(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पतंजली

    एका गावात Nirma आणि Wheel दाम्पत्याला Rexona नावाची सुंदर मुलगी असते,

    तिचे प्रेम Margo आणि Hamam यांच्या देखण्या Cinthol वर असते.. तर Cinthol, आपला "Life Boy" होणार या कल्पनेने Rexona हरकून गेलेली असते..

    501 नावाची तिची आत्या मध्यस्थी करून त्यांचे लग्न जमवते.

    Rexona व Cinthol दोधेही खूप आनंदित होतात

    आणि

    Medimix गावातल्या Santoor सिनेमागृहासमोर असलेल्या Fair & lovely उद्यान कार्यालयात धुमधडाक्यात विवाह संपन्न होतो..

    Lux, Dove, Dettol, Savlon, Tide, Fa, Jo सर्व या आपल्या बिरादरीतील मित्र परिवारास ते दोघेही विवाहाचे आमंत्रण देतात ...

    नव विवाहित आपल्या स्वप्न नगरीतल्या "PEARS" या बंगल्यात सुखाने वैवाहिक जीवन जगत असतात..

    सर्वांचा गुण्यागोविंदाने व्यवसाय चालू असतो....

    २५ वर्षा नंतर त्यांना एक मुलगी होते व ती या सगळ्यांचे १२ वाजवते....

    तीचे नाव .....

    पतंजली

      September 28, 2016


  • संस्कृतीचा पुजारी

    विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील. 

    – मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ साहित्यिक

      August 24, 2012


  • आजी

    आज दिवाळेक ईल्लले मुंबईकार परत तात्याकडे ईले. दिवाळेच्या विषयार चावदिवसाच्या आंघोळीचो विषय ईलो.... आणि तात्याक सांगल्यानी... तात्या तुकाआवस कशी न्हावक घाली ती सांग?

    तातो म्हणता अरे मी आवस बघुकच नाय... मेली 3 म्हयन्याचो आसताना... आजयेन सांभाळल्यान माका...

    आता आजी कशी होती?

    मेल्यानू आवस मी काय बघुक नाय ... बापाशीन दुसरा लगीन काय करूक नाय ... माका आनी हयत्या ईट्याच्या बापाशिक तिनाच सांभाळल्यान...... चावदिवसाक सकाळी पयल्या कोंब्याक ऊठय.... तेवा भयानक थंडी..... दातार दात आपटत.... बेसनच्या पिटाचा उटना लाय.... आऩी न्हावक घाली.... पयलो तांबयो आंगार वतल्यान काय अशी शिरशिरी येय ..... आठावला काय आजय आंगार काटो येता.... तेवा कोन पयलो कारीट फोडता तेचे पैजी लागत.... पण म्हातारेन मरापर्यंत माका कारिट पयला फोडुक गावाक व्हया तेची काळजी घेतल्यान... तेवा न्हानयेरला मडक्या रंगवची पद्धत होती रे.... तेका कारटाचो हारय घालित आदल्यादिवशी.... न्हानी सारवन सापसुप केली जाय.... आता सारखी परीस्थीती नाय रे तेवा... पण वालयच्या गोड्या फोवाची सर मेल्यानू तुमच्या जिलेबीक येवची नाय अशी चव होती तिच्या हाताक.... आणी एक गोस्ट सांगतय तुमका... अरे मयग्या तुझो आजो मरताना आजयेेक पाठवल्यान आमच्याकडे आनि सोलाची कडी करुन घेतल्यान... आणी ती पीऊन मगे प्राण सोडल्यान .. ईचार बापाशीक अशी चव होती तिच्या हाताक.... वायंगान पेरतानाचे पोऴयेची आठवण कोणय आजुनय सांगात.... तिच्या हातचा एकदा खल्ललो जल्मात ईसराचो नाय

    तीच्या हाताक गुन होतो.... मी जी औषधा देतय ती तीनाच दाखवलेली.. ती आणी धोंडग्याची आवस खास मैत्रीनी... आणी दोघाय औषधा देयत... धोंडग्याच्या बायलेन छळल्यान सासयेक. ... त्याऐवजी औषधा शिकली आसती तर भला झाला असता.... आता रडता सासू बरी होती.....

    म्हातारेन माका सगळा शिकवल्यान... बापाशीची माझ्या मरापर्यंत हिम्मत नाय होती ..आजी पुढ्यात आसताना माका हात लावची... काय सांगु पोरांनो तुमका... अगदी म्हारापोरापासुन भिकार्या पर्यंत तिच्या समोरसुन कोन ऊपाशी जावक नाय..... कदाचीत आजचे आमचे दिवस हे तीचीच पुण्याई...

    प्रत्तेक घराक घरपण व्हया तर एक म्हातारी व्हयी रे......

