आनंद लिमये
या टोलसंस्कृतीची सुरुवात ज्यांनी केली तेच आता बोंबा मारतायत. मजाच आहे.
आपण नुस्तं बघत बसायचं. हातावर हात चोळत बसायचं.... जमलंच तर चार शिव्या हासडायच्या.. अगदिच पेटलो तर टोलनाक्यावरच्या माणसाला एक पेटवून द्यायची
आणि बाजूने एखाद्या VIP ची गाडी टोल न भरता सूसाट जाताना बघायची.
हीच आहे आपल्यासारख्या सामान्य माणसाची लायकी
आनंद लिमये
ज्ञानेशांचा मागोवा तसा अनेक वर्षे घेत होतो. आसपासच्या माणसांच्या वागण्याचा अर्थ लावता लावता बासनात गुंडाळलेले ज्ञानेश कधी जीविचा जीव झाले कळलेच नाही. पण हे सहज घडले नाही. अनेक मोठे मोठे धोंडे या गुरुवतीच्या ग्रंथात व माझ्यामध्ये अनेक वर्षे थटून राहिले होते.
आता दुनियेत| होती खूप हाल|
सुकलेत गाल| शोषितांचे||१||
पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||
करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
नाही मला भान|देवा आता||३||
थोडी जनसेवा| हातून घडावी|
साथ रे मिळावी| देवराया||४||
भाव पामराचा| समजून घ्यावा|
आशिष असावा| देवा तुझा||५||
पुसू देत डोळे| भरवू दे घास|
जगण्याची आस| वाढो त्यांची||६||
अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||
-- महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले (ऋतुराज)
दि. २२/०९/२०१९
कथक ही एक भारतीय नृत्यशैली आहे. भारतातील आठ शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी कथक एक आहे. कथक ही प्राचीन शैली मानली जाते कारण तिचा उल्लेख महाभारतातही केलेला आहे.हल्लीच्या काळात या नृत्यप्रकारामधून कृष्ण कथा सादर केल्या जातात.कथक ह्या शब्दाचा उगम 'कथा कहे सो कथक' असा सांगितला जाते. म्हणजेच हावभाव आणि हाताच्या व पायाच्या हालचाली वापरून कथा सांगणाऱ्या व्यक्तींपासून कथक हा शब्द आला असे म्हटले जाते. याचाच दुसरा अर्थ कथा सांगणारी शैली म्हणजे कथक असा होतो.
कथकची तीन प्रमुख घराणी आहेत - जयपूर, लखनउ आणि बनारस. फारसे प्रचलित नसलेले रायगढ घराणे ही कथक या नृत्यशैलीचे उगमस्थान आहे.
जयपूर घराणे : राजस्थानमधील राजा कच्छवा यांच्या दरबारात ज्या विविध प्रकारचे फुटवर्क,चक्कर आणि तालाच्या विभिन्न प्रकारांचा उगम झाला ते जयपूर घराणे. पखवाज हे वाद्य जयपूर घराण्यातील नृत्यप्रकारात जास्त वापरले जाते.
लखनऊ घराणे: अवध राज्यातील नवाब वाजिद अली शाह यांच्या दरबारात ज्या कलात्मक रचना, ठुमरी या अभिनयांबरोबर शाब्दिक अभिनय व काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा उगम झाला ते लखनऊ घराणे. सध्याच्या काळात अच्छन महाराज यांचे पूत्र पंडित बिरजू महाराज हे लखनऊ घराण्यातील कथक नृत्याचे प्रमुख प्रतिनिधी मानले जातात.
बनारस घराणे : प्रसिध्द साहित्यिकांमधील एक जानकी प्रसाद यांच्यापासून कथकमधील बनारस घराण्याचा उगम झाला. या घराण्यात नटवरी नृत्याचा जास्तीत जास्त वापर केला जातो. यातील घेरे (चक्कर) डाव्या व उजव्या दोन्ही बाजूंनी घेतले जातात.
रायगढ घराणे : छत्तीसगडचे महाराज चक्रधार सिंह यांच्याकडे कथकमधील रायगढ घराणे जन्माला आले. यात तबल्याचा जास्त वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या नृत्यशैली,कलाकारांमधील एकात्मता आणि तबल्याच्या विविध रचना यांमुळे या घराण्यातील नृत्यशैलीला वेगळेच महत्व प्राप्त होते. पंडित कार्तिक राम, पंडित फिर्तु महाराज, पंडित कल्याणदास महांत व पंडित बरमानलक हे ह्या घराण्यातील नृत्यशैलीचे प्रतिनिधी मानले जातात.
इतर शास्त्रीय नृत्य प्रकारांच्या तुलनेत कथक मध्ये पाय ताठ ठेवले जातात. हा कथक वरील मुघल प्रभावामुळे झालेला बदल आहे असे मानले जाते.
-- पूजा प्रधान
अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांच्या नोव्हेंबरमधील नियोजित भारतभेटीची सध्या तयारी सुरू आहे. या भेटीतून भारत-अमेरिका संबंधांना काही नवे वळण लागेल का ? अण्वस्त्र नष्ट करण्याचा कार्यक्रम आखून शांततापूर्ण जगाची उभारणी करण्यात दोन्ही देश पुढाकार घेतील का ? त्यासाठी आवश्यक ते धैर्य दाखवण्याची दोन्ही नेत्यांची तयारी आहे का ? ओबामा यांच्या भेटीच्या निमित्ताने हे प्रश्न आधी चर्चिले जायला हवेत.
सर्व सामान्य नागरिकांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्हणजे वारस विषयक कायद्यातील तरतुदी. ह्या तरतुदी अत्यंत किचकट असून भारतात हिंदूंसाठी (बौद्ध, शीख, जैन, ब्राह्मण समाज,आर्यसमाज, नंबुद्री, लिंगायत) ‘हिंदू वारसा कायदा’, मुस्लिमांसाठी‘मुस्लिम वारसा कायदा’ तर पारसी, ख्रिश्चन, अंग्लो इंडियन आणि इतर सर्व धर्मियांसाठी ‘भारतीय वारसा कायदा’ यातील तरतुदी पहाव्या लागतात.
केसातील कोंडा घालवण्याचे सोपे उपाय
एकदा एका लावणीच्या कार्यक्रमाला पु. ल. देशपांडे यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रम संपल्या नंतर सभागृहात लावणी कलावंताने पुलंना म्हटलं...
‘‘तुम्ही बी तमासगीर हायसा नव्हं!’’
तेव्हा पुलं उत्तरले, ‘एखाद्या कलाकाराने छानसं गायन केलं किंवा अभिनेत्याने नाटक सादर केलं किंवा नतर्कीने नृत्य साकारले, वादकाने सुमधुर वाद्य झंकारले तर त्याला परफॉर्मन्स आर्टिस्ट म्हटल जात, तर त्याच ताकदीने लावणी सादर करणाऱ्या कलावंताना तमासगीर म्हटल जातं.’
खरोखरच आपल्या प्रतिभासंपन्न शब्दसंचाराने गदिमांच्या लेखणीतून प्रत्यक्षात शारदेचं वरदान उमटलं, तर बाबुजींच्या स्वरझंकारातून सरस्वतीच्या सुरेल सुरांचे सप्तक झळाळले आणि पुलंच्या लेखणीतून श्रीविष्णूंचं संगीतमय शब्दलालित्य दृगोचर झालं. या गदिमा, बाबुजी आणि पुलंच्या प्रतिभात्रिवेणीतून जन्माला आलेलं मराठी कलासाहित्य अभिजात आहे आणि कलाकार तमासगीरच आहेत. कारण तमाशा म्हणजे काय...
‘तमापासून आशेपर्यंत रंगत जाणारा खेळ म्हणजे तमाशा!’’
तम म्हणजे अंधारापासून आशेच्या प्रकाशापर्यंत जाण्याचा मार्ग तो तमाशा. हा खेळ मग कोणी निखळ आनंद देणाऱ्या गीतलेखणाद्वारे तर कुणी सकस अभिनयाद्वारे तर आणखी कुणी मनोहारी नृत्याद्वारे साकार करताना स्वत:सह जनसागराला असीम आनंदात डुंबवतो, तो कलावंत तमापासून आशा-अपेक्षांपर्यंत रंगत जाणारा खेळ सादर करतो, तो ख़ऱ्या अर्थाने तमासगीरच म्हणावयास हवा आणि त्या सादरीकरणास तमाशा म्हणावयास हवं.
निवेदिका अनघा मोडक बोलत होत्या. कोमल मृदु वाणीने चोखंदळ रसिक प्रेक्षक तल्लीन होत होते. त्यांनी अभ्यासू प्रतिभेतून निवेदनाची अलितीय पण समयोचित मांडणी करीत, नवनवीन गोष्टींनी अवघ्या सभागृहाच्या मनावर राज्य केल. याच तल्लीनतेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला तो स्वरभास्कर नचिकेत देसाई यांनी प्रस्तुत केलेला ‘कानडा राजा पंढरीचा’ हा गदिमा, बाबुजींचा अभंग. विठ्ठलनामाच्या गजराने भक्तिरसात चिंब न्हालेल्या श्रोत्यांनी मग ताल धरला तो नचिकेतच्या सुरेल गळ्यातील पल्लेदार तानेवर आणि नजाकतीने गायलेल्या हरकतीवर.
हा होता क्लायमॅक्स !
सुरेल गळ्याच्या गायिका सोनाली कर्णिक, दीप्ती रेगे, सानिया पंडित यांनी स्वरसाज चढविला तर संगीत संयोजक प्रशांत लळीत, व्यवस्थापक आणि तबला स्वप्निल पंडित, तसेच प्रसन्न पंडित आॅक्टोपॅडवर मोहिते तर तालवाद्यांवर माळी यांनी उत्तम साथ दिल्यामुळे कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. या स्वरांजलीची तरल स्पंदने आसमंत व्यापून गेली.
खरंतर, हाऊसफुल्ल श्रोतृगण आणि मी सलग सव्वातीन तास एकदा खुर्चीवर जे बसलो तो कार्यक्रम संपेपर्यंत... या अप्रतिम मंत्रमुग्ध करणाऱ्या अदाकारीने
एवढा प्रभावित झालो की अगदी ब्रह्मानंद मिळाला... ब्रह्मानंद मिळाला... दुसरे शब्दच नाहीत!
यशवंतराव प्रतिष्ठान नवी मुंबई आणि साहित्य मंदिराच्या संयुक्त विद्यमाने साहित्य मंदिर, वाशी, नवी मुंबई येथे साकारलेला स्वरतीर्थ हा संगीतमय नजराना म्हणजे लाखमोलाची संधी आम्हाला विनामूल्य प्राप्त झाली त्याबद्दल आयोजकांचे मन:पूर्वक धन्यवाद!
लेखक : घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/
सायंकाळी आम्ही दुर्गा गार्डन मध्ये नशा करत बसलो असताना बाहेर च्या रस्त्यावर जरा गोंधळ वाटला अनेक तरुण घोळक्याने रस्त्यावर जमले होते , आमच्या लक्षात आले की दुपारीच त्यावेळच्या विद्यमान पंतप्रधान ‘ इंदिरा गांधी ‘ यांच्यावर त्यांच्या सुरक्षा रक्षकांनीच गोळ्या घातल्याची बातमी रेडिओवर प्रसारित झाली होती ,
Copyright © 2025 | Marathisrushti