(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • लग्न आणि आपला समाज

    काही दिवसापूर्वी एक लग्नपत्रिका माझ्या पाहण्यात आली. त्या लग्नपत्रिकेत वधू-वरांच्या नावासमोर कंसात त्यांच शिक्षणही लिहलेल होत. दोघांचही शिक्षण सारखंच होत मला वाटत त्यांच वय, समाजातील आर्थिक स्तर, जात-धर्म, रंग,उंची शारिरीक बांधा ही सारखाच असावा त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडी आणि व्यसनेही सारखी असावीत येथे व्यसने हा शब्द मी दारू वगैरे पिण्यासंदर्भात वापरलेला नाही. सांगायच तात्पर्य इतक लग्न ठरण्यापासून ते होईपर्यत समानतेला फारच मह्त्व आहे आपल्या समाजात म्ह्णूनच तर आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय एखाद्या तरूणीने घेतल्यास लोक नाक मुरडतात. 

  • ठाण्याचा कलादूत: नरेंद्र बेडेकर

    आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे.

  • मोरपीस

    मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस मोरपीस

  • अभिनेते कुमार दिघे

    कुमार दिघे यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९३३ रोजी कराची येथे सीकेपी कुटुंबात झाला .त्यांच्या आधीच्या चार पिढ्या कराची येथे रहात होत्या .फाळणीमुळे कुमार दिघे पुणे येथे आले व मामाच्या आश्रयाने राहू लागले .त्यांनी एस .पी .महाविद्यालयातूनएम .ए .पर्यंत शिक्षण पूर्ण केले .शिक्षण घेत असतानाच कुमार दिघे अभिनयाच्या क्षेत्राकडे आकर्षित झाले

  • महाराष्ट्रातील हेमांडपंती देवालये

    हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.

  • मराठी की मरींदी ?

    २७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजमाषा दिन ! सध्याच्या मराठी भाषेच्या स्थितीबद्दल मी लिहिलेला एक छोटा लेख दैनिक नवाकाळ मध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा लेख आपल्याला पाठवीत आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे.

    आपल्याला महाराष्ट्रातच " मराठी राजभाषा दिन" साजरा करावा लागतो हेच आधी मोठे दुर्दैव आहे. भाषावार प्रांत रचनेनंतर प्रत्येक राज्यात राज्यभाषेतून सर्व व्यवहार होऊ लागले. पण आपल्याकडे मात्र आधीपासूनच महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी यांचा संबंधच तोडून टाकण्याचे राजकारण रुजविले गेले. या सर्व प्रक्रियेमध्ये मराठी माणसांमध्येच मराठी भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होत गेला. इतर प्रांतीयांना मराठी भाषा समजणार नाही हे गृहीत धरून त्याच्याशी मुळातच मराठीत न बोलण्याची खोड मराठी माणसाला आहे. आपल्याच अशा वृत्तीमुळे मग बाहेरून येणारे कशाला मराठी शिकतायत? माझ्या ऑफिसमधील अन्य राज्यातून पहिल्यांदाच बदली होऊन आलेल्या माणसांना याचे आश्चर्य वाटायचे. ते म्हणायचे की येथे येतांना आम्ही अनेक मराठी शब्द पाठ करून आलो पण येथे आल्यावर बघतोय की मराठी माणसेच हिंदी बोलतायत. इथे आणखी एक उदाहरण देण्यासारखे आहे. अनेक श्रीमंत उच्चभ्रू गाडीवाले, आपल्याला मराठी अगदी अजिबात समजत नाही असा आव आणतात. पण या गाडीवाल्याने सिग्नल तोडला आणि आमच्या मराठी हवालदाराने त्यांना पकडले की हेच गाडीवाले , इतक्या छान मराठीत त्या हवालदाराला समजावतात ते ऐकून आपण अगदी अचंबित होतो.

