(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सन्नाटा

    बायको : ऐकलंत का, आपली नवीन शेजारिन म्हणते की, तीला सेम आपल्या बंड्या सारखा मुलगा झाला पाहिजे ...

    नवरा : हो का ? अगं घे की मग तीला रात्री आपल्या घरी बोलावून

    सगळया रूम मध्ये एकदम "सन्नाटा"

    ऐका ना मंग पुढं बी, जोक खास खाली आहे.

    बायको : पण मग मी तीला पाटलांच्या घरी जायाला सांगीतलं.

    बा@@@@प रे

    आता तर "सन्नाटा" थांबाचं नावच नही घेउन राहिला.

  • सुट्टीत मामा कडे जाऊ

  • संतसाहित्य समीक्षेतील धाडस

    प्रा. डॉ. गुरुप्रसाद पाखमोडे यांनी `संत एकनाथांचे अभंग, स्वरूप समीक्षा हा ग्रंथ लिहून मराठी संतसाहित्याच्या समीक्षेतील एक रिकामी जागा भरून काढण्याचे श्रेय अभ्यासाने प्राप्त केले आहे. रिकामी जागा भरली असे म्हणण्याचे कारण असे आहे, की अनेक अभ्यासकांनी नाथांच्या विविध साहित्यांवर साक्षेपी लिखाण केले आहे.

  • सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का?

    दरवर्षी होणार्‍या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत…. आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला?

    प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान आपल्या मराठीसृष्टीद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता उपलब्ध आहे. आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनाच्या आयोजकांपर्यंत.. आणि पर्यायाने या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही…

  • रक्षाबंधन

    श्रावण महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन नावाचा विधी करतात. पूर्वी आतासारखा हा सण नव्हता.

  • वेधशाळा

    काही जागा अशा असतात की ज्यांच्याविषयी मनोमन कुतुहल असूनसुध्दा त्या जागांच ऐतिहासिक महत्व किंवा मोल काय आहे, भूतकाळात व वर्तमानात त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाची व्याप्ती काय आहे याची जाणीव आपल्याला नसते. त्या जागेमध्ये नक्की काय चालतं व कुठल्या वैशिषट्यांमुळे त्या जागेची किर्ती ही सर्वदुर पसरलेली आहे, यांविषयी आपल्या मनात पुर्णपणे काळोख नसला तरी पुर्ण प्रकाशसुध्दा नसतो. समस्त अलिबागकरांच्या व पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेली व अलिबागसारख्या बिंदुभर गावाला केवळ भारताच्याच नाही तर जगाच्या नकाशामध्ये प्रतिष्ठेचं व सन्मानाचं वलय प्राप्त करून देणारी अशीच एक ऐतिहासिक व प्राचीन जागा म्हणजे अलिबागची चुंबकीय वेधशाळा.

  • आनंदाने तु नाच

  • प्रिटोरिया – माझा सर्वोत्तम काळ – भाग २

    साउथ आफ्रिकेत मी एकूण १७ वर्षे राहिलो, अनेक लोकांशी ओळखी झाल्या, काही मोडल्या तरीही माझा प्रिटोरियामधील काळ हा सर्वोत्तम,असेच म्हणायला हवे. एकतर राहायला सुंदर घर मिळाले होते, बरेचसे भारतीय (माझ्यासारखे नोकरीसाठी आलेले) आजूबाजूला राहात होते, त्यामुळे गाठीभेटी (जरी नैमित्तिक असल्या तरी!!) होत असत. इथेच, मी पहिल्यांदा सिम्फनी संगीताची मैफिल प्रत्यक्ष ऐकली आणि त्याच भारावलेल्या अवस्थेत घरी येउन, बेथोवन,मोझार्ट यांच्या सीडीज रात्रभर ऐकत रात्र काढली!! मराठी माणसे बरीच भेटली, काहींनी निराशा केली, इतकी की, त्यांना परत भेटताना मनात निराशाच ठेऊन भेटलो. त्याचे असे झाले, पहिल्याच भेटीत “माझे मराठी वाईट आहे आणि म्हणून मी हिंदीतच बोलणार” असा अत्याग्रह दिसला!!
    वास्तविक मराठी बोलता येत नव्हते असे नसून, बोलायला “लाज” वाटायची!! फार नाही पण, ३ गृहस्थ असे भेटले. तसे माझे इथे ३ ग्रुप झाले होते. १] खुद्द माझ्या कंपनीत, हेतल, महेंद्र, विजय, कधीमधी भारतातून येणारा रिचर्ड तसेच आमचा सीइओ विजय नाक्रा!! २] मकरंद, बंटी,सुहास, वैभव (हे नंतर भारतात परतले), अशोक आणि राजेश., ३] माझे महाराष्ट्र मंडळ – तिथे राजीव तेरवाडकर, प्रशांत, विनय, आदित्य, कौस्तुभ इत्यादी. मकरंदशी माझी आधीपासूनच ओळख होती आणि त्याने लगेच मला त्याच्या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. इथला खरा संस्मरणीय काळ म्हणजे,भारताचा २००७ सालचा T20 world cup विजय!!
    मकरंदचा चुलत भाऊ अविनाश, याची मुंबईत चांगली CA Practice चालू आहे आणि त्यात, भारतीय संघाचा त्यावेळचा व्यवस्थापक लालचंद राजपूत, हा अविनाशचा चांगला मित्र, पर्यायाने मकरंदचा!! जेंव्हा, भारताने, साउथ आफ्रिकेवर अविश्वसनीय विजय मिळवला आणि डर्बन इथे सेमी फायनल साठी ऑस्ट्रेलियाशी गाठ पडली, हे नक्की झाल्यावर, मकरंदचा मला फोन आला, त्याला ४ पासेस मिळाले आहेत, तेंव्हा विमानाचे तिकीट काढ. डर्बनला जायचे आहे. शनिवारी Match होती, सुदैवाने बंटी कामानिमित्त डर्बन इथे होता, त्याने लालचंदकडून पासेस मिळवले आणि सकाळच्या फ्लाईटने, मी, मकरंद आणि वैभव डर्बन इथे गेलो. Match संध्याकाळची असल्याने, दुपारी मॉलमध्ये खाऊन घेतले आणि स्टेडीयममध्ये शिरलो!! अक्षरश: तुफान गर्दी!! जिकडे तिकडे भारतीय झेंडे फडकत होते. अर्थात, डर्बन इथे भारतीय वंशाचे लोक लाखोंच्या संख्येने राहतात, त्यामुळे ते सगळे स्टेडीयमवर!! साउथ आफ्रिकेतील Matches मी पूर्वी टीव्हीवरून पाहिलेल्या असल्याने, मनात थोडी उत्सुकता होती.
