
टेलिकॉम क्षेत्र हे देशातील सर्वाधिक ऊर्जा वापरणारे दुसर्या क्रमांकाचे क्षेत्र ठरले आहे. टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी देशातील एक तृतियांश ऊर्जा खर्च होते, असे दिसून आले आहे. देशाच्या एकूण ऊर्जा आवश्यकतेपैकी आयसीटी क्षेत्रासाठीच्या ऊर्जेचे प्रमाण येत्या दहा वर्षांत २.७ टक्के एवढे मोठे होईल, असे सरकारी आकडेवारी सांगते. मोबाइल टॉवर्ससाठी सर्वाधिक ऊर्जा लागते.
मागे एकदा संपादकांनी आम्हाला राशिभविष्य लिहायला सांगितले. आता हा आमचा पहिलाच प्रयत्न असल्याने आम्ही कन्या राशीला लिहिले होते की ‘सुखद घटना घडेल व दिवस आंनदात जाईल.’
तुम्हाला सांगतो त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही प्रेसच्या ऑफिसमधून घरी जात असताना, वाटेत आमचा एक कन्या राशीवाला परममित्र दिन्या भेटला.
लग्न जमवण्याच्या बैठकीतील संवाद;
मुलाचे मामा : मुलगा एकदम निर्व्यसनी आहे बरं का. सुपारीचे खांड
सुद्धा खात नाही.
पुणे शहरात खासगी शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणार्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेजचा परिसर म्हणजे तर ज्ञानवंतांच्या वास्तव्याने पुनित झालेला परिसर होय. गोपाळ कृष्ण गोखले, रॅंग्लर परांजपे, रॅंग्लर महाजनी यांसारख्या अनेक ज्ञानी व व्यासंगी शिक्षणतज्ञांचे वास्तव्य व वावर या परिसरात झालेला आहे. येथील प्रत्येक इमारतीला वैभवशाली इतिहास व परंपरेची पार्श्वभूमी लाभलेली आहे. आईवडिलांच्या अशिर्वादाने मला या फर्ग्युसन कॉलेजचा आवारात तब्बल ८ वर्षे बंगला नं.१ म्हणजे, प्राचार्य आगरकरांच्या बंगल्यात राहण्याचा योग आला. त्या वास्तूतील रम्य आठवणी एकत्र करण्याचा हा प्रयत्न आहे.
हळू हळू महंमद बसलेले बास्केट एकदाचे खाली जायला सुरवात झाली. बास्केट खाली जात असताना दोलका प्रमाणे हलत असल्याने जहाजाच्या बाजूवर येऊन आदळते की काय असे वाटत होते पण केवळ अर्ध्या फुटांवरून ते दुसऱ्या बाजूला जात असल्याने अधांतरी लटकलेला महंमद सुमारे साडे तीन तासांनी खाली बोटीत कसाबसा एकदाचा उतरला. मेडिकल साइन ऑफ होऊन घरी जाण्याकरिता जहाजावरुन उतरल्यावर सगळ्यांना हात करून निरोप घेऊन तो बोट मध्ये बाहेर एका बाकड्यावर बसला.
विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील.
हे ऊरात होतय धडधड
परिक्षा उद्यावर आली..
विषय राहिले आठ
Chemistry ची
बाधा आता झाली..
.
आता आधीर झालोया
लई भानावर आलोया..
सारे गेले म्होर मी एकलाच
माघ राहिलोया..
.
आन जागतोय रातीत
झोप गेली मातीत..
गर्दीत आलोया...
.
वाच बुक बुक बुक मुकाट
बुक बुक बुक मुकाट
संमदया पोरांना झालीया
माझ्या pass-out ची घाई.
पण मला माहित आहे कि
मी निघनार नाही..
.
माइक्रो घेऊन आलोया..
चिठ्ठ्या घेऊन आलोया..
फक्त पासिंग साठी
मी तीन चँप्टर वाचून आलोया..
.
आर टेंशन मनात
देव माझे पाण्यात
उन्हात आलोया..
.
वाच बुक बुक बुक मुकाट
बुक बुक बुक मुकाट
-- बापू झिंगाटे
खोबरं हा मालवणी जेवणातला महत्वाचा घटक ... अविभाज्यच... पण अगदि टिपीकल मालवणी तऱ्हा सांगतो... खोबऱ्याच्या. आणि नारळ बागायतदारांच्या...
तस बघायला गेलं तर .. नारळाच्या बागा दोन-तिन प्रकारच्या... एक नदिकाठची.. मळ्यातली...
दुसरी भरडी दगडगोट्याच्या जमिनीतली, तिसरी भरडी..पण डोंगरातल आपवणी पाण्यावरची.. झोळकातली....
यामध्ये साधारण.. बामण , भंडारी आणि वैश्य हे समाज साधारण चविने खाणारे.. म्हणजे बागायतदार...
आता या प्रत्तेक तऱ्हेच्या माडाच्या झाडाचे खोबरे वेगळ्या चविचे... वेगऴ्या टेक्सचर चे.. त्यात ताजे नारळ, कोटार, कुत्रेकोटार., वांझ... हे प्रकार आगळेच.
साधारण माश्याच सार, पिठी, पालेभाजी,गुळचून यासाठी मळ्यातला नारऴ वापरला जातो. तर मटण, भाजणीच्या आमटीसाठी भरडी नारळ... करंजीच्या साठ्यासाठी खास घुडघूडी...
त्यात कढीसाठी काही स्पेशल माडाचे नारळ ... आणि तो बदलला तर कढीची चव बदलते... मग जेवणावर एखादी मालवणी शिवी हमखास....
आता शहाळं कुठल्या माडाचं खायचं त्याचही खास तंत्र.. प्रत्तेक झाडाची चव वेगळी... त्यात तांबड्या माडाची स्पेशल...पण मालक समोर असेल तर तोच सांगणार..आता सिंगापुरी माड झालेत पण शाहाळ्यासाठी ते मस्तच. कुठल्यापेंडीची किती शाहाळी काढायची... नारळ सुद्धा झाडाखालून मालक सांगेल तेच काढायचे.... एक सुंदर तंत्र... शास्त्र. पिढीजात चालत आलेले... त्याच्यात म्हाल पेंड.... आणि धारेची पेंड... हे खासच....
आवयेल... खास मालवणी तेल तांबडया माडाच्या खोबऱ्याच्या रसापासुन तयार केलेले. घरगुती.... पण त्याची क्रूती पण विस्म्रूतीत गेलीय....
तेलासाठी घुडघुडी बारीक करून उन्हात वाळवत घातल्यावर अचुक पुर्ण सुकलेले पण मऊ गोड आणि खाण्यास योग्य अशी कातळी जो ऊचलतो .. तो मात्र खरा दर्दी....
आणि ज्याच्या घरात 2. 4 लिटर खराब खोबर्याचं तेल निघतो तो खरा बागायतदार...
यातही... फक्त नारऴाचा आकार त्यातलं पाणी, रंग.आणि किशी बघून आतल्या खोबर्याविषयी अचुक सांगणारे ज्योतिषी ही याच कुऴातले....
तर असं हे खोबरं पुराण विस्तारभयास्तव आटोपते घेतोय...
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे....
Copyright © 2025 | Marathisrushti