(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वॉकी टॉकी

    दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले.

  • स्वामी भगवान श्रीकृष्णांचे पाचवे अवतार आणि महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर स्वामींचे भिंगारला वास्तव्य

    या देवस्थानचा राज्यशशासनाने तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून विकास व्हावा, अशी भाविकांची अपेक्षा आहे.

  • करंज्यांचा ” ब्युटिशियन ” !

    माझ्या संग्रहातील विविध " कातणी " !

    नवरात्र आणि दसऱ्याची धावपळ संपली की साहजिकच दिवाळीचे वेध लागतात. सगळ्या आघाड्यांवर जोरदार तयारी सुरु होते. दिवाळीचा सण साजरा करण्याचा एक महत्वाचा पैलू म्हणजे फराळ आणि मराठी फराळातील करंज्या हा अगदी महत्वाचा आणि शुभ पदार्थ आहे. फराळाचे पदार्थ बनवायला करंज्या बनवून शुभ मुहूर्त केला जातो. लग्न-मुंजीत केळवणांसाठी, मुंजीत भिक्षावळीसाठी, रुखवत, मातृभोजन इत्यादींमध्ये करंजीचा मान मोठा ! गंमत म्हणजे करंज्या करतांना एक तरी मोदक करण्याची आणि मोदक करतांना एक तरी करंजी करण्याची प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. सुमारे ५५ -५६ वर्षांपूर्वी मी माझ्या आजीला याबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली " अरे, भावाला बहीण नको का ?"... किती सहज आणि अर्थपूर्ण कारण आहे हे ! लाटलेल्या पुरीत पुरण / सारण भरून ती दुमडली की अर्धचक्राकार कडा दाबून बंद करायची. ती कडा नाजूकपणे कातरून काढल्याशिवाय ती करंजी सुंदर दिसतच नाही. कडा जर नुसतीच मुडपून जरी छान आकार दिला तरीही कातरलेल्या करंजीचे रूपच अधिक
    भावते. याच पद्धतीने शंकरपाळे आणि पोह्याच्या पापडाची मिरगुंडेही कातरली जातात. करंजीलाहे सुंदर रूप बहाल करणारा करंजीचा ब्युटिशियन म्हणजेच " कातणे" !!

    माझ्या संग्रहात अशी अनेक, खूप जुनी आणि नवीही कातणी आहेत. पितळ, लोखंड, तांबे, स्टेनलेस स्टील अशा धातूंपासून ती बनविलेली असली तरी एक कातणे चक्क लाकडाचे आहे तर एक पितळी डबीसारखे आहे. या कातण्यांवर पोपट मोर असे पक्षीही आहेत. माशाच्या आकाराचे कातणे जड आहे. कांहींच्या मागे असलेला चमचा हा सारण भरण्यासाठी आहे. काहींवर वाघसिंहांहून श्रेष्ठ अशा याली या पौराणिक प्राण्याचे मुख आढळते. त्रिकोनी नक्षी पाडणारे, बारीक भोकं पडणारे, छान नागमोडी वळण देणाऱ्या अशा दात्यांची चक्रे कातण्यांना बसवलेली आहेत. एका कातण्यावर बोट ठेवायला छोटासा आधार आहे, मोठ्या प्रमाणावर शंकरपाळे आणि मिरगुंडे कातरायची असतील तर त्यासाठी खास लाटणेही आहे. विदेशी पर्यटक, जुन्या बाजारात ही कातणी Indian Pizza Cuter म्हणून मोठ्या औत्सुक्याने खरेदी करतात. अशा या करंज्यांना सौन्दर्य बहाल करणाऱ्या कातण्यांची ही एक झलक !

    -मकरंद करंदीकर.

  • लॉक डाऊन नंतरचं साहित्यविश्व….

    लॉकडाऊन नंतरच्या काळात जग बदलणार आहे असं म्हणतात. या बदललेल्या जगात जशी आपली जीवनशैली बदलेल तसाच सर्व क्षेत्रातील व्यवसाय / उद्योगधंद्यांवर याचा परिणाम होणार आहे.

    साहित्य क्षेत्र याला अपवाद असेल का? या बदलत्या जगाचा साहित्य क्षेत्रावर काय परिणाम होईल? पुस्तक प्रकाशन व्यवसायाचं भवितव्य काय असेल ? वाचनालयांचे भवितव्य काय असेल? असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात.

    तुम्हाला यावर काय वाटतं? याच विषयावर एक लेख लिहा. किमान शंभर शब्द. जास्तीत जास्त शब्दांना कोणतीही मर्यादा नाही.

    आपले लेख सोमवार दिनांक १ जून २०२० पर्यंत पाठवा.

    आपले लेख `मराठीसृष्टी' वर प्रकाशित होतील. तसेच निवडक लेखांचे एक इ-बुक प्रकाशित केले जाईल

    खालील गुगल फॉर्म वर लिहायला सुरुवात करा...

    Loading…

  • संत ज्ञानेश्वर (१९४०)

    संत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय..

  • मुंबईतील दळणवळण साधनांचा रंजक मागोवा

    होडी ते मेट्रो असे मुंबईतील दळणवळणाच्या इतिहासाचे टप्पे. “बॅक टू स्क्वेअर वन” किंवा “हिस्टरी रिपिटस इटसेल्फ” असे म्हणतात ते उगीचच नाही.

  • वणवा खरच पेट घेत आहे….. वगेरे कांही नाही

    यावर प्रतिक्रिया अवश्य द्या आणि त्याच बरोबर पर्यायी शब्द भांडार कसे वाढेल या करता ठोस यंत्रणा उभी करावी लागेल.तरच मराठीला भविष्य आहे.

    धर्म ही अफूची गोळी आहे हे सत्य मानलं तर मालिका या अधिक प्रभावी अफूच्या गोळ्या म्हणाव्या लागतील.

  • तक्कु (खाद्ययात्रा)

  • आठवावेसे वाटले म्हणून( उत्तरार्ध )

    टीब्रेक' नंतर गोलंदाजांनी आपला एण्ड बदलावा तसा विषय बदलून मी गाडी हळूच त्यांच्या करीअरकडे वळवतो. गाडी मला हव्या त्या स्टेशनवर ,इंग्लंडच्या १९६३/६४ च्या भारत दौऱ्यावर येऊन थांबते.पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला, १० जानेवारी ते १५ जानेवारी १९६४ दरम्यान खेळला गेलेला, मद्रासच्या नेहरु स्टेडियमवरचा कसोटी सामना. दुसऱ्या दिवसअखेर धावफलक .....
    भारत..पहिला डाव....७ बाद ४५७
    ( डाव घोषित.... बुधी कुंदरन-१९२,विजय मांजरेकर-१०८ )
    इंग्लंड... पहिला डाव....२ बाद ६३
    १२ जानेवारी..... सामन्याचा तिसरा दिवस. लकाकी गेलेला चेंडू भारताचा तरणाबांड कर्णधार मन्सूर अली खान पतौडी बापूंच्या हातात देतो. पहिल्याच कसोटीत पराभवाचे काळे ढग इंग्लंडच्या डोक्यावर जमा होत असतात.

    अंगात ब्रिटिश खडूसपणा पुरेपूर भिनलेली बोलूस आणि केन बँरींग्टन ही जोडी मैदानात असते. आणि त्यादिवशी नकळत, यापुढे कोणाच्या स्वप्नातही मोडला जाण्याची सुतराम शक्यता नसलेला एक जागतिक विक्रम नोंदला जातो. त्या दिवशी बापू सलग २१ षटके ( अगदी नेमके सांगायचे तर १३१ चेंडू ) निर्धाव टाकतात.( आजच्या २०-२० च्या जमान्यात एक डाव १२० चेंडूंचा असतो,म्हणजे विचार करा.) बोलूस ८८ ( ४१५ चेंडू ) आणि बँरींग्टन ८० (३१२ चेंडू ), हे दोघेही आलटूनपालटून बापूंचे षटक सुरु असताना नॉनष्ट्रायकर एण्डला , बॅटवर रेलून हलकीशी डुलकी घ्यायचे अशी सत्याच्या सीमारेषेवर रेंगाळणारी आख्यायिका चेपॉकच्या "मद्रास कॅफे" मधे अगदी आत्ताआत्तापर्यंत सांगितली जात असे.चौथ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव ( शेवटी एकदाचा ) संपतो तेव्हा बापूंचे पृथःकरण असते ३२-२७-५-० . आणि दुसऱ्या डावात ६-४-६-२.

    "हे दोघे लेकाचे माझ्या बॉलिंगवर बॅटच उचलणार नसतील तर मला विकेट मिळणारच कशी ?"
    बापू २५ वर्षांपूर्वीच्या त्या दिवसांचे असे काही वर्णन करतात की आत्ताच बत्तीसावे षटक संपवून ते पॅव्हेलियनमधे परतले असावेत. इतिहासाचे बोट धरुन मद्रासच्या नेहरु स्टेडियमवर चक्कर मारुन आल्याचा मला भास होतो. वयाच्या ५७ व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यात दिसणारी चमक मला थरारुन टाकते. तो दिवस त्यांचा होता, फक्त त्यांचाच. त्या दिवशी त्यांनी डोळ्याला पट्टी बांधून गोलंदाजी केली असती तरी ती अचूक टप्प्यावरच पडली असती. इतिहासाच्या दुर्मिळ पानांतील एक अजरामर सुवर्णपान आपल्या नावानं लिहिलं जाण्याचं भाग्य आयुष्यात किती जणांना लाभतं ?
    शायर शकील बदायुनी म्हणतो, सवाल उनका, जवाब उनका, सुकूत उनका, खिताब उनका
    हम उनकी अंजुमन में सर न करते ख़म , तो क्या करते ।
    "अजून एक चहा घेणार का ?" बापू आस्थेने विचारतात. त्या क्षणी बापूंनी सांगितलं असतं तर मी उकळत्या चहाच्या पातेल्यात उडीदेखिल मारली असती.

    'नाही.... नको... मी येतो आता'...
    जवळजवळ पाऊणएक तास झालेला असतो. मी जायला निघतो.

    "पुन्हा कधी आलात या बाजूला तर नक्की या! आता तुम्हाला अँपॉईंमेंटची गरज नाही"...बापू मला प्रेमाने निरोप देतात.
    मी कशासाठी आलो होतो हे बापू पार विसरुन गेलेले असतात.( आणि मी तर ते लक्षात ठेवण्याचा प्रश्नच नसतो. जिथं खुद्द भगवान श्रीकृष्णाच्या तोंडून भगवद्गीता ऐकली त्या कुरुक्षेत्रावर घोड्यांना खरारा करण्याचं काम कोण करणार ?)
    युनोच्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत भारताविरुद्ध वापरण्यासाठी चीनने आपला 'व्हेटो' जपून ठेवावा तसे बापूंनी दिलेले आमंत्रण मी आठवणींच्या कालकुपीत जपून ठेवलंय.

    मला खात्री आहे , स्वर्गातल्या "इंद्रप्रस्थ" स्टेडियममधे , त्या आमंत्रणाच्या जोरावर मला VVIP स्टँडमधे सहज प्रवेश मिळेल. तिथे कर्णधार इंद्राचा 'देवेन्द्र' संघ विरुध्द मन्सूर अली खान पतौडीच्या 'भारतीय' संघातील कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ सुरु असेल. नाणेफेक जिंकून 'ब्रम्हा' आणि 'विष्णू' हे देवेंद्र संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानात उतरले असतील. रमाकांत देसाईच्या अनुपस्थितीमुळे दुबळी झालेली भारतीय वेगवान गोलंदाजी फोडून काढत "ब्रम्हा-विष्णूंनी", आणि खास करुन विष्णूंनी जोरदार सुरुवात केली असेल.( रमाकांत देसाईंचा तर वेगळाच किस्सा असेल. अजून { मेल्यावरही } रमाकांत माझ्या स्वप्नात येतो आणि पहिल्या चेंडूवर माझी विकेट काढतो अशी तक्रार हनिफ मोहम्मदने धन्वंतरी ऋषींकडे केली असेल. त्याचा हा मानसिक आजार कायमचा दूर करण्यासाठी तू स्वतः हनिफला घेऊन माझ्या आश्रमात ये अशी विनंती खुद्द धन्वंतरी ऋषींनी रमाकांतला करुन नेमकी आजचीच वेळ दिली असेल. त्यामुळे सज्जन व पापभिरु रमाकांत , विजय मर्चंटसरांची विशेष परवानगी घेऊन, हनिफला स्कुटरवर मागे बसवून धन्वंतरी ऋषींच्या आश्रमात गेला असेल.)