    एकीकडे मराठी भाषिकांचीच अशी उदासीनता आणि न्यूनगंड आणि दुसरीकडे हिंदी भाषेचे आम्हीच ओढवून घेतलेले आक्रमण ! आपल्या महाराष्ट्र राज्यात इतर सर्व भाषिकही वर्षानुवर्षे स्थायिक आहेत. पण त्यांच्या भाषांनी या मराठी भाषेवर अशा पद्धतीने कधीच आक्रमण केलेलं नाही. या भाषांमधील कित्येक शब्द हे दुधात साखर मिसळून जावी तसे मराठीत विरघळून गेले. अशा पद्धतीने भाषाही वाढत असते - समृद्ध होत असते. पण हिंदीचे आक्रमण हे तंबूत घुसलेल्या उंटासारखे आहे. मूळ तंबू मालकालाच परागंदा करणारे आहे. यासाठी मी हिंदी भाषिकांना अजिबात दोष देणार नाही. कारण उद्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब अशा राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी भाषा बोलली गेली तर त्याचा मला, एक मराठी भाषिक म्हणून खूप आनंद होईल. वाईट वाटते ते आपल्याच राज्यात आम्हाला आमच्या भाषेबद्दल असलेला न्यूनगंड आणि आम्हीच स्वीकारलेले अन्य भाषांचे आक्रमण !
    सार्वजनिक ठिकाणी मराठी बोलायची आम्हाला लाज का वाटावी ? घटनेने दिलेले स्वातंत्र्य , भाषिक - प्रांतिक ऐक्य, आर्थिक राजधानी, मुंबई म्हणजे छोटा भारतच, हे काय फक्त मराठी माणसांनीच ऐकायचे ?

    जशी मराठी बोलायची आम्हाला लाज वाटते तसे आम्ही भाषेवरुनही आमच्यात तट पाडले आहेत. आम्ही एकदा ठरवायला हवे की शुद्ध किंवा योग्य मराठी कोणती ? राजकीय आधाराने विद्वान झालेले काही लेखक म्हणतात की जो कुणी जशी भाषा बोलेल, लिहील तीच शुद्ध मराठी.आता यावर काय बोलणार ? असे जगात कुठल्याही भाषेबाबतीत घडलेले नाही. एखाद्या भाषेत सतत बदल अपरिहार्यच असतात. पण मूळ भाषा म्हणून काहीतरी हवेच ना ? मराठी भाषेतही व्याकरणामध्ये , लिहिण्याच्या पद्धतीमध्ये , बोलण्यामध्ये आजवर असंख्य बदल झाले आहेत. आम्ही आमची ल आणि ख अशी दोन मुळाक्षरे आनंदाने बदलली. संगणक, अवकाश विज्ञान, अत्याधुनिक शास्त्रे यामध्ये अनाकलनीय आणि बोजड असे भाषांतरीत मराठी शब्द वापरण्यापेक्षा पेक्षा थेट मूळ शब्द वापरणे योग्य आहे. पण त्याच बरोबर गावांकडे शासकीय व्यवहारात शुद्ध मराठी भाषा अगदी सहज वापरली जाते हे देखील लक्ष्यात घ्यायला हवे.

    शुद्ध मराठी म्हणजे "ब्राह्मणी भाषा " असाही प्रचार केला जातो तो खूपच दुर्दैवी आहे. शुद्ध मराठी भाषा ही कुणाची मक्तेदारी नव्हे. अगदी पूर्वी देखील अनेक सुप्रसिद्ध मराठी लेखकांच्या पुस्तकांची छापखान्यात " प्रुफे " तपासणारे बहुतेक जण ब्राह्मणेतर असत. रोजच्या रोज ग्रामीण भागात वावरणारे हजारो शिक्षक अत्यंत शुद्ध मराठी बोलतात, उत्तम हस्ताक्षरात मराठी लिहितात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून खूप परिश्रम घेत असलेले हजारो मराठी भाषिक हे ब्राह्मणेतर आहेत. मग बेधडकपणे असा शिक्का मारणे हा या सर्व मंडळींचा अपमान नव्हे का?

    एखादा वक्ता उत्तम इंग्रजीत बोलत असतांना मधेच अनेक मराठी शब्द वापरतो का ? असे झाल्यास त्याला इंग्रजी नीट येत नसावे असा समज होतो. मग मराठी बोलत असतांना आपण शब्दच्या शब्द, वाक्येच्या वाक्ये इंग्रजीत का बोलतो ? आता तर मराठी बोलतांना इंग्रजी आणि हिंदी शब्दांचा वापर इतका वाढत चालला आहे की वाक्यात मराठी शब्द शोधायची वेळ येते. वृत्तपत्रातील अनेक जाहिराती या अत्यंत भीषण मराठी भाषेत असतात. मराठी संभाषणात वारंवार इंग्रजी शब्द वापरणे हा अनेकांना "स्मार्ट" होण्याचा मार्ग वाटतो.

    शब्दांचे टंकलेखन करतांना होणाऱ्या चुकांमुळे किंवा लिपी ( "फॉन्ट") च उपलब्ध नसल्यामुळे महत्वाच्या मराठी वृत्तपत्रांमधून काही चुकीचे मराठी शब्द कायमचे रूढ झाले आहेत. उदा. उद्धाटन ( उद्घाटन ), करणार्या ( करणाऱ्या ).

    चुकीच्या शब्दावर अनुस्वार देण्याची विकृती अलीकडेच फोफावत चालली आहे. मुबंई, जवांनाची, राजंहस, उंदड, जगंल, जंगदबा असे लिहिलेले शब्द वाचताही येत नाहीत.अनेक हिंदी शब्द थेट आयात केल्यामुळे अनेक उत्तम छटा असलेले मराठी शब्द कालबाह्य ठरत आहेत. योगदान हा एकच शब्द वापरून पूर्वीचे महत्वाचा वाटा, खारीचा वाटा, सिंहाचा वाटा हे शब्दच बाद झाले आहेत. आयाम या एका शब्दामुळे परिमाण, दिशा, छटा असे उत्तम शब्द बाद होत आहेत. यश ऐवजी यशस्विता, उपयोग ऐवजी उपयोगिता कधी आले ?

    मराठी वृत्त वाहिन्या आणि मालिका वाहिन्या आपल्या मराठी भाषेचे ज्या वेगाने आणि जे वैविध्यपूर्ण धिंडवडे काढतायत, ते पाहिल्यावर या वाहिन्या मराठी भाषेच्या शववाहिन्या ठरणार काय अशी भीती वाटू लागली आहे. हेराफेरी, पर्दाफाश, भांडाफोड, छेडछाड, तामझाम, करूयात / जाऊयात / पाहुयात, मोठा खुलासा ( गौप्यस्फोट ), हिरवी झेंडी दाखविली, जन्मदिवस ( वाढदिवस), प्रधानमंत्री ( पंतप्रधान ), रक्षामंत्री ( संरक्षण मंत्री),वित्तमंत्री (अर्थमंत्री) अशा एकाहून एक अगम्य / आगाऊ आणि भाडोत्री शब्दांनी ओसंडून वाहणारी मराठी भाषा सतत ऐकावी लागते. एखाद्या घटना स्थळावरून वार्ताहर जेव्हा, " हा रस्ता जो आहे, ही झाडे जी आहेत, इथली माणसे जी आहेत, वाहने जी आहेत " अशा मराठीत वर्णन करू लागतो तेव्हा आपणच अवाक होतो. काही मुख्य वाहिन्यांच्या निवेदकांना विदर्भ, विद्यार्थी, विद्यापीठ हे शब्द म्हणताच येत नाहीत. त्या ऐवजी ते अनुक्रमे विधर्ब, विध्यार्ती, विध्यापीठ असे म्हणतात. अशुद्ध, भ्रष्ट, भेसळयुक्त मराठीच्या महासागरात, नक्की योग्य काय हेच समजेनासे होते.

    एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ( जो तामिळ, कन्नड,बंगाली भाषांना आधीच लाभला आहे ) मिळविण्यासाठी अनेक मराठी भाषाप्रेमी खूप झटतायत ! तर दुसरीकडे ही अभिजात भाषा लिहिताना अनेक गोष्टी वेगाने विस्मृतीत जात आहेत. त्याबद्दलचे अज्ञान, अनेक शब्दच न वापरणे, अन्य भाषेतील पर्यायी शब्दांचा मुक्त वापर इ. गोष्टींमुळे हे घडत असावे.