    तिच्या शिवाय घराक घरपण नाय रे येना... आसलेल्यानी झपले तर म्हातारे सांभाळा रे ... मगे नाय गावाची.......

    ..... बापुर्झा

    डॉ बापू भोगटे

      March 12, 2017


  • लक्ष्मीपूजन

    अश्विन अमावस्येला प्रदोष काळी लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. काही ठिकाणी वहीपूजन लक्ष्मीपूजनाचे दिवशी करण्याची प्रथा आहे.

      November 12, 2012


  • ऐरणीच्या देशा

    प्रत्येक व्यक्ती ही कुटुंब, गाव / शहर व देश यांची घटक असते. आपले दैनंदिन जीवन व्यतित करीत असताना आपण काही नियमांनी या तिन्ही पातळींवर बांधलेले असतो. आयुष्यात संधी तसेच समस्या, अडचणी प्रकट होत राहतात. परिस्थितीचे आकलन करून आपण संधीचा वापर करतो तर अडचणींचे निराकरण करतो. हे करत असताना नियमांच्या चौकटीत राहावे लागते. कुटुंबाचे नियम असतात, शहर व देश यांचे कायदे असतात. स्वतः व कुटुंब या पातळीवर, बाधित घटक व निर्णय घेणारे घटक मर्यादित असतात. पण गाव / शहर आणि देश या पातळीवर जेव्हा समस्या उद्भवतात, तेव्हा अनेक अंगांनी विचार करावा लागतो. उपायांची अंमलबजावणी योग्य प्रकारे करावी लागते.

    समस्यांचे निवारण करताना आपण योग्य तेथून मदत घेतो. उदाहरणार्थ, आजार, दुखणे यासाठी डॉक्टरांची मदत, दुरुस्तीसाठी तंत्रज्ञाची मदत आपण घेत असतो. दृष्टीदोष बारा करण्यासाठी आपण हृदयरोगतज्ञाकडे जात नाही, तो डॉक्टर असला तरी. आपल्याला डोळ्यांनी नीट दिसत नाही ही समस्या वैयक्तिक पातळीवर ओळखणे सोपे असते. पण शहरापुढील अडचणींचे मूळ कशात आहे हे सहजासहजी समजू शकत नाही. व्यापक विचार करून ते शोधावे लागते. एकदा ही निश्चिती झाली की उपाय ठरविता येतात. आपल्या देशात समस्या अगणित आहेत. त्यामुळे गुंतागुंत जास्त आहे. काही बाबतीत समस्येचं मूळ शोधणं सोपं नाही. जिथे समस्या व तिचे मूळ सुस्पष्ट आहे तिथे तरी उपाय लागू पडल्याचे दिसले पाहिजे. पण पुष्कळ ठिकाणी अंमलबजावणी तोकडी पडते. कारणे काहीही असोत. उत्तरदायीत्व न जुमानणारे हे अशा उपायांना बाधा आणतात.

    जिथे समस्या व तिचे मूळ याविषयी संदेह असतो तिथे, थातुरमातुर उपायांची मलमपट्टी केली जाते. काहीतरी कृती घडते आहे असे भसविले जाते. यामुळे अशी परिस्थिती काही काळाने पुन्हा उद्भवते. मराठी पत्रकारितेत याची, "... प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे" अशी बातमी बनते. ही ऐरण अनेक प्रश्नांना आपल्या पाठीवर वागवीत असते. रंगमंचावर जसा संवाद म्हणणार्‍या कलावंतावर प्रकाशझोत पडतो, तसा वेगवेगळा प्रश्न प्रकाशझोतात येत राहतो. आपली भूमिका झाली की कलाकार मंचावरून 'Exit' घेतो. पण ऐरणीवरच्या प्रश्नांना 'Exit' चा दरवाजा सहसा दिसत नाही.

    'ऐरण' या शब्दाचा जोडीदार आहे 'घण'. हे दोघे एकमेकावाचून निरुपयोगी. ऐरणीवर असलेल्या प्रश्नावर योग्य जागी घण पडला तर उपाय यशस्वी होऊ शकतो. पायाला गँगरीन झाले असताना हात कापणे हा उपाय असु शकत नाही. तसे झाले तर घाव भलत्याच ठिकाणी पडला असे म्हणावे लागेल. 'आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी’ हा वाक्प्रचारही पत्रकारितेत खूप प्रसिद्ध आहे. आपल्या देशात या दोन वाक्प्रचारांचा वापर करता येण्यासारखी परिस्थिती वारंवार उद्भवते. उदाहरणार्थ, '... घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे', '... बुडून झालेल्या मृत्यूंमुळे जलपर्यटन पुन्हा ऐरणीवर आले आहे', '... पेपरफुटीमुळे बोर्डाच्या क्षमतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे'. अशा असंख्य घटना सर्व क्षेत्रांना स्पर्शून जातात. घण व ऐरण यांची जिथे भेट होते तिथे समस्येचं योग्य कारण असलं तरच उपयोग असतो. समस्या तशीच राहण्याची कारणं पुढीलप्रमाणे असु शकतात.

