्व् असते. तो त्यात रमतो तर काहीजण अत्यंत चातुर्याने आपला कार्यभागही साधू शकतात. अशी अनेक प्रकारची व्यक्तिमत्वे आजूबाजूला बघावयास मिळतात. चित्रकार किंवा चित्र काढणे आणि त्याचा अभ्यास करणे या गोष्टीना आपल्या मध्यमवर्गात कधीच सहजपणे थारा मिळत नाही.

  • त्या’ पराभवानंतर भारतीय संघ कुठे होता?

    पुण्यातील पहिली-वहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसांतच संपली. भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला. गेले 18 महिने यशाची विविध शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारतीय संघाचे उडू पाहणारे विमान या भयानक पराभवामुळे खाडकन जमिनीवर उतरले. पण पाच दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी आटोपल्याने दोन्ही संघांची मैदानाबाहेर गडबड झाली.

    पुढील कसोटी सामना बंगळूरला आहे. या सामन्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ प्रवास करणार होते. त्यामुळे 'दोन दिवस पुण्यात करायचं काय' असा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला. सततच्या क्रिकेटमुळे भारतीय संघ शरीराबरोबरच मनानेही थकला होता. त्यातून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाच्या दणक्‍यामुळे निराशेचे ढग पसरत होते. चाणाक्ष अनिल कुंबळे यांनी संभाव्य धोका ओळखला. पुण्यातील दोन खास विश्‍वासातील मित्रांना बोलावून दोन दिवस संघासाठी काही उपक्रम करण्याचा विचार कुंबळे यांनी बोलून दाखविला. या मित्रांनी सुचविलेला उपाय कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी मान्य केला आणि मग योजना पक्की झाली..

    26 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण भारतीय संघ आणि सर्व सपोर्ट स्टाफ बसमध्ये बसले. रविवार असल्याने हिंजवडी परिसरात अजिबात गर्दी नव्हती. हिंजवडीतून मागच्या रस्त्याने बस मुळशी रस्त्याला लागली. मुळशी धरण पार करून बस ताम्हिणी घाटाकडे निघाली. कुंबळे यांच्या मित्राने ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेल्या 'गरुड माची'च्या व्यवस्थापनाला या कार्यक्रमाची कल्पना दिली होती. 'कुणीतरी खास व्यक्ती येत आहेत' असं 'गरुड माची'च्या कर्मचाऱ्यांना कळलं होतं. प्रत्यक्षात सगळा भारतीय संघच इथे अवतरला. संचालक वसंत वसंत लिमये यांच्या कडक सूचनांनुसार, 'गरुड माची'च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले मोबाईल फोन बंद करून ठेवले. 'गरुड माची'च्या व्यवस्थापकांनी अत्यंत चोख व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोपनीयता बाळगली होती.

    संध्याकाळी सह्य्राद्रीच्या कुशीत विसावणारा सूर्य पाहताना खेळाडू मनोमन शांत झाले. सूर्यास्तानंतर अंधाराचे राज्य चालू झाले. मिलिंद कीर्तने आणि सुरेंद्र चव्हाण यांनी खेळाडूंसाठी मजेदार 'ट्रेजर हंट'चे आयोजन केले होते. हातात कंपास, टॉर्च आणि नकाशे घेऊन लपवलेल्या गोष्टी मिट्ट अंधारात शोधून काढण्यात दोन तास मस्त धमाल झाली. रात्रीचे जेवण चांदण्यात झाले. खेळाडूंच्या आहाराची काळजी लक्षात घेतच जेवण तयार केले होते.

    दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी सात वाजता महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्यासोबत सगळे जण ताम्हिणीतील 'कॅमल बॅक'वर ट्रेकिंगसाठी निघाले. डोके चालवत सुरेंद्र यांनी तिरंगा बरोबर घेतला होता. एका तासाच्या चढाईनंतर सगळे घाट माथ्याला पोचले, तेव्हा पहाटेच्या कोवळ्या सूर्य प्रकाशातील दऱ्याखोऱ्या बघण्यात सगळे रमले. बऱ्याच खेळाडूंनी तिथेच बरेच फोटो काढले. भारतीय खेळाडूंनी सुरेंद्र चव्हाण यांना 'हिमालयातील भटकंती आणि एव्हरेस्ट मोहिमेविषयी' प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. टेकडीच्या माथ्यावर ताठ मानेने तिरंगा फडकावून त्याला घामेजलेल्या खेळाडूंनी सॅल्यूट केला.

