(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • सन्मान निरलस नाट्यसेवेचा

    अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राम जाधव यांची झालेली निवड म्हणजे रंगभूमीच्या निरलस सेवेचा सन्मान आहे. बालपणीच नाट्यवेडाने झपाटलेल्या जाधव यांनी अभिनय, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये मोलाची कामगिरी बजावली. नाट्य चळवळीची परंपरा असणार्‍या अकोल्यात ही चळवळ अधिक रूजवण्यात आणि त्याद्वारे नाट्य व्यवसायाला बळकटी प्राप्त करुन देण्यात जाधवांचे योगदान मोलाचे आहे.

  • “जोखीम”

    आज संयोगिताची एका डोळा हसू आणि एका डोळा आसू अशी अवस्था होती. आज तिच्या लाडक्या एकुलत्या एक लेकीचं, मनूचं म्हणजेच मनस्वी सावंतचं लग्न होतं. मोठी मोठी मंडळी आली होती लग्नाला. लग्न पण मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होतं. तिची मनस्वी आज सावंत नाव मागे सोडून सौ. मनस्वी शार्दुल भोसले होणार होती आणि त्याचा संयोगिताला खूप अभिमान होता.

  • ढोल्या गणपती – नाशिक

    पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद, आणि विद्यमान नाशिक अशी चार नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. रामायणात नाशिक परिसरातील “पंचवटी” येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.

  • रिक्षावाल्याचा सुखद नकार

    सोलापूरहून अक्कलकोटला चालत जाण्याची कल्पना माझ्या मुलाने, विराजने अमलात आणली. त्याच्या मित्रांनाही तो घेऊन जात असे. मीपण एक शनिवार रविवार असा बेत ठरविला. शुक्रवारी रात्री सिद्धेश्वर एक्स्प्रेसने निघून सोलापूरला पहाटे उतरायचे,

  • गदिमांच्या ‘चोर बाजार’ पासून बनला गुरुदत्तचा ‘प्यासा’

    पंचवटीच्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते. फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या. त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले, 'या गुरुदत्तजी!'.

    हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता 'गुरुदत्त' आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते, 'माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखेंगे तो ये हमारा सौभाग्य होगा,हमारे लिये कोई स्टोरी हो तो बताईयेगा' गदिमा 'जरुर गुरुदत्तजी' इतकंच म्हणाले व कथा सांगायला सुरवात केली.

    'एक शायर असतो,त्याला शेरो शायरी चा खुप नाद असतो,पण त्याला फारशी किंमत कोणी देत नसते,तो अनेक प्रकाशकांच्या पायर्या चढतो पण त्याचे पुस्तक छापायलाच कोणी तयार होत नसते,शेवटी वैतागून तो आपल्या काही कविता रद्दित पण विकतो....

    'गदिमांची कथा हळू हळू रंगंत चालली होती व गुरुदत्त च्या चेहर्यावर संतुष्टीचे भाव स्पष्ट दिसत होते...'वा माडगूलकरजी बहोत खूब',असे म्हणून त्यांनी सहाय्यका कडून स्वतःचे चेकबुक घेतले व गदिमांच्या नावाने १०,००० रु चा चेक फाडला, 'माडगूलकरजी बहोत अच्छी स्टोरी हे ये,सुपरडुपर हिट तो होनी ही है,आपसे गुजारीश है के आप ये स्टोरी गुरुदत्त फिल्म के लीए लिखिये'.

    मराठी चित्रपटातून गदिमांची दिगंत किर्ती गुरुदत्त या बड्या निर्मात्या जवळ पोहोचली होती व आज हा हिंदी कलावंत गदिमांना साईन करत होता!.
    गदिमांनी होकार दिला,पुढे काही दिवस गेले गदिमांनी कथेवर काम सुरु केले,हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रथेप्रमाणे एक दिवस गुरुदत्तची स्टोरी डिपार्टमेंटची काही माणसे गदिमांजवळ आली,गदिमांबरोबर चर्चा केली व काही "मसालेदार" बदल सुचवले.आपल्या कथेत कोणी बदल केलेला गदिमांना आवडत नसे,एकदा सीता-स्वयंवर चित्रपटाच्या वेळी,अमराठी धंदेवाईक निर्मात्याने चक्क 'माडगूळकरजी सीतेच्या तोंडात एक फक्कड लावणी टाकूया' म्हणताच,गदिमांनी त्याचे थोबाड ज्या पद्धतीने रंगवीले असेल याची कल्पना न केलेलीच बरी!, तर सांगायचे असे की गुरुदत्तच्या धंदेवाईक टीमचे बदल गदिमांना रुचले नाहीत व त्यांनी त्याच वेळी गुरुदत्तने दिलेले १०,००० रु चेकने त्यांच्याकडे परत दिले व सांगितले की गुरुदत्तना कळवा की हे काम मी घेऊ शकत नाही!

