(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • “आवाजी किमयागार” – संदीप लोखंडे

    काही व्यक्तींमध्ये कलाकार हा कुठल्यातरी कप्प्यात दडून बसलेला असतो, योग्य संधी मिळाली की तो स्वत:चं रुप प्रगट करतो, आणि त्या व्यक्तीला ही जाणीव होताच, त्याची कारकीर्द त्या दिशेनं वळू लागते, घडू लागते, पुढे फुलून त्या कलेला बहर पसरतो व कलाकार म्हणून ती व्यक्ती लौकिक मिळवते आणि सातासमुद्रपार सुद्धा चाहते निर्माण करते. अशीच प्रचिती आली संदीप लोखंडे या तरुणाशी बोलताना. स्टॅण्डअप कॉमेडियन, मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक आणि स्वत:तील अभिनयाचे पैलू त्यांनी “शेअर” केले मराठीसृष्टी.कॉम शी केलेल्या या बातचीत मधून……..

  • नाही म्ह्णून पाहू !

    विनाकारण असा स्वतःल त्रास करून घेण्यापेक्षा स्पष्ट नाही म्ह्णायला शिकण योग्य होणार नाही का ? बर्यारचदा आपल्या जवळ्च्या माणंसाच्या दबावाला बळी पडून एखादी गोष्ट नाईलाजाने करायला आपण होकार देतो आणि तो होकार देऊन केलेल्या चुकीची शिक्षा नंतर आयुष्यभर भोगत राहतो. 

  • मी बुवा बनतो (विनोदी कथा)

    उपहासात्मक विनोदी कथा

  • एका व्हाणाची व्यथा

    ना

  • सह्याद्रीतील महादरी-सांधण व्हॅली

    “महाराष्ट्रात गड-किलल्यांवर चढाई करणं जितकं साहसी आणि थरारक तितकच इथल्या दर्‍या-खोर्‍यां मध्ये भटकण्याचा अनुभव स्मरणीय आणि हो अॅडव्हेंचरस सुध्दा! कारण दरीतून चालण्याचा अनुभव म्हणजे एका दगडावरुन दुसर्‍या खडगावर, आणि मार्ग थेट उतराईचा असल्यामुळे ‘रॅपलिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स’ म्हणजे काय ते कळतं.

  • “क्रमश:” च्या निमित्ताने……

    “क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा एक प्रयत्न होतोय “मराठीसृष्टीद्वारे ! आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्‍या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल...

    “मराठीसृष्टी”ने ऑनलाईन माध्यमांमध्ये लिखाण करणार्‍या लेखकांचे साहित्य इ-बुकद्वारे प्रकाशित करण्याची योजना आखली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. इ-बुक सोबतच छापील पुस्तकेही प्रकाशित करावीत असा बर्‍याच लेखकांचा आग्रह होता आणि म्हणूनच “मराठीसृष्टी”ने याही क्षेत्रात पाऊल टाकले.

    “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. सर्वप्रथम हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या माध्यमातून आपल्यासाठी आणत आहोत.

    आपल्या प्रत्येकामध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला सुप्तावस्थेतून जागं करुन लिखाणासाठी एखादं व्यासपीठ मिळवून द्यावं म्हणून “मराठीसृष्टी”ची निर्मिती झाली. “मराठीसृष्टी” या वेबपोर्टलवर वाचकांनी मनोमन प्रेम केलेलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने वाचक इथे येतात. या वाचकांतूनच लेखक बनतात.

    प्रतिथयश प्रकाशकांचे दरवाजे या नव्या लेखकांसाठी बंदच असतात. यातूनच प्रकाशन व्यवसायात काही गैरप्रवृत्ती बळावल्या आणि लेखक त्या गैरप्रवृत्तींना बळी पडू लागले. स्वखर्चाने प्रकाशन करु इच्छिणार्‍या लेखकांनाही मार्गदर्शनाअभावी या गैरप्रवृत्तींना बळी पडावं लागलं. त्यामुळे “मराठीसृष्टी”ने प्रकाशन व्यवसायात पाय टाकताना संपूर्ण पारदर्शकतेचं धोरण स्विकारलंय आणि त्याचप्रमाणे आमची वाटचाल सुरु आहे.

    इंटरनेटच्या माध्यमातून मराठीत लिहिणार्‍या आणि लिहू इच्छिणार्‍याही, नव्या दमाच्या आणि जुन्या ताकदीच्याही सर्व लेखकांना शुभेच्छा!

    निनाद अरविंद प्रधान
    व्यवस्थापकीय संचालक आणि संपादक
    मराठीसृष्टी डॉट कॉम

  • तो असायला हवा होता म्हणून

    स्थळ : १० वी 'ब' वर्गाचा पहिलाच दिवस.बालमोहन विद्यामंदिर,दादर, मुंबई.
    काळ : (पालकांनी आडून आडून सुचविल्याप्रमाणे) गांभीर्याने घेण्याजोगा.
    वेळ : १३ जून १९७७, सकाळी १०.४२.
    प्रवेश पहिला : (वर्गात गलबला. एखाद्या धीरोदात्त नायकाप्रमाणे मराठेसर वर्गात प्रवेश करतात आणि वर्गातील कुजबुज आपोआपच कमी कमी होत वर्गात संपूर्ण शांतता पसरते.)
    मराठेसर पाच मिनिटे 'राष्ट्राच्या खऱ्या संपत्ती'समोर स्वागत आणि प्रोत्साहनपर भाषण करुन हजेरी घ्यायला सुरुवात करतात.

    'प्रफुल्ल अग्निहोत्री'
    "Present Sir".....
    सुट्टी सत्कारणी लावून कमावलेल्या जबरदस्त अमेरिकन ऍक्सेंटमधे प्रफुल्ल आपली उपस्थिती नोंदवतो.
    (सहा मुलींच्या भुवया उंचावतात.)
    'हेमंत बावकर'
    "Yes Sir"
    हेमंत नेहमीच्याच तरल आवाजात गुणगुणतो.
    (मराठेसरांच्या कपाळावर क्षणभर दीड मिलीमिटर जाडीची आठी उमटून जाते.)
    नंतर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतुकीप्रमाणे हजेरी संथगतीने चालू रहाते.

    'प्रविण रेगे'
    "नमस्ते गुरुजी !"
    'ऑं ?'.....धीरोदात्त नायकाचा चेहरा मानधनाचा धनादेश न वटल्यासारखा गोरामोरा होतो.
    आपण चुकून तळकोकणातील
    "जिल्हापरिषद मराठी शाळा क्र.४,वेताळबांबर्डे."मधे आलो असणार अथवा दादांनी (पक्षी : शिक्षणमहर्षी मा.दादासाहेब रेगे) आपल्या गळ्यात १० वी 'ब' च्या ऐवजी १० वी 'फ' चा वर्ग अडकविला असणार असे, आंगणेवाडीच्या जत्रेत हरविल्यासारखे भाव मराठेसरांच्या चेहऱ्यावर परावर्तित होतात.
    कथानायक प्रविणच्या चेहऱ्यावर मात्र एखाद्या अजाण बालकासारखे निष्पाप व निरागस भाव असतात.

    प्रविण मार्तंड रेगे !

    चेहऱ्यावर हेच भाव घेऊन प्रविण आमच्याबरोबर शाळेतील बारा वर्षे वावरला.
    माझे आवडते लेखक जयवंत दळवी त्यांच्या 'आल्बम' कादंबरीत लिहितात...
    "आपलं आयुष्य हे भागाकारासारखं असतं. समजा चौदाला चारने भागायचय. तर चार त्रिक बारा.बाकी उरले दोन.आता या बाकीचं काय करायचं ? अशीच काही ना काही बाकी आपल्या आयुष्यातसुद्धा उरत जाते आणि आपण पुढे चालत रहातो."
    मला वाटतं माझ्या मनातदेखील प्रविणच्या खात्यात थोडी गर्दगहिरी बाकी शिल्लक आहे.

    शिवसेनेचा पाळणा जिथे हलला त्या दादरच्या खांडके बिल्डिंगसारख्या राजकीय,सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्टया जागृत असणाऱ्या परिसरात तो लहानाचा मोठा झाला.त्याच्या पहिल्या मजल्यावरच्या घराबाहेर "सारस्वतांचा उपाध्ये" अशी,फुटपाथवरुनही वाचता येणारी पाटी लावलेली होती.(ती बहूदा त्याच्या आजोबांच्या व्यवसायाची जाहिरात असावी.)