    वैभवने येतानाच बियरचा टमरेल घेतला होता आणि त्यात, त्या Match मध्ये युवराज आणि धोनी सुसाटले!! बियरला “चव” लाभली, त्याला तोड नाही!! घसा फाटेस्तोवर ओरडून घेतले आणि जेंव्हा फायनलमध्ये, जोहान्सबर्ग इथे भारत/पाकिस्तान भेटणार हे नक्की झाले तेंव्हा मनात जी excitement दाटली, तिला तोड नाही!! वास्तविक, वैभव दुसऱ्या दिवशी, रविवारी भारतात परतणार होता, त्याने तिकीट Cancel केले!! त्याच रात्री,बंटीने डर्बन – जोहान्सबर्ग अशी गाडी हाकली!! भारताचा विजय, पोटात भरपूर बियर, प्रवास कसा झाला, हे वेगळे नकोच!! रविवारी पहाटे ३ वाजता,आम्ही मकरंदच्या घरी पोहोचलो, म्हणजे त्याच्या complex मध्ये!! म्हणजे रात्रभर बंटी एकटाच गाडी चालवत होता!! धन्य आहे!! माझी गाडी तिथेच होती, तशीच गाडी चालवायला घेतली!! भल्या पहाटे, पहिल्यांदाच जोहान्सबर्ग शहर बघत, जवळपास ७० किलोमीटर गाडी चालवून प्रिटोरिया मधील माझ्या घरी आलो, ते फक्त बिछान्यावर पाठ टेकण्यासाठीच!!
    रविवार सगळा झोपून काढला. रात्री मकरंदचा फोन आला, लालचंदबरोबर जेवायला जात आहोत, येतोस का? एकटा राहिल्याचा, हा फायदा!! परत गाडी आता ८० किलोमीटर चालवली आणि त्याच्याबरोबर “पार्टी” (हाच शब्द योग्य!!) करून, परत रात्री १२ वाजेपर्यंत परतलो!! सोमवारी, इथे सुटी होती, एव्हाना, मी डर्बन इथे Match पाहायला गेलो होतो,हि बातमी पसरली होती आणि त्यामुळे “मला पास मिळेल का?” असे फोन आले!! अर्थात, मी काय करणार, माझ्या हातात काहीच नव्हते!! तसा, मी मकरंदला फोनवर विचारले पण तो हताश होता.
    सोमवार दुपार!! मकरंदला गाडी पार्क करायला जागा मिळाली नाही, इतकी तुडुंब गर्दी!! शेवटी, स्टेडीयमपासून १५ मिनिटे लांब गाडी पार्क करावी लागली, मकरंदचा मुलगा,करण आमच्याबरोबर होता. कसेबसे आत शिरलो. स्टेडीयममध्ये खऱ्याअर्थी माणूस शिरायला जागा नव्हती, सगळीकडे, भारत आणि पाकिस्तानचे झेंडे फडकत होते, मध्येच तुरळक काही गोरे दिसत होते. Match शेवटपर्यंत रंगतदार झाली आणि अखेर भारत ज्या क्षणी जिंकला, तो क्षण मी मनात कायमचा जपून ठेवला आहे!! मला तर १९८३ ची फार आठवण आली, त्यानंतर डायरेक्ट २००७!! रात्री, आम्ही देखील एका पबमध्ये विजय साजरा केला!! दुसऱ्या दिवशी ऑफिसमधील इतर मित्रांना बातमी सांगितली आणि त्यांचे चेहरे विस्फारले, त्याची चव वेगळीच!!