    मराठी वाक्यांमध्ये हिंदी शब्दांचा वापर अधिकाधिक वाढत चालला आहे. काही दिवसांनी आपल्या वाक्यातील मराठी शब्द शोधावे लागतील. मराठी भाषेला मराठी म्हणण्याऐवजी "मरींदी " म्हणावे लागेल.

    आपण आत्ताच सावरायला हवे. सर्व भेद विसरून मराठी भाषेच्या भल्यासाठी एक व्हायला हवे. तरच या " मराठी राजभाषा दिन" साजरा करण्याला खरा अर्थ प्राप्त होईल.

    --मकरंद करंदीकर.
    ०२२-२६८४२४९०

  • भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ

    २० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’

  • महागाई कमी होणार तरी कधी ?

    देशातील महागाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तुरडाळीचे दर अव्वाच्या सव्वा वाढण्यापासून खर्‍या अर्थाने सुरू झालेलीमहागाई कांदे आणि दुधापर्यंत येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे हे सर्व सरकारला दिसत असूनही त्यावर ठोस उपाय होतानादिसत नाहीत. आठ रुपयांवर असणारा कांद्यांचा दर शंभर रुपयांवर न्यायचा आणि चाळीसवर आणल्यानंतर भाव कमी केलेम्हणून पाठ थोपटून घ्यायची असे सरकारचे धोरण आहे.

  • लाघवी मारू बिहाग

    माडीवर सारंगीचे सूर जुळत, तबलजी तबल्यावर हात साफ करायच्या प्रयत्नात आहे, खोलीतील दिवे हळूहळू मंद होत आहेत, आलेले रसिक मनगटावरील गजऱ्याचा सुगंध घेत आणि तोंडातील तांबुल सेवनाचा आनंद घेत आहेत. बाजूलाच पडलेला हुक्का आपल्याजवळ ओढून, एखादा रसिक, त्यातील सुगंधी तंबाकूचा स्वाद घेण्यात मश्गुल झाला आहे. तसे बघितले तर संध्याकाळ कधीचीच उलटलेली आहे परंतु नेहमीच्या मैफिलीतील मानिंद अजून आले नसल्याने, इतर रसिकांत किंचित चुळबुळ सुरु झाली आहे. खोलीत पसरलेल्या अलिशान लालजर्द गालिच्यावर, एका बाजूला अत्तरदाणी, दुसऱ्या बाजूला पिंकदाणी आणि तिसऱ्या टोकाला लवंगी,वेलची सहीत मांडलेला त्रिगुणी विड्याचा सरंजाम जारी होता. आजची शनिवार रात्र म्हणजे कधीही न संपणारी किंवा कधीतरी उत्तर रात्रीच्या पलीकडे संपणारी मैफिल!!
    काहीवेळाने प्रमुख गायिका आणि नृत्यांगना- चंद्रमुखी, आपल्या इतर सहेल्यांबरोबर मुख्य दिवाणखान्यात प्रवेश करतात आणि तो दिवाणखाना अचानक "जिवंत" होतो. सगळ्याच्याच नजरा, प्रमुख नृत्यांगनेच्या चेहऱ्यावर खिळलेल्या आणि याची, तिला अत्यंत सजग जाणीव!!
    कवी मर्ढेकरांच्या भाषेत मांडायचे झाल्यास,
    "लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
    सुंदरतेचा कसा इशारा;
    डोळ्यांमधल्या डाळिंबाचा
    सांग धरावा कैसा पारा!!
    इतक्यात, तिथे चुन्नीबाबू आणि आज त्यांच्या बरोबर आलेला नवीन "पाहुणा" यांचा प्रवेश होतो. मैफिलीची सगळी तयारी होते आणि गायिका सूर लावते …… "अब आगे तेरी मर्जी"!! तबला तर इतक्या लगेच टिपेच्या सुरात वाजतो की आजची मैफिल खास होणार, याची सगळ्यांना खात्री पटते. आपल्या लडिवाळ आविर्भावाने रसिकांची नजर आपल्याकडे खेचून, मैफिलीचा केंद्रबिंदू ठरवून टाकते.
    "दिलदार के कदमो में आ
    दिल डाल के नजराना,
    महफ़िल से उठा और ये कहने लगा दिवाना;
    अब आगे तेरी मर्जी, हो आगे तेरी मर्जी."
    आजच्या मारुबिहाग रागाची ओळख या गाण्याने आपल्याला या गाण्यातून मिळते. एस.डी. बर्मन, यांच्या अप्रतिम व्यासंगाची चुणूक दाखणारे गाणे. यात आणखी एक गंमत आहे. गाण्याच्या मध्यात, तबल्याचा लहानसा "तुकडा" आहे पण तो अशा रीतीने वाजवला आहे की त्यातून, सादर होणाऱ्या कथ्थक नृत्यातील, "तोडा" या अलंकाराची झलक दाखवतो, चित्रपट संगीतकाराचे हे आणखी व्यवच्छेदक लक्षण म्हणायला लागेल, शास्त्रीय संगीतातील किंवा कलेतील, नेमका "अर्क" शोधून, त्याचा आपल्या रचनेत बेमालूम समावेश करून, आपली रचना श्रीमंत करायची. तसे बारकाईने ऐकले तर, मारू बिहाग रागाचे चलन आणि या गाण्याचे चलन, यात थोडा भेद आहे परंतु तरी देखील, रागाच्या थोडी वेगळी ओळख करून घेण्यासाठी, या गाण्याचा आस्वाद घेणे योग्य ठरते.
    बिहाग रागाच्या प्रभावळीतील एक प्रमुख राग, उत्तर रात्रीचा समय, ग्रंथातून दिलेला आहे पण तरीही दिवसाच्या कुठल्याही प्रहरी मन लुभावून टाकण्याची असामान्य गोडी, या रागाच्या सुरांमध्ये आहे. "औडव-संपूर्ण" जातीच्या या रागात, आरोही स्वरसमुहात, "रिषभ" आणि "धैवत स्वर वर्ज्य आहेत तर अवरोहात संपूर्ण सप्तक ऐकायला मिळते. या रागाची खरी ओळख आपल्याला घडते, ती "तीव्र मध्यम" या सुराने. कधीकधी काही कलाकार, "शुद्ध मध्यम" स्वराचा उपयोग करतात पण ते अपवादात्मक. "म ग रे सा" किंवा "म ग म ग रे सा" ही स्वरसंहती या रागात फार उठून दिसते.