    जगातील प्रत्येक शाळेच्या प्रत्येक वर्गात पंचावन्न ते साठ टक्क्यांच्या दरम्यान रेंगाळणारी एक अल्पसंख्य जमात असते. प्रविण त्या जमातीचा बिनीचा शिलेदार होता.रवी शास्त्री, मदनलाल व बिन्नी हे जसे भारतीय संघातील उपयुक्त खेळाडू होते त्याप्रमाणे प्रविण हा आमच्या वर्गातील उपयुक्त सदस्य होता.तो वर्गाच्या कबड्डी आणि क्रिकेट संघात तर असायचाच पण मिलिंद नेरुरकरला शनिवारच्या नाटुकलीमधे काम करायला कोणी मिळाले नाही की तो ऐनवेळी प्रविणला गळ घालायचा.मला स्मरतय,"थांब टकल्या भांग पाडते"सारख्या विनोदी नाटुकलीची नेमकी फार्सीकल नस पकडून तो बघता बघता मिलिंदसकट इतर सहकलाकारांना आरामात खाऊन टाकायचा.(अभिराम भडकमकरच्या 'हसत खेळत' नाटकात विनय येडेकरने जसे अशोक सराफ आणि कंपनीला खाल्ले होते ना,अगदी तसेच.) प्रविण म्हणजे "कमी तिथे आम्ही" या उक्तीची जणू चालतीबोलती जाहिरातच.किंबहुना कोणाच्याही मदतीला धावून जाणे हा त्याचा स्थायीभाव होता.

    पत्यांमधल्या जोकरप्रमाणे कोणाबरोबरही त्याचे गोत्र सहज जमायचे.शाळेतील त्याचा वावरही एखाद्या विदूषकासारखाच असायचा.कधी वर्गावर मुद्दामून उशीरा येऊन,शिक्षकांसकट सर्व विद्यार्थ्यांच्या नजरा रोखलेल्या असताना,तो बदकासारख्या दुडक्या चालीने दरवाजापासून आपल्या बाकापर्यंत चालत जायचा.तर कधी केसांचा गोटासदृश्य झीरोकटच करुन यायचा.
    पण आज इतक्या वर्षांनंतर वाटतं की या विदूषकी मुखवट्याआड तो त्याच्या मनातली खदखद किंवा अस्वस्थता आमच्यापासून लपवित तर नव्हता ?

    तो लवकर घरी जायला फारसा उत्सुक नसायचा आणि शक्य तितका वेळ घराबाहेर काढायचा असा मला तेव्हाही अंधुकसा संशय होता.
    एकदा तो मला संध्याकाळी उशीरा शाळेच्या युनिफॉर्ममधेच पार्कात भेटला.त्याच्या खिशात चक्क चार आणे होते.आमच्या शर्टला तर त्याकाळी खिसाच नसायचा.मला न कटवता उलट तो मला पाणीपुरी खायला घेऊन गेला.
    त्यानंतर त्याचा भय्याशी खालीलप्रमाणे प्रेमळ संवाद झडला.
    "भय्या, पानीपुरी कैसा दिया ?"
    'आठ आणा'
    "एक प्लेटमे कितना पुरी आयेगा ?"
    'सात'
    "हम दो दोस्त सात पुरी बराबर कैसे खायेगा ?"
    प्रविणने बिनतोड गणिती सवाल केला.
    (या भय्याने नंतरच्या काळात पवई परिसरात बऱ्याच अनधिकृत चाळी बांधल्या.पण इतका अवघड प्रश्न त्याला मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी देखील कधी विचारला नसावा.)
    'ठीक है बाबा, आठ पुरी देगा !'
    "ये ठिक है,यह लो चार आना,हम दोनो को दो-दो पुरी देना !"
    प्रविण विजयी स्वरात म्हणाला आणि हे संभाषण कौतुकाने ऐकणाऱ्या पाच-सहा गिऱ्हाईकांसमोर भय्याचा नाईलाज झाला.
    भय्याला जेरीस आणणारा पहिला मराठी माणूस मी पाहिलेला आहे.

