मराठबाणा ही कविता लिहीताना डोळयांत शिवचरिञ तरळत हो्तं
पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्मृती जागवणारं 'ययाती देवयानी' या संगीत नाटकातील हे सुरांनो, चंद्र व्हा हे सुरेख पद..
हे गाणं लिहीलं आहे, मा.वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांनी. तर त्याला संगीत आणि आवाज लाभला आहे, स्वतः पं. जितेंद्र अभिषेकी यांचा. अभिषेकीबुवा हे गाणं गाताना इतके तन्मय होत की ते गाणं थेट मनाला भिडत असे. गाताना त्यांचं उजवं बोट आकाशाकडे जात असे. जणू काही ते सुरांना आज्ञाच देत असत. मुळातच 'हे सुरांनो, चंद्र व्हा' ही कल्पनाच सुचणं दिव्य आहे. अशी अलौकिक कल्पना फक्त कुसुमाग्रजांसारख्या महान कवींनाच सुचू शकते.
ययाती, देवयानी आणि शर्मिष्ठा अशा तिघांच्या प्राक्तनाची कहाणी म्हणजे हे नाटक आहे. यातील शर्मिष्ठा हे गाणं म्हणत असते.
हे सुरांनो, चंद्र व्हा
चांदण्याचे कोष माझ्या
प्रियकराला पोचवा ॥
शर्मिष्ठा खरंतर राजकन्या, पण एका दुर्दैवी घटनेमुळे ती देवयानीची दासी झालेली आहे. त्यावेळी ती ययातीसाठी हे गाणं म्हणत असते.
वाट एकाकी तमाची
हरवलेल्या मानसाची
बरसुनी आकाश सारे
अमृताने नाहवा ॥
ती म्हणते, हे सुरांनो, तुम्ही चंद्र होऊन माझ्या प्रियकराच्या आयुष्यात शीतल प्रकाश आणा. त्याच्यापर्यंत चांदण्याचे कोष पोहोचवा. त्याची वाट एकाकी आहे, अंधारमय आहे. तो हरवला आहे, त्याचं चित्त थाऱ्यावर नाही. हे सुरांनो, तुम्ही अमृताची बरसात त्याच्यावर करा. त्याला शांत करा. नवा मार्ग दाखवा. अशी विनवणी शर्मिष्ठा करत आहे.
https://www.youtube.com/watch?v=BZVAfYiqsjk&spfreload=5
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
महाड जिल्ह्यातील रायगड येथील आदिवासींचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नदीतील मासेमारी. पण नद्यांवर धरणं बांधली गेल्याने तेथील मच्छीमारीवर मर्यादा आल्या. पोटापाण्यासाठी आदिवासी स्थलांतर करू लागला. २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. त्या वेळी कोयनानगर सातारा येथील श्रमजीवी संघटना त्यांच्या मदतीला धावली. मच्छीमारीतून त्यांना उत्पन्न कसे मिळवता येईल, याबाबत त्यांनी विचार सुरू केला. पूर्वी दोन आदिवासी संस्थांनी सुरू केलेली तलावातील मच्छीमारी मासळीअभावी तोट्यात गेली होती. त्यांच्यासह अजून चार संस्था नोंदणीकृत केल्या आणि आठ तलाव भाडेपट्टीने घेतले.
तलावात मासळीचे प्रमाण वाढवण्यासाठी रोहू कटला, मृगल या गोड्या पाण्यात तीन स्तरांवर संचार करणाऱ्या माशांचे बीज तलावात सोडले. २००६ साली मासेमारीला सुरुवात केली. पण मागवलेले मत्स्यबीज निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर केलेला खर्च फुकट गेला. उत्पादनही मिळाले नाही. तरीही उमेद न हरता मत्स्यबीजनिर्मिती केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. खैरलवंग येथे पंधरा एकर जमीन भाड्याने घेऊन, मदत मिळवून अगदी कमी खर्चात तेथे मत्स्यबीज केंद्र उभे केले. मच्छीमारांना प्रशिक्षण दिले, जेणेकरून केंद्र पूर्णपणे त्यांचे त्यांनाच चालवता यावे.
