मला आश्चर्य वाटायचं. सुखवस्तू आणि झोपडीतली माणसं,माणूस म्हणून सगळे सारखेच. आम्हाला जेवढं मिळतं ते कमीच वाटतं. त्या सुखाचे ही अनंत प्रकार. सगळंच हवं असतं. आणि हा रामकृष्ण, इतके वय झालेला. अजून कष्ट करतो तेही विनातक्रार.आला दिवस कसा जाईल अशा परिस्थितीत हा इतका संतुष्ट कसा?
माझे नुकतेच लग्न झाले होते. मी मे महिन्याच्या अश्याच एका गरम दुपारी आपल्या वडिलांसोबत थंडगार पन्हे पीत बसलो होतो. मार्च मध्ये माझे लग्न झाले होते आणि माझ्या वडिलांनी माझ्यात झालेले बदल अनुभवले होते. मी मित्रांना टाळत होतो, भेटी कमी झाल्या होत्या. बायको सोबत गुलुगुलु बोलणे हा माझा आवडीचा विषय झाला होता. मित्रांना टाळून आम्ही सिनेमाला जात होतो.
पन्हे पितांना वडील म्हणाले, अरे मी सांगतो म्हणून ऐक, पण मित्रांना भेटत जा, त्यांना टाळू नकोस. जसे तुझे वय वाढेल तशी तुला मित्रांची जास्त गरज भासेल.
मला जरा गंमतच वाटली. माझ लग्न झाले होते आणि आम्ही दोघेही अडल्ट होतो, आम्ही परिवार सुरू करणार होतो आणि माझा परिवार माझी काळजी घेणार हे मला माहीत होते. पण तरीही मी वडिलांचा सल्ला मानला. आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतर मला काही गोष्टी रियालाईझ झाल्या आहेत.
१.पैसे आले आणि गेले
२.खराब वेळ आली गेली
३.पिल्ले घरट्यातून उडून गेली
४.नोकरी गेली आणि परत मिळाली
५.भौतिक आकर्षणे कमी झाली
६.आप्त गेले
७.आयुष्याशी रॅट रेस संपली
८.धावायची इच्छा कमी झाली
सगळं बदललं पण खरे मित्र बदलले नाहीत. पश्या पश्याच राहिला, घोड्याचा कधी बिपिन झाला नाही, देशपांड्याचा कधी मिस्टर देशपांडे झाला नाही, सँडीचा संदीप झाला नाही, मोरेचा आशय झाला नाही, सुज्याचा सुजीत झाला नाही, आशुचा आशुतोष झाला नाही तर फांज्याचा गिरीश झाला नाही. नम्या नम्याच राहिला, नमीत झाला नाही. संजय नाव कधी आवड्ले नाही, संजूची गोडी नाही त्यात. मंगेश दादाच राहिला त्याच दुसरे रूप कधी दिसलेच नाही. आम्ही सगळे एकत्र धावलो, काही मागे राहिले तर काही रेस जिंकले पण मेडल पोडीयमवर आम्ही सगळेच होतो.
आईवडिल, भाऊ बहीण, लेकरं यांची काळजी तर घ्याच पण मित्रांना जपा. सच्चे मित्रच तुमचे असतात, कारण त्यांना " अबे तू ...............है " हे सांगायला कोणतेही दडपण नसते.
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.
राशी :- मिथुन
स्वामी :- बुध
देवता :- केशव
जप मंत्र :- ॐ क्रीं केशवाय नमः
उपास्यदेव :- श्री कुबेर
रत्न :- पाचू
जन्माक्षर :- क कृ का कि की कु कू घघृ घा ड छ छा के कौ ह हा ह् मिथुन राशीवर बुध (ज्योतिष) ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासु वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.
दुर्ग नावाच्या उन्मत्त महाबलाढय असुराचा निर्दालन केल्यामुळ देवीला दुर्गा हे नाव पडले. सृष्टीच्या कल्याणाच्या हेतुने शिवशंभूच्याच ईच्छेने, श्रीविष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे शरीर खंडीत केले. छिन्नविछिन्न शरिराचे भाग ज्या-ज्या ठिकाणी पडले, त्या-त्या ठिकाणी शक्तीपिठांची निर्मिती झाली.
Dating ची संकल्पना ही वैचारीक आणि एका मर्यादेपर्यंत भावनिक स्वातंत्र्याला मान्यता देते.पाश्चिमात्य लोकानी त्यांच्या संस्कृती, सामाजिक, कौटूंबीक जडन घडन इतकी बदलून टाकली की त्या ठिकाणी कुणाच्याही विचारांना, भावनेला आणि म्हणून वागण्याला पायबंद राहात नाही.
जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात.
रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे स्थानिक मंत्री, नेते, शेपुट खाली घालून पक्षावर आणि श्रेष्ठींवर पूर्ण निष्ठा असल्याचे जाहिर करतात. त्याचबरोबर काही जोकर आपल्या कोलांट्या उड्या मारत नेतेगिरी करत असतात. पण कधीतरी हेच जोकर हुकमाचा एक्का बनतात.
काश्मिरपासून कन्याकुमारी, गुजरातपासून नागालैंडपर्यंत ह्या सर्कसचा तंबू असतो. मतदार नामक प्रेक्षक त्याच्या नावाने चाललेली ही सर्कस उर्फ ग्रामीण भाषेत तमाशा बघत असतो.
सर्कसरूपी तमाशाचा मतदार मुख्य खांब असतो. या सर्कसची जाहिरात ढोल ताशे वाजवुन करण्याचे काम लोकशाहीचा चौथा खांब असलेले पेपरवाले, टी व्ही वाले करत असतात.
-- विनोद सुर्वे
कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला.
गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेले शीतयुद्ध अलीकडेच वाढले. नोबेल शांतता पुरस्कारआणिचलनदराच्या प्रश्नावर या दोन देशांमध्ये अलीकडे संघर्ष झाला. या दोन प्रश्नात चलनदराचा प्रश्न अधिक महत्त्वाचा. चलनदरवाढवण्याची मागणी चीन मान्य करत नाही तोपर्यंत आर्थिक मंदीतून वर येणे अमेरिकेसाठी अवघड ठरणार आहे. अर्थकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात चीनचा प्रभाव वाढत आहे.
अध्यात्म ‘ मोक्षप्राप्तीच्या मार्गातली धोंड म्हणून तिचा उल्लेख करतं, पुरुषाच्या ध्येयप्राप्तीमध्ये स्त्री ही अडथळा आणते कारण तिला पुरुष हवा असतो तो ऐहिकसुखात कालक्रमण करण्यासाठी, असं काही सामाजिक महत्त्वाच्या कादंबऱ्यांमध्ये म्हटलं आहे. पण हे कितपत खरंय? उलट त्याग, समर्पण आणि ज्याच्याबरोबर सात पावलं चालली त्याला त्याच्या सगळ्या मार्गावर आजन्म साथ देण्याची तयारी यासाठीच तर भारतीय स्त्रिया प्रसिद्ध आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti