(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वाघांचा प्रदेश – ताडोबातील तेलिया तलाव

    जंगलातील मध्यात असलेल्या तेलिया तलावाचे पाणी इतके संथ, नितळ व निस्तब्ध पाहून आपण अवाकच होतो. समोरच्या डोंगराचे त्यात पडलेले प्रतिबिंब. वर शुभ्र निळे आकाश. दहा मिनिटे निस्सिम शांततेत जंगल न्याहाळण्याचा आनंद वर्णनातीत होता.

  • प्रेमकवी सावरकर

    एकदा आचार्य अत्रे आणि प्रा. फडके यांच्यात प्रचंड वादविवाद झाले तेव्हा फडके म्हणाले, अत्रे नेहमी फडकेंच्या साहित्यावर टीका करताना म्हणतात की त्यात अश्लील, बिभत्स प्रसंग रगविलेले आहेत, पण ते सावरकरांच्या साहित्यातील तशा वर्णनाच्या वाटेला जात नाही. त्यावर अत्रे म्हणाले, फडके यांनी केलेली बलात्काराची वर्णने वाचली की त्या वाचकाला आपणही असा बलात्कार करावा असे वाटू लागते.

  • मराठी माध्यमात शिकल्याने काय कमावले? न शिकल्याने काय गमावले?

    ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.

  • निवडणूक

    एकदा एक ससा
    निवडणूकीला उभा
    कासव होते विरोधी
    घेत पाण्यावर सभा

    जंगलात म्हणे देईन
    प्राण्यांना बांधून घर
    फळे वाटून कासवाने
    भरपूर केला प्रचार

    आश्वासनांची वाटून
    स्वप्ननगरी खैरात
    ससा झोपला बागेत
    जोराजोराने घोरत

    कासव मोठे हुशार
    त्याने दिला कानमंत्र
    ऑनलाईन प्रचाराचे
    आणले नविनच तंत्र

    सशाच्या झोपीने बघा
    पडे मतांचा भोपळा
    कासवाची निघे रॅली
    प्राणी विजयी सोहळा

    -- विठ्ठल जाधव.

    संपर्क: ९४२१४४२९९५

    शिरूरकासार, बीड

  • भारतमातेच्या वीरांगना – २७ – अहिल्याबाई रांगणेकर

    १९४२ चा वणवा भारतभर पेटला. अहिल्याबाई त्यावेळी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज ला शिकत होत्या. विद्यार्थ्यांनी सुद्धा ह्यात भाग घ्यावा म्हणून सगळ्या विदयार्थ्यांना एकत्रित केले आणि “चलेजाव” चळवळीत भाग घेतला, साडे तीन महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. फ्लस्वरूप फर्ग्युसन कॉलेज ने त्यांना पुढील शिक्षणासाठी बंदी केली.

  • दिलासा ट्रस्ट

    दिलासा ट्रस्ट ही डोंबिवली येथील संस्था स्पास्टिक्स (सेरेब्रल पाल्सी) या व्याधीने ग्रासलेल्या मुलांच्या संदर्भात उल्लेखनीय कार्य करीत आहे. सुरवातीला सामाजिक कार्याची आवड असलेल्या काही महिला एकत्र आल्या आणि मग त्यांना एका संस्थेची गरज वाटु लागली आणि त्यातूनच सन २००० मध्ये ही संस्था स्थापन झाली.

  • भारतमातेच्या वीरांगना – 19 – बिना दास

    बिनाजींचा पदवीदान समारंभ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या समारंभ साठी बंगाल चे गव्हर्नर स्टेनली जॅक्सन येणार होते. बिनाजीं ने आपल्या सह क्रांतिकारी कमला दास गुप्ता ह्यांच्याकरवी एक पिस्तुल मिळवले. स्टेनली जसे सभागृहात आले त्यांच्यावर बिना जींने गोळी झाडली, ती त्यांना न लागता त्यांच्या कानाजवळून गेली आणि स्टेनली जमिनीवर झोपले.

  • पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना

    पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना --

    भारतात - महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.

    नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात

    लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात.

    कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस यासाठी निवडला आहे. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहीरात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.

    कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.

    मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.

    विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.

    चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते.

    जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरीम्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्‍या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात.

    इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.

    जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.

    रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.

    मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.

    हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात

    मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात – दिआ द ला मुरतोस – हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.

    अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवारमनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी.

    ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

    याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील. बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या त्या कृती त्या त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील. जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल – पाप – लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत. रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्‍यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते. -

    अधिक माहितीसाठी पहा.

    http://epaper.eprabhat.net/337780/Rupgandh/Rupagandh#page/9/1. श्राद्ध वगैरे कल्पना ब्राह्मणांनी समाजाला लुटायला निर्माण केल्या असा घाणेरडा आरोप करणाऱ्यांनी वरील माहिती लक्षात घ्यावी.

  • फक्त हिमतीने लढ

    घरटे उडते वादळात
    बिळा, वारूळात पाणी शिरते
    कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ?
    म्हणून आत्महत्या करते ?

    प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही
    शिकार मिळाली नाही म्हणून
    कधीच अनूदान मागत नाही

    घरकुला साठी मुंगी
    करत नाही अर्ज
    स्वतःच उभारते वारूळ
    कोण देतो गृहकर्ज ?

    हात नाहीत सुगरणी ला
    फक्त चोच घेउन जगते
    स्वतःच विणते घरटे छान
    कोणतं पॅकेज मागते ?

    कुणीही नाही पाठी
    तरी तक्रार नाही ओठी
    निवेदन घेउन चिमणी
    फिरते का कोणत्या योजनेसाठी ?

    घरधन्याच्या संरक्षणाला
    धाऊन येतो कुत्रा
    लाईफ इन्शुरन्स काढला का ?
    अस विचारत नाही मित्रा

    राब राब राबून बैल
    कमाउन धन देतात
    सांगा बरं कुणाकडून
    ते निवृत्ती वेतन घेतात ?

    कष्टकर्याची जात आपली
    आपणही हे शिकलं पाहिजे
    पिंपळाच्या रोपा सारखं
    पाषाणावर टिकलं पाहिजे

    कोण करतो सांगा त्यांना
    पुरस्काराने सन्मानित
    तरीही मोर फुलवतो पिसारा
    अन कोकिळ गाते मंजुळ गीत

    मधमाशीची दृष्टी ठेव
    फुलांची काही कमी नाही
    मधाच्या पोळ्यासाठी मित्रा
    कोणतीच रोजगार हमी नाही

    घाबरू नको कर्जाला
    भय, चिंता फासावर टांग
    जिव एवढा स्वस्त नाही
    सावकाराला ठणकाऊण सांग

    काळ्या आईचा लेक कधी
    संकटापुढे झुकला का ?
    कितीही तापला सुर्य तरी
    समुद्र कधी सुकला का ?

    निर्धाराच्या वाटेवर
    टाक निर्भीडपणे पाय
    तु फक्त विश्वास ठेव
    पुन्हा सुगी देईल धरणी माय

    निर्धाराने जिंकु आपण
    पुन्हा यशाचा गड
    आयुष्याची लढाई
    फक्त हिमतीने लढ

    फक्त हिमतीने लढ

    !! आवडली तर इतरांनाही पाठवा !!

    ऍड. अनंत खेळकर,
    अकोला

  • आत्महत्या

    हल्लीच्या जगातील आत्महात्येच्या वाढत्या प्रमाणाबद्दल शोध घेणारा हा छोटासा लेख