    आपल्याला पोटापाण्यासाठी-पैशासाठी आपले साहित्य विकावे लागते याची गदिमांना खूप खंत होती पण त्यासाठी वाटेल ती तडजोड त्यांनी कधीच केली नाही.

    एका कवितेत ते म्हणतात

    'गीत हवे का गीत?,
    एका मोले विकतो
    घ्यारे विरह आणखी प्रित!......
    'याच कवितेत शेवटी म्हणतात'
    मी हसण्याने तुमच्या हसलो
    बोलू नये ते गूज बोललो,
    तुमच्या दारी रोजच बसणे
    माल मला खपवित..
    गीत हवे का गीत?'

    पुढे १-२ वर्षे गेली व सगळीकडे गुरुदत्त फिल्म चा नवा चित्रपट 'प्यासा' अशी पोस्टर्स झळकली,'प्यासा' ची कथा गदिमांचीच घेतलेली होती,पण त्याने गदिमांना याचे श्रेय कधीच दिले नाही, गुरुदत्त म्हंटल्यावर पहिले चित्रपटाचे नाव डोळ्यासमोर येते ते 'प्यासा' आणि याचे संपूर्ण श्रेय आपल्या गदिमांना आहे,गंमत म्हणजे गदिमांचा 'जोगीया' हा काव्यसंग्रह काढून पहा,पान १०६ ते ११७ अशी १२ पानांची 'चोर बाजार' नावाची गदिमांची दिर्घ कविता आहे ती 'प्यासा' ची कथा आहे, इतकेच काय कोणाला प्यासा चा दुसरा भाग काढायचा असला तरी पुढची स्टोरी तुम्हाला त्याच संग्रहात दुसर्या एका कवितेत मिळेल!

    मराठी चित्रपटसृष्टीचे भाग्य म्हणा की हिंदी चित्रपटसृष्टीचे दुदैव पण गदिमा त्या वातावरणात फारसे रमले नाहीत,गुरुदत्तने त्यांना श्रेय दिले नाही पण याऊलट स्क्रीन मासिकातून सजंय लिला भंसाळी यांनी एक खूलासा केला होता की अलिकडेच खूप गाजलेल्या 'अमिताभ बच्चन' व 'राणी मुखर्जी' यांच्या 'ब्लॅक' या चित्रपटाची मूळ कल्पना ग.दि.माडगूळकरांची होती,त्यांनी गदिमांना त्यांचे श्रेय दिले आहे.गदिमांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक कलाकृती दिल्या ,पण 'प्यासा' च्या गुरुदत्तना सुद्धा 'चोर बाजार' करावासा वाटला हे दुदैव!'

  • महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?

    महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ? असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर एकच...

    महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो... इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.

  • महाराष्ट्र दिन १ में २०११

    हे राष्ट्र असेच अभिमानाने जर सदा सर्वकाळ उभे ठेवायचे असेल तर आजच्या पिढीला त्याची काळजी घ्यावी लागेल.

