अखेर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा सोनिया गांधींनी मंजूर केला. विधिमंडळात प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावे लागू नये यासाठी हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच पक्षाने हा निर्णय घेतला. सुरेश कलमाडींनाही पक्षाच्या सचिवपदावरून हटवण्यात आले. काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत सफाई मोहिम राबवण्यात आली असली तरी ती कितपत परिणामकारक ठरणार हा खरा प्रश्न आहे.
November 10, 2010
सत्यनारायणाचं व्रत’ हा अनेकांच्या भक्तिभावाचा विषय तर अनेकांच्या चेष्टेचा. देवधर्म, सणवार या गोष्टींतील निरर्थक रूढींकडेच ज्यांचं लक्ष जातं, त्यांच्या दृष्टीनं हा चेष्टेचाच विषय. पण अध्यात्माच्या गूढ चर्चेत रमणाऱ्यांच्या दृष्टीनेही हे ‘काम्य व्रत ! ‘ म्हणजे कमी महत्त्वाचंच एकदा कशावरून तरी विषय निघाला आणि मी म्हटलं, ‘काही गोष्टी खरंच कळत नाहीत हं. ‘
December 28, 2023
माझे प्रकाशनाच्या मार्गावर असलेले ई-पुस्तक “पॉलिटिका” अल्पावधीतच प्रसिध्द होत आहे. हे पुस्तक मी माझ्या ब्लॉगवर नविन नोंदणी करणाऱ्या सदस्यांना सप्रेम भेट देण्याचे ठरविले आहे.
March 23, 2014
आज पुरुषांच्या बरोबरीने ५०%महिलांना राजकारणात प्रवेश मिळालाय अन् आज महिला नगरसेविका झाल्यात ते केवळ सावित्रीबाईंच्या धैर्यामुळे अन् पुढाकाराने….अशा या सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलांनी सामाजिक अन् राजकीय स्तरावर वावरतांना स्वत:पासून सुरवात करून समाजाला किमान भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, मुबलक पाणीपुरवठा, ग्रामीण व शहरातील महामार्गांवरील बस व एसटी थांब्याजवळ महिलांसाठी सौचालाये, महापालिका रुग्णालयांतून अध्यायावत आरोग्य सोयी, सुविधा व सेवा देण्याचं काम व स्वच्छता राखण्याचं काम जरी केलं तरी सावित्रीबाईंचं ‘मौलिक कार्य व स्वप्न’ सफल झाल्याचं समाधान व महिलाराजचं प्रत्यय तुम्हा आम्हा सर्वांनाच मिळेल यात दुमत नाही.अशा या आदर्श पहिल्या महिला शिक्षिकेला स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!
March 9, 2012
प्रथम देशाकरीता लंडनला गेला.
धिंग्राकरुनी कर्झन वायली मारीला.
समुद्र उड्डाण करुनी हाहाकार केला.
हादरले आंग्ल पाहूनी तव ज्वाळा.
जय देव जय देव….
June 4, 2013
ज्युनिअर केजीची फी पाहून बाबांनी मला संन्यास घायला सांगितले आहे....
June 28, 2016
आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे.
July 27, 2018
भारत आणि पाकिस्तान ह्या दोन देशामध्ये युद्ध पेटले व त्यांत अणु बॉंम्ब वापरले गेले तर त्याचे परिणाम फक्त ह्या दोन देशांच्या अवती भवतालच्या प्रदेशा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण जगात त्याचे परिणाम दिसतील. ही लढाई ( युद्ध ) जरी आशिया खंडात होत असेल तरी पण जगात याचा परिणाम दिसेल व त्या मुळे जागतिक दुष्काळाची भीती उद्दभवते व हें युद्ध त्यासं कारणीभूत ठरेल.
April 28, 2012
मानवाच्या सतत वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी राहायला आवश्यक जमीन, उद्योगधंद्यांना आणि इतर कामासाठी लागणारी जमीन, या वाढीव लोकसंख्येला पुरविण्यासाठी पिकवाव्या लागणाऱ्या अन्नासाठी आणखी जमीन, असा हा जमिनीवर अधिकाधिक अतिक्रमण करणारा विकास प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि वनस्पतींसाठी घातक ठरत आहे.
December 24, 2021
रमय ते बालपण
April 27, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti