गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! इतिहासाच्या उत्खननापेक्षा निसर्गाची भटकंती घडवणारा; म्हणूनच पावसाळा स्थिरावला की, एखाद्या वारी वेळ काढून कोरीगडची वाट धरावी. लोणावळय़ाच्या दक्षिणेस कोरबारसे मावळात एक वाट गेली आहे. या वाटेवरील आंबवणे गावच्या डोक्यावर हा कोरीगड. ‘सह्य़ाद्री’कार स. आ. जोगळेकर म्हणतात, कोरी हे कोळय़ांच्या एका पोटजातीचे नाव. तेव्हा या कोरी लोकांचा गड तो कोरीगड आणि त्याचा मावळ तो कोरबारसे. लोणावळय़ापासून या कोरीगडापर्यंत अंतर आहे साधारण वीस किलोमीटर. याशिवाय मुळशी रस्त्यावरील माले गावातूनही एक रस्ता घुसळखांबमार्गे कोरीगडकडे जातो. पण या दोन्ही वाटांवरून एका दिवसात ही भ्रमंती करायची असेल तर स्वतचे वाहन असणे सोयीचे. अन्यथा लोणावळय़ातून सुटणारी दुपारी १२ किंवा सायंकाळी पाचची भांबुर्डे एस.टी. पकडायची आणि आंबवणे गावातील महादेवाच्या मंदिरात मुक्काम ठोकत गडदर्शन आटोपायचे.
असो, तर या आंबवणेत आलो की, या गावातूनच एक वाट तीन हजार फूट उंचीच्या या गडावर जाते. पण यापेक्षा एक सोपी वाट आंबवणे अलीकडच्या शहापूरमधून गडाकडे निघते. हे शहापूर म्हणजे गडाची एकेकाळची पेठ. यामुळे गावचा उल्लेख पेठ शहापूर असाही होतो आणि यामुळेच कोरीगडला कुवारीगड, कोराईगडच्या बरोबरीने शहागड असेही म्हणतात. तर हे शहापूर ओलांडले की, एका मोठय़ा घळीतून जाणारा हा मार्ग थेट गणेश दरवाजात येऊन थडकतो. या दरवाजाअलीकडेच काही प्राचीन खोदीव लेण्या दिसतात. यातीलच एका लेणीत गणेशाची स्थापना केली आहे. त्यामुळे या दरवाजालाही त्याची ओळख मिळाली - गणेश दरवाजा! हा गणेश दरवाजा ओलांडून आत गेलो की, उत्तम तटबंदी आणि भरपूर सपाटी असलेला गड समोर येतो. यातील बलदंड तटावरूनच गडप्रदक्षिणा सुरू करावी. उत्तम तट, शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या तोफा, गडदेवता कोराईदेवी आणि पाण्याने काठोकाठ भरलेली दोन तळी ही एवढीच ती काय कोरीगडची दुर्गसंपत्ती! पण आपण पावसाळय़ात आलो तर या वेळेची हिरवाई या मोजक्याच निर्जीव अवशेषांनाही जिवंत करते. यातही सर्वात जास्त लक्ष जाते ते गडावरील दोन मोठय़ा तळय़ांकडे. पश्चिम तटाला खेटून असलेली ही तळी पावसाळय़ात काठोकाठ भरतात. अगदी कधीकधी वाऱ्याच्या हेलकाव्यावर हे पाणी बाहेर पडू पाहते. अशा वेळी या कठडय़ावर यावे आणि आपल्याच हलणाऱ्या प्रतिमा पाहत तासन् तास बसून राहावे. या तळय़ाच्याच पाश्र्वभूमीवर कोराई देवीचे मंदिर आहे. भव्य आणि तेजस्वी मूर्ती. असे म्हणतात की, शेवटच्या मराठे-इंग्रज लढतीत जेव्हा हा गड पडला तेव्हा इंग्रजांनी या देवीचे दागिने उतरवले आणि ते मुंबईच्या मुंबादेवीला घातले. पुढे काळाच्या ओघात देवीचे छतही कोसळले. यामुळे एरवी कधी आलो की, उघडय़ावरील ही मूर्ती आणि तिची ही कथा आठवली की हळहळ व्यक्त होते. पण तेच पावसाळय़ात आलो की, भोवतालच्या हिरवाईतून असंख्य रानफुले उमलतात आणि जणू हे सारे दु:ख बाजूला सारत कोराईदेवी नवरात्रासाठी पुन्हा सालंकृत होते.