    कधीकधी त्याच्या खिशामधे उघडझाप करणारा एक चार इंची चाकू असायचा.(एकदा सुजाता नाडकर्णीने बसमधून शाळेच्या सहलीला जाताना,सामुदायिक भेळेवर पिळण्यासाठी म्हणून त्याला एक लिंबू कापायला दिले.त्याच्या त्या बोथट चाकूने पातळ सालीचे लिंबूदेखिल कापले जाईना तेव्हा,आपल्याला विश्वासाने हातभर राख्या बांधणाऱ्या वर्गभगिनींसमोर आपले नाक कापले गेले म्हणून तो कमालीचा ओशाळला होता.) हे हौस म्हणून खिशात चाकू बाळगणं वगैरे ठिक आहे पण तो स्वभावाने बिल्कुल खुनशी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा नव्हता.शाळेत त्याने कधी कोणाशी पंगा घेतल्याचे किंवा कोणाशी मारामारी अथवा दादागिरी केल्याचे मला तरी आठवत नाही. तो मूलतः मवाळपंथी असावा असं मानायला बरीच जागा आहे.

    १९९१ सालातल्या एका भल्या पहाटे,बांद्राच्या टीचर्स कॉलनीसमोरील रस्त्यावर,प्रतिस्पर्धी टोळीकडून झालेल्या गोळीबारात तो मारला गेला.त्याच्या टोळीप्रमुखावर झालेला गोळीबार मधे पडून त्याने स्वतःच्या अंगावर झेलला म्हणतात.समोरच्याला मदत करण्याचा घेतलेला वसा त्याने मृत्यूच्या दारातदेखील टाकला नाही.

    तो काही राजकारण्यांना आणि बिल्डर्सना वेठीला धरणारा हाय प्रोफाईल गँगस्टर नव्हता.त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही फारसा गवगवा झाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात 'विवाहितेस जाळले' अथवा 'तरुण बुडाला' अशा सिंगल कॉलमी बातम्यांखाली त्याच्या मृत्युची बातमी छापून आली होती असे सांगतात.

    तो वाममार्गाला का,कधी व कसा लागला याचा शोध घेण्याची वेळ तर कधीच निघून गेली होती. त्याकाळी फिशपॉंड देण्याची पद्धत होती की नाही माहीत नाही पण "आदमी सडक का" हा फिशपॉंड त्याला चपखल बसला असता.

    तो आज असता तर आमच्या वर्गाच्या रियुनियन संयोजनात त्याने उत्साहाने भाग घेतला असता.आणि किमान यावेळेस तरी चांगला धारदार चाकू आणून त्याने लिंबू आणि उकडलेली अंडी कापायला आम्हाला नक्कीच मदत केली असती.

    प्रविण मार्तंड रेगे !!

    संदीप सामंत.
    ९८२०५२४५१०
    १४/०३/२०२२.

  • पुन्हा एकदा सार्वभौमत्वावर हल्ला

    वाराणसीमधील शीतला घाट येथे गंगा आरती सुरू असताना बॉम्बस्फोट घडवून दहशतवाद्यांनी देशाच्या सार्वभौमत्वावर पुन्हा एकदा हल्ला केला. आपले सरकार, गुप्तहेर खाते आणि पोलिसही असे हल्ले रोखण्यास पुन्हा एकदा अपयशी ठरले. असे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘अँटिसिपेटरी थ्रेट अॅनालिसिस’ आणि ‘प्रेडिक्टिबिलिटी थ्रेट अॅनालिसिस’ या यंत्रणांचा अभाव हेच असे हल्ले यशस्वी होण्याचे कारण आहे.

  • एका शाळेतलं मीडिया प्रशिक्षण

    एका मोठ्ठाल्या इंटरनॅशनल शाळेत नोकरी मिळाली.. तीही शिक्षिका म्हणून…विषय: mass communication and journalisum… इयत्ता तिसरी ते नववी…. मुळात तिसरीतल्या मुलांना मीडिया हा विषय का शिकवावा? समजा शिकवायचाच असेल तर मीडिया कसा पहावा.. का वापरावा वगैरे अगदी बेसिक .शिकवलं तर ठीक आहे पण३री ते ९वीतल्या मुलांना पत्रकारिता.. किंवा चित्रपट निर्मिती? खरं तर माझ्या करिता हा धक्का होता…

  • ज्येष्ठ तबला वादक झाकिर हुसेन

    आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.