  • सुधारणेचा लटका प्रयत्न (नशायात्रा – भाग ४०)

    मी पोलीस स्टेशन वरून पळून आल्यानंतर घरात जो हलकल्लोळ माजला होता त्याचे फलित हे झाले की त्या दिवशी रात्री मी सर्वांची माफी मागितली. ( अर्थात तेव्हा ब्राऊन शुगर पिऊन झाली होती , टर्की नव्हती म्हणून ही पश्चात बुद्धी होती , अनेक व्यसनी असे नेहमी करतात , काही मोठी भानगड , भांडण , किवा मोठी चूक केली की ते तात्पुरते माफी मागतात , काही दिवस शांततेने जगतात अर्थात व्यसन बंदच असते असे नाही पण ते घरी त्रास देणे बंद करतात काही काळ ) व या पुढे चांगला वागेन असे वचन दिले . मनाशी देखील मी हे ठरवले होते की आता एखादी नोकरी शोधली पाहिजे जेणेकरून आपला खर्च आपल्याला स्वतःला करता येईल .

    माझा ऐक जिवलग मित्र होता भीमा डावरे म्हणून तो विष्णुनगर च्या पलीकडे असलेल्या दलित वस्तीत राहत असे , आठवी पासून तो माझा मित्र होता . भीमाचे वडील लहानपणीच गेले होते , मोठा भाऊ व त्याच्या पत्नी मुलांसोबत भीमा व त्याची आई राहत असे . मोठा भाऊ प्रेस मध्ये नोकरीला होता मात्र त्याच्या भावाला एकंदरीत ५ मुली होत्या व तुटपुंज्या पगारात सर्व कारभार चालला होता . भीमा जरी माझ्यासोबत नेहमी राहत असला तरी त्याचे ऐक वैशिष्ट्य असे की त्याने आमच्या कोणत्याही मवाली पणात अथवा व्यसनात भाग घेतला नव्हता , उलट तो आम्हाला समजावून सांगे व्यसन करू नका म्हणून , आम्ही त्याला अनेकवेळा अनेक प्रकारे व्यसनाचा आग्रह करूनही तो सोवळा राहिला होता .कित्येक वेळा तो कुतूहल म्हणून आमची चिलीम साफ करून देत असे , किवा एखादे वेळी सिगरेट मध्ये गांजा भरून देत असे पण कधी त्याने व्यसन केले नाही हे कौतुकास्पद होते

    म्हणजे आम्ही सगळे मित्र व्यसनी आणि सतत आमच्यात राहूनही स्वतःला कोणतेही व्यसन न लावून घेतलेला भीमा म्हणजे ऐक आश्चर्य होते . भीमा नेहमी माझ्या घरी आभ्यास वगैरे निमित्ताने असायचा , आईने मला सांगितलेली अनेक कामे मी भिमावर ढकलत असे , उदा . सिलेंडर साठी नंबर लावणे , दुकानातून किराणा समान घेऊन येणे वगैरे . आई नेहमी म्हणत असे की तुझ्याऐवजी भीमा माझा मुलगा हवा होता इतका प्रेमळ आणि नम्र व गुणी होता तो .( गेल्या अनेक वर्षात भीमा भेटलेला नाही , तो मुंबई ला कोणत्यातरी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे असे समजले आहे ).

    तर या भीमा सारखे आता वागायचे असे मी ठरवले होते व तसे वचन देखील दिले होते सर्वाना . दुसऱ्या दिवशी पासून मी भिमासोबत नोकरी शोधू लागलो , अर्थात नोकरी शोधण्याच्या निमित्ताने व आता चांगला वागतो असे म्हणून आईकडून थोडेफार पैसे उकळतच होतो व त्यात नशा भागवत होतो कसातरी .त्या पोलीस स्टेशनच्या प्रकरणानंतर मोठा भाऊ मला जरा टरकूनच होता , त्याला जरी नंतर मी काही बोललो नव्हतो तरी त्याच्या मित्रांनी बहुधा त्याला शहाणपणाचा सल्ला दिला असावा की तू तुषार च्या भानगडीत पडू नकोस , तो उगाच तुला काहीतरी इजा करेल ,त्यामूळे असावे कदाचित तो आता माझ्या बाबतीत फारसे बोलत नसे अर्थात त्याची माझ्यावर नजर होतीच फक्त त्याने बोलणे कमी केले होते इतकेच .