    मागील लेखात महाराष्ट्र मंडळाची “गाथा” सांगितली होती. माझ्या अंदाजाने, अजूनही तशीच परिस्थिती आहे. प्रत्यक्ष बोलताना, “आपले मंडळ” अशी भाषा करायची पण प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी पाठ दाखवायची!! मला तर अशा लोकांचा फार रागच यायचा. त्यावर्षी राजीव तेरवाडकरच्या घरी होळीचा कार्यक्रम ठेवला होता, सगळ्यांना दोन महिने आधी कल्पना दिली होती आणि त्यादृष्टीने “होकार” मिळवले होते. राजीवच्या घरी, होळीचे सामान आणले होते, जेवणाचे Contract बाहेरच दिले होते, साधारण ७० ते ८० जण येतील असा अंदाज होता पण अखेर प्रत्यक्षात केवळ ५० व्यक्ती आल्या!! यात, मंडळाची Management धरून!! यथासांग “होळी” पेटवली,भारताप्रमाणे पूजा केली, नंतर “बोंबा” मारल्या, संगीताचा कार्यक्रम झाला ( मी देखील तबल्यावर जवळपास १५ वर्षांनी हात “साफ” केला!!) आणि अर्थात जेवणाचा कार्यक्रम!!
    मला इतर देशांतील मंडळांची अवस्था माहित नाही, म्हणजे अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर मंडळाचे कार्य चालते, तसेच इंग्लंड इथे देखील परंतु साउथ आफ्रिकेत अजूनतरी मंडळाने “बाळसे” धरलेले नाही!!
    याचे मुख्य कारण, लोकांची मनोवृत्ती!! एकतर बहुतेक सगळे प्रथमच भारतातून, इथे आलेले. साउथ आफ्रिका म्हणजे, युरोपचा छोटा अविष्कार!! म्हणजे, हवामान, Infrastructure, राहणीमान अशा गाष्टींचे फार अप्रूप वाटते!! काहींच्या ते “डोक्यात” जाते!! त्यामुळे, आपण भारतीय आहोत आणि आपणदेखील कधीतरी का होईना, भारतात जाणार आहोत, हे विसरून “ताठ्यात” वागायला लागतात!! मराठी बोलणे देखील नाकारणे,हा त्याच वृत्तीचा भाग. इथे मला गुजराती लोकांचा हेवा वाटतो. डर्बन इथे trading business अधिक करून, गुजराती आणि मुसलमान लोकांच्या हातात आहे, जे केवळ भारतीय वंशाचे आहेत, म्हणजे त्यांची चौथी किंवा पाचवी पिढी इथे रहात आहे, भारताशी तसा काहीही संबंध उरलेला नाही!! तरीही या नहुतेक गुजराती लोकांच्या घरात