    थकलेल्या अवस्थेत परतल्यानंतर सगळेजण ब्रेक-फास्टवर तुटून पडले. एक संपूर्ण दिवस इथे घालवला, तरीही कुणाचाही पाय 'गरुड माची'च्या कॅम्प साईटवरून निघत नव्हता. 'बऱ्याच दिवसांनी मोकळ्या आकाशाखाली हुंदडायला मिळाले. सह्याद्रीच्या सौंदर्याने आम्ही हरखूनच गेलो..', अशी भावना एका खेळाडूने व्यक्त केली.

    काही काळ खेळापासून लांब जाऊन मनाने ताजेतवाने होण्यासाठी कोहली आणि कुंबळे यांनी हा खटाटोप केला होता. याचा प्रत्यक्षात खूपच चांगला परिणाम झाला. 24 तासांच्या मजेदार सहलीनंतर सगळे जण ताजेतवाने झाले. चेहऱ्यावरची निराशा नाहीशी झाली होती. गेले 18 महिने भारतीय संघ अव्याहत क्रिकेट खेळत आहे. यामुळे सगळेच जण थकले होते. 'गरुड माची'ची सहल गोपनीय राखण्यात यश आल्याने खेळाडूंना कोणताही त्रास झाला नाही. येथील व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना कसलाही त्रास दिला नाही किंवा फोटो काढण्याचा हट्टही धरला नाही. त्यामुळे खेळाडूंना मनसोक्त दंगा करता आला.

    अखेरीस खेळाडू इतके खुश झाले, की त्यांनीच कर्मचाऱ्यांना बोलावून फोटो काढले. इतकेच नाही, तर खास प्रशस्तिपत्रकही बहाल केले. मंगळवारी सायंकाळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुसऱ्या कसोटीसाठी खेळाडू बंगळूरला रवाना झाले.

    सुनंदन लेले

  • मोबाईलचा डायबेटीस

    संक्रांतीच्या शुभेच्छा
    इतक्या वारेमाप झाल्या
    मोबाईलला माझ्या
    काळ्या मुंग्या लागल्या

    किती गोड किती गोड
    दुर दुरून बोलतात माणसं
    किती अगदी सहजपणे
    जवळून दूर जातात माणसं

    लांबचा वाटतो जवळचा
    जवळचा काय कायमचा
    कधीतरी येणाराच
    सण असतो महत्वाचा

    शुभेच्छा हव्यात कृतीत
    नको नुसत्या उक्तीत
    एकमेकांच्या असावं
    प्रेमळपणानं संगतीत

    मेसेज डिलीट करण्यातच
    अख्खी संक्रांत गेली
    मोबाईलची शु्गर लेवल
    मात्र भलतीच वाढली

  • कुणकेश्वरची वालुकाशिल्पे !

    कोकणातील कुणकेश्वर या अत्यंत सुंदर मंदिर परिसरात फिरण्याचा नुकताच योग्य आला. स्वच्छ समुद्र व हिरवागार निसर्ग यांच्या कोंदणामध्ये आपल्या भव्य मंदिरात वसलेला देव श्री कुणकेश्वर !

    येथून अगदी जवळच महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे खूप छान पर्यटक निवास आहे. कुणकेश्वर मंदिराच्या मागील किनाऱ्यावर एक वैशिष्ठ्य पाहायला मिळाले. देवळाच्या तटबंदीपर्यंत समुद्राच्या लाटा येऊन नंतर ओहोटी लागते. तेव्हा तेथील वाळूमध्ये अशी काही लघुशिल्पे, नैसर्गिकरीत्याच तयार होतात ती पाहताना खूप जुन्या, गाडलेल्या एखाद्या जुन्या संस्कृतीच्या त्या पाऊलखुणाच वाटाव्यात. नंतरच्या भरतीमध्ये पुन्हा हे नैसर्गिक शिल्पकाम वाहून जाते आणि पुढच्या ओहोटीला पुन्हा नव्याने तयार होते ! येथील समुद्रावर पोहणाऱ्यांसाठी जी कळकळीची सूचना लावली आहे ती मात्र प्रत्येकानेच लक्षात ठेवण्यासारखी आहे.

    --मकरंद करंदीकर.

  • अन्याय

    सकाळी अकरा – साडेअकराची वेळ होती. जरा बाहेरची कामे करून यावी म्हणून निघाले होते. घरात बाहेरची कामेच जास्त असतात. कधी लाईट बिल, पाणी बिल, बाजारहाट, बँकेची कामं वगैरे. आणि ही सगळी कामं सकाळीच करायला लागतात. तशीच त्या दिवशी पण बाजारात जायला निघाले होते. जवळच सेन्ट्रल स्कूल आहे. शाळा सुटली होती. सोसायटीतील लहान मुले परीक्षा संपल्या म्हणून जवळ जवळ नाचतच आनंदात घरी परत चालली होती ही सगळी मुले आठ ते अकरा या वयोगटातील आहेत. माझ्या मनात विचार आला “चला आजपासून धुमाकूळ चालू.”

    साधारण दीड दोन तासाने कामे आटोपून घरी येत होते. बघितले कि ही सगळी ‘वानरसेना’ दोन तीन सायकलीवरून आलेल्या मुलांच्या मागे वेडी वाकडी धावत आमच्याच घराच्या बाजूने जात होती. मी थांबले आणि विचारले “अरे काय झाले?” सगळे एकदम चूप. तशी ही सगळी मला उगाचच घाबरत असतात. मला बघितल्यावर त्यांचे चेहरे हे कामासाठी निघालेल्या माणसाला मांजर आडवी गेली कि जितका वाईट होतो तेवढे वाईट झाले. क्षणभर मला वाटले शेजारच्या बाईच्या आंब्याच्या झाडावर चढण्याचा यांचा प्लॅन बहुतेक मला बघून फसलेला दिसतोय. शेजारचे दोघेही नवरा बायको नोकरी करतात त्यामुळे या मुलांना ही आयतीच संधी.

    पण नाही. जशी घराच्या जवळ पोहोचले तसे लक्षात आले कि ही मुले या सायकल वरून आलेल्या मुलांच्याच मागे धावत होती. मी टोकल्यावर तशीच उभी राहिली आणि त्या मुलांकडे बघत होती. मला कळून चुकले कि काहीतरी गडबड या नवीन आलेल्या मुलांचीच आहे म्हणून जरा जोरातच त्या मधल्या एका मुलाला विचारले “काय आहे? काय गडबड चालली आहे?”

    पण एक नाही की दोन नाही आणि माझ्याकडे बघतच तो शेजाऱ्यांच्या कंपाऊंडवर चढायला लागला. बाकीची मुले घाबरून उभी होती. क्षणभर वाटले की साप निघाला कि काय? या बाजूला बरेच वेळा लोकांनी साप बघितला आहे. म्हणून त्याला जोरात ओरडले “अरे चढू नकोस, तो साप उलटा तुझ्यावर येईल. खाली उतर.” तसा तो माझ्याकडे बघून हसला आणि म्हणाला “आँटी यहाँ साप नाही है.”

    त्याला बघून माझी खात्रीच झाली हा सोसायटीतला नाही. दहा अकरा वर्षाचा असेल. सायकल चालवून चालवून दमलेला दिसत होता. हातात येशू ख्रिस्ताचा क्रॉस असलेली फिक्कट हिरव्यां रंगाची माळ होती. बहुतेक रेडियम सारखी असावी. ती त्यांनी हातात घट्ट धरून ठेवली होती. अगदी केविलवाणा, कावराबावरा. त्याच्याकडे बघून हा काहीतरी शोधत इथपर्यंत आलेला आहे आणि त्याचा त्या देवाच्या माळेवर अपार विश्वास असावा हे पटकन कळून येत होते आणि देव त्याला नक्कीच मदत करणार आहे अशी त्याला खात्री असावी. म्हणूनच एका हातात ती माळ घट्ट धरली असावी. त्याच्या बरोबरची मुले फक्त शांत उभी होती. त्यातल्या एकाच्या हातात एक काठी होती. दुसऱ्या जवळ बॅगेला गाडीत बांधायला वापरतात तशी एक साखळी होती आणि शर्टच्या खिशातून बिस्किटचा छोटासा डबा बाहेर डोकावताना दिसत होता.

    मी त्यांच्याजवळ जाऊन विचारले, “ तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? आणि इथे काय करताय?” माझा तो शांत अवतार बघून सोसायटीतील चिटकी पिटकी माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. आणि तो ही कंपाऊंडवरून खाली उतरला. त्याच्या बरोबरची मुले पण त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. तो मला काही सांगणार तेवढ्यात कंपाउंडच्या आत एक छोटेसे पांढरे कुत्र्याचे पिल्लू दिसले. तसा तो धावत “जॉली जॉली” करत त्याच्याकडे पळाला. मला माहित होते हे कुत्रे तर इथलेच आहे. मग हा का त्याला हाक मारतोय? तो म्हणाला, “हा माझा कुत्रा आहे”. बाकीची मुले ओरडली, “हा कुत्रा त्याचा नाही.” तो अगदी रडवेला झाला.

    म्हणाला, “ मी तेरा सेक्टर मध्ये राहतो. एकदा मला रस्त्यात एक कुत्र्याचे पिल्लू सापडले त्याच्या पायाला काहीतरी लागले होते. त्याला पट्टी लाऊन, औषधे देऊन मी बरे केले. तो माझ्याबरोबर खेळतो म्हणून शेजारच्या डॉ. काकांनी त्याला इंजेक्शनं पण दिली आहेत. त्याला मी जेवणही देतो. तो माझ्याच जवळ राहतो पण माझ्या बाबांना वाटले की मी त्याच्यामुळे अभ्यास करत नाही. म्हणून माझ्या परीक्षेच्या आधीच त्यांनी त्याला या बाजूला कुठेतरी सोडून दिले आहे. हा त्यांचा ऑफिसचा रस्ता आहे. म्हणून मला खात्री आहे की तो इथेच कुठेतरी आहे. माझी परीक्षा आज आता सकाळीच संपली. आम्ही लगेच त्याला सायकलवर शोधायला निघालो आहोत. आम्ही जॉलीला घरी घेऊन जायला आलो आहोत.”

    ऐकून काय करावे हे क्षणभर सुचलेच नाही. मी विचारले “हेच कुत्रे तुझे आहे कशावरून?” तो म्हणाला “तो असाच आहे. माझा आवाज ओळखतो, मी हाक मारली की लगेच येईल” असे बोलत परत त्या कंपाऊंडवर चढून “जॉली जॉली” अशी हाक मारायला लागला.

    त्याच्या आवाजातली ती आद्रता ऐकून असे वाटले हाच त्याचा जॉली असावा आणि त्याच्याकडे धावत यावा. पण तसे झाले नाही. अगदी नाराज होऊन ती मुले सायकलवर चढून दुसरीकडे त्याच्या शोधात निघाली. आम्ही सगळे त्यांच्याकडे नुसते बघतच राहिलो. एवढा वेळ हा त्याचा कुत्रा नाही म्हणून भांडणारी इतर छोटी मुले त्याच्या मदतीला धावून गेली. “अरे शेजारच्या गल्लीत एक नवीन पांढरे कुत्रे आहे. जाऊन बघा” आणि परत त्यांच्या मागे धावत गेली.

    संध्याकाळी सोसायटीतील मुले खेळत होती. एकदा वाटले कि त्यांना विचारावे “अरे त्याचा कुत्रा मिळाला का?” पण मन घाबरले, कदाचित नाही ऐकण्याची माझ्या मनाची तयारी नसावी. पण मनोमन देवाला प्रार्थना करत होते कि “त्या लहान मुलाचा जॉली त्याला लवकर भेटू दे आणि या इवल्याशा चेहऱ्यावर परत खूप आनंद झळकू दे. तुझ्यावरच्या त्याच्या श्रद्धेला तडा नको जाऊ देऊ”.

    आणि स्वत:ला एक प्रश्न विचारावा असे वाटले की, “कधी कधी आपण आपल्या मुलांवर किती अन्याय करतो नाही?”

  • बस तारीख पे तारीख !

    पुरोगामी महाराष्ट्राला सुन्न करून सोडणारी एक बलात्काराची भीषण घटना नुकतीच महाराष्ट्रात घडली .अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्दी गावात एका अल्पवयीन मुलीवर काही नराधमांनी पाशवी अत्याचार केले गेले. शरीराला पिडा देण्यापासून तर सरळ जीव घेण्यापर्यंतच्या पिशाच्च वृत्तीचा परिचय आला.घटनेनंतर कोपर्दी व आसपासच्या लोकांनी तीव्र निदर्शने केली .संप झाला.बंद झाले.सम्पूर्ण महाराष्ट्रीय समाजाला तीव्र वेदना झाल्या .त्याचे पडसाद विधानसभा हादरवन्या पर्यंत उमटले.या घटनेचं गांभीर्य इतके घेतले गेले कि सैराट चित्रपटाला दोष देण्यापर्यंत काही लोकांच्या शब्दांनी मजल मारली .

    मूळ प्रश्न दूरच राहिला तर काही सेकुलर राजकारणी लोक जातीय टुरिझम करण्यात उतरले .एवढे क्रूर काम होऊनही राज्याचे मुख्यमंत्री केवळ आणि केवळ फाशीच मागणीच करू शकतात.राज्य्प्रमुखाला या प्रशासनिक व्यवस्थांमध्ये फक्त एवढेच अधिकार का आहेत? केवढे हे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे ?
    स्त्रीच्या जर केसालाही धक्का कोणी लावला तर त्याला टकमक टोकावरून दरीत फेकणारा ,सावित्रीला हात लावला म्हणून सैनिकाचे डोळे फोडणारा महाराष्ट्र कुठे आहे??भिवंडीच्या सुलतानी सुभेदाराची सून हाती आल्यावर तिला आईसाहेब संबोधणारे आमचे महाराज व तो काळ. मोगालादि शत्रूंच्या बायका हाती लागल्यावरही त्यांना साडीचोळी करणाऱ्या आमच्या सईबाई राणीसाहेब व त्यांची ती शिकवण .शिवाजी ओठीच का उरलाय फक्त? शिवाजी आपल्या व्यवस्था तन्त्रात का नाही?

    निर्भय कांडानंतर काय झाले? कोणता न्याय मिळाला? वयाच्या १८ वर्षे पूर्ण व्हायला फक्त २७ दिवस कमी होते म्हणून निर्भायाच्या बलात्कार्याला बालगुन्हेगार मानले गेले .३ वर्षे बालसुधारगृहात ठेवले गेले व नंतर सुटका झाली .अशा नराधमांसाठी जुवेनाईल जस्टीस act आहे देशात .अशा गुन्हेगारांना न्यायपालिका बालक किंवा लहान मुले कशी काय मानते? सर्वात जास्त अन्याय तर अरुणा शानबाग बरोबर झाला केइएम रुग्णालयातील या परीचारीकेवर सोहनलाल वाल्मिकी नामक उत्तर प्रदेशातील एका वार्ड बॉय ने इतका प्रचंड घातक अत्याचार केला कि अरुणा कोमात गेली आणि तेही थोडे थोडके नव्हे तर तब्बल ४२ वर्षे तिला लाइफ सपोर्ट सिस्टीम वर कोमात जगावे लागले .आणि या नराधमाला शिक्षा फक्त ७ वर्षे .आता तर तो सुखात जगतोय.

    जेव्हाही अशा घटना होतात समाज आंदोलन करतो.विविध संघटनांचे मोर्चे गावापासून शहरापर्यंत काढले जातात . मोठमोठी भाषणे होतात .राजकारणी लोक यात आपले हित साधतात .आश्वासने दिली जातात.निषेध व्यक्त होतो पण पुन्हा काय ??

    जैसे थे.
    आपल्याकडे स्त्री अत्याचाराची मूळ करणे व त्याचे समाधान यावर चर्चाच होत नाही वस्तुतः काय आहे न मेकॉले शिक्षण व्यवस्थेमुळे (बि)घडलेल्या भारतीयांना आपण कुठल्या व्यवस्थांच्या देशात राहतोय हेच ठाऊक नसते .हि न्यायव्यवस्था एवढी अन्याय कारक का झालीय आपल्या भारतीयांच्या समस्यांसाठी त्याचा व्यवस्थित उलगडा व्हावा म्हणूनच हा लेखणी प्रपंच .