    १. समस्येचं मूळ समजलेलं नाही, त्यामुळे घावही नाही (अज्ञानात आनंद).

    २. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपाय शोधण्याची इच्छा नाही (वैचारिक दारिद्र्य).

    ३. समस्येचं मूळ समजलेलं आहे, उपाय करण्याची इच्छा आहे, पण घाव वर्मी बसत नाही (सदोष अंमलबजावणी).

    ४. समस्येचं मूळ समजलेलं आहे, पण उपायाचं नाटक करायचं आहे. समस्या ऐरणीच्या एका बाजूला व घाव दुसरीकडे पडत आहे (उपायाचा आभास).

    पावसाळ्यात मुंबईत ठराविक ठिकाणी पाणी साचणे, रेल्वे रुळ पाण्याखाली जाणे या गोष्टी दरवर्षी घडाव्याच लागतात. बोअरवेलमधे लहान मूल अडकणे, सेलिब्रिटीजना विशेष सवलती मिळणे यांची बातमी व्हावीच लागते. त्यांना ऐरणीवर यावेच लागते. काही प्रश्न सोडविण्यासाठी नसतात. तसे झाले तर काम काय राहील घण मारणाराला?

    अव्यवस्था दूर केली तर सामान्याचे जीवन सुखी होईल, पण अव्यवस्थेमुळे ज्यांना रोजगार मिळत होता ते बेकार होतील. गुटका खाउन कितीही मेले तरी चालतील, पण गुटक्याचा कारखाना बंद झाला तर जे बेकार होतील त्यांचे काय? रस्ते चांगले झाले तर गॅरेज कशी चालतील? गाडीचे सुटे भाग बनविणारांनी काय करायचं? शाळेतच शिक्षण मिळालं तर क्लासवाले उपाशी राहतील त्याचं काय? अशा प्रकारे एक प्रश्न सोडवताना दुसरा उद्भवेल. म्हणजे प्रश्न आहेच. ‘मग आहे तो प्रश्न तसाच राहिला तर काय बिघडले’ ही वृत्ती बळावते आहे. अशा परिस्थितीत गळ्याशी आल्यावर धावाधाव करणे आले. आपल्या देशापुढील समस्या कोणत्या क्रमाने व कशा सोडवायच्या हा मोठा प्रश्न आहे. सुजाण नागरिकत्व अंगी बाणल्याशिवाय कोणतेही उपाय निरुपयोगी ठरतील, आणि हेच सर्वात कठीण आहे.

    खूप वर्षांपूर्वी ‘साधी माणसं’ या मराठी चित्रपटातील एक गीत प्रसिद्ध झाले, ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहु दे ...’. पण आता, ‘ऐरण, घण व समस्या’ यांचा समन्वय साधता आला नाही तर म्हणावे लागेल, ‘ऐरणीच्या देशा तुला प्रश्न प्रश्न पडू दे ...’.

    - रवि गांगल

      April 15, 2019


  • साल्व्हादोर, फोर्तालिझा

    साल्व्हादोर पोर्ट मध्ये गेल्यावर जहाज लगेच जेट्टी वर जात नसे तीन चार दिवस जेट्टी पासून बाहेर समुद्रात नांगर टाकून उभे राहावे लागत असे. आजूबाजूला आणखी चार पाच जहाजे उभी असायची. ब्राझिल मध्ये असल्याने जहाजावरुन किनाऱ्यावर जायला लगेच बोट मागवली जायची बोटचा खर्च कमी असल्याने कॉन्ट्रीब्युशन वगैरे काढून केला जात असे .

      April 17, 2019


  • श्यामची आई

    `श्यामची आई’ वाचताना ज्याच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या नाहीत, असा माणूस क्वचितच सापडेल. हे कथानक म्हणजे खरे तर गद्य रुपात साने गुरुजींनी रचलेले काव्यच आहे.

      February 9, 2022


  • भारतासाठी लाजिरवाणी गोष्ट

    काय तर कृषिप्रधान देश!!!!!!!

    वा रे लोकशाही…………..

      September 13, 2010


  • बडबड गीत !

     

      June 21, 2013


  • खच्चीकरणाची पंचवीस वर्ष

    येणाऱ्या जानेवारीत मुंबईतील गिरणी कामगारांच्या ऐतिहासिक संपाला ३९ वर्ष पूर्ण होतील. या संपाला २५ वर्ष झाली (१८ जानेवारी २००७) तेव्हा संवेदनशील लेखक जयंत पवार यांनी महाराष्ट्र टाईम्समधे लिहिलेला लेख त्यांच्या परवानगीने खाली उद्धृत करत आहे.

      January 31, 2025