(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • डाग!

     

  • वजनदार सुराची टूणटूण

    इतरांच्या शारीरीक व्यंगावर हसणे या सारखे दळभद्री काम जगात कोणतेच नसेल. स्वत:ची खिल्ली उडवणे किंवा आपल्यावरच व्यंग कसणे ही अत्यंत अवघड गोष्ट. चार्ली चॅप्लीनने तर स्वत:चीच इतक्या टोकादार पणे खिल्ली उडवली की तो आमच्याच वर्मावर घाव घालत होता हे आम्हाला कळलेच नाही. लॉरेल हर्डी या शारीरीक विजोड जोडीने आम्हाला खदखदून हसवले. भारतीय चित्रपटसृष्टीत देखिल असे अनेक कलावंत होते व आजही आहेत. दामू अण्णा मालवणकरांचे डोळे तिरळे होते पण त्यांनी याच डोळ्यांचा वापर करून प्रेक्षकानां भरपूर हसवले. डेव्हीड व शरद तळवळकरांनी आपल्या टकलावर स्वत:च विनोद केले. मुक्री, सुंदर यांची शारीरीक उंची जरी कमी होती तरी विनोदाची उंची मोठी होती. असे स्वत:वर हसत हसत प्रेक्षकानां हसवत ठेवण्याची कला जगातल्या ज्या ज्या अभिनेत्यांनी साधली त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र तितकेच दु:खद होते.

    उत्तर प्रदेशातील एका पंजाबी ग्रामीण खत्री परीवारात या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचे नाव उमा देवी असे ठेवण्यात आले. उमादेवी खत्री. आई वडील लहानपणीच वारले आणि अनाथ उमाला मग काकाने आधार दिला. हे अनाथपण जीवनातले सर्व विषाचे घोट पचवायला अनेकदा खूप मदत करतं. सुरक्षित वातावरणात वाढतानां आपल्याला जे सभोवती प्राप्त होतं ते या अनाथांच्या नशीबी कधीच येत नाही. लहानपण संघर्षात घालवणाऱ्या मुलानां निसर्ग झुंजण्याची एक असिम शक्ती देत असतो. उमाला एकच निसर्गत: देणगी होती ती म्हणजे तिचा गोड गळा. अनाथपणाच्या संघर्षात याच आवाजाची तिला सोबत होती. गाणी ऐकणे व कॉपी करत तसेच गाणे ही तिचा छेदच होता. मग एक दिवस तिने अचानक निर्णय घेतला की घर सोडून जायचे….पण कुठे? तरूण वयात हे कसे शक्य होईल? पण उमाने घर सोडले आणि तीने मुंबईचा रस्ता धरला. २३ व्या वर्षी घर सोडून मुंबईला पळून येणे आणि तेही एका तरूण मुलीला !!! किती अवघड गोष्ट असेल त्या काळी. बरे मुंबईत नातेवाईक तर दूरच पण ओळखीचेही कुणी नव्हते. तिला फक्त एकच नाव माहित होते संगीतकार नौशाद यांचे. ते ही उत्तर प्रदेशचेच. पत्ता शोधत ही थेट त्यांच्याकडे पोहचली. त्यांना म्हणाली- “मला छान गाता येते मला काही तरी काम द्या नाहीतर मी समुद्रात जीव देईन.’’ नौशादजीने तिला गायला लावले. तिचा आवाज खरंच चांगला होता. नौशादनी तिला चक्क एक सोलो गाणे दिले. १९४६ मधील हा प्रसंग आहे. ए.के.कारदार हे त्या काळातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक, त्यांनी उमा देवीला करारबद्ध केले.