    दामिनी चित्रपटातील सनी देओल चा डायलॉग तारीख पे तारीख बस तारीख पे तारीख हि या देशातल्या न्याय व्यवस्थेची खरी ओळख .इंग्रज भारतात १४ व्या शतकातच आले पण खरे इंग्रजी राज्य हे १८६१ नंतर म्हणजेच १८५७ चे स्वातंत्र्य समर संपल्यावरच आले.लुटायला सोपे जावे म्हणून इंग्रजांनी देशाला युनिफाइड स्वरूप दिले . आणि अर्थातच भारत लुटायचा म्हणजे एक केंद्रीकृत लुटीन्ग सिस्टीम देशभर असायलाच हवी न ?म्हणूनच मित्रांनो शिक्षण न्याय taxation पर्यंतच्या सर्व व्यवस्था ब्रिटिशांनी बनवल्या .गवर्नर जनरल लॉर्ड मेकॉलेने त्या आधीच भारतीय शिक्षण व्यवस्था उध्वस्थ केली होती .व त्याजागी गुलाम कारकून जन्माला घालणारी मेकॉले शिक्षण व्यवस्था जन्माला घालून तो न्याय प्रणालीकडे वळला .१८६१ ला इंग्रजांनी देल्ही पोलीस act बनवला ज्याच्या मसुद्यामध्ये असे लिहिले आहे कि कॉप्स आर एजेन्टस ऑफ गवरमेंट and नॉट फॉर पीपल्स केअर” म्हणजे पोलीस सरकारचे हस्तक म्हणून काम करतील जनतेसाठी स्वतंत्र यंत्रणा नाही किरण बेदिजींनी कित्येक वेळा अनेक वृत्त वाहिन्यांवर याबद्दल तीव्र विरोध प्रकट केलाय .ब्रिटीश तंत्राने या देशावर अधिकार गाजवायला हि न्यायप्रणाली अस्तित्वात आणली गेली
    .या व्यवस्थेला घडवायला ब्रिटीशांचे गवर्नर जनरल ,उच्चपदस्थ अधिकारी विविध आयसीएस अधिकारी तसेच हाउस of कॉमनस म्हणजेच इंग्लंडच्या संसदेतील खासदार कामाला लागले या सर्व कामात लॉर्ड मेकॉले तर जातीने लक्ष देऊ लागला होता .तेव्हा देशावर ब्रिटीश इस्ट india कंपनीचे राज्य होते.त्या कंपनीला देशातील सर्व कायदे व्यवस्था हाउस of कॉमन्स मधूनच पारित करून घ्यावे लागत असे भारतीय न्याय पालिका कशी असेल व ती कोणत्या प्रकारे व नियमांद्वारे न्यायदान करेल यासाठी एक मसुदा तयार करण्यात आला. तो मसुदा आज इंडिअन पेनल कोड अथवा भारतीय दंड विधान (भादंवि) या नावाने ओळखला जातो .हा ipc चा ड्राफ्ट जेव्हा मेकॉले ने अनुमोदन मागून पारित करायला इंग्लंडच्या संसदेमध्ये ठेवला .तेव्हा तत्कालीन इंग्रज खासदार व जागतिक ख्यातीचे कायदेतज्ञ सर एडमंड विर्क यांनी पुढील तीप्पानिद्वाते याबद्दलचे आपले अभिमत व्यक्त केले होते ते खाली देत आहोत .

    ‘कोणत्याही समृद्ध आणि प्रबुद्ध परंपरा , जीवनमान पद्धती असलेल्या सुसंस्कृत समाजाला व राष्ट्राला सरकारी अत्याचारांनी दारिद्र बनवाण्याकर्ता ,चरित्र भ्रष्ट होऊन भित्रे व कर्मदरिद्र ’ ,तसेच दुष्टांचे पक्षधर बनवून त्या समाजाच्या आतल्या मानवी भावनात्मक सद्गुणांचा सत्यांश करण्यासाठी यापेक्षा अधिक प्रभावी कायदे पुस्तिका लिहलीच जाऊ शकत नाही .आता अनेक वर्षापर्यंत भारत ब्रिटीशांच्या या अन्याय्तन्त्राच्या पिंजर्यात बंद,पंख छाटलेल्या पक्ष्यासारख फडफडत राहील शाब्बास मेकॉले तुझ्या या कामासाठी .वाह वाह क्या बात है !” -एडमंड विर्क

    सोप्या शब्दात सांगायचे असल्यात भारतीय न्याय्तन्त्र हे हजारो अपराधी सुटले तरी चालेल पण एक निरपराधी दंडित होऊ नये या तत्वावर चालते आहे.किंबहुना सर्व अपराधी हे निर्दोशाच कसे आहेत हेच काय ते सिद्ध करण्याची हि व्यवस्था बनलीय .तारखांवर तार्खांमुळे उशिर होतो.यावेळेत आरोपीला पळण्याचा मार्ग सापडतो .खोटे पूर्वे सादर करून राजकीय दबावतंत्र वापरून न्यायलाच खिळ घातली जाते .
    सर्वेक्षणे व काही न्यायप्रिय कायदे तज्ञानुसार भारतीय न्यायपालिका हि ६% कान्विक्शन रेट असणारी व्यवस्था झालीय.म्हणजेच १०० खटल्यांपैकी फक्त ६ खटले निकाली निघतात.शिक्षा घोषित होते पण शिक्षेची अंमलबजावणी मात्र सरकारच्या हाती असते .आणि आजकालची सरकारे तर नागपूर भुसावळ पसेंजर गाडीपेक्षाही आळशी आहेत .आमची गाडीतरी बरोबर एक वाजता शेगावला पोचवते पण हि सरकारे सुभानाल्लाह!

    भारतीयांवर हे इंग्रजी व्यवस्थांचे जोखड इतक्या खोलवर रुजवले गेले कि इंग्रजांच्या वेळचा वकील व न्याय्मुर्तीन्साठीचा तो काळा कोट देखील बदलला गेला नाही त्यासाठीदेखील इथेच लढावे लागले तेव्हा कुठे त्याचे बंधन काढले

    गेले .