वर्षातून दोन टप्प्यांत चालणाऱ्या बीजनिर्मितीत जास्तीतजास्त चक्रे पूर्ण केल्यामुळे बीजनिर्मिती वाढली. खात्रीशीर मत्स्यबीजामुळे माशांचे उत्पादनही वाढले. आठ तलावांत दिवसाला सरासरी पाचशे किलो मासेमारी व त्यांची विक्री केली जाते. गेल्या चार-पाच वर्षांत ५६ टनांची मासेमारी झाली. पहिल्याच वर्षी २०१० मध्ये सव्वा कोटी मत्स्यबीज तयार झाले. २०१२ मध्ये ही संख्या १ कोटी ८६ लाखांवर गेली. २०१२ मध्ये विविध संस्था, आदिवासी संस्था यांना १७ लाख तर २०१३ मध्ये १८ लाख मत्स्यबीजांचे मोफत वाटप केले.
महाडमधील सुमारे तीन हजार आदिवासी व पोलादपूर मधील एक हजार कुटुंबांना रोजगार तर मिळालाच, पण स्थैर्यताही मिळाली. अल्पशिक्षित आदिवासींना प्रशिक्षित केल्यास ते मत्स्यबीज केंद्र यशस्वीपणे चालवू शकतात, हे यांतून सिद्ध झाले आहे.
(संदर्भ : राज्य शासनाची वेबसाईट )
लेखक : सुरेश खडसे
महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीत नागपुर जिल्हा नेहमीच अग्रणी राहिलेला आहे.तसं पाहील तर आपल्या राज्यातील प्रत्येकचं जिल्ह्याची खाद्यसंस्कृतीत आपापली एक विशेष ओळख आहे.
खरं आहे. या टोलचा आता कंटाला आलाय. नुस्ते पेसे जातात म्हणून नाही तर वेळ किती फुकट जातो? एकदाच काय ते वर्षभराचे पेसे घ्या आणि आम्हाला या रोजच्या कटकटीतून वाचवा...

एक होता आंधळा. एक होता पांगळा. दोघेही एका देवळासमोर भिक मागत असत. अगदी सुरवातीला त्यांच्यात सख्य नव्हते. दोघेही वेगवेगळे बसून भिक्षा मागत. आंधळ्याला डोळे नसल्यामुळे लोक भिक्षा घालत. आंधळा अंदाजाने भिक्षा मोजत असे. पांगळा एकाच ठिकाणी बसून असे. त्याला भिक्षा कमी मिळे.
एके दिवशी पांगळा आंधळ्याला म्हणाला, आपण एकत्र भिक्षा मागू. त्यामुळे आपल्या दोघांचा फायदा नक्की होईल. तू मला उचलून घे. मी तुला कुठे जायचे ते सांगीन.
आंधळ्यांने मान्य केले. त्याने पांगळ्याला आपल्या खांद्यावर घेतला. दोघे मिळून भिक्षा मागू लागले. भिक्षा भरपूर मिळू लागली. आंधळा खुश झाला.
असे काही दिवस गेले. एकंदर दोघांचे बरे चालले होते. पण चालताना आंधळ्याला पांगळा जरा जड वाटू लागला. पांगळा चांगलाच तब्बेतीने सुधारत होता. आंधळ्याला संशय आला. आपल्याला दिसत नाही याचा फायदा तर हा पांगळा घेत नाही ना? आंधळा बैचेन झाला. कधी एकदा खांद्यावर घेतलेला पांगळा फेकून देतोय असे त्याला झाले. पण पांगळा आता आंधळ्याच्या खांद्यावरून उतरायला तयार नाही.
सहन होत नाही आणि सांगताही येत नाही .....काय करावे बरे आंधळ्याने ?
-- चिंतामणी कारखानीस
मनाच्या खेळात त्याचा आवडता भाग असतो कोणतीही गोष्ट अधांतरी ठेवण्याचा. अधांतरी असतात विचारांची आंदोलने आणि निर्णय प्रक्रिया. एखाद्या अगदी क्षुल्लक विचारला विनाकारण खूप मोठे बनवायचे आणि खूप मोठ्या विचारला अगदी सामान्य पातळीवर आणायचे हे मनाला खूप आवडते.
कवीता – जयेश मेस्त्रि-
तु माझी कुणी नाहीस,
Copyright © 2025 | Marathisrushti