    उपहारापूर्वी शतक करुन व्हिक्टर ट्रम्पर , चार्ल्स मॅकॅर्टनी,डॉन ब्रॅडमन, माजीद खान ,डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवनच्या पंक्तीत बसण्याचे आणि हे शतक लक्ष्मीला तिच्या वाढदिवसाची 'खास भेट' म्हणून अर्पण करण्याचे मांडे विष्णुजी मनातल्या मनात खात असतील.लेगस्पिनरला त्याचा टप्पा मिळून द्यायचा नाही या विक्स ,वॉरेल व वॉलकॉट या वेस्ट इंडियन त्रयीने शिकविलेल्या अलिखित नियमानुसार सुभाष गुप्तेच्या पहिल्याच षटकात त्याने कव्हर ड्राइव्हजच्या दोन खणखणीत चौकारांसह ११ धावा वसूल केल्या असतील. चिंतेत पडलेला भारताचा सर्वोत्कृष्ट कर्णधार (अर्थात महेंद्रसिंग धोनी व सौरभ गांगुलीची क्षमा मागून ) मन्सूर अली खान पतौडी मग भारताच्या सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकाशी ( अर्थात फारुख इंजिनीअर व सय्यद किरमाणीची क्षमा मागून ) नरेन ताम्हाणेशी सल्लामसलत करेल.

    इतका वेळ थर्डमॅनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या, कोणाच्या नजरेत न भरलेल्या एका कृश खेळाडूला हाक मारुन , त्याच्याशी दोन शब्द बोलून कर्णधार निर्धास्तपणे त्याच्या हाती चेंडू सोपवेल. त्याला पहाताच इतका वेळ विव्ह रिचर्डसच्या मिजाशीत वावरणाऱ्या विष्णूंच्या चेहेऱ्याचा रंगच उडेल. उपहारापूर्वी तर सोडाच पण दिवसभरात आपले शतक पूर्ण झाले तरी नशीब असे नासिर हुसेन अधिक मनमोहन कृष्णसारखे रडके भाव त्याच्या चेहेऱ्यावर येतील. आणि आपले ठेवणीतले स्मितहास्य करत , साडेचार पांच पावलांचा स्टार्ट घेत, 'नरक' एंडकडून "बापू" पहिल्या चेंडूपासून, गुडलेंग्थ स्पॉटवर चेंडूंचा चुंबक ठेवल्यागत,अचूक डावखुरी गोलंदाजी सुरु करतील. आता बराच वेळ आपल्याला काही काम नाही या खात्रीने रंभा, मेनका व उर्वशी या चिअरगर्ल्स फ्रेशरुमकडे वळतील. आणि प्रत्यक्ष देवांची सुरु झालेली साडेसाती, शिवाजीपार्कला पुनर्जन्म मिळेपर्यंत , मी अभिमानाने आणि कौतुकभरल्या नजरेने पहात राहीन.

    शायर हैदर कुरेशी म्हणतो,
    ये चंद घड़िया ही जन्नत नजी़र हो जायें ,
    फ़िर अपने अपने जहन्नम मे हमको जलना है !

    संदीप सामंत

    ८ - ३ - २०२०

  • राशिभविष्य

    मागे एकदा संपादकांनी आम्हाला राशिभविष्य लिहायला सांगितले. आता हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही कन्या राशीला लिहिले होते की ‘सुखद घटना घडेल व दिवस आंनदात जाईल.’

    तुम्हाला सांगतो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रेसच्या ऑफिसमधून घरी जात असताना, वाटेत आमचा एक कन्या राशीवाला परममित्र दिन्या भेटला.