    १९४७ मध्ये ए.के.कारदार यांनी मुन्वर सुलताना या अभिनेत्रीला घेऊन “दर्द” हा चित्रपट तयार केला. यात सुरैय्या सह कलाकार होती. नौशाद संगीतकार होते. “अफसाना लिख रही हूँ..” हे उमादेवीचे गाणे प्रचंड हीट झाले. या गाण्याचे गीतकार शकील बदायुनी हेही आपले नशीब अजमावण्यासाठी त्याच काळात मुंबईत आले होते. दर्द ची सर्व गाणी त्यांनी लिहली. त्या वर्षातला हा सर्वात हीट संगीतमय चित्रपट होता. “अफसाना लिख रही हूँ..” हे गाणे ऐकून दिल्लीचे एक सज्जन खूपच प्रभावीत झाले आणि ते मुंबइर्ला आले आणि उमादेवी सोबत काही काळ राहून लग्नही केले. दोन मुले व दोन मुली या अपत्याला झाल्या. उमादेवी आपल्या पतीला मोहन या नावाने हाक मारीत. उमादेवीला लगेच पूढच्या वर्षी मेहबूबखानच्या “अनोख अदा” चित्रपटात गायची संधी मिळाली. यातल दोन गाणी पुन्हा हिट झाली व उमादेवी उत्तम मानधन मिळविणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाली. १९४८ मध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध जेमिनी बॅनरचा भव्यपट “चंद्रलेखा”तील उमादेवीची ७ गाणी खूप गाजली. तिच्या संगीत कारकिर्दीतील हा सर्वात महत्वाचा टप्पा होता. तिच्या आवाजाची एक विशिष्ठ रेंज होती. चित्रपटसृष्टीतले संगीत हळूहळू बदलत होतं. त्यात लता-आशा यांचा उदय झालेला त्यामुळे उमादेवीला काम मिळण कठीण जात होत. आता उमादेवीचा प्रवास संपून टूणटूण नावाच्या विनोदी अभिनेत्रीचा प्रवास सुरू होणार होता.

    उमादेवी बऱ्यापैकी जाड झाली होती. तिचे बबली व्यक्तीमत्व बघून नौशादनी तिला अभिनय करण्याचा सल्ला दिला. दिलीपकुमार उमादेवीचे चांगले मित्र होते. एक दिवस तिने दिलीपकुमारकडे गळ घातली की तुझ्या चित्रपटात मला काही तरी काम दे. ते वर्ष होते १९५०. दिलीपकुमारच्या “बाबूल” या चित्रपटात उमादेवीने सर्वप्रथम अभिनय केला. टूणटूण हे नाव याच चित्रपटाने तिला दिले. यानंतर मात्र तिने आपल्या बबली व्यक्तीमत्वाचा पूरेपूर वापर करून घेतला. गुरूदत्तच्या बहुतेक चित्रपटात टूणटूण आहे. त्या काळच्या भगवान दादा, आग़ा, सुन्दर, मुकरी, धूमाळ, जॉनी वॉकर या सर्वच विनोदवीरा सोबत तिने काम केले. तिची चित्रपटातील एन्ट्रीच प्रेक्ष्कानां जाम आवडत असे. शिवाय तिच्या चेहऱ्यावरील निरागस आणि मिष्कील भाव खळखळून हसवत. तिच्या पासूनच स्त्री विनोद वीरांची परंपंरा सुरू झाली असे म्हणावयास काहीच हरकत नाही. १९५० ते १९९० या काळात विविध भाषेतील १९८ चित्रपटातुन टूणटूणने प्रेक्षकांचे मनोरजंन केले. मुंबईतील वर्सोवा भागात टूणटूणचे घर आहे. मी २००१ मध्ये त्याच भागात राहात असताना मला समजले म्हणून मी अनेकदा त्या रोडवर फेऱ्या मारीत असे पण मला कधी तिचे दर्शन नाही झाले. एखाद्या स्त्रीला जाडपणा वरून चिडवायचे असेल तर टूणटूण याच नावाचा वापर केला जात असे. गायीका उमादेवी ते विनोदी टूणटूण हा तसा आगळा वेगळा प्रवास म्हणावा लागेल. असे म्हटले जाते की चित्रपटसृष्टीत जो पर्यंत पडद्यावर अभिनेते दिसत असतात तो पर्यंत ते लक्षात रहातात. पडद्यावर दिसेनासे झाले की विस्मृतीत जातात. १९९० ते २००३ या कालावधित टूणटूण विस्मृतीत गेली ती कायमचीच. वयाच्या ८० व्या वर्षी ती काळाच्या पडद्याआड गेली.

    -दासू भगत (११ जुलै ०१७)

  • जपानमधील अप्रतिम साकुरा

    भारताच्या पूर्वेला अगदी चिंचोळा, चारी बाजूंनी समुद्राचे संरक्षण असणारा, निसर्गसौंदर्याने नटलेला देश. हिमालयाच्या काही शिखरांशी स्पर्धा करू पाहणारा माउंट फुजी सारखा पर्वत, ‘लेक अशी’ सारखी विस्तीर्ण व निर्मळ तळी, पॅगोडा सारख्या उतरत्या छपरांच्या वैशिष्ठ्यपूर्ण इमारती, रस्त्याचे चढउतार, त्यावरून लगबगीने चालणारी मध्यम उंचीची गोरीपान चपट्या नाकाची माणसे….. कायकाय अन् कशाकशाचं वर्णन करावं…पण त्यातही तिथल्या चेरीब्लॉसमच्या वर्णनांनी मनावर भुरळ घातली