    एकदा अशीच ऐक जाहिरात आली होती स्थानिक दैनिकात ' प्रचारक हवेत ' या आशयाची . नाशिक मध्ये उंट छाप बिडीचे उत्पादन होते त्याचे मालक बस्तीराम नारायणदास सारडा हे होते , त्या समूहाची ही जाहिरात होती ' उंट ' छाप बिडी चा गावोगावी प्रसार आणि प्रचार व विक्री वाढवण्यासाठी हे ' प्रचारक पद ' होते , त्यात उमेदवाराला गायन , अभिनय , ई बाबतीत प्राविण्य असावे असा उल्लेख होता म्हणून मी भीमा सोबत तेथे मुलाखतीला गेलो श्री . पाडेकर साहेब म्हणून होते मुलाखत घ्यायला ( हे पाडेकर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात वावरणारे होते ) मुलाखतीच्या वेळी त्यांनी मला कविता म्हणून दाखव , गाणे म्हणून दाखव , कविता कर , असे प्रश्न विचारले तसेच एखादा अभिनय करून दाखवण्यास सांगितले मी त्यावेळी त्यांना नट सम्राट मधील ' घर देता का कुणी घर ' हा भाग करून दाखवला होता . त्यांनी लगेच माझी निवड केली प्रचारक पदासाठी . भीमा त्या वेळी एका ठिकाणी पार्टटाईम नोकरी करतच होता त्यामूळे त्याने काही मुलाखत दिली नाही . तर आता मी नोकरी करणार होतो , चांगला वागणार होतो भीमा सारखा म्हणून घरची मंडळी खुश होती . कामावर हजर व्हायला अजून ऐक आठवडा बाकी होता तो पर्यंत मग आईकडून निर्विघ्न पैसे मिळत गेले मला .

    मी व्यसन बंद केले नव्हते तर फक्त आता जरा सांभाळून व्यसन करत होतो इतकेच , आईने देखील घडल्या प्रकारचा धसका घेतला होता म्हणून ती मला बिनदिक्कत पैसे देत असे . माझ्या नोकरीचा दिवस उजाडला आणि मी सकाळी सकाळी मी माझा ब्राऊन शुगर चा डोस घेऊन कामावर हजर झालो पहिल्या दिवशी मला फक्त कामाचे स्वरूप समजावून सांगण्यात आले , नंतर सातपूर येथे असलेल्या उंट बिडीचे उत्पादन जेथे चालते तेथील कारखान्यात नेण्यात आले , बिडीची पाने वळून त्यात तंबाखू कशी भरली जाते , तंबाखूवर कशी प्रक्रिया होते ते सारे मी पहिले . मग उद्या पासून तुला मलकापूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागेल असे सांगितले गेले . प्रशिक्षण म्हणजे उंट विडीचा प्रचार करणारी ऐक व्हँन होती त्या व्हँन सोबत मला जायचे होते त्या गाडीवर वर भोंगे लावलेले होते , ऐक मँनेजर , ऐक प्रचारक , ऐक सहायक , चालक आणि त्याचा सहायक अशी टीम सुमारे १ आठवडा ते १५ दिवस अश्या दौऱ्यावर जात असे , त्या दोऱ्यात गावोगावी जाऊन उंट बिडीचा प्रचार करणे , तेथील व्यापाऱ्यांना बिडी सप्लाय करणे , विक्री वाढण्यास मदत करणे असे काम असे , सगळी टीम एखाद्या स्थानिक लॉज वर मुक्काम करत असे , आम्हाला जेवणाचा भत्ता मिळत असे . मी ज्या गाडीबरोबर प्रशीक्षणासाठी जाणार होतो त्या गाडीचे व्यवस्थापक आणि प्रचारक यांच्याशी माझी ओळख करून देण्यात आली , त्यांनी मला त्यांचे काही अनुभव सांगितले . व दुसऱ्या दिवशी मी प्रशिक्षणासाठी जाण्यास सज्ज झालो . रात्रीच माझा ब्राऊन शुगर चा दोन दिवसांचा स्टॉक मी घेऊन ठेवला होता .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

  • निघाली घुमानची गाडी..

    कदाचित पुढचं साहित्य संमेलन “फुकट” करुन घेण्यासाठी थेट “फुकेट”लाच ठेवतील. चला फुकटात फुकेत ची वारी करायला…

  • जमली गट्टी

    चाफा बोलेना ….. या गाण्याच्या चालीवर रचलेली ही कविता…..