तसेच वातावरण असते, म्हणजे बहुसंख्य गुजराती शाकाहारी, घरात तशीच देवपूजा, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, गुजराती बोलायला लागले तर पत्ता लागणार नाही, की ही व्यक्ती इथल्या चौथ्या पिढीची आहे म्हणून!! इतके अस्खलित गुजराती बोलतात आणि मुख्य म्हणजे त्यांची मुले देखील तेच “वळण” गिरवतात!!
    याउलट माझ्यासारखे नोकरीनिमित्ताने आलेले भारतीय!! ३,४ महिन्यात “साउथ आफ्रिकन” संस्कृती आवाक्यात घेतात. यांच्या मुलांचे मात्र कधीकधी हाल होतात. एकतर ही माणसे, त्यांच्या भारतातील कंपनीतर्फे आलेली असतात, त्यामुळे जोपर्यंत Contract आहे, तोपर्यंत नोकरी!! मुले तशी इथे लगेच settle होतात, पण परत जायची वेळ येते, तेंव्हा प्रश्न उद्भवतो!! इथल्यासारखे राहणीमान, भारतात शक्यच नसते आणि मग मनाची कुचंबणा होते, अगदी माझ्याबाबतीत देखील सुरवातीला हा बदल स्वीकारणे फार अवघड गेले, जरी मी इथे एकटाच राहात होतो, दरवर्षी कमीतकमी महिनाभर सुटीवर येत होतो तरीही!!
    इथे Sandton नावाचा भाग आहे, जोहान्सबर्ग मधील अति अलिशान भाग!! इथेच श्रीमंतीची रेलचेल दिसते आणि त्याचेच प्रतिबिंब इथल्या मॉल्समध्ये दिसते. अर्थात, सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत चाललेला आहे, इतका की रस्त्यावरून संध्याकाळचे पायी चालणे दुरापास्त झाले आहे. असो, इथल्या भारतीय लोकांनी मात्र माझ्यासारख्या एकट्या राहणाऱ्या माणसाचे आयुष्य मात्र सुखाचे केले, हे मान्यच करायला हवे.मी, सेंच्युरीयन भागात राहात होतो, तिथे माझ्या complex समोर, एक आयरिश पब होता/आहे, तिथे संध्याकाळी बियरचा एक “पिंट” घेऊन बसले म्हणजे अगदी मुंबईतील इराण्याच्या हॉटेलप्रमाणे तासंतास बसत येते, विशेषत: सोमवार ते गुरुवार, संध्याकाळी फारशी वर्दळ नसते, तेंव्हा तिथे बसून शांतपणे “समाधी” लावणे, हा सुंदर अनुभव होता. माझ्या कितीतरी संध्याकाळ या पबमध्ये गेल्या आहेत, इतक्या की पुढेपुढे, तिथला वेटर (पुरुष/स्त्री, जे कुणी तिथे असेल ते!!) मी आलो, कि लगेच “पिंट” घेऊनच यायचे!! जून/जुलै मधील गारठलेल्या संध्याकाळी बियर पिणे, हा अनुभव शब्दात मांडणे अवघड आहे!! अखेर मी देखील नोकरदार माणूस, कंपनी जशी चालेल,त्याप्रमाणात तिथला रहिवास!! कधीतरी स्वप्नाची अखेर ही ठरलेलीच!!
    - अनिल गोविलकर

  • माणूस

     

  • भीमसेन जोशींबद्दलचा एक ह्रुद्य किस्सा जरूर वाचा

    सच्च्या स्वरांचे, पक्क्या शब्दाचे!

    मी त्या वेळी वाडिया ब्रदर्स, मुंबई या चित्रपट संस्थेसाठी 'स्वयंवर झाले सीतेचे' हे चित्र दिग्दर्शीत करीत होतो. या चित्राचे लेखक गीतकार ग. दि. माडगूळकर होते आणि संगीत वसंत देसाई यांचे. या चित्रपटात रावणाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रावण हा ऋषीकुमार सर्व विद्येत पारंगत होता. शस्त्रास्त्र शास्त्रात तो निपुण होता. गायनाचा त्याला शौक होता. त्याने तो उत्तम जोपासला होता. रावणाच्या तोंडी 'गदिमां'नी एक गीत लिहिले होते. अहंमन्य रावण या गीतात लंकेच्या ऐश्वर्याचे आणि ताकदीचे वर्णन करतो. रावणाचे हे गीत - 'रम्य ही स्वर्गाहून लंका' - भीमसेन जोशींसारख्या दमदार आवाजाच्या गायकाकडून गाऊन घ्यावे, असे होमी वाडिया, वसंत देसाई आणि मी ठरवले. भीमसेन जोशींशी बोलणी करण्याचा सर्व अधिकार होमीशेठनी मला दिला.
    मी पुण्याला भीमसेन जोशींच्या घरी गेलो. समोर एका खुर्चीत भीमसेन बसले होेते. त्यांनी विचारले, 'काय बाबा?'
    ' वाडिया ब्रदर्ससाठी मी स्वयंवर झाले सीतेचे हा चित्रपट दिग्दर्शीत करत आहे. त्यातील रावण या व्यक्तिरेखेच्या तोंडी एक गीत आहे- रम्य ही स्वर्गाहून लंका, ते आपण गावेत अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे.'
    ' गीत कोणी लिहिले आहे?'
    ' ग.दि. माडगूळकरांनी. संगीत वसंत देसाई यांचे आहे.'
    भीमसेनजी थोडा वेळ गप्प बसले. मग म्हणाले, 'मला या गाण्याचे दीड हजार रुपये मिळाले तर मी गाईन.'
    भीमसेनजींच्या दमदार आवाजाची आणि आकर्षक गायनाची मला पूर्ण जाण होती. मी भीमसेनजीना दोन हजार दिले जातील, असे वचन दिले. भीमसेनजींच्या चेहऱ्यावरील चिंतेचं झाकोळ थोडं कमी झालं. त्यांना कसली चिंता होती हे मात्र मी विचारले नाही. नंतर मला कळले, त्यांच्या पत्नी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या.
    ' रेकॉडिर्ंगची तारीख कळव, मी मुंबईला येईन,' असे म्हणून ते खुर्चीवरून उठले आणि स्वयंपाकघराकडे गेले.
    रेकॉडिर्ंगची तारिख ठरली. होमी वाडियांची फियाट गाडी घेऊन मी पुण्याला आलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मुंबईतील दादर भागातील, पोर्तुगीज चर्चजवळील 'बॉम्बे लॅब'च्या रेकॉर्डिंगरूममध्ये पोहोचलो. वसंत देसाई आणि होमी वाडियांनी भीमसेनजींचे स्वागत केले. मी समोर पाहिले,रेकॉर्डींग हॉलमध्ये पांढऱ्याशुभ्र गादी, तक्क्या, लोड यांच्या बैठकी चौफेर घातल्या होत्या. मी भीमसेनजींना गाण्याचा कागद दिला. वसंत देसाई म्हणाले, 'मी बांधलेली चाल आपल्याला म्हणून दाखवतो.' असे म्हणून वसंतरावांनी वाद्यमेळाला हात वर करून इशारा केला. वाद्ये वाजू लागली. वसंतरावांनी ध्रुपद आणि अंतऱ्याची चाल ऐकवली. भीमसेनजी त्या गीताच्या कागदाकडे लक्षपूर्वक पाहत तीन-चार मिनिटे चिंतनात गुंतून गेले. नंतर त्यांनी वसंत देसाईंकडे पाहिले आणि म्हणाले, 'मी एकदा गाऊन दाखवतो, काही सुधारणा असल्यास सांगावी.'
    गीताच्या कागदाकडे पाहत भीमसेनजी बारीक आवाजात स्वत:शीच गुणगुणू लागले.