गडाच्या पोटातील काही खोदीव लेण्यांकडे पाहून हा गड प्राचीन असावा असे वाटते. पुढे तो कोळय़ांच्या ताब्यात असताना १४८६ मध्ये निजामशाहीने जिंकल्याची नोंद आहे. यानंतर १६४६ मध्ये अन्य गडांबरोबर कोरीगडही स्वराज्यात दाखल झाला. १७०० मध्ये पुन्हा मुघल राजवटीकडून पंत सचिवांनी हा गड स्वराज्यात आणला आणि अखेर १८१८ च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात तीन दिवसांच्या प्रखर लढय़ानंतर गडावर युनियन जॅक चढला. इतिहास सांगणाऱ्या या काही सन-सनावळय़ा आणि घटना कोरीगडाबाबत मिळतात. इतिहासाचे हे दाखले देणाऱ्या सहा तोफा आजही गडावर दिसतात. पैकी ११८ इंच लांबीची ‘लक्ष्मी’ ही सर्वात थोरली. तिच्या हिशेबाने उभे राहावे आणि उगाच समोरच्या मावळाकडे उरी अभिमान घेत पाहावे. गडावरील हे विशेष पाहत असतानाच आपल्या नजरा आजूबाजूलाही वळतात. यामागे दऱ्याखोऱ्यांचा मावळ हे कारण तर असतेच, पण त्यातही पावसाळा हे खास निमित्त असते. एरवी लक्षातही न येणारे डोंगर पाऊस पिऊन हिरवे-ओले झाले की, उगीचच ओळखीचे वाटतात. मग त्यातही थोडेसे धुके हटले की, दूरदूरचे कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, मोरगड, ढाक, राजमाची ही दुर्गमंडळी ओळखी देऊ लागतात. तळातील भातखाचरांची सर्वच गावे एकसारखी वाटतात. मुळशी जलाशय या साऱ्या देखाव्याला एक निळी किनार देतो आणि मग हे सारे पाहता पाहता कोरीगडची मुशाफिरी आकार घेऊ लागते.
पावसाळ्या मध्ये हा गड फिरताना एक वेगळाच अनुभव येतो. या गडाची भटकंती करीत असताना समोरील गावामधून वारकरी सप्ताहातील कीर्तने ऐकायला येत होती. या मधुर गाण्याच्या तालावर गड कधी फिरून झाला हे कळेच नाही. पावसाची अधूनमधून येणाऱ्या सरी आणि गार वाहणारा वारा अंगावरती शहारे उभे करीत होता. खरे तर या साऱ्याचा मोह ‘त्यांनाही’ झाला, त्यातूनच श्रीमंतांचा सहारा आता या कोरबारसे मावळात उभा राहिला. पण त्याच्या या विळख्यात आमचा कोरीगड मात्र उगाचच अवघडून उभा राहिल्यासारखा वाटतो. चालायचेच, काळाचा महिमा! पण या ‘काळा’ला एकच विनंती; गावे, शेती, जमिनी गेल्या; आता आमचा गड तरी आहे असाच सोळाव्या शतकातील राहू द्यावा! राजांच्या या कोरीगडालाही त्याचा मोकळा श्वास घेऊ द्यावा!
सौजन्य : संतोष घारे यांनी लिहिलेला हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करत आहे.
पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास.
ज्युनिअर केजीची फी पाहून बाबांनी मला संन्यास घायला सांगितले आहे....