    आता इथे मला, भीमसेन जोशी यांनी सादर केलेला मारू बिहाग आठवला. " रसिया हो ना" ही ठाय लयीतील तर "तरपत रैना" ही द्रुत लयीतील बंदिश. ही रचना तशी फार पूर्वीची, म्हणजे तेंव्हा पंडितजी तरुण होते, त्यावेळची आहे. अर्थात, गायनावर, तरुणाईचा म्हणून एक खास ठसा दिसतो, विशेषत: आवाजाचा लगाव ऐकताना किंवा ताना ऐकताना, हे ऐकायला मिळते.
    रुंद, भरदार, मर्दानी आवाज. नावास साजेसा असा गरिमा. गरिमा म्हणजे ध्वनीचा लहान-मोठेपणा, हे परिमाण. तसे पाहता, हे तारता आणि ध्वनीवैशिष्ट्य या दोन इतर परिमाणापेक्षा जात्या कमी शक्यतांचे. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पायरी-पायरीने रागाची बढत करायची आणि असे ठरल्यावर गायनातील "स्वर" या अंगावर भर दिला जाणे अपरिहार्य!! याचा दुसरा परिणाम असा होतो, गाण्यातील शब्दांना गौणत्व प्राप्त होते!! भाषिक स्वरांपेक्षा व्यंजनांना उच्चारण्यात कमी श्वास लागतो. वेगळ्या शब्दात , त्यामुळे त्याच श्वासात अधिक काळ स्वरांचे काम दीर्घ पद्धतीने करता येते. किराणा घराण्यात, स्वरांभोवती रुंजी घालणे विशेष मानले जाते. पंडितजी, हेच तंत्र अनुसरतात. त्यामुळे आवाज, मांडणी आणि मांडणीसाठी निवडलेले राग, या सर्वांवर घुमारायुक्त अखंडता, याच तत्वाचा वरचष्मा गायनात दिसतो. तानक्रिया जाणवण्याइतकी द्रुत करून, त्यांचा आविष्कार करण्याचे तंत्र. गुंतागुंतीच्या, द्रुत, दीर्घ पल्ल्याच्या आणि ख्यालाची लय तशीच म्हणजे मुळचीच ठेवल्याने, अधिक द्रुत भासणाऱ्या अशा या ताना असतात. वरील रचनेत, या सगळ्या वैशिष्ट्यांचा आढळ आपल्या दिसेल.
    आता लताबाईंचे, या रागावर आधारित, "चिमुकला पाहुणा" या चित्रपटातील, "तुज साठी शंकरा" हे गाणे हे गाणे या रागावर आधारित आहे.
    "तुज साठी शंकरा, भिल्लीण मी झाले,
    धुंडीत तुज आले".
    संगीतकार स्नेहल भाटकर यांनी चाल बांधली आहे. खरतर स्नेहल भाटकर यांना, लायकीपेक्षा फार कमी यश मिळाले. अगदी हिंदीत देखील हाच प्रकार घडला. मुळात, हिंदी चित्रपटात मराठी संगीतकार फार कमी असतात (एकूण संख्येच्या दृष्टीने, मी हे विधान करीत आहे) असतात आणि त्यात मग संधी देखील त्यामानाने कमी मिळतात. अतिशय अभ्यासू, व्यासंगी संगीतकार पण उपेक्षेच्या खाईत विसरला गेला. हे गाणे केवळ गोड आहे, असे म्हणणे अर्धवट ठरेल. रागच अभ्यास करून, त्यातील नेमके सौंदर्य हेरून, त्यांनी ही "तर्ज" बांधली आहे.
    सुरवातीला जो मंद्र सप्तकातला आलाप आहे आणि त्याला जोडून, वरच्या सप्तकात जी आलापी आहे, तिथे हा राग सिद्ध होतो. लताबाईंच्या आवाजाचा तारता-पल्ला अतिशय विस्तृत आहे. त्यामुळे लयीच्या सर्व दिशांनी तिला, चपलगती चलन सहज शक्य आहे. याचाच वेगळा अर्थ, सगळ्या सप्तकात त्यांचा गळा सहज फिरतो. या आवाजातील आणखी प्रमुख जाणवणारे वैशिष्ट्य – प्रासादिकता!! रसिकांपर्यंत पोहोचणारे गाणे, हे नेहमी एका चाळणीतून गाळून येत असते!! त्यामुळे चाळणी काय गुणवत्तेची आहे, ते इथे महत्वाचे ठरते. याच प्रसादगुणांमुळे लताबाईंच्या आवाजातून जे गाणे ऐकायला मिळते, ते बव्हंशी अतिशय विशुध्द स्वरुपात मिळते, तिथे संगीत अपभ्रष्ट होण्याची शक्यता फार कमी आहे. संगीतकारांना याचा गुणाचा अधिक विशेष वाटत असतो. त्यांच्या ज्या रचना आहेत, त्यातील नेमकी गुणग्राहकता, लताबाईंच्या गळ्यातून तंतोतंतपणे रसिकांपर्यंत पोहोचणार, याची रचनाकारांना खात्रीच असते.