    होमीसेठचे सर्व कुटुंबीय, वसंत देसाईंचे गानक्षेत्रातील अनेक मित्र भीमसेनजींकडे टक लावून बघत होते. भीमसेनजींचे गुणगुणणे थांबले आणि हात वर करून ते वसंत देसाईंना म्हणाले, 'तुमचा वाद्यमेळा सुरू करा, मी गीत म्हणून दाखवतो.' वाद्यमेळा वाजू लागला आणि भीमसेनजी आपल्या दमदार आवाजात गाऊ लागले-
    ' रम्य ही स्वर्गाहून लंका, तिच्या कीतीर्चा सागरलहरी वाजविती डंका...'
    भीमसेनजींनी बघता बघता त्या गीतावर आपला कब्जा केला आणि संपूर्ण गीत त्यांनी ताना, पलटांसह गाऊन दाखविले. भोवताली बसलेल्या सर्व रसिक श्रोत्यांकडून 'वाहवा! वाहवा!' असा गजर झाला. वसंत देसाई पुढे झाले आणि त्यांनी भीमसेनजींशी हात मिळवले आणि म्हणाले, 'व्वा, क्या बात है, रेकॉडिर्ंग करूया?'
    भीमसेनजी म्हणाले, 'आणखी काही सुधारणा हव्यात का?'
    वसंतरावांनी भीमसेनजींच्या हातात पुन्हा हात मिळवत सांगितले, 'उत्तम गायलात आपण, दहा-पंधरा मिनिटांच्या विश्रांतीनंतर आपण गाणं रेकॉर्ड करू.'
    भीमसेनजी आसनावरून उठले त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले, 'चल बाबा आपण दहा -पंधरा मिनिटं चक्कर मारून येऊ.'
    मी भीमसेनजींच्या बरोबर लिफ्टपर्यंत गेलो तोच वसंतरावांनी हाक मारली. जवळ येऊन त्यांनी खुणेनेच मला सुचवले- भीमसेनजींना रोख. अजिबात घेऊ देऊ नकोस. मी मानेनेच आश्वासन दिले आणि भीमसेनजींबरोबर खाली रस्त्यावर आलो. ते तरातरा चालत पोर्तुगीज चर्चजवळ गेले. एका बोळात शिरले, एका घराशी आले. मी विचारले, 'इकडे कुणाकडे जायचे?' त्यांनी उत्तर दिले नाही. माझा हात पकडून ते जिना चढू लागले. त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका दाराशी ते थांबले. मी भीमसेनजींचा हात धरत म्हणालो, 'आपल्याला दहा-पंधरा मिनिटांत गाणे रेकॉर्ड करायचे आहे. तुम्ही काही घ्यायचं नाही.'
    ' तू चूप रे, मला नको शिकवूस...' म्हणत भीमसेनजींनी समाधानी चेहऱ्याने त्यांना हवे ते केले. मग जॅकेटच्या खिशातील गाण्याचा कागद समोर धरून ते गुणगुणू लागले- 'रम्य ही स्वर्गाहून लंका.' हातवारे करत भीमसेनजी ते गाणं आपल्या घशावर ठसवत राहिले. मी पुन्हा त्यांचा हात धरला आणि म्हणालो, 'गाण्याच्या रेकॉडिर्ंगमध्ये काही घोटाळा झाला तर माझी आणि वसंत देसाईंची नाचक्की होईल.'
    तेव्हा ते दिलखुलास हसले. म्हणाले, 'नाचक्की झाली तर माझी होईल.' असं म्हणून ते उठले. म्हणाले, 'चलो बाबा, तू चिंता मत कर.'
    आम्ही एका पानाच्या ठेल्यापाशी थांबलो. भीमसेनजींनी उत्तम पान जमावले. सातारी जर्दा तोंडात टाकला. खरंतर मी मनोमन अस्वस्थ झालो होतो. आता गाण्याच्या रेकॉर्डींगचे काय होणार याची मला चिंता लागून राहिली होती.
    आम्ही लिफ्टने रेकॉर्डींग रूममध्ये आलो. वसंत देसाई सामोरे आले. त्यांच्या सगळं लक्षात आलंच. भीमसेनजी चालत बैठकीकडे गेले. वसंतराव थोड्या दबक्या आवाजात मला रागातच म्हणाले, 'शेवटी व्हायचं ते झालं ना? तू त्यांना अडवलं का नाहीस?' तेवढ्यात बैठकीत माईकसमोर बसलेल्या भीमसेननी मोठा आवाज दिला, 'वसंतराव, चला, गाणं रेकॉर्ड करा.' वसंत देसाईंनी सगळया वादकांना इशारा केला आणि वाद्यमेळा वाजू लागला. भीमसेनजीनी आपल्या खड्या दमदार आवाजात गायला सुरुवात केली.