    खरे स्वातंत्र्य हे अधुरे आहे का ? आजही इंग्रजांच्या संसदेतल्या व्यवस्थांचे जोखड धरून का जगतीय हि भारतमाता ? जर संविधानाने देशाला प्रजासत्ताक दिले तर मग हे ब्रिटीशकालीन सर्वच्या सर्व जसेच्या तसे कसे सुरु आहे .? डॉ आंबेडकरांनी जर ३ वर्षे मेहनत घेऊन ह्या व्यवस्था बनवल्या तर मग १९४८ ला नाथुरामला फाशी कोणत्या न्यायपालीकेद्वारे देण्यात आली? नव्या व्यवस्था का बनवल्या गेल्या नाहीत? प्रजसत्ताक म्हणने हे व्यर्थ आहे का? सावरकर, भगत सिंग सुभाश्चन्द्रांचे हे बलिदान व्यर्थ गेले का ? नेहरू व mountbatan मध्ये १४ ऑगस्ट च्या रात्री जो करार झाला तो संपूर्ण स्वातंत्र्याचा नसून फक्त ट्रान्स्फर of पावर चा करार आहे का?

    गेल्या दोन दशकात भारतीय जनमानसाने सर्वच प्रकारच्या आधुनिक क्रांतीला समर्थन केले आहे .उदारीकरण जागतिकीकरण एलेक्ट्रोनिक क्रांती सोशल मिडिया मिसाईल्स आदींच्या क्षेत्रात परिवर्तन झाले.पत्र ते मोबाईल ,साडी ते जीन्स ,धोतर ते trauser वृत्तपत्र ते ई-न्यूज पेपर गणपती बाप्पात ते लॉर्ड गणेशा वगरे सर्व बदल स्वीकारले किंवा केले गेलेच न? बँकांमध्ये कॉम्पुटर ,निवडणुकीमध्ये एलेक्ट्रीनिक वोटिंग मशीन पर्यंत आधुनिकता बदल झालेच नां ?

    भाषा भूषा भोजन देखील इतक्या एक्स्ट्रीम लेवेल वर बदलल्या गेलेच नां? मग हि न्यायव्यवस्था का नाही? ती का पावणेदोनशे वर्षे जुनीच,गरिबाला न परवडणारी,पीडितांना छळणारी,न्यायला तारखांवर तारीख देत उशीर करत सतत न्यायला हुलकावणी देणारी हि अन्यायव्यवस्था ?आंधळया न्यायदेवतेची उपासक हि न्यायपालिका? हि का बदलली जाऊ नये ?

    शिवछ्त्र्पतींपासून काय शिकावे ? शिवाजी म्हजे न्यायाची तत्परता अन्यायाचा पूर्ण बिमोड .शिवाजी हे जगण्याचे व जगवण्याचे अर्थव्यवस्थेपासून यतर भाषाशुद्धी पर्यंतचे एक व्यवस्था तंत्रही आहे हा साधा विचार देखील आज ७ दशके होऊनही राजकारणाला समाजाला अद्यापही का स्पर्शला नाही ? देशातील शेकडो न्यायमूर्ती आणि वकिलांनी हि ज्युडीशिअरी बदलण्याची मागणी केली आहे .व्यवस्था स्वतः बदलास अनुकूल आहे पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अडसर झालाय?

    गुंडागर्दी व बलात्कारासाठी प्रसिद्ध असलेल्या समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुल्लायम सिंग यादव एका कर्यक्रमात म्हणाले होते कि” बलात्कारियो को फासी नही होनी चाहिये बच्चे है हमारे छोटी मोटी गलतिया हो जाती है उनसे ,,इसका मतलब ये थोडी है कि आप उनको फासी दे दो ”

    असे नालायक निर्लज्ज नतद्रष्ट राजकारणी लोकच या भ्रष्टाचाराचे मूळ कारण आहेत .

    काही विचारक व मित्रांची याबद्दलची मते –

    १.सिस्रो नावाचे एक लेखक आपल्या वेजिटेबल vendar या पुस्तकात लिहितात कि कानून एक गधा है जीसपर बुद्धिमान चतुर लोग सवारी करते है और सामान्य लोग उसकी दुलत्ती खाते है .

    २.बनारसचे विख्यात साहित्य मनीशी श्री भारातेंदू हरिश्चंद्र यांनी भारताला अंधेर नगरिका ताजीराते शौहार उद्बोधून व्यंग नाटक लिहिले होते.ते उत्तर भारतात फार गाजले होते तेव्हा त्यावर नेहरूंनी बंदी आणली होती.