  • मार्लेश्वरची यात्रा

    सह्याद्रीच्या उंच कडय़ांच्या कुशीत वसलेले शंकाराचे स्वयंभू देवस्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर हे महाराष्ट्रातील पवित्र देवस्थान आहे. हे अतिशय प्राचीन देवस्थान आहे. दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. विशेष म्हणजे, त्यादिवशी मार्लेश्वराचे शुभमंगल साजरे केले जाते.(या वर्षी हा योग १४ जानेवारी ला आहे) मारळ या गावचा देव म्हणजे मार्लेश्वर. भगवान परशुरामाने मारळच्या देवस्थानाची स्थापना केली, असे सांगितले जाते. आणेराव साळुंके हा आंगवलीचा सरदार १८०० मध्ये शिकारीला गेला असता त्याला गुहेमध्ये शंकराचे दर्शन झाले. तोच हा मार्लेश्वर. ज्यादिवशी मार्लेश्वराचा शोध लागला तो दिवस मकर संक्रांतीचा होता. म्हणून संक्रांतीला मार्लेश्वराचा उत्सव साजरा होतो.

    त्यादिवशी साखरपा या गावातील गिरिजादेवी या देवीला मिरवत मार्लेश्वराच्या विवाहासाठी आणले जाते. आंगवली या गावात मार्लेश्वर प्रकट झाला म्हणून तेथील लोक चांदीचा मुकुट या सोहळ्यासाठी आणतात. अनेक गावांतून मार्लेश्वरला पालख्या येतात. देवरुख येथील श्री देव व्याडेश्वर हे यजमानी असतात. हा लग्नसोहळा मोठय़ा थाटात पार पडतो. त्यानंतर ठिकठिकाणच्या पालख्या व दिंडय़ा येतात. या दिंडय़ा श्री मार्लेश्वराच्या करवल्या होतात. या यात्रेसाठी अन्नछत्र चालवले जाते. अतिशय रमणीय निसर्ग लाभलेल्या या ठिकाणी आलेला माणूस तहानभूक विसरून आजूबाजूच्या सुंदर परिसराचा व हिरव्यागार वनराजीचा आस्वाद घेण्यातच दंग होतो. उंचच उंच डोंगर, मधूनच वाहणारी बावनदी, हिरवीगार झाडी.. हे सर्व पाहून प्रवासात आलेली मरगळ दूर होऊन मन प्रसन्न होते. येथून चालताना सभोवतालचे सृष्टीसौंदर्य व हिरवीगार वनराजी पाहून व या सर्वाचा आस्वाद घेत असतानाच आपण देवळाजवळ केव्हा पोहोचतो ते कळतच नाही.

    शंकराचे हे स्वयंभू देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावापासून 18 कि.मी. वर आहे. शंकराचे निस्सीम भक्त मार्लेश्वरची फेरी सहसा चुकवत नाहीत. मार्लेश्वरचं वैशिष्ट्य म्हणजे इथे नास्तिक मंडळीही रमतात. याचं कारण म्हणजे इथला रम्य निसर्ग. पावसाळ्यात इथला धबधबा रौद रूप धारण करतो. परंतु त्याचं ते रूपही मनाला भावतं. भाविक मंडळी शंकराचं दर्शन घेऊन तृप्त होतात तर निसर्गप्रेमींना इथे आगळीच भेट मिळते. म्हणूनच मार्लेश्वर हे ठिकाण लोकप्रिय आहे.

    मार्लेश्वर. भगवान शंकराचं मंदिर आणि नजिकचा धबधबा यामुळे आस्तिकांबरोबरच नास्तिकही इथे आवर्जून येतात. संगमेश्वर रेल्वेस्थानकापासून ३८ कि.मीटर अंतरावर आहे. देवरूख समुद्रसपाटीपासून उंच असल्यामुळे इथला बराचसा भाग ओसाड भासतो. मात्र पावसाळ्यात हाच परिसर घनदाट झाडांनी वेढला जातो. लांबवर पसरलेल्या सह्यादीचं दर्शन रस्त्यावरून जाताना होतं. देवरूख गावं मागं पडलं की काही मिनिटांतच आपण मार्लेश्वरला पोहोचतो. सह्यादीच्या उंच पर्वतांच्या तुलनेत मालेर्श्वरचा डोंगर एका दमात चढण्याइतपतच उंच आहे. डोंगर किंवा ब्रीज चढून गेल्यावर डोंगर पोखरून गुहा तयार केलेली दिसते. गुहेची उंची खूपच कमी असल्यामुळे वाकून आत प्रवेश करावा लागतो. आत गेल्यावर मिट्ट काळोखात समईच्या प्रकाशात मार्लेश्वराची पिंड आणि मूर्तीचं दर्शन होतं. असं सांगितलं जातं की या गुहेत एकही विजेचा दिवा टिकत नाही. अनेकांनी इथे विजेचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येक वेळेस तो असफल ठरला असं इथले पुजारी सांगतात. त्यामुळे इथे बॅटरी, मेणबत्ती किंवा कंदिल घेऊनच यावं लागतं. मेणबत्तीने गुहेच्या कपारीत निरखून पाहिल्यास बरेच साप दिसतात. परंतु आजवर कुणालाही सापाने चावल्याचं ऐकण्यात आलेलं नाही.