    ' रम्य ही स्वर्गाहून लंका...'

    बघता बघता भीमसेनजी गाण्यात एवढे गुंगून गेले की सर्व रसिक श्रोते, वसंत देसाई आणि मी अचंब्याने गानसमाधीत व्यस्त असलेल्या भीमसेनजींकडे पाहतच राहिलो. भीमसेनजी एका दमात ते गीत गाऊन पुरे केले. रेकॉडिर्स्ट शर्माने हात वर करून 'इट्स ओके!' भोवतीच्या सर्व रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
    भीमसेनजी नम्रपणे म्हणाले, 'तुमच्या दृष्टीने हे गाणे ओके असले तरी मी पुन्हा गातो. एक अंतरा थोडा वेगळेपणाने गायचा आहे. तुम्हाला आवडेल तो 'टेक' वापरा', असे म्हणून भीमसेनजी पुन्हा खाली मान घालून गुणगुणू लागले. वसंतरावांनी पुन्हा वाद्यमेळ्याला हात केला. आणि त्याच जोशात आपल्या दमदार आवाजाने भीमसेनजीने दुसरा टेक पूर्ण केला. पुन्हा रसिक श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. वाडियाशेठनी पुढं होऊन भीमसेनजींच्या गळ्यात गुलाबाचा हार घातला. भीमसेनजींच्या दमदार गाण्याच्या सुगंधाने सर्व रसिकवृंद मुग्ध झाला होता. त्यांच्या मघाच्या कृतीचा कुठेही मागमूस नव्हता. सर्व रसिकांनी भीमसेनजींच्या भोवती गर्दी केली. अभिनंदनाचा वर्षाव केला. तेव्हा भीमसेन म्हणाले, 'आपण आपल्या जागेवर बसा. मला थोडे गायचे आहे.' त्यांनी वसंतराव देसाईंना आणि तबलजी आचरेकरांना खुणावलं. वसंतराव हामोर्निअम वाजवायला बसले. आचरेकर तबल्यावर बारीक आवाजात ठेका धरत तबल्याच्या खुंट्या पिळू लागले. भीमसेनजींनी स्वर ठीक लागला असं खुणावलं. 'बाबुल मोरा' ही भैरवी त्यांनी गायला सुरुवात केली. या गाण्यात ते एवढे रंगून गेले, की रसिकांना आपण कुठे आहोत तेच कळेना. जवळपास पाऊणतास भीमसेनजी ही भैरवी गात राहिले. सारा श्रोतृवर्ग धुंद होऊन गेला. भीमसेनी स्वरसुगंधाने सारा रसिकवृंद मोहून गेला होता. वसंतराव देसाईंनी भीमसेनजींना गळा मिठी मारली. पाणावलेल्या डोळ्यांनी वसंतराव म्हणाले, 'माझ्या गीतबांधणीचं चीज केलंत आपण.' भीमसेनजींनी सर्वांच्याकडे हास्यमुदेने पाहिले. बटवा काढून डाव्या हातावर तंबाखू घेतली, चुन्याने मळली आणि तोंडात टाकली. सर्वांना हात जोडत ते म्हणाले, 'आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा.'
    लिफ्टपाशी आल्यावर वसंत देसाईंनी माझ्या हातात एक पाकिट दिले. ते भीमसेनजींना द्यायला सांगितले. आम्ही गाडीपाशी आलो. भीमसेनजी आणि मी गाडीत बसलो. त्यांनी ते पाकीट उघडले आणि पैशाकडे पाहून मला म्हणाले, 'अरे, हे पैसे जास्त आहेत. आपले दोन हजारच ठरले होते. हे तर पाच हजार आहेत. यातले तीन हजार वर परत करून ये बघू.'
    ' अहो भीमसेनजी तुम्ही गाणं रेकॉर्ड करून झाल्यानंतर जवळपास 'बाबुल मोरा' ही भैरवी तासभर गायलात आणि रसिकांना गुंगवून टाकलेत. वाडियाशेठनी हे अधिकचे पैसे आपल्या गाण्यावर मोहित होऊन... ''
    ' नाही, मी गायलो ते माझ्या हौसेसाठी. जा, हे पैसे परत करून ये...' भीमसेनजी म्हणाले.
    मी वर येऊन वाडियाजींना भीमसेनजींचे म्हणणे सांगितले, तेव्हा ते म्हणाले, 'बाबा, हे तीन हजार तुझ्याजवळच राहू देत. पुण्याला त्यांना पोहोचवेपर्यंत तू त्यांच्या मिनतवाऱ्या कर आणि त्यांना हे अधिकचे पैसे घ्यायला लाव. यातच आम्हा सर्वांना आनंद आहे.'
    मी अनेक तऱ्हेने भीमसेनजींना विनवले; पण त्यांनी ते अधिकचे पैसे नाकारले. खरंतर त्यांच्या घरात अडचण होती. त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये होती. पण नाही, त्या सच्च्या कलावंताने मला शेवटपर्यंत नकार दिला.

    म. गो. उर्फ बाबा पाठक ......

    WhatsApp वरील संजीव वेलणकर यांच्या संगीत संगीत आणि फक्त संगीत या ग्रुप वर आलेला लेख साभार प्रकाशित.