    ३.ये इंग्लीश law है इसे पुरी तरहसे बदल देना चाहिये तभ हि सच्चा न्याय आयेगा.

    –advocate प्रमिला नेसरगी कर्नाटक उच्च न्यायालय .

    ४.युरोप व अमेरिका खंडात न्यायपालिका अगदी उत्तम व त्वरित शिक्षा देणाऱ्या आहेत .भारताने त्या देशांकडून ज्युडीशिअल पोलीसीस शिकाव्या हेच खरे ग्लोबलायझेशन.

    -dr.प्रज्ञा देशपांडे लेखिका, नागपूर.

    ५.महिलान्माधीला वाढत्या अत्याचाराच्या प्रवृत्तीस या ज्युडीशिअरि मधल्या loopholes मुळेच बल मिळत आहे कडक शासन ण झाल्यामुळेच गुन्हेगारी वाढतीय .दिवसागणिक हा प्रश्न गंभीर होत चाललाय - वृषाली मोहिते बदलापूर ,मुंबई

    ६.आंपण आता बुलेट ट्रेन व दुरांतोच्या faaast युगात वावरतोय न मग हि न्यायव्यवस्था पसेंजर पेक्षाही उशिराची का ? सरकारी व्यवस्था आता update करण्याची गरज निर्माण झालीय.

    - श्रद्धा मराठे ,खामगाव.

    ७.जलदगती न्यायालयेसुद्धा ५-१० वर्षे घेतायत न्यायनिवाडा करायला जनसहभागातून सर्वत्र पोचणारी खर्च नसलेली व lacuna नसलेली नवीन न्यायपालिका तयार व्हायला हवीय

    – अंकित कलकोटवार ,नागपूर

    ८.भारताच्या संसदेत मध्यम वर्गीय युवा खासदारांचा प्रवेश झाला पाहिजे .new generation नक्कीच सिस्टीम स्पीड अप आणि करेक्ट करे

    –अमर अणे , पत्रकार नागपूर

    ९.शहाण्या माणसांनी कोर्टाची पायरी चढू नये हे पूर्वीचे बिरूद आता बदलायला पाहिजे .व्यवस्था परिवर्तनच भारताचा अभ्युदय करू शकते .-सत्यम मौन्देकर ,नागपूर

    १०.मराठा मोर्च्याच्या आंदोलकांनी शिवकालीन न्यायप्रणालीची मागणी करावी जेणेकरून मराठाच काय तर इतर सर्व महिलांना खरा न्याय मिळेल गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसेल .जवळपास ६०% आमदार व खासदार मराठा आहेत शिवाय पवारसाहेब मोदींचे गुरु आहेत मग बदलून टाका हि ब्रिटीश व्यवस्था .

    -- avinash bhosale

  • अंधभक्तांची गोची

    एकदा एक साधूसदृश बाबा बारमध्ये शिरले. तिथे जाताच तिथे बसलेले तरूण पोरं त्यानां पाहुन हसायला लागले.

  • गृहनिर्माण संस्थेचे हेल्थ चेकअप कसे कराल ?

    येणाऱ्या नवीन सहकार वर्षात, सदस्य आणि संस्थेचे पदाधिकारी यांत परस्पर सौदाह्याचे, आनंदाचे व सहकार्याचे वातावरण तयार करण्यास तसेच होणाऱ्या चुका कमी करण्याबाबत काय करावे? असा प्रश्न एका सदस्याने विचारला. “Precaution is always better than cure”. याचे उत्तर ज्या प्रमाणे इन्कमटॅक्स साठी CA, आजारी पडलात की डॉक्टर, त्याप्रमाणे आपण स्वत: आपला मौल्यवान वेळ कायद्याची पुस्तके वाचून चुकीचे निर्णय घेण्याआधी योग्य कायदेतज्ञ यांचा सल्ला आपल्याला नक्कीच उपयोगी येईल. बहुतेक लोकांना उपविधी म्हणजे कायदा किंवा एखादा सोशल मिडिया मेसेज हा आपल्या मनासारखा असेल तर बरोबर अशी चुकीची समजूत असते. आज या लेखात तुम्हाला सदस्यांनी काय काळजी घ्यावी याची माहिती देत आहे.

  • श्री त्र्यंबकेश्वर

    विष्णूसह महेश तेथेच ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात राहिले. हे ज्योतिर्लिंग खरोखर आगळेवेगळे आहे. कारण इथली पिंड साळुंकेश्वर नसून एका खोलगट भागात अंगुष्ठाप्रमाणे तीन लिंग आहेत.