    मार्लेश्वराच्या मंदिरानंतर डोंगराची सपाटी संपते. इथल्या सपाट भागाला लागूनच खाली घळी आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर समोर पांढराशुभ्र धबधबा आपल्याला खुणावतो. घळीत उतरून या धबधब्याकडे जाता येतं. इतर मोसमात तुम्ही या धबधब्याच्या पाण्यात खेळू शकता. पण पावसाळ्यात मात्र त्या घळीत उतरणंही कठीण होतं. गुळगुळीत दगड आणि डोंगरकपारीतून वाहणारा तो शांत धबधबा अचानक उग्र रूप धारण करतो. आता ब्रीजवर उभं राहून पावसाळ्यातही जवळून धबधब्याचे बोचरे तुषार अंगावर घेण्याचा आनंद लुटता येतो. मार्लेश्वराच्या डोंगराला तिन्ही बाजूंनी डोंगरांनी वेढलं आहे. मार्लेश्वरचा परिसर पावसाळ्यात अधिक खुलतो. त्यावेळेस तर इथे निसर्गप्रेमींनी आवर्जून यावं. त्याचबरोबर इतर दिवसांमध्येही मार्लेश्वरला आवर्जून भेट द्या. निसर्गाची भिन्न रूपं आपल्याला अनुभवायला मिळतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकिपीडिया

  • वारी..

    संत आणि वारी यांचा वेध घेण्याचा केलेला छोटासा प्रयत्न…

  • श्री गणेशोत्सवानिमित्ताने एक माहितीपूर्ण लघुपट.

    https://www.youtube.com/watch?v=AE4M95JqLqw

    श्री गणेशोत्सवानिमित्ताने एक माहितीपूर्ण लघुपट.

    -- मराठीसृष्टी व्यवस्थापन

  • भारतीय जनतेला लोकशाहीने काय दिले?

    भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. मुळात भारताला स्वातंत्र्य मिळाले तेच भारताचे तुकडे होऊन. ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य न देता, भारतातील संस्थानांना स्वातंत्र्य दिले. भारताचे दोन भाग पाडले. भारत आणि पाकिस्थान असे दोन राष्ट्र निर्माण झाले. भारताने लोकशाहीचा स्वीकार केला. आज भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश मानला जातो. सरदार वल्लभभाई पटेलांनी साम, दाम, दंड यांचा यथायोग्य वापर करुन भारत एकसंध राष्र्ट केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली लिहिली गेलेली घटना म्हणजे भारतातील लोकशाहीचा कळसंच

  • श्री बल्लाळेश्वर – पाली

     रायगड जिल्ह्यात सुधागड तालुक्यात आंबा नदीच्या सान्निध्यात स्वयंभु असे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून सुर्योदय होताच सूर्याची कोवळी किरणे मूर्तीवर येऊन पडतात. मंदिराच्या आवारात मोठी घंटा असून सभामंडपाला आठ खांब आहेत. पुढील गाभार्‍यात दोन पायात मोदक धरून बल्लाळेश्वराकडे पाहणार्‍या उंदीराची मूर्ती आहे.

  • वाईचा ढोल्या गणपती

    सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती. याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तिरावर वसलेले वाई, जसे ऐतिहासिकदृष्टया प्रसिद्ध आहे

  • माती परिक्षणाची फिरती प्रयोगशाळा…

    शेतकऱ्यांना जिल्हा पातळीवर येऊन माती परिक्षण करुन घेणे शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना परिस्थितीनुसार मातीमधील नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शीयम, मॅग्नेशियम यासारखे गुणधर्म लक्षात येत नाहीत व त्यासाठी काय करावे हे ही समजत नाही. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाने फिरती माती परिक्षण प्रयोगशाळा तयार केली आहे.