वातावरणात उन्हाच्या प्रचंड झळा लागून, मनाची तलखी होत असावी. थंड पाणी पिऊन देखील घशाला शोष पडावी. घराबाहेर नावाला देखील वाऱ्याची झुळूक नसावी आणि त्यामुळे झाडांची पाने देखील शुष्क आणि अम्लान झाली असावीत. सगळीकडे रखरखाटाचे वातावरण पसरले असावे. डोक्यावरील पंख्यातून देखील गरम हवेचे(च) झोत पडत असावे आणि त्यामुळे चिडचीड वाढत असावी. बाहेर नजर ठरत नसावी कारण, डोळ्यांना उन्हाची तिरीप त्रस्त करीत असावी. अगदी डोळे मिटले तरी ग्लानी यायच्या ऐवजी लालसर पिवळे रंग फेर धरत असावेत. आणि अशा अस्वस्थ क्षणी दूरवरून, "मध्यम","पंचम" स्वरांच्या जोडीने "कोमल निषाद" कानावर येऊन, मनाची अवस्था किंचित मनोरम व्हावी. हीच किमया, ब्रिंदाबनी सारंग या रागाच्या, सुरांनी होते. रागदारी सुरांची ही किमया केवळ अलौकिक म्हणावी अशीच आहे. वातावरणात क्षणात बदल घडवून आणण्याची ताकद, सुरांच्या अवगाहनातून सहजगत्या होते आणि आपल्याला देखील, या किमयेचे नेमके विश्लेषण करणे अवघड होऊन बसते. अर्थात, यामागे मनावर झालेले पारंपारिक संस्कार देखील कारणीभूत असतात.
राशी :- मेष
स्वामी :- मंगळ
देवता :- भगवान विष्णु
जप मंत्र :- ॐ श्रीलक्ष्मीनारायणाय नमः
उपास्यदेव :- श्री गणेश
रत्न :- पोवळे
जन्माक्षर :- चू चे चो ला ली लू लेलो अ आ चै लृ ल लं मेष राशीवर मंगळ (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही अग्नि तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या १ ते ३० अंशात पसरली आहे. मेष राशीच्या व्यक्ती तापट, कर्तबगार, व्यावहारिक दृष्टीकोण ठेवणार्या, धीट, महत्वाकांक्षी, कोणत्याही
समस्येला बुद्धीने तोंड देणार्या अशा असतात. स्वतंत्र वृत्तीचा स्वभाव, कर्तबगारी यामुळे या राशीच्या व्यक्तींचा दैवापेक्षा प्रयत्नावर अधिक विश्वास असतो. हे अरसिक, रुक्ष,कठोर, खोटी स्तुती न करणारे, आग्रह न करणारे असे असतात. कालपुरूषाच्या मस्तकावर या राशीचा अंमल असल्याने या राशीच्या लोकांना सहसा मेंदूशी संबंधीत त्रास जसे दाह, मस्तकशूळ वगैरे तसेच चेहर्याचा पक्षाघात,नेत्रदोष, कर्णदोष, रक्तदाब वाढणे असे विकार होतात. मेष राशीच्या स्वभावानुसार यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण असल्यामुळे राजकारणी, सैन्य अधिकारी, पोलीस विभागातील अधिकारी जर या राशीचे असले तर ते जास्त
यशस्वी होतात.
कुतुहल, मित्रांचा आग्रह किंवा तात्पुरती मॊजमस्ती उसना आनंद म्हणून आयुष्यात प्रवेश केलेले दारु व इतर मादक पदार्थांचे व्यसन कसे आयुष्य उध्वस्त करते याचा प्रवास या सदरात केलेले आहे..
सातारा शहरापासून पूर्वेच्या भागात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये महादेव रांगेचे श्रृंग वसलंय. या श्रृंगातच नांदगिरी म्हणजे कल्याणगड हा किल्ला वसला आहे. पायथ्याशी नांदगिरी अर्थात धुमाळवाडी गाव असल्याने या किल्ल्याला नांदगिरी हे नाव मिळालं आहे
आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली.
२०१८ च्या डिसेंबर महिन्यात आमच्या गुड्डीचा (विशाखा) विवाह झाला. आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा पार झाला होता. सन-२०१८ साल लग्नाच्या गडबडीत कधी सरलं हे कळायच्या आत सन-२०१९ साल सुरू झालं.
"झिमझिम पाऊस,आभाळ भरून.
Copyright © 2025 | Marathisrushti