दुसरे अनन्यसाधारण वैशिष्ट्य सांगता येते – लालित्य!! अनेकदा सर्व कळतं किंवा सौंदर्यात्म प्रयत्नांचे लक्षण म्हणून लालित्याचा उल्लेख केला जातो. कोणतीही कला किंवा शैली असो, तिथे याच शक्ती कार्यरत असतात. त्यामुळे, कुठल्याही कृतीचे, कलाकृतीत रुपांतर होते, तिथे लालित्य अवश्यमेव आढळतेच!! व्यापक कलानुभव आणि सांस्कृतिक अर्थपूर्णता, या दृष्टीने, लताबाईंच्या गळ्यातील “लालित्य” हा अवाक करणारा अनुभव आहे. वरील रचनेत, या सगळ्या बाबी अगदी नेमकेपणे आढळतात आणि गाणे कमालीचे श्रवणीय होते.
    या गाण्यात अशा कितीतरी "जागा" आहेत, ज्यांच्यावर लताबाईंची खास "मुद्रा" आहे. "नयनामधल्या जलगंगेला, दुख्ख: प्रीतीचे कथिले" खास ऐकण्यासारखी आहे. गाण्याची ओळ पट्टीत सुरु होते आणि लगेच "नयनामधल्या" शब्दानंतर जी आलापी आहे, ती खास ऐकण्यासारखी आहे. आलापीमधून त्या आलापीचाच विस्तार म्हणून दीर्घ तान आहे पण ती कशी आहे, हे समजून घेण्यासारखे आहे. किंचित "खंड" पाडून घेतली आहे. नंतर लगेच सरगम आहे आणि ती देखील बारकाईने ऐकायला हवी. गाण्यात, तान आणि सरगम यांचा मिलाफ घडणे आवश्यक असते. तान आणि त्याचे "स्पेलिंग" म्हणजे सरगम नव्हे!! तान आणि तिचा स्वरिक विस्तार म्हणजे सरगम, असा विचार अपेक्षित असतो आणि त्या विचाराचे प्रतिबिंब इथे बघायला मिळते. या गाण्याचा शेवट देखील असाच अप्रतिम आहे. "धुंडीत तुज आले" या शब्दांवर गाणे संपते पण तिथे ही ओळ वरच्या पट्टीत आहे आणि नंतर एकदम, मंद्र सप्तकात गाण्याचा शेवट होतो. हा शेवट, इतका "जीवघेणा" आहे, की स्वरांचा "ठेहराव", मनाचा ठाव घेतो.
    "सहेरा" चित्रपटातील "तुम तो प्यार हो" हे गाणे म्हणजे अखंड मारुबिहाग!! अगदी पहिल्या सुरापासून या रागाची पटते.
    "तुम तो प्यार हो सजनी,
    मुझे तुमसे प्यारा और ना कोई,
    तुम तो प्यार हो".
    संगीतकार रामलाल हा हिंदी चित्रपटसृष्टीत तसा मागे पडलेला संगीतकार परंतु या चित्रपटातील गाण्यांमुळे तो सगळ्यांच्या ध्यानात राहिला आहे. केरवा तालात बांधलेले गाणे तसे गायला अगदी सरळ, सोपे आहे. लयीला देखील फारसे अवघड नाही पण मुळात रागाच्या सुरांची अवीट गोडी, गानाय्च्या चालीत उतरली असल्याने, गाणे अतिशय श्रवणीय होते.
    "हे बंध रेशमाचे" या नाटकातील "का धरिला परदेस" हे गाणे या रागाची सुंदर ओळख करून देते. संगीतकार पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी, भावगीतसदृश चाल लावली आहे पण गाताना गायकीसाठी पुरेसा वाव आणि शक्यता निर्माण केली आहे. प्रसिद्ध गायिका बकुल पंडित यांनी, तशी फार थोडी गाणी गायली आहेत आणि त्या यादीत या गाण्याचे नाव फार वरच्या क्रमांकाने घ्यावे लागेल.
    "का धरिला परदेस, सजणी.
    श्रावण वैरी बरसे झिरमिर,
    चैन पडेना जीवा क्षणभर
    जावू कुठे, राहू कैसी
    घेऊ जोगीणवेश".
    कवियत्री शांता शेळक्यांनी कविता लिहिताना, साधारण नाट्यगीताच्या रचनेचा आराखडा डोळ्यासमोर मांडून नंतर(च) कविता लिहिली. अभिषेकी बुवा तर काव्याचा दांडगा अभ्यास करणारे, तेंव्हा कवितेतील आशय नेमकेपणाने जाणून घेऊन, त्यांनी या गाण्याची चाल बांधली आणि बकुल पंडित यांनी त्याला अतिशय योग्य असा न्याय दिला. गाण्याचे अवघे सोने झाले.
    -- अनिल गोविलकर

  • आता कुठे मला ते जाणवणार होते …

    आता कुठे मला ते जाणवनार होते …